Monday, December 8, 2014

विदर्भात मागील ७२ तासात ११ शेतकऱ्याच्या आत्महत्या :युतीसरकारने पिक कर्जमाफी व हमीभाववाढीच्या आश्वासनाला पानेपुसल्याने वाढली निराशा

विदर्भात मागील ७२ तासात ११ शेतकऱ्याच्या आत्महत्या :युतीसरकारने  पिक कर्जमाफी व हमीभाववाढीच्या आश्वासनाला पानेपुसल्याने वाढली निराशा 

दिनांक ८ डिसेंबर २०१४
मागील ७२ तासात दुष्काळग्रस्त विदर्भात आणखी ११ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व सतत नापिकीला तसेच भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभेत सातबारा कोरा करणे व  लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन पुर्ण करणे तिजोरी खाली असल्यामुळे शक्य नाही असे सुतोवात केल्यामुळे विश्वासघाताचा धक्याने शेतकरी आत्महत्या होत असून ,ज्या ११ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपली जीवनयात्रा  संपविली त्यांची ओळख माध्यमांनी १- मोरेश्वर चौधरी  रा . देहेली यवतमाळ २-सुरेश जाधव रा. साखरा यवतमाळ ३- त्याताजी सोनुर्ले रा. नागरगाव यवतमाळ ४-हंसराज भगत रा. घारफळ यवतमाळ ५- कचरु तुपसुंदरे रा. रामपुर अमरावती ६-नामदेव खंडारे रा. माथान अमरावती ७. वामन राउत रा. चांडोले बुलढाणा ८- उमाशंकर काटकर रा. आजनी बुलढाणा ९. केशव  चौधरी  रा. बोरगाव नागपुर १०- पांडुरंग हिवसे रा. खराडी भंडारा ११-रेवनाथ  भारसाकळे रा. नगरी गडचिरोली असून यावर्षी विदर्भात १०५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या असुन ,सरकारच्या उदासीन धोरणामुळे आत्महत्या मागील दोन महिन्यात वाढल्या असुन मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला . 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला देता येत नाही ,कर्जमाफीमुळे  शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे , जर युती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं , सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही तर आज दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर येत्या काळात नौकरशाही गुलामीतील  नाकर्त्या सरकारला दररोज कमीत कमी १० निरापराध शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोजाव्या लागतील ,असा ईशारा किशोर तिवारी दिला  आहे 
 कापसाला व सोयाबीनला  मागील तीन  वर्षापासुन देण्यात येत असलेला हमीभाव अन्यायकारक असुन यामुळेच कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करीत अशी ओरड करुन आम्ही लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज करणारे भाजप सेनेचे नेते कापसाला कमीत कमी रु सहा हजार तर सोयाबीनला रु पाच हजार प्रती किं .  भाव दयावा अशी मागणी करून निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र पैकी तेलंगाना पाठोपाठ आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. मात्र कोरडवाहु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज माफी म्हणजे आत्महत्यांना आमंत्रण अशी टोकाची शेतकरी विरोधी भुमिका महाराष्ट्राच्या युती सरकारने घेतली ही तात्काळ बदलावी असाही रेटा तिवारी यांनी लावला आहे .  
लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याचे व लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज केली आहे.यावर्षी तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र मध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला व शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्र सारख्या वाढल्यानंतर  राज्यातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात आहेत, या जाणिवेतून आणि शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी पुन्हा पत निर्माण व्हावी, या भूमिकेतून पहिले तेलंगाना व आता आंध्र सरकारने संपूर्ण पीककर्ज घोषित केली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका या कर्जमाफीला विरोध करीत असुन  केंद्राचे रालोआ सरकार बँकानी  कोणतीही माफी देऊ नये अशा आदेशामुळे शेतकरी नवीन पिककर्ज घेण्यापासून वंचित रहात आहेत या शेतकरीविरोधी  पत पूरवठा धोरणाची चिन्हे महाराष्ट्रात दिसत असुन युती सरकारचे कोरा सातबारा करण्याचे आश्वासन आता भाजप पाठोपाठ शिवसेनाही विसरणार व आम्ही गंमत गंमत करत होतो असेच उत्तर  येत्या अधिवेशनात देणार हे आजच निश्चित झाले आहे ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 

Saturday, December 6, 2014

तेलंगाना नंतर आता आंध्र प्रदेशात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी : मात्र महाराष्ट्राचा युती सरकारचा पिक कर्जमाफीला धोरणात्मक विरोध

तेलंगाना नंतर आता आंध्र प्रदेशात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी : मात्र महाराष्ट्राचा युती सरकारचा पिक कर्जमाफीला धोरणात्मक विरोध 

दिनांक ६ डिसेंबर २०१४
निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र पैकी तेलंगाना पाठोपाठ आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. मात्र कोरडवाहु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज माफी म्हणजे आत्महत्यांना आमंत्रण अशी टोकाची शेतकरी विरोधी भुमिका महाराष्ट्राच्या युती सरकारने घेतली असून हि भूमिका केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकार तर्फे राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव (कृषी) डॉ .सुधिर गोयल यांनी याच आठवड्यात दिल्ली भेटीत मांडली असुन त्यांनीच आपणास अधिकृतपणे  सांगितल्याचे विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी एका पत्रकाद्रारे दिली आहे. 
लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याचे व लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज केली आहे.यावर्षी तेलंगाना ,आंध्र व महाराष्ट्र मध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला व शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्र सारख्या वाढल्यानंतर  राज्यातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात आहेत, या जाणिवेतून आणि शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी पुन्हा पत निर्माण व्हावी, या भूमिकेतून पहिले तेलंगाना व आता आंध्र सरकारने संपूर्ण पीककर्ज घोषित केली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका या कर्जमाफीला विरोध करीत असुन  केंद्राचे रालोआ सरकार बँकानी  कोणतीही माफी देऊ नये अशा आदेशामुळे शेतकरी नवीन पिककर्ज घेण्यापासून वंचित रहात आहेत या शेतकरीविरोधी  पत पूरवठा धोरणाची चिन्हे महाराष्ट्रात दिसत असुन युती सरकारचे कोरा सातबारा करण्याचे आश्वासन आता भाजप पाठोपाठ शिवसेनाही विसरणार व आम्ही गंमत गंमत करत होतो असेच उत्तर  येत्या अधिवेशनात देणार हे आजच निश्चित झाले आहे ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
कापसाला व सोयाबीनला  मागील तीन  वर्षापासुन देण्यात येत असलेला हमीभाव अन्यायकारक असुन यामुळेच कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करीत अशी ओरड करुन आम्ही लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन केंद्राची व राज्याची सत्ता काबीज करणारे भाजप सेनेचे नेते कापसाला कमीत कमी रु सहा हजार तर सोयाबीनला रु पाच हजार प्रती किं .  भाव का देत  नाहीत असा सवालही ,किशोर तिवारी यांनी विचारला आहे. जर युती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं , सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही तर आज दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर येत्या काळात नौकरशाही गुलामीतील  नाकर्त्या सरकारला दररोज कमीत कमी १० निरापराध शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोजाव्या लागतील ,असा ईशाराही किशोर तिवारी दिला  आहे . 


Thursday, December 4, 2014

विदर्भात मागील दोन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात शेतकरी आत्महत्यांचा पाऊस

विदर्भात मागील दोन दिवसात  आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात  शेतकरी आत्महत्यांचा पाऊस  
४ डिसेंबर २०१४ 
एकीकडे शिवसेना भाजपशी सत्ता समीकरणात जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून 'शिवशाहीचा ' सुतोवात करीत होती त्याच वेळी मागील विदर्भात ४८ तासात ७  दुष्काळग्रस्त उपासमारीला तोंड देत असलेले मदतीची आस संपलेले शेतकरी आपली जीवन यात्रा आत्महत्या संपवीत होते या  नापिकीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमरावतीचे घाटलाड्गीचे  संदीप  नागले ,चमकचे सुरेंद्र निकम चेटकपुरचे  प्रभाकर भोसले ,यवतमाळ येथील बाम्ह्रडाचे   शैलेश  खरे ,अकोला येथील राम्पापुरचे  कृष्णा मडावी ,वाशिमचे  वाईगौड  गावचे  राजू टोंगे तर भंडारा येथील बपेराचे  अप्पाजी निनावे यांचा समावेश आहे याच दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त  मराठवाडा भागात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले ,विदर्भात या वर्षी १०४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या आत्महत्या होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
मागील २ व ३ डिसेंबरला आपण दिल्लीयेथे केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी ,हंसराज अहिर यांना भेटून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  निवेदन देऊन  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे   सुमारे ५० लाख हेक्टर वरील नगदी पिक कापुस व सोयाबीन  सम्पूर्ण नापिकी झाल्यानंतर व आलेल्या पिकला हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे तसेच सतत दोन महिन्यापासून  ओरड करूनही  सादी  दखलही अधिकारी घेत नसल्यामुळे  सारा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे त्यातच केंद्र व राज्य सरकारने बध्याची  भुमिका घेतली  शेतकऱ्यांचे एकूण पिकांचे नुकसान ५० हजार कोटीचे झाले असतांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला फक्त साडे चार हजार कोटीची मदत मागितली असुन ही फारच अपुरी असुन महाराष्ट्राचे या वर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असुन या करीता कमीतकमी ६० हजार कोटीचे  विषेय पकेज देणे काळाची गरज असुन   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात यावे अशी विनंती  विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केंद्र सरकारला केली आहे . 
आपल्या मागणी पत्रात  सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान द्या, संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करा, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करा, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी अनुदान द्या, सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्या आदी मागण्याही तिवारी यांनी केल्या आहेत.

Monday, December 1, 2014

विदर्भात मागील दोन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात शेतकरी आत्महत्यांचा पाऊस

विदर्भात मागील दोन दिवसात  आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात  शेतकरी आत्महत्यांचा पाऊस  
४ डिसेंबर २०१४ 
एकीकडे शिवसेना भाजपशी सत्ता समीकरणात जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून 'शिवशाहीचा ' सुतोवात करीत होती त्याच वेळी मागील विदर्भात ४८ तासात ७  दुष्काळग्रस्त उपासमारीला तोंड देत असलेले मदतीची आस संपलेले शेतकरी आपली जीवन यात्रा आत्महत्या संपवीत होते या  नापिकीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमरावतीचे घाटलाड्गीचे  संदीप  नागले ,चमकचे सुरेंद्र निकम चेटकपुरचे  प्रभाकर भोसले ,यवतमाळ येथील बाम्ह्रडाचे   शैलेश  खरे ,अकोला येथील राम्पापुरचे  कृष्णा मडावी ,वाशिमचे  वाईगौड  गावचे  राजू टोंगे तर भंडारा येथील बपेराचे  अप्पाजी निनावे यांचा समावेश आहे याच दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त  मराठवाडा भागात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले ,विदर्भात या वर्षी १०४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या आत्महत्या होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
मागील २ व ३ डिसेंबरला आपण दिल्लीयेथे केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी ,हंसराज अहिर यांना भेटून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  निवेदन देऊन  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे   सुमारे ५० लाख हेक्टर वरील नगदी पिक कापुस व सोयाबीन  सम्पूर्ण नापिकी झाल्यानंतर व आलेल्या पिकला हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे तसेच सतत दोन महिन्यापासून  ओरड करूनही  सादी  दखलही अधिकारी घेत नसल्यामुळे  सारा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे त्यातच केंद्र व राज्य सरकारने बध्याची  भुमिका घेतली  शेतकऱ्यांचे एकूण पिकांचे नुकसान ५० हजार कोटीचे झाले असतांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला फक्त साडे चार हजार कोटीची मदत मागितली असुन ही फारच अपुरी असुन महाराष्ट्राचे या वर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असुन या करीता कमीतकमी ६० हजार कोटीचे  विषेय पकेज देणे काळाची गरज असुन   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात यावे अशी विनंती  विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केंद्र सरकारला केली आहे . 
आपल्या मागणी पत्रात  सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान द्या, संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करा, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करा, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी अनुदान द्या, सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्या आदी मागण्याही तिवारी यांनी केल्या आहेत.

Saturday, November 29, 2014

Vidarbha reports seven farmer’s suicides during ‘CM’s Two Vidarbha Tour’- Dying Farmers crying as drought relief Measures are Peanut

Vidarbha reports seven farmer’s suicides during ‘CM’s Two Vidarbha Tour’- Dying Farmers crying as drought relief Measures are Peanut
30 November 2014
When newly elected Maharashtra CM Devendra Fadnavis  was reviewing vidarbha crisis in his two days tour of farm suicide affected region same time seven debt trapped distressed and drought ridden farmers killed themselves as per reports indentified as Kashiram Indore and Digabar Nimbhokar from Akola district ,Vinod Malik and Kisan Shanwhare from Amaravati, Suresh Gugul from Chandrapur,Raju Rathode from Washim ,Ramkrishnna Gawande from Buldhana  taking toll 1022 in the year 2014 which is  showing increasing trend in last five years as region is grilling severe drought and agrarian economic recession as farmers are being forced to sale only cash crop cotton and soybean in much more lower rate than minimum support price moreover their cost cultivation has been double and production has been dropped to 50% as per GR issued by Govt. of Maharashtra on 25th November 2014 ,Kishor Tiwari of Vidarbha Janandolan Samiti only activist group monitoring farm suicide in Vidarbha since 1995 has termed these  recent farm suicides since new BJP ruled  Modi Govt. as farmers genocide due to continuous apathy and betrayal from promises of addressing farm suicides issues of  hostile minimum support price, exploitation of farmers from free economy ,very poor credit facility of banking institute and completely failed disaster management even after the repetitive alerts of severe drought and crop failure in the region since June 2014 and matter of National Shame  when Indian Prime Minister has come to power by making vidarbha farmers suicides as key issue of national election and giving toll promises of raising MSP as per Modi formula of investment plus 50% profit and taking banker to doorstep of farmers for  crop loan  but all elections talks are turning to hoax ,which is fueling more despair and increasing farmers suicides in region.
Maharashtra Govt. has rubbed salt on the wound of the farmers when they declared relief aid package admitting severe drought in 10,000 villages of vidarbha region affecting 2 million farmers but all relief measures have ignored basic demands of crop failure compensation, crop loan waiver , providing food, fodder, water and employment  to crisis driven distress rural population of region ,when last two days vidarbha reported seven innocent farmers genocide same time other drought hit region marathawada of Maharashtra  has reported seven farmers more suicides which is much more irritating as all political parties are doing dirty politics of issue but not serious for the requisite relief aid ,Tiwari added.

The Delegation of distressed farmers met Maharashtra CM Devendra Fadnavis  at Amravati on 28th November and submitted six demands asking Rs.25,000 per hector compensation due to crop failure , complete crop loan waiver, 100 days wage subsidy under NAREGA to drought hit farmers , free food, health and education security to all drought hit families of the region and complete ban of liquor and gambling like mataka ,Tiwari urged CM in his meeting 

Monday, November 24, 2014

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडून होत असलेली उपेक्षा म्हणचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार -येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी विधवा या मंत्र्यांना मिठाचे पोत भेट देणार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडून होत असलेली  उपेक्षा  म्हणचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार -येत्या हिवाळी अधिवेशनात  शेतकरी विधवा  या मंत्र्यांना मिठाचे पोत भेट देणार 

दिनाक -२५ नोहेंबर २०१४
आजच्या यवतमाळ भेटीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा  पोलीस मार्फत सर्किट हाउसला ताटकळत ठेऊन  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री  यांना न भेटताच  निघुन गेल्याने  व राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  सरकारची तिजोरी खाली आहे पिककर्ज ,कापसाला बोनस  व वीज बिल माफी देता येत नाही मोबाइलवरचे बोलणे थांबू नये म्हणून तुम्ही दरमहा मोबाइल बिल भरताच ना! मग वीज बिल नियमित का भरत नाही, अशा शब्दांत  यांनी रविवारी अकोला येथील दुष्काळी आढावा कार्यक्रमात शेतकऱ्यांनाच  उपदेश  दिल्याने विदर्भाचे दुष्काळग्रस्त शेतकरी व्यथीत झाले असून , शेतकरी अभूतपूर्व संकटात असतांना त्यांच्या अडचणी ऐकण्यास वेळ नसणे तर त्यांना दिलासा न देता मस्तवालपणा दाखविणे हा तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असुन आम्ही  भाजप सरकारला येता हिवाळी अधिवेशनात शेकडो शेतकरी विधवांच्या हातांनी मिठाचे पोत देऊन आपला  त्रागा प्रगट करणार अशा  तिव्र शब्दात शेतकऱ्यांना मदतीच्या  उशिरावर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी   महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महसूल मंत्री  वागण्यावर  व्यक्त केली आहे . 
या पुर्वी जेंव्हा जेंव्हा भारताच्या   महामाहीन राष्ट्रपतीसह  केंद्रीय मंत्री यांनी यवतमाळ शहराला भेट दिली त्यांनी वेळात वेळ काठून शेतकरी विधवा व शेतकर्याना  वेळ दिला आस्थेने विचारपुस केली पण ज्या यवतमाळ जिल्यात भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  दाभाळी  येथे  विषेय  राष्ट्रीय शेतकरी चर्चा  केली व शेतकरी आत्महत्यांचा  मुददा रेटून केंद्रात व राज्यात सत्ता काबीज केली ते सरकार पदारुड होताच आपल्या जाहिरनाम्यानुसार पिककर्ज ,बीज बिलमाफी  देणार ,लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव तात्काळ देणार अशी आशा सर्व विदर्भ मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकर्याना होती मात्र मागील सहा महिन्यात भारताच्या मोदी सरकारने ह्या मागण्या विचारातच घेतल्या नाहीत तर आता १५ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या राज्याच्या भाजप सरकारने चक्क हातच वर केल्यामुळे शेतकरी विश्वासघात  झाल्याचा अनुभव घेत आहेत व  यामुळेच मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे 

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  यांना निवेदन देऊन    शेतकरी वाचवा व या कोरडवाहु शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या अशी विनंती करून खालील मागण्या सादर केल्या आहेत 

-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१.सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे 
२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
३. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
४. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा हमीभाव द्या . 
५-सर्व आदिवासीना तात्काळ  अन्न  सुरक्षा व  खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट  अंत्योदय योजने नुसार अन्न सुरक्षा व  खावटी वाटप  करा . 
६- आरोग्य सेवा 
सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना २०१३ च्या यादी नुसार बी पी  एल चे  कार्ड देऊन मोफत वैद्दकिय सेवा  सर्व दवाखान्यात मोफत देणे 
७..सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांनावृद्धाना व विधवा  मासीक अनुदान -सर्वदुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना दया ,अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली मात्र सरकार या मागण्यावर गंभीर नसुन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ  करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 

Saturday, November 22, 2014

Farmers' widows to stage protest outside CM bungalow= DNA

Farmers' widows to stage protest outside CM bungalow

Sunday, 23 November 2014 - 5:35am IST | Agency: DNA
http://www.dnaindia.com/mumbai/report-farmers-widows-to-stage-protest-outside-cm-bungalow-2037563

The Vidarbha Jan Andolan Samiti, an aggressive farmers' advocacy group, plans to stage demonstrations outside Chief Minister's residence in Nagpur during the winter session of the assembly, which starts from December 8.
Led by Kishor Tiwari, an engineer- and MBA-turned activist, the VJAS will highlight the issue of farmer suicides in the region. Tiwari, who is the president of VJAS, is known for his inflammatory and provocative language during agitations.
Speaking to dna over phone, Tiwari pointed out that more than 4,000 farmers have committed suicide in 2014, with Vidarbha accounting for about 1,000 deaths, because of inaction on the part of the government.
Tiwari said BJP leaders, including late Gopinath Munde, had held the previous Congress-NCP government responsible for the suicides. "If the Fadnavis government is not in a position to prevent any suicide, what should we term it as?"
The firebrand leader said VJAS is left with no option but to launch an intense agitation outside Ramgiri, CM's official residence in Nagpur. Underlining the demands of the Samiti, he said, "Cotton growers whose crop has been damaged should be paid investment money plus 50 per cent of their profit in addition to loan waiver."
Stressing that the crop have been damaged on over 20,000 hectares, Tiwari said the farmers should be included in Antyoday Yojana so that they can get food-grains at least for a year. "Their children should get free education and all health schemes should be extended to them. Most important, the government should ban alcohol and gambling in Vidarbha."
Areas from Western Vidarbha and Marathwada (1,200 deaths), which largely depend on rain, have seen maximum farmer suicides, said Tiwari. The activist added that Amravati, Akola, Washim, Yavatmal, Buldhana, Nanded, Parbhani, Hingoli and Beed are the other stages in Maharashtra where this human tragedy is playing out.
'CM understands issue well'
Tiwari said CM Fadnavis, who is from Nagpur, understands the ordeal farmers are going through. "I have sent a number of SMSes to draw his attention to the crisis. Four farmers ended their lives on the day when he took oath. The CM has been maintaining that he would look into this issue."