Saturday, March 2, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील सभेत विदर्भ मराठवाडयातील कोरडवाहू शेतकरी ,आदीवासी ,बंजारा व महिला बचत गटांची घोर निराशा केली -किशोर तिवारी 

दिनांक २ मार्च २०२४

ज्या विदर्भ मराठवाड्याने मोदींना २०१४ व २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड विश्वास दाखविली तेथील  आत्महत्याग्रस्त शेतकरी ,शोषित महीला आदिवासी यांची आपलय २०२४ च्या लोकसभेचा प्रचार सुरु करण्यासाठी घेतलेल्या सभेत प्रचंड निराशा केली २०१४ व २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी दिलेल्या सर्व आश्वासनाचा यावेळी त्यांना संपुर्ण विसर पडल्यामुळे सकाळी पासुनउपाशी तापाशी  बसून असलेल्या महिला आदिवासी व शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली असुन याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसणार अशी घणाघाती प्रतिक्रिया विदर्भाचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

साध्य विदर्भ मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नापीकी व हमीभावापेक्षा कमी भावात कापूस सोयाबीन विकल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील १० वर्षात विदर्भ मराठवाड्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ,आदीवासी व बंजारा भटक्या समाजाचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य हे प्रश्न प्रचंड प्रमाणात या १० वर्षात वाढले आहेत .विदर्भ मराठवाड्यात लाखो बचत गटांपैकी फक्त २ टक्के महिला बचत गट सरकारी बँकातून कर्ज काढत आहे तर ९८ टक्के बचत गट मायक्रोफायनान्स कंपन्या वा सहकारी नागरी पत संस्थांच्या दाम दुपट्टीच्या व्याजात फरफटत आहे व आरबीआय ने बघ्याची भूमिका घेतली आहे . 

२०१४ मध्ये दाभाडी येथे नरेंद्र मोदीजींनी  शेतकऱ्यांचे उत्त्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे ,बँक शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन मुबलक पतपुरवठा करतील,लागवडीचा खर्च अर्धा करणार ,जमिनीचे आरोग्य ,पोत व पुनर्जीवन करणार , सर्व शेतकऱ्यांना  सिंचनाची सुविधा देणार ,सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवडा देणार , कापूस व सोयाबीन मध्ये बियाणे ,लागवड पद्धत यामध्ये तांत्रीक अडचणी दूर       करणार . ,कोरडवाहू क्षेत्रात तेलबिया ,डाळ पिके ,कडधान्य पिकासाठी विशेष प्रोसाहन देणार, हमीभाव देतांना डॉ स्वामिनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणार  रासायनिक शेतीमुळे निर्माण झालेल्या कर्क, किडनी आचार,पाण्याचे प्रदूषण ,पाण्याची शुद्धता ,आम्लता कमी करणे यावर विशेष  कार्यक्रम व योजना राबविणार तसेच  २०१९ मध्ये  पांढरकवडा  येथे नरेंद्र मोदीजींनी आदिम आदीवासी जसे कोलामाना पक्के घर शुद्ध पाणी शाळा उपलब्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,भटक्या जातीच्या जसे बंजारा व पारधी यांना विशेष निधी उपलब्ध करून  पक्के घर शुद्ध पाणी समाज जीवन शेती पट्टे  शाळा उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार ,महिला बचत गटांमार्फत देण्यात आलेले सर्व कृषी कर्ज माफ करण्यात येणार ,सर्व महिला बचत गटांना ३ लाखापर्यंत नवीन भांडवल देण्यात येणार हि आश्वासने दिली होती मात्र या आश्वासनांची पूर्तता तर केली नाही मात्र नवीन आश्वासनांची खैरात वाटुन वंचितांच्या जखमेवर मीठ चोळले ,असा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला 

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील दाभडी या गावी "चाय पे चर्चा" हा कार्यक्रम गाजावाजा करून घेण्यात आला. या ठीकाणी  गाजावाजा करून दिलेली सर्व आश्वासने आता १० वर्षानंतर खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या संबंधात तिवारी यांनी एक पत्र नरेंद्र मोदींना पाठवले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला आहे.केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबतील आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपा ने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द नरेंद्र मोदी सरकारने पाळला नसून एकीकडे शेतीवर खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही. कापूस, सोयाबीन चे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सी.सी.आय. आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडुन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण, आरोग्य यांचे वरील खर्च तिप्पट झाला आहे. बेलगाम महागाई ने आम आदमी हैराण आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस चे भाव आकाशाला भिडले आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार राजरोस पणे सुरू असून नरेंद्र मोदी या गंभीर विषया वर आपले तोंड कधी उघडणार? असा सीधा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

शेतीकडे सरकारचे दुलर्क्ष 

मागील दशकात एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात ३२४१६ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत आतातर तरुण युवक युवती हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना २०२४ मध्ये मोदीजींना त्यांच्या गारंटी वर बालवेच लागेल आता भारत सरकारच्या सर्व योजनांचे तीन तेरा वाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २०२४ चा लोकसभेच्या  निवणुकीचे बिगुल फ़ुंकताना त्यांना वास्तविक सत्यावरही बोलावे कारण सन २०१४ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दाभडी येथे पंप्रधान मोदी साहेबांनी विदर्भ शेतकरी आत्महत्या मुक्त करू,शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न हमीभाव,पत पुरवठा,लागवड खर्च कमी करणे,जमिनीची उत्पादकता वाढविणे,सिंचनाची व्यवस्था करणे,कृषी क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी आणणे,पीक पद्धतीत बदल करणे ही प्रमुख आश्वासने दिली होती. तर २०१९ मध्ये पांढरकवडा येथे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला बचत गटांचे कर्ज माफ करून ३ लाखाचे व्याजमुक्त कर्ज देणे व सर्व आदिम आदिवासी बंजारा, भटक्या समाजाला पक्के घर देण्याचे,सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने घरी देऊ,प्रत्येक घरात एकाला रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र मागील १० वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व सहकारी पत संस्थांनी १८ ते २४ टक्के व्याज वसुली करून सर्व महिला बचत गटाच्या आई, बहिनींचे संसार रस्त्यावर आणले आहेत. मात्र सरकारी बँका झोपा काढत आहेत.केंद्र सरकार चे धोरण हे फक्त मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना लाखो कोटी रुपयांचा फायदा पोहचविणे हाच असून शेतकऱ्यांचे शोषण, बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या या ज्वलंत मुद्यांवर लक्ष देण्यास नरेंद्र मोदी सरकार जवळ अजिबात वेळ नाही. रेटून खोटे बोलणे हे फक्त एकमेव तंत्र मोदींना चांगले अवगत असून ज्वलंत मुद्यांवर बोलण्यास त्यांना अजिबात आवडत नसल्याचा आरोप नरेन्द्र मोदी यांच्या “चाय पे चर्चा” कार्यक्रमाचे वॉर रुम सदस्य राहीलेल्या किशोर तिवारी यांनी केला आहे. 


-----------------------------------------------------------------

किशोर तिवारी

राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (ठाकरे गट) 

मो. ९४२२१०८८४६

Email ID : kishortiwari@gmail.com


Monday, January 22, 2024

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे

राम मंदिरासाठी मोदींचे अभिनंदन -आता शेतकऱ्यांच्या, महिलांच्या ,बेरोजगारांच्या व  ग्रामीण भारताच्या समस्यांवर तोडगा काढा -किशोर तिवारी यांचे मोदींना साकडे 

दिनांक -२२ जानेवारी २०२४

ज्या मुद्याला धरून भाजपने भारताची सत्ता काबीज केली व शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते व विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच आदीवासी जनतेच्या प्रश्न्नावर काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खुल्यामनाने अभिनंदन केले असुन आता महाराष्ट्रातील अतिशय मागास व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सोबतच  अतिमागास आदीवासी बेरोजगार महिलांच्या तसेच ग्रामीण भागातील प्रचंड आर्थिक विपन्नतेवर तोडगा काढा साकडे घातले आहे . महाराष्ट्र ही छत्रपती शाहू महाराज , ज्योतिबा फुले, गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या ठिकाणी सामाजिक न्याय व समानता सर्वोच आहे या मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेनी सुद्धा मर्यादापुरुष प्रभू राममंदिर प्राण प्रतिष्ठेचे स्वागत केले असुन मात्र आपण आता राजधर्माचे पालन करीत आर्थिक व सामाजिक न्याय दयावा अशी कळकळीची विनंती केली असुन देशाला शुद्ध धर्माची गरक असुन धर्माच्या नावांवर अंधश्रद्धेचेथो थोतांड मांडून २५०० वर्षांपूर्वीची   परिस्थिती देशात आणून धर्मांथेच्या नावावर अराजकतेला जन्म देत असल्याची भीती ग्रामीण भागातील शेतकरी आदीवासी वंचित जनता बोलून दाखवत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे . 

देशाचे महामाहीन राष्ट्रपती व चारही शंकराचार्य यांना अपमानित करून राममंदिराच्या राष्ट्रार्पण देशाच्या लोकशाहीला घातक 

एकीकडे ज्या रीतीने राममंदिर निर्माण याला ५०० वर्षांपूर्वीचा हिंदू समाजाचे स्वप्न व भाजपने याला आपला राजकीय व येणाऱ्या २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये राममंदिराच्या प्रमुख मुद्दा करून पुन्हा सत्ता मिळविण्याचा कुटील डाव रचण्यात आला असुन मात्र ज्या रीतीने चारही पिठाचे शंकराचार्य यांचे सर्व आक्षेप केराच्या टोपलीत टाकण्यात आले मात्र भारताच्या महामाहीन आदिवासी  महीला राष्ट्रपती यांना कार्यक्रमाचे यजमान पद कट रचुन मोदींनी दिले नाही व भाजपा धार्जिण्या संतांना ,भारताची ९८ टक्के संपत्ती व सर्व संसाधन यावर अधिकार सांगणाऱ्या २ टक्के मुठभर निवडक लोकांसमोर देशाच्या ९८ टक्के मागासवर्गीय दलीत आदीवासी जनतेच्या रामावरील श्रद्धेचा बाजार करून आपल्या १० वर्षाच्या अराजकता व विफलता लपविण्याचा प्रयन्त तर नाहीना असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी केला आहे . 

राममंदिराच्या बाजार करून भाजपा २०२४ मध्ये निवडणूक जिंकू शकत नाही 

सध्या ज्या रीतीने भाजपने धर्माच्या खुला बाजार मांडला असुन आपले राजकीय क्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या सामाजीक असमानता ,भौतिकवाद ,अन्नाचे व आरोग्याचे तसेच शिक्षणाचे बाजारीकरण मुळे तयार झालेल्या समस्येला बाजूला ठेऊन जसे २०१९ जसे भारतीय जनतेला पुलगामा समोर करून आपले राजकीय अपशय लपविता येणार का हा प्रश्न यावेळी किशोर तिवारी यांनी उपस्थित करून ज्या देशात शंकराचार्य यांचाही खुला अपमान कधीही सहन केला नाही तसेच ज्यावेळी धर्माचा बाजार मांडला गेला त्यावेळी भारताने भगवान गौतम बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार केला याची आठवण नरेंद्र मोदींना यावेळी करून दिली . 

====================================================================

  

Monday, December 25, 2023

यवतमाळ जिल्यात मध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये पश्चिम विदर्भात १२७८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम तात्काळ राबवावा -किशोर तिवारी

 यवतमाळ जिल्यात मध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये पश्चिम विदर्भात १२७८  शेतकऱ्यांच्या आत्महत्या -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम तात्काळ राबवावा  -किशोर तिवारी 


विदर्भात २५ हजार शेतकरी आत्महत्या 

दिनांक -२४ डिसेंबर  २०२३


एकीकडे मोदी सरकारचा विकास योजना  यवतमाळ जिल्ह्यात  बंजारा ,आदीवासी व दलीत समाजाचे पाच  कर्जबाजारी  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मागील ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या  आत्महत्या  समोर आल्या आहेत ,मिळालेल्या माहिती प्रमाणे 

१. यवतमाळ जिल्ह्यातील लोणंदरी येथील फकीरजी बोलके  

२. यवतमाळ जिल्ह्यातील कोलगाव   येथील प्रदीप अवताडे 

३. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरगाव  येथील बाबाराव डोहे 

४ यवतमाळ जिल्ह्यातील सिंधी वाढोणा   येथील मारोती अवताडे 

५. यवतमाळ जिल्ह्यातील उमर विहीर  येथील अमित्रा पवार 

शेतकऱ्यानं सोबत आता शेतमजूर ही आत्महत्या करीत असुन 

६. यवतमाळ जिल्ह्यातील बोथ येथील कुणाल शेडमाके 

या आदिवासी शेतमजुराने  आत्महत्या केली आहे तर 

७. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील शेतकरी  संजय घोडे 

यांनी सुद्धा आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे 

२०२३ साली विदर्भातील अमरावती विभागात २४ डिसेंबर पर्यंत या दशकातील सर्वाधिक १२७८ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.तर २००१ पासुन  विदर्भात २६ ५६८  शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे स्वत:चा जीव द्यावा लागला. सरासरी दररोज पाच  शेतकऱ्यांनी इहलोकाचा निरोप घेत असुन या आत्महत्या रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आता कृषी धोरणात्मक स्वरूपात विदर्भातील ४० टक्के आत्महत्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये एकात्मिक कार्यक्रम तात्काळ सुरु करण्याची विनंती  महाराष्ट्राच्या स्व वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी  अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली  आहे . 

१९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी नरसंहाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर  आणणारे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात पश्चिम  विदर्भाच्या ग्रामीण संकटामुळे १८९७  शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, जो गेल्या २५ वर्षांतील हा  विक्रमी आकडा आहे.सध्या  संपुर्ण विदर्भात शेतकरी मागील वर्षीच्या कापूस सोयाबीन च्या मंदीमुळे तसेच  प्रचंड नापिकी मुळे आर्थिक संकट आले आहेत लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे ह्या आत्महत्या करीत  असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . "लागवडीचा खर्च नियंत्रण ,हमीभाव , पीकपद्धती  आणि पतपुरवडा धोरण , पर्यावरणातील बदल यावर शेतकऱ्यांना सरकारं करणारी पीक विमा योजना   यासंबंधीचे मुख्य प्रश्न्नाकडे  केंद्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या निष्पाप हत्येवर नियंत्रण ठेवले जात नाही आणि १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र  सुरूच आहे. कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत पॅकेजेस कोणताही दिलासा देत नाहीत. राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि व्यवस्थेतील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे विदर्भातील सर्वात मागासलेला प्रदेश आहे, असे किशोर तिवारी यांनी गावांना भेटी दिल्यानंतर सांगितले.

"खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली  आहे. लागवडीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे  आणि बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक  अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या प्रदेशात आणि जागतिक हवामानातील बदल हे सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत,” किशोर तिवारी पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम तात्काळ राबवावा

विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज पाच पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल ठरत  आहे, केंद्र सरकारने  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर  चर्चा करून तसेच नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरणकरण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम सुरु  करण्याचे आवाहन ,किशोर तिवारी यांनी  पंतप्रधानांना केले आहे .

Monday, December 18, 2023

सी.सी.आय.ने सुरु केलेली कापूस खरेदी फक्त कागदावर -सी.सी.आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने कापसाची होळी केली-शेतकरी वाऱ्यावर तर लोकप्रतिनिधी मात्र उदासीन

सी.सी.आय.ने सुरु केलेली कापूस खरेदी फक्त कागदावर -सी.सी.आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने कापसाची होळी केली -खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने शेतकरी वाऱ्यावर तर लोकप्रतिनिधी मात्र उदासीन ! 

नागपूर, दि. १८ डिसेंबर, २०२३

विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा आज मिळत नाहीनसल्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी शेतकरी नेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज सरकार कडे केली होती मात्र आज सोमवारला  
सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे मोजक्याच ठिकाणी उघडण्यात आली मात्र तांत्रिक करणे समोर करून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष आणि वस्त्रोद्योग सचिव श्रीमती रचना शहा यांनी फक्त उच्च  प्रतीचा  कापुस घ्यावा हे कारण समोर करून एकही क्विंटल कापूस घेतला नाही . 
सी.सी.आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने कापसाची होळी केली 
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा पूर आलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला आहे हे कारण देत सी.सी.आय अधिकाऱ्यांनी कापुस घेण्यास नकार दिल्याने तर खाजगी व्यापाऱ्याने फक्त ६२०० रुपये भाव देत असल्यामुळे शेतकरी शंकर वरगट याने   सारा कापुस खरेदी केंद्रावरच जाळला व मोदी सरकारच्या विरुद्ध घोषणा दिल्या ,आपण असाच कापुस दोन वर्षांपूर्वी १०,००० प्रति क्विंटल विकला आता खर्ज दुप्पट झाला व भाव अर्धा झाला असल्याने आपण कापसाची होळी करीत असल्याचे या शेतकरी शंकर वरगट यांनी यावेळी  सांगीतले ,हा सगळा प्रकार किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात कळविलें असुन ,श्री तिवारी यांनी विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून गेल्या दीड महिन्यापासून लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या सातत्याने होत असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे सर्व ठिकाणी सुरु करावे ही विनंती केली आहे 
सध्या कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्याने त्याचा नाहक फायदा खाजगी व्यापारी घेत असून आज विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी उच्च प्रति चा कापूस सुद्धा ४०० ते ६०० रुपये कमी दरात विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत खरेदी करणे नोडल एजन्सी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा सी.सी.आय. खरेदी केंद्रे कधी सुरू होतील, याचा कांहीं थांगपत्ता नाही. जिथे केंद्रे सुरू केलीत तिथे सुद्धा खरेदी अजिबात नाही. कारण खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने कित्यके केंद्रावर सरसकट कापूस रिजेक्ट केला जात आहे तर दुसरी कडे खाजगी व्यापारी पडक्या किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करीत आहेत. कोणताही पणन अधिकारी किंवा बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरली असून अश्या विपरित परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असलेली खरेदी केंद्रे विदर्भ मराठवाड्यातील लाखों कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने सरकारने तातडीने आदेश द्यावेत , अशी मागणी श्री किशोर तिवारी यांनी केली आहे. 
सारे लोकप्रतिनिधी उदासीन -भोजनवळीचा आनंद घेण्यात गुंतले 
कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्यामुळे एकीकडे कापूस उत्पादकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन मात्र विदर्भ मराठवाड्याच्या समस्या निवारणासाठी नागपूर सुरु असलेल्या अधिवेशनात मात्र हा विषय लावून यावर तोडगा काढण्यासाठी साधी चर्चाही होत नसुन सारे आमदार भोजनावळी आनदं घेत असुन काही भाजप आमदार  तर मुलाच्या लग्नाचे स्वागत सभारंभ आटपून घेत आहेत मात्र ज्या  पश्चिम विदर्भांत मोदी सरकारच्या १० वर्षात ६ हजारावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर भाजपा नेते झोपा काढत आहेत तर मंत्री दलाल मार्फत मिळत त्या प्रकारे पैसे खाण्यात  गुंतले आहेत .एकीकडे केंद्र सरकार मोदी संकल्प यात्रेचे सोंग करीत आहे तर राज्य सरकार  करोडो रुपये "शासन आपल्या दारी " या थोतांडात खर्च होत आहे मात्र हवालदिल शेतकरी शासन दारी चपला घासत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

---------

वरील प्रेस नोट प्रकाशित करण्याची नम्र विनंती !

