Thursday, November 19, 2020

बिहार मध्ये कट्टर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार मुख्यमंत्री चालू शकतात तर महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सदैव पुरस्कार करणारी शिवसेना का नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन जी भागवत यांना किशोर तिवारी यांचे खुले पत्र !

प्रेस नोट :
कृपेने प्रकाशनार्थ...

"बिहार मध्ये कट्टर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार मुख्यमंत्री चालू शकतात तर महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सदैव पुरस्कार करणारी शिवसेना का नाही ?"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन जी भागवत यांना किशोर तिवारी यांचे खुले पत्र !
शिवसेने विरुद्ध सतत आकस व दरळ ओकनाऱ्या चांडाळ चौकडीचे सत्ता पिपासू राजकारण ओळखा- किशोर तिवारी

दि. १९ नोव्हें २०२०, 


बिहार विधानसभेच्या नुकत्यात झालेल्या निवडणूकी नंतर उत्पन्न राजकीय परिस्थितीत भाजपाने ज्या प्रकारे प्रखर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, पण हाच मापदंड शिवसेनेसाठी महाराष्ट्रात कां अंगी कारण्यात आला नाही ? असा प्रश्न संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना विचारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि रा.स्व.संघाचे एके काळचे पूर्णकालिन स्वयंसेवक शेतकरी नेते श्री.किशोर तिवारी यांनी एक मार्मिक खुले पत्र डॉ.भागवत यांना लिहिले असून शिवसेनेला सातत्याने दूर सारण्या साठी टारगेट करणाऱ्या चांडाळ चौकडी च्या कारस्थानचे  पितळ उघडे केले आहे.

आपल्या पत्रात श्री तिवारी यांनी म्हटले आहे की संपुर्ण देशाला माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा सातत्याने पुरस्कार केलेला असून आजही शिवसेना हिंदुत्वासाठी कोणतेही त्याग करण्यास सदैव तयार असताना,महाराष्ट्र भाजपातील देवेंद्र रुपी चांडाळ चौकडी सातत्याने शिवसेने विरुद्ध आग ओकीत आहेत. यामागे फक्त आणि फक्त सत्तेचे राजकारण असून मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिवसेनेला कदापि देणार नाही, ही कलुषित भावना ठेवून, ३० वर्षाची सच्ची सहकारी- साथी असलेल्या शिवसेनेला बाजूला सारण्याचे कृष्णकृत्य या मंडळीने चालू ठेवले आहे. शिवसेना प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे विरूध्द सातत्याने दरळ ओकण्याचे काम राणे, सोम्मया आदी शिवसेना विरोधी मंडळीस देण्यात आले असून यात फक्त पदाची लालसा असलेली मंडळी या लोका कडून भाट गिरीचे काम करवून घेत असताना हिंदुत्वा चा मुद्दा मात्र बाजूला लोटून हे सर्व कुटील कारस्थानं सुरू असल्याचे तिवारी यांनी विशद केले आहे."
गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण फक्त सत्तेसाठी सुरू असून शिवसेना-भाजपा जर एकत्र आले तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे लागेल, या भीतीपोटी ही मंडळी शिवसेनेला बाजूला सारण्यासाठी सतत बदनाम करून  हिंदुत्वाच्या मुद्द्याचा सुद्धा बळी देत आहेत.
भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये ज्याप्रमाण नितीश कुमार यांना हिंदुत्व विरोधी असले तरी मुख्यमंत्री केले पण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सदैव पाठराखण करणारी सच्ची साथी असलेली हिंदुत्ववादी शिवसेना मात्र कशी दूर सारली गेली, याचा सविस्तर उहापोह या पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची फक्त आणि फक्त आपणास मिळावी, या कलुषित भावनेने हिंदुत्ववादी शिवसेनेला बाजूला लोटून त्यावर रात्रं-दिवस काम करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रिय भाजपा ला गुमराह करून सातत्याने दबाव निर्माण करण्याचे काम, या देवेंद्र च्या चांडाळ चौकडी इकडून सुरू असून , त्यामुळे राष्ट्रवादी हिंदुत्ववादाला तिलांजली दिली जावून राष्ट्राचे अतोनात नुकसान होत आहे, ही बाब संघ नाकारून शकत नाही. बिहार साठी एक माप दंड आणि महाराष्ट्र साठी दुसरा , हे भाजपा चे कसे काय धोरण ?

याप्रकरणी रा.स्व. संघाने हस्तक्षेप करून हिंदुत्वाचा उपहास होऊ नये, यासाठी या चांडाळ चौकडीला वेळीच काबूत आणावे आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी राष्ट्रिय भाजपला योग्य सल्ला द्यावा, त्यामुळे राष्ट्रवादी हिंदुत्वाचा उपवास होणार नाही आणि शिवसेना या उदात्त हेतू पासून भाजपा कडून दूर जाणार नाही, याची काळजी घेण्याची कळकळीची विनंती सुद्धा किशोर तिवारी यांनी रा स्व संघ प्रमुखांना केली आहे.

*******

संपर्क सूत्र : ¯
किशोर तिवारी
भ्रमण ध्वनी :
9422108846
ईमेल :

No comments: