Friday, February 18, 2022

"शिवसेना नेते संजय राउत यांचे गंभीर आरोपावर भाजपा नेत्यांचा भ्रामक खुलासा म्हणजे शुद्ध धूळ फेक ! "-किशोर तिवारी

"शिवसेना नेते संजय राउत यांचे गंभीर आरोपावर भाजपा नेत्यांचा भ्रामक खुलासा म्हणजे शुद्ध धूळ फेक ! "-किशोर तिवारी

नागपूर, दि. १८/०२/२०२२,

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या गंभीर आरोपावर भाजपचे नेते आता अकलेचे तारे तोडत आहेत की महा आयटीवर फक्त ३५६ कोटीचा खर्च झाला असताना २५ हजार कोटीचा महा घोटाळा कसा ? भाजपा नेत्यांचा हा बुद्धी भेद म्हणजे जनतेच्या डोळ्यात चक्क धूळ फेक होय ", अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्य सरकार च्या शेतकरी मिशन चे अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) श्री. किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा नेत्यांना उद्देशून केलेल्या ट्विट आणि पोस्ट मध्ये किशोर तिवारी यांनी खरपूस समाचार घेत अनेक यक्ष प्रश्न उपस्थित करीत म्हंटले आहे की *"अरे, अति चाणक्य बाबांनो, महा आयटी अंतर्गत "महा टेंडर" ही एकिकृत खरेदी/कंत्राट वाटण्याचे ऑनलाइन पोर्टल राबवून ३ लाख पेक्षा जास्त मुल्याच्या सर्व निविदा "महा टेंडर" पोर्टलवर अनिवार्य करून २०१६ ते २०१९ चे चार वर्षात ५ लाख कोटी मूल्यांचे टेंडर कुणी म्यानेज केले ? रेती घाट पासून ते हेलिकॉप्टर खरेदी पर्यंत सर्व टेंडर मॅनेज करणारे कोण होते ? जल संपदा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, समृद्धी महामार्ग, परिवहन महामंडळ, शेतकरी कर्ज माफी, समाज कल्याण तसेच आदिवासी विभाग खरेदी, आदी सर्व "ऑन लाईन टेंडर" चे बॅक इंड मधून रेट लीक करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना चढ्या किमतीत ठेके कसे दिलेत ? कमी किमतीत काम करण्यास तयार ठेकेदारांना अपात्र कसे ठरविले ? पासवर्ड कोण कोण मनेज करीत होते ? महा टेंडर करिता वर्षा बंगल्याचा "आय. पी." कसा आला ?

*महा आयटी तील दुसरे प्रमुख घटक "महा भरती" हे सरकारी नोकर भरती चे पोर्टल कोण चालवीत होता, बॅक एंड मधून हेराफेरी करून लाखो रुपयांची "अमृत वसुली" च्या बदल्यात नोकऱ्या विकणारे कोण होते ? आहेत काय याची उत्तरे ??*

अश्या प्रकारे अनेक ग्रभित इशारे देणारे प्रश्न उपस्थित करून तिवारी यांनी पुढे म्हटले आहे की "अहो, होवूद्या ना "फॉरेन्सिक सायबर क्राईम ऑडिट", बिहार मधील "चारा घोटाळा" सुध्धा लाजेल, असा भयानक प्रकार "महा आयटी" घोटाळ्यात झाला आहे ! या सर्व अति गंभीर प्रकरणी माफीचे साक्षीदार बनून सर्व सत्य पुराव्यानिशी समोर आणण्यासाठी तुमची पूर्वीची "ब्ल्यू आय" टीम अगदी दोन दिवसाचा पोलीस कस्टडी मधे एका पायावर तयार होणार आहेच, सोबतच ऑर्थर रोड तुरुंग सुद्धा !" 

किशोर तिवारी आपल्या निवेदनात पुढे म्हणतात की या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास महाराष्ट्र पोलीस चा सायबर क्राईम विभाग पूर्ण पने सज्ज आहे च सोबत दिमतीला के.पी.एम.जी.ची फडणवीस सरकार ची जुनी टीम सुद्धा !!

या प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी होणे फार आवश्यक असताना, कांहीं प्रसिध्दीगीर भाजप नेत्यांनी खऱ्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणे आणि धूळ फेक करणारे खुलासे देणे म्हणजे महाराष्ट्र लुटून देश सेवे चे ढोल वाचविणे होय !
--------


*किशोर तिवारी,*
अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा)
शेतकरी स्वावलंबन मिशन, 
महाराष्ट्र सरकार, मुंबई 
संपर्क : 9422208846
Email :