किशोर तिवारी,
राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
आणि
अध्यक्ष, विदर्भ जन आंदोलन समिती,
Mbl. 9422108846

Thursday, December 14, 2023

विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बेहाल : सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा - किशोर तिवारी यांची सरकार कडे मागणी ! खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने तातडीने कारवाई ची मागणी !

 विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बेहाल : सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा - किशोर तिवारी यांची सरकार कडे मागणी !

खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने तातडीने कारवाई ची मागणी !

नागपूर, दि. १४ डिसेंबर, २०२३


विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा आज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी शेतकरी नेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज सरकार कडे केली आहे. 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष आणि वस्त्रोद्योग सचिव श्रीमती रचना शहा यांचेसह मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात श्री तिवारी यांनी विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून गेल्या दीड महिन्यापासून लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या सातत्याने होत असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे अद्यापही सुरू झालेली नाहीत या कडे लक्ष वेधले आहे. 

कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्याने त्याचा नाहक फायदा खाजगी व्यापारी घेत असून आज विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी उच्च प्रति चा कापूस सुद्धा ४०० ते ६०० रुपये कमी दरात विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत खरेदी करणे नोडल एजन्सी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा सी.सी.आय. खरेदी केंद्रे कधी सुरू होतील, याचा कांहीं थांगपत्ता नाही. जिथे केंद्रे सुरू केलीत तिथे सुद्धा खरेदी अजिबात नाही. कारण खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने कित्यके केंद्रावर सरसकट कापूस रिजेक्ट केला जात आहे तर दुसरी कडे खाजगी व्यापारी पडक्या किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करीत आहेत. कोणताही पणन अधिकारी किंवा बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरली असून अश्या विपरित परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असलेली खरेदी केंद्रे विदर्भ मराठवाड्यातील लाखों कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने सरकारने तातडीने आदेश द्यावेत , अशी मागणी श्री किशोर तिवारी यांनी केली आहे. 
सारे लोकप्रतिनिधी उदासीन -भोजनवळीचा आनंद घेण्यात गुंतले 
कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्यामुळे एकीकडे कापूस उत्पादकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन मात्र विदर्भ मराठवाड्याच्या समस्या निवारणासाठी नागपूर सुरु असलेल्या अधिवेशनात मात्र हा विषय लावून यावर तोडगा काढण्यासाठी साधी चर्चाही होत नसुन सारे आमदार भोजनावळी आनदं घेत असुन काही भाजप आमदार  तर मुलाच्या लग्नाचे स्वागत सभारंभ आटपून घेत आहेत मात्र जय पश्चिम विदर्भांत मोदी सरकारच्या १० वर्षात ६ हजारावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर भाजपा नेते झोपा काढत आहेत तर मंत्री दलाल मार्फत मिळत त्या प्रकारे पैसे खाणीत गुंतले आहेत .एकीकडे करोडो रुपये "शाशन आपल्या दारी " या थोतांडात खर्च होत आहे मात्र हवालदिल शेतकरी शासन दारी चपला घासत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 


---------

वरील प्रेस नोट प्रकाशित करण्याची नम्र विनंती !

किशोर तिवारी,
राष्ट्रीय प्रवक्ते - शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
आणि
अध्यक्ष, विदर्भ जन आंदोलन समिती,
Mbl. 9422108846

Thursday, November 23, 2023

भाजपा द्वारे राजकीय इव्हेंट करून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला- नरेंद्र मोदी आणि अमित शाह यानी देशाची माफी मागावी !- किशोर तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)

भाजपा द्वारे राजकीय इव्हेंट करून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला !

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यानी देशाची माफी मागावी !- किशोर तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)

नागपूर , दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ 

"वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना जाणून बुजून मुंबई ऐवजी अहमदाबाद येथे ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल आणि इव्हेंट बनवून 'शो बाजी' च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला, ही दुर्दैवी बाब आता समोर आली असून, ज्या पध्दतीने  अंतिम मॅच चे ३/४ दिवस पूर्वी पासून टीव्ही चॅनल, मीडिया त्या साठी अहमदाबाद येथील क्रिकेट चे स्टेडियम वर कब्जा केला होता, अति विशिष्ट सुरक्षा यंत्रणे च्या विळख्याने आणि जणू विजय झाल्याचे श्रेय मोदींना कसे देता येईल? मीडिया ने याचा 'मेगा शो' कसा प्रसारित करावा ? या साठी भाजपाने २४ तास रात्रं दिवस केलेली कसरत, यामुळे भारतीय खेळाडूवर एक प्रकार चा मानसिक दबाव पडून शेवटी हा सामना आपल्या देशाने गमाविला. या साठी भाजपाचा "मेगा शो" करण्याचा अट्टाहास जबाबदार असल्याने या पराभवाची नामुष्की साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यानी देशाची माफी मागावी", अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.

अहमदाबाद येथे वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामन्यात केवळ इव्हेंट बाजी समोर ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल बनवून 'शो बाजी' साठी प्रचंड दबाव निर्माण केला गेला होता. पूर्वी विकलेल्या हजारो तिकिटा पंतप्रधान सुरक्षा कारणामुळे रद्द करून त्या भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या, जेणे करून विजय कप रथ घेवून मोदी संपूर्ण स्टेडियम आणि अहमदाबाद / गांधीनगर परिसरात मिरवून त्याचे प्रसारण भाड्याच्या मीडिया लावून दिवस रात्र प्रसारित करून देशभरात ठीक ठिकाणी विजय जुलूस काढून जणू नरेन्द्र मोदी यांनीच हा वर्ल्ड कप जिंकून आणला, असा इव्हेंट आणि शो बाजी करण्याचे नादात
दुसरी कडे भारतीय खेळाडूवर मनोविज्ञानिक दबाव आणि दडपण येवून त्याची परिणीती फायनल मॅच हरण्यात झाली. ज्या पद्धतीने बी.सी.सी.आय. ने खेळाडू वर दबाव निर्माण केला होता, स्टेडियम वर एकतर्फी घोळके समशान शांतता प्रस्थापित करून नकारात्मक भावना पसरवीत होते, मो. शमी आणि मो.सिराज यांना त्यांचे प्रतेक ओवर्स वर उद्देशून अर्वाच्य टोमणे मारणारे भाजपा कार्यकर्ते त्यामुळे प्रत्येक चेंडू वर खेळाडू हतबल होऊन पराजयाकडे जात होते, या सर्व वातावरणा साठी सत्तेचा माज चढलेले नेते जबाबदार असून १० सामने जिंकूनही भारतीय संघ या अनाठायी दबावामुळे शेवटी अपयशी ठरला. या साठी अवास्तव इव्हेंट बाजी आणि प्रसिद्धी साठी हपापलेले मोदी शहा हेच जबाबदार असून त्यांनी १४० कोटी भारत वासियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. 

क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट साठी दुरुपयोग करणाऱ्या या सर्व बाबींचा उल्लेख करून खरपूस समाचार घेणार एक खुले पत्र किशोर तिवारी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना पाठविले असून त्यात जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने(बी.सी.सी.आय.) धोरणात्मक निर्णय घेवून भविष्यात क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट होण्यापासून बंदी घातली पाहिजे, अशी मागणी ही तिवारी यांनी केली आहे.

------

किशोर तिवारी,
राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)
मो. ९४२२१०८८४६*

Thursday, September 28, 2023

हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन याना राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करणेच खरी श्रद्धांजली ठरेल - किशोर तिवारी

हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन याना राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करणेच खरी श्रद्धांजली ठरेल - किशोर तिवारी 

दिनांक -२८ सप्टेंबर २०२३


भारताच्या हरीतक्रांतीचे जनक डॉ.एम.एस स्वामिनाथन यांचे आज वयाच्या ९८वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले कारण राष्ट्रीय शेतकरी मिशनच्या अध्यक्षपदी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे व उपाय यावर सतत दौरे  करून सखोल अभ्यास करून आपल्या अहवालात   हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत  पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी केल्या होत्या मात्र मागील १० वर्षात सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना केराची टोपली दाखविल्यामुळे भारतात २०१४ पासुन दोन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन जर 
डॉ.एम.एस स्वामिनाथन यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली देण्यासाठी हमीभाव ,पीक पद्धती बदल ,पत  पुरवडा धोरण या संबंधी शिफारशी खऱ्या अर्थाने तात्काळ लागु कराव्या अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्न्नावर डॉ.एम.एस स्वामिनाथन सोबत १९९९ पासुन सतत काम करणारे शेतकरी कार्यकर्ते व महाराष्ट्र सरकारच्या स्व वसंतरावं नाईक शेती स्वालंबन मिशन माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या दुःखद निधनावर आपली संवेदना व्यक्त करताना केली आहे . 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना मोदी सरकारने सोयीने बगल दिल्याची यांची शेवटपर्यंत खंत 

किशोर तिवारी यांनी तीन  वर्षापूर्वी डॉ.एम.एस स्वामिनाथन यांची  विषेय भेट घेऊन विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी लागवडीचा खर्च अधिक ५० टक्के नफा हा आपला हमीभावाचा फार्म्युल्याप्रमाणे लागवडीचा खर्च याचा हिशोब करतांना शेती शेतकरी कुटुंब श्रम सह अनेक खर्चाचा हिशोब न करताच जाहीर केल्यामुळे हमीभाव लागवडी खर्चापेक्षा कमी येत असल्याची खंत प्रगट केली होती . अन्नाच्या पिकांची लागवडी साठी अनुदान पीक कर्ज धोरण ,डाळीचे व तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच जागतीक तंत्र व संशोधन याच्या वापरासाठी अम्बलत येणारे धोरण यावर त्यांनी सरकारच्या धोरणावर चिंता व्यक्त केली होती 

विदर्भ जनआंदोलन समिती कडुन विदर्भ मित्र पुरस्काराने सन्मानित 

६ऑक्टोबर २००५ मध्ये पांढरकवडा येथे डॉ एम एस स्वामिनाथन यांचा सपत्नीक  विदर्भ मित्र हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता यावेळी तात्काळणी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी सत्कार केला होता . यावेळी पांढरकवडा येथील अग्रसेन भवन मध्ये विदर्भातील शेतकरी विधवांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला होता . 




विदर्भाच्या शेतकरी विधवांच्या साठी भरीव कार्य 


डॉ.एम.एस   स्वामिनाथन यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात महीला शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या होत्या .त्यांनी आपल्या फॉउंडेशन मार्फत शास्वत शेतीचे प्रयोग सुद्धा यशस्वीपणे राबविले .महिला शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी व विकासासाठी त्यांनी आपल्या राज्यसभेच्या कार्यकाळात महीला शेतकरी अधिकार बिल सादर केले होते त्या बिलामध्ये शेतकरी  विधवांच्या कल्याणाच्या संपूर्ण एकात्मीक कार्यक्रम सादर केला होता मात्र सरकारने यावर साधी चर्चा सुद्धा करण्याची तसदी दाखविली याचे दुःख त्यांना शेवटच्या काळात होते . 

  =================================================