Friday, March 20, 2020

कोरोना वायरसशी भारताची झुंज :असंघटित कामगार व शेतमजुरांनाही उपासमार टाळण्यासाठी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी

कोरोना वायरसशी भारताची झुंज :असंघटित कामगार व शेतमजुरांनाही उपासमार टाळण्यासाठी आर्थिक मदत  तात्काळ द्या -किशोर तिवारी  
दिनांक - २० मार्च २०२०
कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचा प्रसार होण्यापासून रोखणे हा मंत्र घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला महाराष्ट्रात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांनी अभुतपुर्व प्रतीसाद दिला असुन मात्र यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात व गावात काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट आले असुन त्यांना अन्नपुर्णा योजनेचा विस्तार करून सर्व शिधापत्रिका धारकांना घरपोच फुकट  पुढच्या तीन महिन्याचे डाळ गहु तांदूळ व तेल त्याच बरोबर घर खर्चाला आर्थिक अनुदान देण्याची मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जगातील व भारतातील सर्व सरकारे उद्योग समुह व संघटीत क्षेत्रातील कामगारांचे हीत जोपासण्यात मोठमोठाले आर्थिक पॅकेज घोषीत करीत आहेत मात्र व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांचा साधा विचारही करण्यात येत नसुन दररोज सरकार उपाय योजनेच्या नावावर आदेश काढत आहेत तर प्रशासन आपल्यापरीने अर्थ लावून अघोषित संचारबंदी लावून बसला आहे त्यामुळे महाराष्ट्रात भयंकर उपासमारी व आर्थिक संकटामुळे कोरोनापेक्षा जास्त बळी जाण्याची चिंता किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
अधिकारी व पोलिसांनी फक्त गर्दी करणारे माल हॉटेल रेस्टारेंस्ट पान टपरी बंद करण्याचे आदेश दिले असतांना सारेच दुकाने दंड्या जोरावर बंद केल्या आहेत अचानक  रेल गाड्या व वाहने रद्द केल्याने हजारो प्रवाशी कमालीची गर्दी करून प्रवास करीत आहेत ज्यावाटेल जशा सोयीच्या रीतीने गरीबांना उपासमारीला तोंड देण्यास लावत आहेत हजारो मंजूर शहरातुन गावाला परत जात आहेत यामुळे सर्वात जास्त संक्रमण गावागावात व खेड्यखेड्यात होत आहे यासाठी आहे तेथे राहण्यासाठी आर्थिक अनुदान अन्न सुरक्षा देण्याची व वैद्यकीय माहीती नसणाऱ्या आगाऊ शहाणपणा दाखविणाऱ्या स्वतःचा पॅटर्न चालविणाऱ्या नेत्यांना अधिकाऱ्यांना आवरण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
"कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे किंवा यावर तोडगा निघेल अशी आशा आहे, असे लोकांना लोकांचे आश्वासन हवे आहे." तसेच  सरकारने प्रथम या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला पाहिजे त्यासाठी चायना इटाली स्पेन अमेरीका सारखं लोकांनी सरकारला सहकार्य दिल आहे मात्र सरकारने चायना स्पेन इटाली  सारखं आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे मात्र सरकारने व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले आहे असे चित्र आहे कारण कोरोनाच्या भीतीमुळे चिकन भारतात ९० टक्के  स्वस्त झाले आहे त्यामुळे या उद्योगाशी जुडलेले सर्व व्यापारी असंघटित कामगार उपाशी मरत आहेत मात्र यांच्या दुःखावर पंतप्रधान एकही शब्द बोलत नाहीत मात्र मोठ्या उद्योगासाठी पॅकेज वर पॅकेज घोषीत करण्यासाठी टास्क फोर्स तयार करतात  आज भारतात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांची संख्या ७० टक्के आहे या कोरोना वायरसचा फटका यांना सर्वात जास्त बसत आहे मात्र यांच्यासाठी संध्याकाळी ५ मिनिटे टाळ्या मारण्याचे आव्हान नाहीतर आर्थिक पॅकेज   घोषीत करण्याची मागणी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  किशोर तिवारी यांनी केली आहे .. 
======================================================================

No comments: