Wednesday, October 9, 2024

केळापुर-आर्णी विधान सभा मतदार संघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उबाठा लढणार -आदिवासी नेते अंकीत नैताम यांची उमेदवारी साठी राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे

केळापुर-आर्णी विधान सभा मतदार संघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उबाठा लढणार -आदिवासी नेते अंकीत नैताम यांची उमेदवारी साठी  राष्ट्रीय  प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे 

दिनांक -९ ऑक्टोबर २०२४

महाराष्ट्राची विधान सभेची निवडणुकीची तारखा घोषीत होण्याची व आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली असता महाविकास आघाडीमध्ये मेरीटवर पक्ष भेदाभेद न करता नवीन परीवाद बाजूला ठेऊन युवा नवीन भूमीपुत्र चेहरा देण्याच्या भूमिकेचे शिवसेना उबाठा चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन  पांढरकवडा ह्या आदिवासी बहुल  केळापुर -आर्णी विधान सभा मतदार संघावर शिवसेना उबाठा चा दावा ठोकला असुन हि जागा शिवसेनेला महाविकास आघाडीने सोडावी व पांढरकवडा येथील स्थानीय व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांना साकडे टाकले आहे व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरदचंद्र पवार व काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी सुद्धा आपला दावा कसा मजबूत आहे हे समजावून सांगणार असल्याचे किशोर तिवारी यांनी आज सांगीतले . मागील २५ वर्षापासून सतत आदिवासी व शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे अत्यंत गरीब मात्र सतत समाजसेवा करणारे युवा आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांना भूमिपुत्र उमेदवार शिवसेना उबाठा उभे करणार आहे . 

"हा मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असुन सतत आयात केलेले  भाजपचे नाकर्ते लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे वणी राळेगाव सह केळापूर भागातील आदिवासी व कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत व आपल्या हक्काच्या जमिनीशी नाळ जुडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देण्याचा व मस्तवाल पोटभरू तसेच परीवारवादाला सोडुन आमदार निवडण्याच्या आग्रहाचा आदर महाविकास आघाडीने करावा यासाठी किशोर तिवारी पाठपुरावा करीत असुन अंकित नैताम यांनी सुद्धा आपला जनसंपर्क सुरु केला आहे 

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघ आर्णी केळापूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर २००४ काँग्रेस पराभूत झाली आहे त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेस पराभूत झाली व 20१९ मध्ये काँग्रेस पराभूत झाली या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय प्राप्त होत आहे २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार यांनी ३१०००मतदान घेतले  आहे अंकित नैताम एक आदिवासी कुटुंबातील वयाच्या दहा वर्षापासून किशोर तिवारी राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना यांच्या सोबत  आहेत व आहे मी पांढरकवडा नगर परिषदेत सन २००७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयप्राप्त करुन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती या पदावर कार्यरतहोते 

सन २०१२ मध्ये नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून अंकीत नैताम यांनी  नियुक्ती  करण्यात आली होती. यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी या पदावर कार्यरत होते  तसेच यवतमाळ जिल्हा ट्रायबल  फोरम या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत असुन तसेच ते युवा टायगर फोर्स सयोजक या पदावर कार्यरत आहे आदिवासी भागातील सामाजिक संस्था म्हणून क्रांतिवीर बिरसा मुंडा शैक्षणिक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केळापूर तालुक्यातील शेतकरी आदिवासी विधवांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण कोरोना काळामध्ये अन्नाची किट वाटप सात हजार कुटुंबांना घरपोच वाटप केला आहे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्त साडी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता रक्षाबंधन ना बहिणींना टिफिन डबे चा कार्यक्रम आयोजित करून वाटप केला आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे विवाह संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे कार्यक्रम सुरू असतात

अंकित नैताम एक  सामाजिक कार्यकर्ता .

मी विविध विषयावर आंदोलन करीत असून शेतकऱ्यांना, आदिवासींना न्याय मिळवून देण्याकरिता माझं सामाजिक काम सतत सुरू असतात. आणि मी एक गरीब कुटुंबातील आदिवासी कार्यकर्ता आहे यांना यावेळी शिवसेना उबाठा कडुन  संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे टाकले आहे . 

=================================================

Friday, June 21, 2024

कापूस सोयाबीन हमीभाव घोषणा-पंडी सरकारने महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली -किशोर तिवारी

कापूस सोयाबीन हमीभाव घोषणा-पंडी सरकारने महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली -किशोर तिवारी 

दिनांक - २२ जुन २०२४

मागील लोकसभा निवडणुकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात सरसकट नाकारल्यानंतर भाजपा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आर्थीक अडचणीत असलेले शेतकरी विक्रमी आत्महत्या करीत असतांना येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील मोदी सरकार विरुद्धचा रोष कमी होण्यासाठी स्वामिनाथन  आयोगाच्या लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा या फार्म्युल्याने यावर्षी केंद्र सरकार १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करतांना CACP अर्थात कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्ष लागवड खर्च अधिक कमीत कमी पन्नास टक्के नफा हिशोबात धरून करतील अशी अपेक्षा होती मात्र हमीभावाच्या घोषणेत हाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली असुन या हमीभावाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढतील अशी भीती विदर्भाच्या  कापुस उत्पादक कोरड वाहू शेतकऱ्यांसाठी १९९० पासून अधिकारांचा लढा लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 

कृषी खर्च आणि किमती आयोगाने वातानुकुल कार्यालयात भांडवलदारांशी चर्चा करुन घोषणा केली  

यावर्षी कापसाचा नवीन हमीभाव ७१२१ व ७५२१ म्हणचे ५०१ रुपयाची नगण्य वाढ  करण्यात आला  आहे  तर सोयाबीनच्या हमीभावात फक्त २९२ रुपये करून दुष्काळ नापीकी व कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची निराशा केली आहे यातच तूर डाळीच्या एमएसपीमध्ये ५५० रुपये प्रति क्विंटल आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये ४५०  रुपये प्रति क्विंटलने वाढ केल्याने विदर्भ मराठवाड्यात पेरा करतांना कसला पेरा करायच्या हा प्रश्न मोदी सरकारने उभा केला आहे. 

हमीभाव म्हणचे भांडवलदारांच्या लुटीचा बाजार 

यावर्षी कापसाला ५०१ रुपयाची नगण्य वाढ  तर सोयाबीनच्या हमीभावात फक्त २९२ रुपये वाढ देणे यावर मागील २ वर्षात लागवडीचा खर्च ,उत्पादकेमध्ये झालेली घट ,निसर्गाचा प्रकोप ,जागतिक बाजारात सुरु असलेली लूट याचा  अभ्यास कृषी खर्च आणि किमती आयोगाने शेतकऱ्यांशी चर्चा करून केला असता तर फक्त लागवडीचा खर्च कापसाला ७००० रुपये ,सोयाबीनला ५००० हजार तर तुरीला ७००० रुपये येत आहे याचा अर्थ या हमीभावात शेतकऱ्यांना नफा तर सोडा प्रचंड तोटा होणार आहे सध्या भारताचे कृषीमंत्री शिवराज चव्हाण आहेत व महाराष्ट्रात शेतकरी समस्यांची जाण असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी महाराष्ट्राचे ९० लाख हेक्टर मध्ये पेरा असणारे १७२ विधान सभेच्या जागांवर आपला जय-पराजय निश्चित करण्याची क्षमता असणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी व सध्या होत असलेल्या विक्रमी आत्महत्या रोखण्यासाठी या तोट्याच्या हमीभावात रद्द करून वाढीव हमीभाव जाहीर करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली आहे . 

CACP अर्थात कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी

पिके

MSP

2024-25

MSP

2023-24

MSP त किती वाढ?
धान23002183117
धान A ग्रेड23202203117
ज्वारी हायब्रीड33713180191
ज्वारी मालदंडी34213225196
बाजरी26252500125
रागी42903846444
मक्का22252090135
तूर75507000550
मूग86828558124
उडीद74006950450
शेंगदाणे67836377406
सूर्यफूल72806760520
सोयाबीन48924600292
तीळ92678635632
रामतीळ87177734983
कपाशी (मिडल स्टेपल)71216620501
कपाशी (लाँग स्टेपल)75217020501


Sunday, June 9, 2024

१० जूनला किशोर तिवारी यांचा आभार प्रदर्शन व ऋणानुबंध दौरा - डेंगू ग्रस्त गावांना सुद्धा भेट देणार

१० जूनला किशोर तिवारी यांचा आभार प्रदर्शन व ऋणानुबंध दौरा - डेंगू ग्रस्त गावांना सुद्धा भेट देणार 

दिनांक ९ जुन २०२४

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघातील केळापुर तालुक्यातील गावांमधुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार यांना भरघोस मतदान केल्या बद्दल त्यांचे ऋण व आभार प्रगट  करण्याकरीता सोमवार १० जूनला शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी ,आदिवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते अजय राजुरकर ,प्रेम चव्हाण ,अभय कट्टेवार , संजय सुरंगे ,प्रशांत बावणे ,कोलाम चळवळीचे नेते  अतुल आत्राम , नानासाहेब वाघमारे ,विजय खापर्डे , रमेश चव्हाण हे सर्व कार्यकर्ते  करणवाडी ,खैरगाव (देशमुख ) ,वागदा  लिंगटी ,सायखेडा बेघर वस्ती ,किन्ही नंदपूर ,उमरी ,घोडदरा ,वाढोणा ,मंगी पोड  ,करंजी, खातारा ,अडणी ,सोनुर्ली ,मुंजाळा ,सिंगलदिप या ठिकाणी मतदारांचे आभार मानतील .सर्व ११ जूनला उरलेल्या गावांना भेटी देतील ,अशी माहीती दौरा  संयोजक संतोम नैताम यांनी दिली . 

शेतकऱ्यांच्या पीककर्ज ,बियाणे टंचाई ,टेंगूची साथ याच्या तक्रारी शासनदारी मांडणार 

सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी पतपुरवडा मिळत नसुन ,बियाणे व रासायनिक खते सुद्धा दर्जेदार मिळत नसुन ,अनेक भागात पावसाच्या पुर्वीच टेंगू  इतर आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत मात्र मस्तवाल सरकारचे आमदार व अधिकारी फक्त पैसे खाण्यात गुंतले असुन ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडले आहे .पाणी पुरवड्याच्या सर्व योजना आमदाराने आपल्या दलाल यान दिल्यामुळे तसेच सर्व कामात आमदाराने ५० टक्के कमीशन खाऊन वाढल्याने त्याचे तीन तेरा वाजले आहे या साठी जनआंदोलन सुरु करण्यासाठी आभार व ऋणानुबंध दौऱ्यात नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी केली .

 =============================================

Friday, June 7, 2024

शिवसेना"इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी"साठी महाराष्ट्रात जनआंदोलन करणार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी

शिवसेना"इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी"साठी महाराष्ट्रात जनआंदोलन करणार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी 

दिनांक -७ जुन २०२४

यावेळेस राहुल गांधी-उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी निवडणुक प्रचारात शेतकऱ्यांना ,महिलांना ,बेरोजगार युवकांना ,वंचितांना दिलेल्या ' पंच गॅरंटी ' ची पूर्तता ,ही काळाची गरज असुन सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या कुबडया घेवून सत्तेत आलेल्या भाजपावर सशक्त विरोधक या नात्याने केंद्रात व राज्यात असलेल्या निकामी सरकारच्या विरोधात आता जनतेच्या आक्रोश रस्त्यावर दाखविणें गरजेचे असुन त्यासाठी आता महाविकास आघाडीचे सर्व पक्ष जनआंदोलन सुरु  करतील व भाजपला संपूर्णपणे नाकारलेल्या विदर्भ व मराठवाड्यात शिवसेना लवकरच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगी सुरु करेल ,अशी माहीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी दिली . 

शेतकऱ्यांसाठी गॅरंटी 

सध्या शेतकऱ्यांना बियाणे व कीटक - तण नायक करमुक्त करणे ,सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करणे ,हमीभाव कापसाला १० हजार रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ६ हजार रुपये प्रती क्विंटल देणे गरजेचे आहे त्या बरोबर रोजगार हमी योजनेतून शेतीच्या मजुरीचे अनुदान देणे ,शेतकऱ्यांना पूर्णवेळ मोफत वीज देणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे व त्यासाठी या भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या सरकारच्या विरोधात जनतेचा एल्गार अत्यंत आवश्यक आहे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना संपुर्ण राज्यात मशाल पेटविणार व या घटनाबाह्य सरकारची पापाची लक्तरे टांगणार असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला 

 महीला व बेरोजगार युवकांना गॅरंटी 

देशाच्या संपत्तीं व संसाधनावर फक्त अडाणी सारख्या २२ लुटारूंचा अधिकार आहे व ९० टक्के सरकारच्या ५ किलो अन्नावर जगत आहे तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील कोट्यवधी बेरोजगार युवक सरकारी नौकरीसाठी   फक्त मागच्या दहा वर्षापासुन  आहेत आता प्रत्येक गरीब कुटुंबाला कमीत कमी १० हजार रुपये शोषणमुक्ती भत्ता व प्रत्येक शिक्षित युवकाला बेरोजगारी भत्ता देणे गरजेचे आहे ,

महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्याची गॅरंटी 

सध्या सर्व गरीब शेतकरी शेतमजूर महागड्या खाजगी शिक्षणामुळे व अती महाग आरोग्यसेवे मुळे  जगणे कठीण झाले आहे ,श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या भाजपा सरकारला महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्यासाठी जनआंदोलन करणे काळाची गरज आहे व यासाठी जनआंदोलन हाच एक मार्ग आहे . 

आदिवास्यांना जल जंगल जमिनीचा अधिकार 

आज पर्यंत मूळ निवासी आदीवासी जनतेला त्यांचा 'जल-जंगल -जमिनीचा ' अधिकार देण्यात आला नसुन सध्या त्यांना या संसाधनावरून भाजपा हुसकावुन देत आहे यासाठी जनआंदोलन सुरु करण्याची घोषणा किशोर तिवारी केली . 

जातीनिहाय जनगणना व त्यानुसार आरक्षणाचा मुद्दा 

बिहार सारखं जाती जमाती निहाय सर्वे अत्यंत आवश्यक असुन अती वंचितांना 'जगण्याचा अधिकार ' अबाधित राहावा व त्यांना देशाच्या मुख्य धारेत आणावे हि काळाची गरज आहे व हे काम महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच करू शकतात असा विश्वास किशोर तिवारी यावेळी प्रगट केला 

=========================================================================





Thursday, June 6, 2024

Agrarian Crisis Responsible Massive Defeat of BJP-NDA in Rural Maharashtra-Farm activist Kishore Tiwari

Agrarian Crisis Responsible Massive Defeat of BJP-NDA in Rural Maharashtra-Farm activist Kishore Tiwari  

6 June-2024

In line with rural UP, Haryana, Punjab in Maharashtra too farmers unrest in against anti  polices of BJP lead NDA caused big upsent in Cotton Soybean Onion and other  cash crop growing region of farmers suicide effected  Maharashtra, minimum 24 parliament constituencies directedly rejected BJP ministers and very senior leaders hence now NDA should focus the core issues to address on going agrarian cum rural economic crisis ,farm activist Kishore Tiwari who is advocating dry land cotton farmers suicides since 1990 ,urged today in press release.

In last 10 years BJP failed to address the core issues of going agrarian economic crisis which are  profitable Minimum Support Price MSP, direct subsidies to reduce cultivation cost, pro-farmers import-export policy, farmers friendly farm credit policy,  introduction of update technology in seed, cultivation and mechanism in harvesting ,processing technique at village level, network of farmer producer association, employment opportunities in rural Maharashtra , crop diversion,  irrigation facility and proper power supply lastly most important farmers friendly crop insurance system ,Tiwari informed .

In recent years cost of education and health services has upset ,rural economics  and massive unemployment has added the fuel in agrarian crisis   resulting more than 32840 farm suicide in last decade which was ignored by INDIA alliance too but farm unrest impact has boosted and given rebirth to almost dying congress party which has no local leaders who were  raising voice against on going farm unrest, Tiwari said .

In order to stop on going  farm genocide of Maharashtra .PM Modi should address the core issue of input cost reduction, output cost feasible and profitable pricing ,institutional interest free credit , direct  cash subsidies for cultivation, education ,health and rural employment ,Tiwari urged  

==========================================================================


Saturday, March 2, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी 

दिनांक २ मार्च २०२४

ज्या विदर्भ मराठवाड्याने मोदींना २०१४ व २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड विश्वास दाखविली तेथील  आत्महत्याग्रस्त शेतकरी ,शोषित महीला आदिवासी यांची आपलय २०२४ च्या लोकसभेचा प्रचार सुरु करण्यासाठी घेतलेल्या सभेत प्रचंड निराशा केली २०१४ व २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी दिलेल्या सर्व आश्वासनाचा यावेळी त्यांना संपुर्ण विसर पडल्यामुळे सकाळी पासुनउपाशी तापाशी  बसून असलेल्या महिला आदिवासी व शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली असुन याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसणार अशी घणाघाती प्रतिक्रिया विदर्भाचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

साध्य विदर्भ मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नापीकी व हमीभावापेक्षा कमी भावात कापूस सोयाबीन विकल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील १० वर्षात विदर्भ मराठवाड्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ,आदीवासी व बंजारा भटक्या समाजाचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य हे प्रश्न प्रचंड प्रमाणात या १० वर्षात वाढले आहेत .विदर्भ मराठवाड्यात लाखो बचत गटांपैकी फक्त २ टक्के महिला बचत गट सरकारी बँकातून कर्ज काढत आहे तर ९८ टक्के बचत गट मायक्रोफायनान्स कंपन्या वा सहकारी नागरी पत संस्थांच्या दाम दुपट्टीच्या व्याजात फरफटत आहे व आरबीआय ने बघ्याची भूमिका घेतली आहे . 

२०१४ मध्ये दाभाडी येथे नरेंद्र मोदीजींनी  शेतकऱ्यांचे उत्त्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे ,बँक शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन मुबलक पतपुरवठा करतील,लागवडीचा खर्च अर्धा करणार ,जमिनीचे आरोग्य ,पोत व पुनर्जीवन करणार , सर्व शेतकऱ्यांना  सिंचनाची सुविधा देणार ,सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवडा देणार , कापूस व सोयाबीन मध्ये बियाणे ,लागवड पद्धत यामध्ये तांत्रीक अडचणी दूर       करणार . ,कोरडवाहू क्षेत्रात तेलबिया ,डाळ पिके ,कडधान्य पिकासाठी विशेष प्रोसाहन देणार, हमीभाव देतांना डॉ स्वामिनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणार  रासायनिक शेतीमुळे निर्माण झालेल्या कर्क, किडनी आचार,पाण्याचे प्रदूषण ,पाण्याची शुद्धता ,आम्लता कमी करणे यावर विशेष  कार्यक्रम व योजना राबविणार तसेच  २०१९ मध्ये  पांढरकवडा  येथे नरेंद्र मोदीजींनी आदिम आदीवासी जसे कोलामाना पक्के घर शुद्ध पाणी शाळा उपलब्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,भटक्या जातीच्या जसे बंजारा व पारधी यांना विशेष निधी उपलब्ध करून  पक्के घर शुद्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे  शाळा उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,महिला बचत गटांमार्फत देण्यात आलेले सर्व कृषी कर्ज माफ करण्यात येणार ,सर्व महिला बचत गटांना ३ लाखापर्यंत नवीन भांडवल देण्यात येणार हि आश्वासने दिली होती मात्र या आश्वासनांची पूर्तता तर केली नाही मात्र नवीन आश्वासनांची खैरात वाटुन वंचितांच्या जखमेवर मीठ चोळले ,असा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला 

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील दाभडी या गावी "चाय पे चर्चा" हा कार्यक्रम गाजावाजा करून घेण्यात आला. या ठीकाणी  गाजावाजा करून दिलेली सर्व आश्वासने आता १० वर्षानंतर खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या संबंधात तिवारी यांनी एक पत्र नरेंद्र मोदींना पाठवले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला आहे.केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबतील आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपा ने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द नरेंद्र मोदी सरकारने पाळला नसून एकीकडे शेतीवर खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही. कापूस, सोयाबीन चे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सी.सी.आय. आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडुन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण, आरोग्य यांचे वरील खर्च तिप्पट झाला आहे. बेलगाम महागाई ने आम आदमी हैराण आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस चे भाव आकाशाला भिडले आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार राजरोस पणे सुरू असून नरेंद्र मोदी या गंभीर विषया वर आपले तोंड कधी उघडणार? असा सीधा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

शेतीकडे सरकारचे दुलर्क्ष 

मागील दशकात एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात ३२४१६ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत आतातर तरुण युवक युवती हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना २०२४ मध्ये मोदीजींना त्यांच्या गारंटी वर बालवेच लागेल आता भारत सरकारच्या सर्व योजनांचे तीन तेरा वाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २०२४ चा लोकसभेच्या  निवणुकीचे बिगुल फ़ुंकताना त्यांना वास्तविक सत्यावरही बोलावे कारण सन २०१४ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दाभडी येथे पंप्रधान मोदी साहेबांनी विदर्भ शेतकरी आत्महत्या मुक्त करू,शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न हमीभाव,पत पुरवठा,लागवड खर्च कमी करणे,जमिनीची उत्पादकता वाढविणे,सिंचनाची व्यवस्था करणे,कृषी क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी आणणे,पीक पद्धतीत बदल करणे ही प्रमुख आश्वासने दिली होती. तर २०१९ मध्ये पांढरकवडा येथे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला बचत गटांचे कर्ज माफ करून ३ लाखाचे व्याजमुक्त कर्ज देणे व सर्व आदिम आदिवासी बंजारा, भटक्या समाजाला पक्के घर देण्याचे,सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने घरी देऊ,प्रत्येक घरात एकाला रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र मागील १० वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व सहकारी पत संस्थांनी १८ ते २४ टक्के व्याज वसुली करून सर्व महिला बचत गटाच्या आई, बहिनींचे संसार रस्त्यावर आणले आहेत. मात्र सरकारी बँका झोपा काढत आहेत.केंद्र सरकार चे धोरण हे फक्त मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना लाखो कोटी रुपयांचा फायदा पोहचविणे हाच असून शेतकऱ्यांचे शोषण, बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या या ज्वलंत मुद्यांवर लक्ष देण्यास नरेंद्र मोदी सरकार जवळ अजिबात वेळ नाही. रेटून खोटे बोलणे हे फक्त एकमेव तंत्र मोदींना चांगले अवगत असून ज्वलंत मुद्यांवर बोलण्यास त्यांना अजिबात आवडत नसल्याचा आरोप नरेन्द्र मोदी यांच्या “चाय पे चर्चा” कार्यक्रमाचे वॉर रुम सदस्य राहीलेल्या किशोर तिवारी यांनी केला आहे. 


-----------------------------------------------------------------

किशोर तिवारी

राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (ठाकरे गट) 

मो. ९४२२१०८८४६

Email ID : kishortiwari@gmail.com


Monday, January 22, 2024

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व  ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे 

दिनांक -२२ जानेवारी २०२४

ज्या मुद्याला धरून भाजपने भारताची सत्ता काबीज केली व शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते व विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच आदीवासी जनतेच्या प्रश्न्नावर काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खुल्यामनाने अभिनंदन केले असुन आता महाराष्ट्रातील अतिशय मागास व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सोबतच  अतिमागास आदीवासी बेरोजगार महिलांच्या तसेच ग्रामीण भागातील प्रचंड आर्थिक विपन्नतेवर तोडगा काढा साकडे घातले आहे . महाराष्ट्र ही छत्रपती शाहू महाराज , ज्योतिबा फुले, गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या ठिकाणी सामाजिक न्याय व समानता सर्वोच आहे या मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेनी सुद्धा मर्यादापुरुष प्रभू राममंदिर प्राण प्रतिष्ठेचे स्वागत केले असुन मात्र आपण आता राजधर्माचे पालन करीत आर्थिक व सामाजिक न्याय दयावा अशी कळकळीची विनंती केली असुन देशाला शुद्ध धर्माची गरक असुन धर्माच्या नावांवर अंधश्रद्धेचेथो थोतांड मांडून २५०० वर्षांपूर्वीची   परिस्थिती देशात आणून धर्मांथेच्या नावावर अराजकतेला जन्म देत असल्याची भीती ग्रामीण भागातील शेतकरी आदीवासी वंचित जनता बोलून दाखवत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे . 

देशाचे महामाहीन राष्ट्रपती व चारही शंकराचार्य यांना अपमानित करून राममंदिराच्या राष्ट्रार्पण देशाच्या लोकशाहीला घातक 

एकीकडे ज्या रीतीने राममंदिर निर्माण याला ५०० वर्षांपूर्वीचा हिंदू समाजाचे स्वप्न व भाजपने याला आपला राजकीय व येणाऱ्या २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये राममंदिराच्या प्रमुख मुद्दा करून पुन्हा सत्ता मिळविण्याचा कुटील डाव रचण्यात आला असुन मात्र ज्या रीतीने चारही पिठाचे शंकराचार्य यांचे सर्व आक्षेप केराच्या टोपलीत टाकण्यात आले मात्र भारताच्या महामाहीन आदिवासी  महीला राष्ट्रपती यांना कार्यक्रमाचे यजमान पद कट रचुन मोदींनी दिले नाही व भाजपा धार्जिण्या संतांना ,भारताची ९८ टक्के संपत्ती व सर्व संसाधन यावर अधिकार सांगणाऱ्या २ टक्के मुठभर निवडक लोकांसमोर देशाच्या ९८ टक्के मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेच्या रामावरील श्रद्धेचा बाजार करून आपल्या १० वर्षाच्या अराजकता व विफलता लपविण्याचा प्रयन्त तर नाहीना असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी केला आहे . 

राममंदिराच्या बाजार करून भाजपा २०२४ मध्ये निवडणूक जिंकू शकत नाही 

सध्या ज्या रीतीने भाजपने धर्माच्या खुला बाजार मांडला असुन आपले राजकीय क्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या सामाजीक असमानता ,भौतिकवाद ,अन्नाचे व आरोग्याचे तसेच शिक्षणाचे बाजारीकरण मुळे तयार झालेल्या समस्येला बाजूला ठेऊन जसे २०१९ जसे भारतीय जनतेला पुलगामा समोर करून आपले राजकीय अपशय लपविता येणार का हा प्रश्न यावेळी किशोर तिवारी यांनी उपस्थित करून ज्या देशात शंकराचार्य यांचाही खुला अपमान कधीही सहन केला नाही तसेच ज्यावेळी धर्माचा बाजार मांडला गेला त्यावेळी भारताने भगवान गौतम बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार केला याची आठवण नरेंद्र मोदींना यावेळी करून दिली . 

====================================================================