मिहानमध्ये ‘कमी भावाने’ विकलेल्या जमिनींची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने संबंधितांचे धाबे दणाणले | |
‘मिहान’ प्रकल्पासाठी जमिनी देताना काही कंपन्यांबाबत पक्षपात करून त्यांना कमी दरात जमिनी विकण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव, राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव, मिहानचे उपाध्यक्ष, नागपूरचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी या प्रतिवादींच्या नावे गेल्या आठवडय़ात नोटीस बजावली.
मिहानमधील जमीन खरेदी करणाऱ्या निरनिराळ्या कंपन्यांना वेगवेगळ्या दराने जमीन देण्यात आली. मे २००८ मध्ये सत्यम कंपनीला १२८ एकर जमीन एकरी १९ लाख एकर या दराने विकण्यात आली. मात्र इतर कंपन्यांना एकरी ३० लाख, ३५ लाख, ४० लाख, ४४ लाख, ५२ लाख, ६० लाख, ६५ लाख, ८० लाख अशा विविध दराने जमिनी विकण्यात आल्या. याउलट ‘गती लिमिटेड’ला १ कोटी १ लाख रुपये, तर टीसीआय इन्फ्रास्ट्रक्चरला १ कोटी २० लाख ५ हजार रुपये एकर दराने जमीन विकण्यात आली. यातून विशिष्ट कंपन्यांबाबत पक्षपात, तसेच मोठय़ा रकमेचा गैरव्यवहार स्पष्टपणे दिसून येतो. १०० एकर क्षेत्राचे तेल्हारा धरण सत्यम कंपनीला फुकटात देण्यात आले, तर अलीकडेच रिटॉक्स कंपनीला १० एकर जमीन मोफत दिली गेली, याचाही उल्लेख सिटिझन्स फोरमच्या याचिकेत करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment