यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घ्यावी -किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांनां साकडे
यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घ्यावी -किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांनां साकडे दिनांक २० जानेवारी २०१९
स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मराठा सेवा संघ, प्रहार, गुरूदेव सेवा मंडळ, शेतकरी वारकरी संघटना, पोलीस पाटील संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, संभाजी ब्रिगेड, इंडियन मेडिकल असोसिएशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरी विश्व विद्यालय, जिजाऊ ब्रिगेड, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना, आयटक, बिरसा ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जमाते इस्लाम हिंद, अल्कोहोलीक एनॉनिमस, गणेश दुर्गा मंडळ, अस्तित्व फाऊंडेशन, माळी समाज, माहेश्वरी मंडळ, बचतगट आणि विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणीसाठी काढलेल्या महामोर्चाची दखल घेत सरकारने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदी करावी अशी मागणी आदीवासी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे . जिल्ह्यातील गावोगावी खुलेआम दारू विकली जाते. मात्र, पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने 'आधी दारूबंदीबद्दल बोला, नंतर इतर प्रश्न' असा प्रश्नच आता आमदारांना महिलांनी विचारात आहेत. शेकडो ग्रामसभेतही संतप्त महिलांनी 'संपूर्ण गाव दारूमुळे अधोगतीला गेले आहे, दारूसोबतच जुगाराचे व्यसनही वाढले आहे. यावर अंकूश नसल्याने आमची तरुण मुले कामधंदा करत नाहीत, दारू पिऊन घरी येतात', करिता सर्वच गाव दारूमुक्त करण्याचा ठरावच घेण्यात आला आहे . यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, केळकर समितीने यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा, असा अहवाल दिला असल्यामुळे या अहवाला प्रमाणे जिल्हा दारूमुक्त करा अशी मागणी होत आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गाशक्तीने आपला अवतार दाखविल्यानंतर सरकारने यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या युती सरकारने चंद्रपूर जिल्यात दारूबंदीच्या निर्णयाचे तीनतेरा यवतमाळ जिल्ह्यातील सोनु सरदार कंपनीने सारे अधिकारी विकत घेऊन केले आहे आता यवतमाळ जिल्यात दारूबंदी करा कारण यवतमाळ जिल्यात दारूबंदी करण्यासाठी मागील ७ वर्षापासुन जनांदोलन होत असून येथील आदिवासी व शेतकऱ्यांची तीव्र मागणी भाजपने यापूर्वी या मागणीला दिला होता जर सरकारने यवतमाळ जिल्यात दारूबंदी चंद्रपूर सोबत लागू करावी या मागणीसाठी उपोषण सत्ताग्रह सुद्धा केले होते कारण महाराष्ट्राच्या युती सरकारने विधीमंडळाच्या पटलावर महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा फारच प्रतीक्षा असलेला अहवाल सादर करण्यात आला असून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारस केली असून ग्रामीण भागातील प्रचंड अडचणी ,आर्थिक संकट व अभुतपूर्व कृषी संकट यावर केळकर समितीच्या सर्व नऊ सदस्य सह नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी यांनी शेकडो शेतकरी विधवा व गावागावातील महिलांनी दारूच्या विरोधात एल्गार पुकारत रस्त्यावर उतरुन आंदोलने करीत असलेल्या माय बहीणीची हाकेला दाद देत हि शिफारस केली होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या डॉ.विजय केळकर समितीच्या यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारसीची बजावणी तात्काळ करावी किशोर तिवारी यांनी केली आहे . तरुण पिढीत व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहे. दारूमुळे सुखी संसाराची रांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. पोलीस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्टय़ा पेटविल्या जात आहे. या दारूच्या विरोधात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी कारवाई करायची त्यांचेच छुपे पाठबळ असल्याने न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न महिलांपुढे निर्माण झाला आहे. अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. काही ठिकाणी तर महिलांनी स्वत:च दारूच्या भट्टय़ा नेस्तानाबूत केल्या. दारूचे हे साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. दारूविरुद्ध आंदोलन करणार्या या महिलांना दारू माफियांकडून धमक्याही दिल्या गेल्या. काही ठिकाणी हल्लेही केले गेले,हि शोकांतिका किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्रा समोर वारंवार ठेवली आहे मात्र दारूविके सरकार जागत नाही याचे दुःख किशोर तिवारी यांनी व्यक्त केले . ===============================================================
VIDARBHA JANANDOLAN SAMITI PRESIDENT – KISHORE TIWARI, B.E. (Mech.Engg.), M.B.A., LL.B., M.A. (Pub. & Admn.), M.A. Sociology, M.I.S. (USA), Fellow - I.E.H., Fellow – Institution of Engineers (India)- CHARTERED ENGINEER BACKGROUND : Vidarbha Jan Andolan Samiti is fighting for the cause of common man since 1998. Vidarbha Jan Andolan Samiti is constantly pursuing its battle on various fronts like – a.Administrative b.Judicial c.Quasi-judicial d.Legislative e.Parliamentary f.International levels PUBLIC ISSUES : 1.Farmers suicides 2.Mal nutrition of Tribals. 3.Plights of Rural economy 4.Drinking water 5.Right to Food 6.Right to Education 7.Problems of Minorities 8.Issue of Separate Statehood to Vidarbha THE EFFECT OF MOVEMENT : The continued follow up and Jan Andolans of Vidarbha Jan Andolan Samiti has resulted in many success broadly classified as – 1.Waiver of small farmers crop loans 2.interest remission to marginal farmers 3.right to food to the lacs of tribals. 4.Primary Education to every rural students. 5.Farmers packages 6.BPL benefits to thousands of poor families. 7.Justice to unwed mothers
No comments:
Post a Comment