Monday, January 17, 2022

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायच्या कचरा कुंडी खरेदी प्रकरण हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार -विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची किशोर तिवारी यांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायच्या  कचरा कुंडी खरेदी  प्रकरण हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार -विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची किशोर तिवारी यांची मागणी 

दिनांक १७ जानेवारी २०२२


यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये पंचायती राज विभाग मागील दोन वर्षात संघटीत गुन्हेगारी करून कोट्यवधी लूट करण्यासाठी सतत चर्चेत असतांना व सॅनिटरी पॅड नष्ट करण्याच्या मशीनचा शात्रशुद्ध भ्र्ष्टाचाराची चौकशी अहवाल प्रलंबित असतांना जिल्हा विकास निधी मधुन ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाची दिलेला निधी जिल्हा परिषदेमध्येच कागदोपत्री निविदा प्रक्रिया राबवून सुमारे ५ कोटीचा जुना लावल्याची सतत ५ महिन्यापासून प्रत्येक लोकशाही दिनात तक्रार केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचा अनुभव घेतल्यानंतर हा सारा संच एका समाजसेवकाने कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनकडे सादर केल्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुरवडा झालेल्या १३४ गावातील ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना अंधारात ठेऊन प्रशासकीय सर्व खरेदीचे नियम धाब्यावर ठेऊन संघटीत गुन्हेगारी करून कोट्यवधी लूट राजरोसपणे करण्यात आल्याचे समोर आले असल्यामुळे हा एक सखोल चौकशीचा फौजदारी गुन्हा असल्यामुळे विभागीय आयुक्तांनी या सर्व प्रकाराची प्राथमीक चौकशी करून पोलीसात प्रकरण देण्यासाठी एक तक्रार शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी केली आहे . 

यवतमाळ जिल्हा विकास निधीमधुन २०२१-२२ मध्ये कचरापेटी ग्रामपंचायतीना देण्याचा प्रस्ताव आदीवासी प्रकल्प विभागात पुरवडा करून लाखोंचा चूना लावणाऱ्या एका फौजदारी गुन्हे असणाऱ्या राजकीय नेते पगारपटावर ठेवणाऱ्या पुरवडा करणाऱ्या दलालाने कट रचुन कोट्यवधींचा चूना सालाबादप्रमाणे लावण्यासाठी निधी योजना अधिकाऱ्याला टक्केवारी देऊन मंजूर केला मात्र याची सूचना एका जागृत समज सेवकाला लागल्यावर त्यांनी  २३/८/२०२१ ,३०/८/२१,२९/९/२१,१८/१०/२१ ला वारंवार जिल्हाधिकाऱ्याला व इतर अधिकाऱ्याला दिली व पुरवडा करण्यात येत असलेली कचरा कुंडी ही जास्तीत जास्त १८०० ते २००० रुपयाची असुन त्यासाठी ७००० रुपये देण्यासाठी पंचायत समिताना ग्राम पंचायतींना सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या मात्र १३४ गावात पूर्वी ज्याप्रकारे निकामी सॅनिटरी पॅड नष्ट करण्याच्या मशीनचा पुरवडा झाला होता त्याच धर्तीवर पुरवडा झाल्याची ओरड केली परंतु मस्तवाल अधिकाऱ्यांनी त्यांचे एकही तक्रार गंभीरपणे घेतली नाही शेवटी या समाजसेवकाने किशोर तिवारी यांच्याकडे तक्रार केली व त्यांनी कचराकुंडी तयार झाली त्या ठिकाणावरून सर्व ग्रामपंचायती गाठल्या मात्र तेव्हां वस्तुस्थिती पाहील्यावर ही सर्वमान्य लुट विभागीय आयुक्तांना सांगीतली व फौजदारी चौकशीची मागणी केली आहे . 

सरकारने टाचणी पासुन कोणतीही महागडी वस्तू दर्जा व दर नियंत्रणासाठी जेम पोर्टल वरूनच घ्यावी अशी अट असतांना कचरा पेटी सरकारला आदीवासी विभागात चुना लावल्याचा आरोप असणारा पुरवडादार शोधुन चौपट दराने एकत्रीत करून जबरीने दिलेली ऑर्डर वादग्रस्त आहे व ऑर्डर देणारा खाते प्रमुख हा जिल्हा परिषदेमध्ये पैसे खाऊन डॉन झाला असल्यामुळे मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यासह सर्वच त्याच्या मर्जीने काम करतात व त्याने ग्राम विकास विभागला विकत घेतल्याची चर्चा तो नियमित करतो अशा भ्र्ष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकुन जनतेचा पैसा तिजोरीत परत आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला जर विभागीय आयुक्तांनी फौजदारी कारवाई केली नाही आपण उच्चंन्यायालयात जाणार असल्यची माहिती  त्यांनी यावेळी दिली . 

==============================================================









No comments: