Wednesday, August 29, 2018

पारधीसमाजावर होत असलेल्या उपेक्षेची दखल :मुकींदपूर पारधीबेड्यावर ३० ऑगस्टला सरकार आपल्या दारी कार्यक्रम

पारधीसमाजावर होत असलेल्या उपेक्षेची दखल :मुकींदपूर पारधीबेड्यावर ३० ऑगस्टला सरकार आपल्या दारी कार्यक्रम 
दिनांक -२९ ऑगस्ट २०१८

स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाची होत असलेली सतत उपेक्षेची  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी गंभीर घेतली असुन यामुळेच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेडा निवडला असुन याचे कारण मुकींदपूर पारधी बेडा भयाण वास्तव असून विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नाही. पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर  गेलेला आहे. दररोज उद्याचे काय? हा प्रश्‍न यांच्या आजही पारधी समाजासमोर अशा   या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी या बेड्याला भेट  मागील  ता.७ फेबु २०१७ भेट दिली असता साहेब आमच्या बेड्यावर पाणी नाही, रस्ता नाही, साधी नालीही नाही व खायला धान्यपण नाही. सांगा आम्ही जगाव तरी कस?’ असला आर्त टाहो नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील नागरिकांनी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवार समोर फोडला होता त्यावेळी आपण ज्या ज्या कोलाम पोडावर व पारधी बेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेतो तेंव्हा  कोलाम पारध्यांना  मूलभूत सुविधांपासून तसेच  अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याचे संघटीत षडयंत्र असल्याचे दुःख प्रगत केले होते . आता पुन्हा एकदा पारधीसमाजाची सतत उपेक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचाराण्यासाठी ३० ऑगस्टला सरकार आपल्या दारी कार्यक्रम स्व वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी घेत आहेत . 
उच्चंन्यायालयाच्या आदेशाची सतत पायमल्लीकरून यवतमाळ जिल्ह्यातील हजारो  कोलाम पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याच्या सर्व नागरी पुरवडा विभागाच्या सर्व जबाबदार  अधिकाऱ्यांवर आदिवासी अत्याचार नियंत्रण कायद्याखाली सरकारने कारवाई आदेश  स्व वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी  नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात दिल्यावर महसूल विभागाच्या   मस्तवाल अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप उखडलीमोडली असुन मार्च महिन्यापासून  मुकींदपूर पारधी बेड्यावरील सर्व पारधी शिथापत्रिका धारकांना अंत्योदय योजनेमधुन अन्न देण्यास सुरुवात केल्याची माहीती तहसीलदार अमोल पोवार यांनी दिली . सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत ,
मुख्यमंत्री ग्राम फेलो राजू केंद्रे सह सुनील धोटकर ,तालुका अध्यक्ष पंजाब शिरभाते यांच्या विषेय प्रयासाने हा महत्वाचा विषय मार्गी लागला होता . 

आपल्या भेटीत  किशोर तिवारींनी पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जावून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्‍यांना त्या सोडविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या या पोडावर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यानंतर त्यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना किशोर तिवारी म्हणाले  ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहे. त्या निवारण्याची जबाबदारी तहसीलदारांची राहील. धान्याच्या समस्येसबंधी ते म्हणाले , येत्या सात दिवसात अंत्योदयाच्या लाभ प्रत्येक नागरिकास मिळाला पाहिजे, कुणीही यापासून वंचित राहता कामा नये. या पोडाला तात्काळ महसुली दर्जा देवून दोन ते तीन गावांची ग्रामपंचायत करण्यात यावी, अंतर्गत रस्त्यांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, वीजेची समस्या त्वरित मार्गी लावावी. आरोग्या संदर्भात काही अडचण असल्यास मला फोन करावा, असेही त्यांनी सांगितले. संघर्षाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, तेव्हा जागृत होवून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करा, असे आवाहन यावेळी केले. आदिवासी विभागाच्या सचिव वर्मा यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून येथील समस्येशी त्यांना अवगत केले होते मात्र सतत पाठपूरावा करूनही पारधी समाजाच्या समस्या सुटं नसल्यामुळे आपण ही भेट घेत असल्याचे तिवारीं यांनी स्पष्ट केले 
==============================

Monday, August 27, 2018

गंगापट्टयात तीन हजार हेक्टर वरील पिकाची पुरामुळे हानी : किशोर तिवारी यांनी केली पाहणी

गंगापट्टयात  तीन हजार हेक्टर वरील पिकाची पुरामुळे हानी : किशोर तिवारी यांनी केली पाहणी 

दिनांक २७ ऑगस्ट २०१८
यवतमाळ जिल्हातील झरी तालुक्यातील पैनगंगेच्या तीरावरील धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोली गावामधील सुमारे तीन  हजार हेक्टर वरील उभेपीक पुरबुडी व खरडल्यामुळे संपूर्ण नष्ट झाले असुन या  प्रचंड नुकसानीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असुन येत्या १० दिवसात संपुर्ण पंचनामे पुर्ण करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे  व सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पुराने हानी झाली आहे त्यांना सरसकट विना अटीने ही मदत मिळणार असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २३ ऑगस्टला  धानोरा दुर्भा  ,विठोली सतपेल्ली येथे आयोजित   सरकार आपल्यादारी कार्यक्रम   केली . 
धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोली गावामधीलशेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी  पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी नागरीकांनी मांडल्या त्यावर खिरेकर साहेब तहसीलदार,चव्हाण साहेब गट विकास  अधिकारी गवई साहेब , ठानेदार लशकरे साहेब  यांनी जनतेच्या तक्रारींचे समाधान केले. 
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी केली तसेच यावर्षी सरकारने ऐतिहासिक पीककर्जमाफी दिल्यांनतर यवतमाळ जिल्ह्यातील बँकांना सुमारे हजार कोटी रुपये जमा केल्यानंतरही सरकारी  बँका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा पालन  करीत नसुन या खरीप हंगामात झरी पाटण मुकटबन येथील बँका  पिककर्ज  वाटपात २० २० वेळा जक्कारा मारूंनही  आज या उद्या म्हणत असल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी यावेळी केली यावेळी किशोर तिवारी आपला असंतोष प्रगट करीत ३१ ऑगस्टपूर्वी पिककर्ज  वाटप करण्याचे आदेश दिले 

धानोरा ,दुर्भा ,दिग्रस ,सतपेल्ली ,पाटण ,अहेरल्ली ,विठोलीच्या पाहणी दौऱ्यात   शेतकरी नेते अनिल भाऊ पोटे तालुका अध्यक्ष संगीताताई सुरेश मानकर जिल्हापरिषद सदस्य मिनाक्षीताई सुरेश बोलेनवार जिल्हा परिषद सदस्य, लताताई आत्राम पंचयात समिती सभापती,राजु  गोंडरा वार पंचायत समिती सदस्य, अशोकरेड्डी बोदकुरवार, अनिल भाऊ पोटे तालुका भाजपा अध्यक्ष , अनिल पावडे, विठल बंडेवार ,सुरेश बोलेनवार, सुरेश मानकर, सतिश नाकले, शाम बोदकुरवार, कुश केमेकार, मनोज शर्मा, सचिन  दुमनवार,सुधिर पांडे गजानन काळे, महेश बाडलवार, मोहन चुक्कलवार  खिरेकर साहेब तहसीलदार,चव्हाण साहेब गट विकास  अधिकारी गवई साहेब , ठानेदार लशकरे साहेब उपस्थित होते .  
========================

Wednesday, August 22, 2018

सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार -घुबडी येथील "सरकार आपल्यादारी कार्यक्रमात किशोर तिवारी यांचा घोषणा 
दिनांक -२३ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने व सतत अतिवृष्टी मुळे पिंपळखुटी चनाका कोदोरी रूढा घुबडी कारेगाव हिवरी व अर्ली परीसरात झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन सर्व पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असुन येत्या १० दिवसात संपुर्ण पंचनामे पुर्ण करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात येणार नाही व सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पुराने हानी झाली आहे त्यांना सरसकट विना अटीने ही मदत मिळणार असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २१ ऑगस्टला  घुबडी येथे आयोजित   सरकार आपल्यादारी कार्यक्रम   केली . यावेळी  शेतकरी नेते शिवरेड्डी एलटीवार ,गंगारेड्डी क्यातमवार ,सुरेशभाऊ बोलेनवर ,अंकितभाऊ नैताम 
बाबुलाल मेश्राम ,सुनिलभाऊ राऊत ,घुबडी सरपंच रेखाताई कोवे ,सुभाष अयंचमवार ,गजानन गटकावार ,संजय मेश्राम ,गजानन खडसे ,निखिल मेश्राम ,गौरीशंकर कांबळे ,  प्रल्हादराव कोवे  उपस्थित होते . 
यावेळी केळापूर तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा,घुबडी,वळवाट,खैरी,पिठापोंगरी, पिंपळशेंडा ,अर्ली परीसरातील शेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी  पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी नागरीकांनी मांडल्या त्यावर तहसीलदार महादेवराव जोरवार ,अभियंता राठोडसाहेब ,तालुका कृषी अधिकारी शेरखाने ,वनाधिकारी संगीता कोकणे यांनी जनतेच्या तक्रारींचे समाधान केले . 
घुबडी पूर्वी किशोर तिवारी यांनी हिवरीला भेट दिली व भोई समाजाच्या समस्या जाणून घेतल्या व तक्रारींचे समाधान केले . घुबडी येथे दररोज दार ताशी  दहावेळा लाईन जाते विद्दुत विभागाचे अधिकारी साधा फोनही उचलत नसल्याची तक्रार संजय गंगारेड्डी कायतमवार यांनी केली . 
घाटंजी तालुक्यातील भीमकुंड येथील भेटीत सर्व पुरग्रस्त आदिवासींना कायमस्वरूपी पट्टे देण्याची घोषणा सरकार तर्फे किशोर तिवारी यांनी केली . मंगी तालुका घाटंजी मध्ये शाळेवर मागील तीन महिन्यापासून शाळेवर शिक्षक नसल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आपला असंतोष प्रगट केला त्यावेळी यवतमाळ जिल्हा शिक्षणाधिकारी सुजाता पाटेकर यांनी एका आठवड्यात कायमस्वरूपी शिक्षक देण्याची घोषणा केली मंगी  येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात सुहास पारवेकर रुपेश कनॅलवार जीवन मुद्दलवार ,अर्जुन आत्राम .तुळशीराम मोहुर्ले  हे प्रामुख्याने उपस्थित होते . 
====================================

Friday, August 17, 2018

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हीच अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली -किशोर तिवारी

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हीच अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली -किशोर तिवारी 
दिनांक-१७ ऑगस्ट २०१८

भाजप पक्षाच्या भारतीय जनसंघापासुन  छोट्या राज्याची निर्मितीला सुयोग्य प्रशासन व समतोल विकासासाठी पाठिंबा होता व यामुळेच स्व.अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना २००४ मध्ये एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु आपल्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १९९० दशकातच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव एकमताने मंजूर सुद्धा करण्यात होता झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती अटल बिहारी वाजपेयी यांनी केली तेंव्हा वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी त्यावेळी आग्रह धरला होता मात्र शिवसेनेची राजकीय नाराजी टाळण्यासाठी त्यावेळी 
सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य स्व.अटल बिहारी वाजपेयी कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी अनेकवेळा  एका  बोलून दाखविली होती. एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे, परंतु मुंबई व पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्या राजकीय दबाबामुळे हे शक्य झाले नाही मात्र आज केंद्रात व राज्यात भाजपची अमर्याद सत्ता आहे तसेच केंद्रात कट्टर विदर्भवादी नेते  नितीन गडकरी वजनदार मंत्री आहेत तर राज्यात कट्टर विदर्भवादी नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत अशा वेळी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी व त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची सहमतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत विदर्भ राज्य निर्माण करावे अशी कळकळीची विनंती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धाजंली व्यक्त केली आहे . 

ज्यावेळी २००४ मध्ये  स्व.अटल बिहारी वाजपेयी यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली त्यावेळी महाराष्ट्रात विदर्भ राज्याचा विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या भाजपला कुबड्या घेण्याची गरज होती आता २०१८ मध्ये राजकीय समीकरण बदलले आहेत केंद्रात व राज्यात भाजपची अमर्याद सत्ता आहे तसेच केंद्रात कट्टर विदर्भवादी नेते  नितीन गडकरी वजनदार मंत्री आहेत तर राज्यात कट्टर विदर्भवादी नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे मात्र नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या स्वप्नपूर्ती गंभीरपणे प्रतिष्ठापणाला लावून प्रयन्त करावे  असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. 
===========================
============

Tuesday, August 14, 2018

Maharashtra PSBs meet barely 30% of Kharif crop loan Targets-Kishore Tiwari

Maharashtra PSBs meet barely 30% of Kharif crop loan Targets-Kishore Tiwari 
Dated: August 14, 2018
Nationalised banks in Maharashtra have disbursed barely 30% of the crop loan targets issued by the state government for the kharif season of 2017-18. This finding came to light after a review meeting of bankers held by the state-sponsored Vasantrao Naik Sheti Swavalambi Mission (VNSSM) today in Pune. Farmer activist and VNSSM chairman Kishore Tiwari on Monday held a review meeting with the State Level Bankers Committee (SBLC) and issued an ultimatum to the banks to meet their crop loan targets.
The Vasantrao Naik Shetkari Svavlamban Mission (VNSSM), a farmers' task force in Maharashtra , has urged State Level Bankers Committee (SBLC) to urgently clear the Maharashtra government's plan to extend fresh crop loans to farmers as the state wants to bring around 80 percent debt-trapped farmers under bank loans to arrest farmland suicides in 14 of the worst-hit districts.
For the Kharif season of 2017-18 PSBs has given Rs.24253 crore target whereas total disbursement of crop loan as per data of SLBC is only Rs.7492 crore , this is for the Kharif season of 2017-18 due to  apathy and hostile functioning of the public sector banks which hampers the state's proposal to give fresh loans to  all previous defaulters since 2001 even after mega loan waiver given by the state to nearly 4 million farmers," Tiwari said.
Akola 25%, Amaravati 31%, and Washim 16% and Wardha 34% from Vidarbha whereas Beed 15%  Hingoli 16% Parbhani 15% from Marathwada rea worst performance in crop loan disbursement even after the state government has initiated several direct and indirect interventions covering various aspects concerning the 13.6 million registered defaulter farmers.
"As a major relief, Chief Minister Devendra Fadnavis announced mega agriculture loan waiver  to at least 80 percent of these farmers by all pending crop loans since 2001  in June 2017 but even after 14 months there is massive confusion in online list of benefiting farmers defeating the purpose of granting the loan waiver to the dying farmers thanks to most corrupt and nonaccountable lobby of babus working for the finalisation of list ," Tiwari pointed out.
"The VNSSM wants PSBs to adopt a mature stand and immediately re-examine the issue to meet the target of bringing 80 percent farmers under bank loan net by August  30 and help prevent suicides," Tiwari said.--
If any farmer commits suicide, if he is not being given loans by these banks, the mission will treat the case as culpable homicide and seek action against the concerned officer, Tiwari warned, adding that no farmer should suffer because of red tapism. “Nationalised banks are hostile to farmer issues and are working against farmer interests,” he alleged.

The Maharashtra government has targeted a disbursal of crop loans worth R43,873 crore to farmers in the state this Kharif season. Of these, district cooperative banks are expected to disburse crop loans worth R13193 crore by now DCCBs have disbursed Rs.8281 crore which 63% of total given target.
====================================================================================