Saturday, November 16, 2019

विनोद तिवारी, वॉटरटेक २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलच्या दौऱ्यावर

विनोद तिवारी, वॉटरटेक २०१९  मध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलच्या दौऱ्यावर 
दिनांक- 16 नोव्हेंबर २०१९
अर्थव्यवस्था व उद्योग व व्यापार व इस्त्राईल राज्य आर्थिक मंत्रालयाच्या निमंत्रणावरून, सदस्य कायदा व भूजल श्री विनोद तिवारी १८ रोजी होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शन व परिषद वॉटरटेक २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी इस्राईलच्या दौर्‍यावर जात आहेत. इस्राईलमधील तेल अवीव येथे १८ ते २१ नोव्हेंबर हि परिषद होत आहे . विनोद तिवारी  महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या प्रतिनिधीमंडळाचा एक भाग आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री (जलसंपदा), भारत सरकार श्री. गजेंद्र शेखावत हे इस्रायलमधील  वॉटरटेक २०१९ मध्ये साठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
वॉटरटेक २०१९ मध्ये जलसंपतेचे किमान वापर व संरक्षण यासाठी जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रयन्तांचे  भाग आहे  वॉटरटेक २०१९ मध्ये जगभरातील धोरणकर्ते, उद्योग नेते, व्यवसाय अधिकारी, संशोधक आणि राजकीय निर्णय घेणारे एकत्रयेणार आहेत 
वॉटरटेक २०१९ मध्ये कार्यशाळा, गोलमेज आणि सर्व सहभागींच्या बर्‍याच संवादासह पॅनेल चर्चा समाविष्ट करणारे सत्र. २०१७ मध्ये झालेल्या अंतिम डब्ल्यूएटीईसी इस्त्राईल कार्यक्रमात ९०  देशांतील १०,००० हून अधिक अभ्यागतांनी हजेरी लावली होती  . यंदाचे अर्थव्यवस्था व उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून इस्रायलचे राज्य नवीनतम घडामोडी व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी पहिल्यांदाच एक परस्परसंवादी प्रदर्शन क्षेत्र सादर करीत आहे. पाण्याचे डिजिटल व्यवस्थापन ; सोल्युशन्स ३६० डीग्री आणि सर्वमान्य पर्याय यावर प्रस्ताव चर्चेला येणार आहेत . 
श्री तिवारी इस्त्राईलमधील जलसंपता  क्षेत्रातील कल्पकतेची स्थिती समजून घेण्यासाठी क्षेत्रीय भेटी घेणार आहेत.
महाराष्ट्र जल जलसंपत्ती नियामक प्राधिकरण (एमडब्ल्यूआरआरए), महाराष्ट्रातील जल क्षेत्रामधील एक वैधानिक प्राधिकरण जलशक्ती मंत्रालय (जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान) भारत सरकारतर्फे स्थापित करण्यात आली आहे त्यांना राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नियोजनाच्या कामात केलेल्या कामगीरी बद्दल देण्यात आला आहे यामध्ये एमडब्ल्यूआरआर ए राज्य भूजल प्राधिकरण महाराष्ट्र राज्यातील जलसंपत्तीचा शाश्वत, न्याय्य व न्याय्य वापर करण्याच्या उत्तम पद्धतींचा उपयोग करण्यासाठी नियोजन करणारी एकेमव संस्था आहे 
महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) तरतूदी अंतर्गत एमडब्ल्यूआरआर ए राज्य भूजल प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे आणि श्री. तिवारी हे भारतातील पर्यावरण विषयाचे विधी कायदेशीर  अभ्यासक असून राज्याचे भूजल रिसोर्सेस प्राधिकरणाचे प्रभारी सदयस  देखील आहेत.

================
Vinod Tiwari, to  visit  Israel to participate in WATEC 2019
Dated- 16 Nov.2019 
On the invitation of  Ministry of Economy & Industry and Trade and Economic Mission of State of Israel , Mr. Vinod Tiwari, Member Law & Ground Water is visiting Israel to participate in WATEC 2019, an international professional exhibition and conference which will take place on 18-21 November in Tel Aviv, Israel. He is part of delegation of Maharashtra Water Resourses Regulatory Authority. Union Minister for Jalshakti ( Water Resourses), Govt of India Shri. Gajendra Shekhawat is heading Indian delegation for WATEC, 2019 in Israel.

The focus of WATEC 2019 is “Water Stewardship and Innovation - driving global leadership in the responsible planning management, and protection of water”.  WATEC Israel 2019 brings together policy makers, industry leaders, business executives, researchers, and political decision makers from around the world. 

Sessions that incorporate workshops, roundtables and panel discussions with much interaction from all participants. More than 10,000 visitors from 90 countries attended the last WATEC Israel event held in 2017. This year State of Israel thru it's Ministry of Economy & Industry is introducing a first-of-a-kind interactive display area, to showcase the latest developments and technologies: Digital Water; Solutions 3600 and Mainstream. This year we leverage Israel's global position as 'the water start-up nation' to jolt forward water technology for generations to come.

Mr. Tiwari will also be carrying out field visits to understand state of art innovation in Water Resourses Sector in Israel.

Maharashtra Water Resourses Regulatory Authority ( MWRRA), a Statutory authority in Water Sector in Maharashtra is the Winner of First position in National Water Awards, 2018 instituted by Govt of India thru Ministry of Jalshakti ( Water Resourses, River Development & Ganga Rejuvenation ) and planned to introduce best practices in sustainable, juditious & equitable use of Water Resourses in State of Maharashtra.  

MWRRA is also functioning as State Groundwater Authority under the Provisions of Maharashtra Groundwater ( Development & Management ) Act and Mr. Tiwari is also in charge of Ground Water Resourses Authority for the State.
==========================================================

Monday, November 4, 2019

भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीची करु नये माती..-किशोर तिवारी


भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी  महायुतीची करु नये माती..-किशोर तिवारी
किशोर तिवारी, 
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )
+919422108846
kishortiwari@gmail.com

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांची महायुती एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेली. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात युती ने निवडणूक रिंगणात उतरून प्रचंड यश मिळविले. त्या पूर्वी मातोश्री वर झालेल्या सविस्तर बोलणीत ५०:५० चा फॉर्म्युला ठरला होता. 
विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासप प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांतीचे संघटनाप्रमुख सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटना प्रमुख विनायक मेटे हे सर्व महायुतीचे नेते एकत्र निवडणूक प्रचार करीत होते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बांद्रा बीकेसी येथील मैदानात झालेल्या महायुतीच्या विराट सभेत उद्धव जी ठाकरे, रामदास आठवलेंसहीत भाजप शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी एकजुट दाखविली होती. लोकांनी विश्वास दाखवीत युती ला बहुमत दिले. हे यश कांहीं एकट्या भाजपचे नव्हते. शिव सेना व महायुती च्या इतरही घटक पक्षांचे ते संयुक्त यश होते, हे सर्वांना मान्य करावेच लागेल.
तीन दशकांपासून शिवसेना भाजपची युती अभेद्य असल्याचे अभिवचन देत,आमच्या महायुतीला महाराष्ट्राच्या हितासाठी विजयी करा, असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. महायुतीची अभेद्य एकजुट विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडी असा राज्यात सामना रंगला. 
निवडणुकीत २२५ च्या वर जागा मिळतील असा विश्वास ठेवणाऱ्या भाजप ला १०५ आणि शिवसेना ५६ जागा मिळून अपेक्षित यश जरी मिळू शकेल नाही तरी १६१ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवित निवडणूकीचा सामना महायुतीने जिंकला. महायुतीच्या बाजूने जनतेने आपला कौल दिला. महायुतीला १६१ जागांचा स्पष्ट बहुमतांचा जनादेश मिळाला. 
पण हा जनादेश मान्य करुन विजय उत्सव महायुतीच्या नेत्यांना आणि आमदारांना मनापासून आनंद साजरा करता आला नाही. याचे काय कारण असेल याचा विचार केला तर भाजप मधील मुख्यमंत्री पदाची व पूर्ण सत्ता निरंकुश पणें काबीज करून प्रभुत्व गाजविणे ही वृत्ती हे एकमेव कारण समोर येते. गेली पाच वर्षे शिवसेना चे ६३ आमदार भाजपसोबत होते. भाजपचा जोडीदार भागीदार, भाऊ म्हणून राज्यकारभार करण्यात शिवसेना भाजप ला साथ देत होती . मागील विधानसभा निवडणुक २०१४ मध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि नंतर सत्तेत एकत्र आले. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती करुन एकत्र लढले आणि निवडून आल्यावर पुन्हा वेगळे होण्याचे चिन्ह दिसत आहे. सत्तेत ५०:५० चा वाटा लोकसभेच्या निवडणुकीतच ठरला असताना आता मात्र सरळ नाकारणे, सध्या चर्चेला ही तयार नसणे व मुख्यमंत्रीपदासाठी १००% कब्जा सांगणे, हे युती धर्माला अशोभनीय आहेच पण वरुण शिवसेनेला दोष देत मीडिया मध्ये नकारात्मक संदेश देणे, हे फार क्लेशदायक आहे. दि. २४ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. येत्या गुरुवारी दि. ८ नोव्हेंबरला निकाल लागून १५ दिवस पूर्ण होतील. तोपर्यंत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, असे कोणतेही लक्षण दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांचे जणू जहाल द्वंद्व पेटलेले आहे, असे मीडिया मध्ये अंकित करणे, युती धर्माला तिलांजली देणेच आहे ! दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लोभा पोटी भाजपा पार युती धर्म विसरुन गेलेत की आपण एकत्र युती करुन जनतेसमोर मतांचा जोगवा मागायला गेलो होतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महायुतीच्या हाती सत्ता द्या, ही जनतेसमोर केलेली याचना भाजप नेते विसरले आहेत. महाआघाडीपेक्षा महायुती बरी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला. पुन्हा महायुतीला सरकार स्थापन करण्याची संधी दिली.भाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेच्या हव्यासाची एवढी धुंदी आहे की त्यांना शिवसेने चे अथक परिश्रम व जनतेने युती म्हणून दिलेली सुवर्ण संधी दिसत नाही. ५०:५० चा जग जाहीर केलेला सर्व मान्य फॉर्म्युला पाळून सरकार स्थापन करायची मिळालेली संधी, हे नेते वाया घालवित आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी  भाजप च्या हव्यासाचे द्वंद्व एवढे पेटले आहे की तीन दशकांच्या युतीची माती होते की काय अशी शंका येते. सोन्यासारख्या महायुतीची होत असलेली माती पाहून भाजपाच्या या गंभीर विषय पुढे महाराष्ट्राच्या जनतेने कपाळाला हात लावला आहे. महायुतीला पुन्हा सरकार स्थापन करण्याची महाराष्ट्राच्या जनतेने संधी दिली मात्र हे मुठ भर नेते इतके करंटे निपजलेले पाहून त्यांना ज्यांनी मतदान केले त्यांना निश्चित पश्चाताप होत असेल. म्हणूनच राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी खर्‍या अर्थाने वरिष्ठांनी हस्तक्षेप करावा,असे मी आवाहन केले आहे.
युतीला मिळालेले यश एकट्या भाजपचे नाही म्हणुनच सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी अत्यंत सरळ मार्ग म्हणजे ५०:५० चा जग जाहीर सर्व मान्य फॉर्मुला ..! कारण दोन्ही पक्ष महायुतीतून एकत्र निवडणूक लढले, त्यात भाजपला १०५ जागा जिंकता आल्या. त्यामुळे तो मोठा पक्ष ठरत नाही. पूर्वी जो फॉर्म्युला मान्य केला आहे, तो  भाजपला युती धर्म म्हणून मानावाचं लागेल. त्यात कांहीं कमी पणा नाही. एक जुना भरवश्याचा सहकारी पक्ष म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मान त्याचबरोबर मंत्रीमंडळाचे खातेवाटप करताना शिवसेनेला महत्वाची खाती आणि सम समान मंत्रीपदे देण्यात काहीच गैर नाही. किंबहुना त्यात भाजपची प्रतिमा उंचावेल. मात्र ते पाळणे सोडून आता शिवसेनेला मीडिया व जगासमोर खलनायक सिध्द करण्यासाठी शक्ती खर्ची करण्यात धन्यता कसली ? 
निवडणुकीचे वेळेस भाजप जनतेसमोर "आमचं ठरलंय - आमचं ठरलंय" असे ओरडून सांगत होती. या नेत्यांना जनतेचा सवाल आहे तुमचं नक्की काय ठरलंय? निवडणुकी नंतर शब्द फिरवून भांडायचं ठरलंय की एकत्र सरकार चालवायंच ठरलंय? "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटली होती , तो धागा पकडून आता सर्व राज्यभर पुन्हा देवेंद्रचा नारा दिला. शिवसेनेच्या अथक परिश्रमातून महायुतीने निवडणूका लढल्या आणि जिंकल्या. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला कळले की आपण खोदलेल्या खड्ड्यात १०५ वर आऊट झालो आहोत. शिवसेना चे ५६ शिलेदार असल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. ही अडचण ओळखून तरी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे सोडून बंडखोरीची तलवार उपसली. पुन्हा देवेंद्र म्हणून मीडिया मधे द्वंद्व सुरु करून शिवसेनेला खलनायक ठरविले जात आहे. हे  अनाकलनिय व अशोभनीय आहे.  
संजय राऊत शिवसेनेचे योद्धे हाती लेखणीची तलवार आणि जिव्हेतून वाक्बाण भाजपवर चालवू लागले, तर आता यांना आग होत आहे.  दोन्ही कडून घनघोर युद्ध सुरु आहे, असे भासवून ५०:५० च्या सर्व मान्य जग जाहीर फॉर्म्युला वर चादर झाकणे सुरू आहे. मुख्यमंत्रीपद लक्ष्य आहे. मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून अक्षरशः करो या मरो या आवेशात ते लढत आहेत. भाजपाची मुख्यमंत्रीपदाची लालसा व महत्वाकांक्षा आम्हाला मान्य आहे, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेशी जे लढणे सुरु आहे ते लढणे नसून कपटी डाव आहे. 
मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून चालविलेला रडीचा डाव थांबवावा. 
५०:५० फॉर्म्युला मान्य नव्हता तर व पुन्हा द्वंद्व करायचे होते तर निवडणूक प्रचारापूर्वीच घोषित करायच होत. "आमचं ठरलंय!!" हे कोड्यात बोलण्यापेक्षा "काय ठरलं?" ते तेव्हाच निवडणूक प्रचारात भाजपने स्पष्ट करायला पाहिजे होते. मुख्यमंत्रीपदाची आपली महत्वकांक्षा देवेंद्रने "आमचं जमल!!" या घोषणेच्या पदराआड लपू द्यायची नव्हती. "काय ठरलं" ते लेखी घेऊन जनतेसमोर मांडायचे होते. अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजपने वाटून घेण्याचे ठरले होते. आता म्हणायचं "मुख्यमंत्रीपदाबाबत असे ठरलेच नव्हते " हे किती लज्जास्पद आहे. त्यानंतर बहुमतासाठी आपल्या परीने आकडे जमविण्याचा आकड्यांचा खेळ सुरु करणे, सत्तेचा वापर करून अपक्षाना खुट्याशी बांधणे, चक्क भाई ठाकूर शी हात मिळविणे, असुरुद्दिन ओवैसी ला ओवाळणी घालणे व  बहुमताच्या आकड्यांच्या खेळात शिवसेना कशी खलनायक आहे,हे मीडिया मधून जगासमोर नकारात्मक अंकित करणे, हे सर्व युती धर्म सोडून वागणे नव्हे काय ? निवडणूक झाली की शिवसेना भाजपमधला संवाद संपला. ही फार क्लेशदायक बाब आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला की भाजपला या प्रश्नाभोवती महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा वाढत चालला आहे. त्यावर सातारचे राजे उदयनराजे भोसले यांनी शिवसेना भाजपचे ठरत नसेल तर मुख्यमंत्रीपदी रामदास आठवलेंची वर्णी लावून सरकार स्थापनेचा तिढा सोडवावा,अशी मिश्किलपणे मागणी करणे व त्यावर व्यंग करून भाजपने हास्य पसरविणे फार दुःखदायक आहे. तीस वर्षांपूर्वी झालेली युती नाकरण्या सारखे आहे. भाजपला हे शोभणारे नाही. म्हणूनच  मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने जास्त ताणू नये. युतीची माती करु नये. सत्तेची सुवर्ण संधी वाया घालवू नये. ५०:५० चा  फॉर्म्युला मान्य नव्हताच तर लोकसभे पूर्वीच कां जाहीर केले नाही?  शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते तर त्यांनी स्वबळावर स्वतंत्र लढले पाहिजे होते. युतीत शिवसेनेच्या बळावर लढलेल्या निवडणुकीच्या सामन्याचा भाजपा शतकवीर आहे,असे म्हणून सामनावीर आहे, असे भासवून शिवसेनेने आता उपकर्णधारपदावर समाधान मानले पाहिजे, हे ढासून सांगणे म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, अशी वृत्ती कोणी ठेवू नये. पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगत तसा प्रचार केला, त्याला त्यावेळी शिवसेनेने हरकत घेतली नाही, मग आता शिवसेना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी का हरकत घेत आहे? हे म्हणणे साफ चुकीचे आहे. युती धर्म सोडून आहे. जनतेचा विश्वास घात आहे !
शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे युतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन चाललेला पोरखेळ थांबवावा. खरे तर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले असते तर या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे पानिपत झाले असते. महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे त्यांना बहुमत मिळाले आहे, याची जाणिव ठेवून सत्ता स्थापनेची मिळालेली सुवर्णसंधी भाजपने वाया घालवू नये. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले त्यांच्यासमोर सत्ता टाकण्यात कसला आला आहे सच्चेपणा? आता वेळ न दवडता भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठीचे द्वंद्व थांबवावे आणि शिवसेना प्रमुखांना संधी द्यावी हीच महाराष्ट्राची इच्छा आहे....!

- *किशोर तिवारी
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )*
+919422108846
kishortiwari@gmail.com

Sunday, November 3, 2019

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी 
दिनांक - ३ नोव्हेंबर  २०१९
दररोज पडत असलेल्या परतीच्या वादळी पाऊसाचा कहर दररोज नवीन नवीन क्षेत्रात पसरत असुन आता खरीपासोबत रबीचे क्षेत्र नापिकीच्या व नुकसानीच्या पट्टयात आले असुन आता संपुर्ण महाराष्ट्राचे -८० लाख हेक्टरमधील ३० हजार कोटीचे पिकांचे नुकसान झाले असुन यापुर्वी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी ६०  लाख हेक्टरमधील  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते आता महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटीची तातडीची मदत देऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसह सर्व खासदार व आमदारांनी नासीडीच्या शेतात जाऊन  शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा  प्रयन्त केल्याबद्दल शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी आभार मानले आहेत . 
दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत  आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या  दमदार पाऊस सुरू झाला होता   ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ  आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ८० टक्के   महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती मात्र मागून आलेल्या  पावसानंतर मराठवाड  पाठोपाठ आता विदर्भातील अनेक  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरीपेक्षा दिंडी ओलांडली आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दररोज होत असलेल्या पाऊसाने तसेच १५ दिवसांपासून ओला झालेला  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे महसुल व कृषी विभाग हतबल असुन आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या ग्रामीण नुकसानग्रस्त क्षेत्रातील पन्ना प्रमुख ,बुथ प्रमुख ,शक्ती प्रमुख ,विधानसभा क्षेत्र विस्तारक ह्या कंत्राटी फौजेसह वॉर रुममधील पगारी नियंत्रक सर्वे टीमचे खोटे रीपोर्ट देणारे कर्मचारी ,निकामी पगारी प्रवक्ते यांना कमी लाऊन ज्या ग्रामीण महाराष्ट्राने भाजप तेल लावलेले उमेद्वाराना आमदार केले व सत्तेचा वाट दाखविली त्याना वाचविण्यासाठी २४ तासात फोटो-पंचनामे करण्याचे आदेश द्यावे  असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे . 
==================================================================

Saturday, November 2, 2019

महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघाने मध्यस्थी करावी -किशोर तिवारी

महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघाने मध्यस्थी करावी -किशोर तिवारी 
दिनांक -३ नोव्हेंबर २०१९
महाराष्ट्राचे शेतकरी व ग्रामीण समस्यांचे राज्यमंत्री दर्जा असलेले व  निवडणुकीपूर्वी शिवेसनेत प्रवेश घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार विदर्भातील शेतकरी आत्महत्या जगासमोर आणुन  १९९६  पासुन सतत सरकारशी भांडणारे चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत याना महाराष्ट्रातील भाजप सेनेतील सत्तासंघर्षात  मध्यस्थी करण्याची जाहीर विनंती केली आहे कारण महायुतीला स्पष्ट सत्ता जनतेनी दिल्यावरही फक्त युतीधर्म व संवाद त्याचबरोबर दिलेला शब्द्ध फिरवल्याच्या कारणाने मागील १० दिवसांनी सुरु असलेला नंगानाच घृणास्पद असुन संघाने आपली भूमिका गंभीरपणे घ्यावी व हा तिढा सोडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी दिले . 
किशोर तिवारी हे हाडाचे संघाचे असुन त्यांचे वडील संघाचे व जनसंघाचे पहिले पूर्णवेळ प्रचारक होते व त्यांनी आणीबाणीत १९ महीने नाशिक जेलात हवा खाली होती मात्र न विचारता सल्ला देण्याचा त्यांचा स्वभाव असुन मागील डिसेंबर २०१८ मध्ये भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी कडे द्या म्हणजे आपल्या नागपूरचा मित्र भारताचा पंतप्रधान होऊ शकते अशी गळ संघाला टाकुन नितीन गडकरींना अडचणीत आणले होते व त्यानंतर भाजपने निर्विवाद सत्ता प्राप्त केल्यांनतर संघाने सत्ता विकेंद्रित करावी व गुजरातच्या जोडीचा एकाधिकारवाद मोडीत काढावा असा अनाहुत सल्ला दिला होता मात्र संघाने मौन धारण केल्यामुळे सबकुछ अमित शहा असे चित्र आज समोर येत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे .सध्या  "धृतराष्ट्र आंधळा होता व गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली " असे चित्र असुन फक्त सारेकाही  मीडियाच्या माध्यमावाले  "संजय उवाज "ने टी आर पी वाढवीत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
आज भाजपाचे केंद्रीय नेतृत्व देशातील एकमेव हिदुत्व जपणारी समाजसेवेत सक्रिय असलेली शिवसेने सारख्या पक्षाला दिलेला शब्द्ध पाळत नाही त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही नाक घासुन येतील हा आदेश देणे अत्यन्त अनैतिक आहे व असला राजधर्म आला कोठून असा सवालही किशोर तिवारी व्यक्त केला आहे . 
जर आजही देशात  भाजपचे सर्वात मोठा जनाधार असलेले महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते नितीन गडकरी यांना मध्यस्थीं दिली तर दोन तासात शपधविधी झाला नाही तर पहा असे बोलवचन देत मागील सहा महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात ,जनादेश यात्रेत ,प्रचारात तसेच नेता निवडीमध्ये नितीन गडकरींचा उपमान जनतेला वेदनादायी आहे संघाने आज संपुर्ण भारतात संघटनेची होत असलेली व संघाने भाजपला दिलेले पूर्णवेळ प्रचारक यांचा झळ व सत्यासाठी भांडणाऱ्यांची  वाताहत ,पगारी व काँग्रेस संस्कृतीच्या नेत्यांचा हैदोस ,भरष्ट्राचाराच्या प्रचंड तक्रारी त्यातच अनियंत्रित एकाधिकारदाव मोडीत काढण्यासाठी यावेळी आदेश देऊन सत्तासूत्रे व सन्मान  कोणत्याही अटी न घालता शिवसेनेला द्यावा अशी विनंती सुद्धा किशोर तिवारी यांनी केली आहे . 
==========================================================================