Sunday, December 31, 2017

तेलंगणाच्या शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनकडून स्वागत

💫 *नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!* 💫
----------------------------------------
   *येणारे नवीन वर्ष आपणांस व आपल्या     परिवारास सुख समृद्धीचे व यशाचे जावो    हीच प्रार्थना!*
तेलंगणाच्या शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनकडून स्वागत 
दिनांक १ जानेवारी २०१८
२०१८ या नववर्षाच्या पहील्या दिवसाची पहाट लगतच्या तेलंगणा राज्याच्या आत्महत्याग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज पासुन सर्व कृषी वीज पंपांना चोवीस तास २४ x ७ मोफत वीज पुरवडा करण्याच्या सुखद दिलासा देणाऱ्या घोषणेचे  महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना मागील तीन वर्षात विक्रमी ४ लाखावर कृषीचे वीज कनेक्शनची जोडणी झाली आहे मात्र वीज पुरवडा प्रचंड प्रमाणात  खंडित तर मिळतो मात्र जेमतेम ८ ते १० तासही मिळत नसल्याच्या तक्रारीचा डोंगरच सतत करीत असल्याचा आपला मागील २  वर्षाचा अनुभव असल्याने शेतकरी मिशन कडुन आपण मोफत नाही मात्र रास्त दरात वीज द्या मात्र देतांना चोवीस तास २४ x ७ द्या ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करीत असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
अखंड आंध्रप्रदेश असतांना तेलंगणा राज्याची सतत विजेबाबत उपेक्षा होत होती व ४ वर्षांपूर्वी तेलंगणा राज्याची निर्मितीच्या वेळेस विजेचे संकट व वीज कपात प्रचंड प्रमाणात होती मात्र  अवघ्या साडे तीन वर्षात स्वतंत्र तेलंगानाने वीजेच्या क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद असुन विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना असा दिलासा मिळणे काळाची गरज आहे . 
भारत सरकारचे सिंचन मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी सर्व प्रलंबित सिंचन प्रकल्पासाठी २० हजार कोटी दिले असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सर्व कृषी वीज पंप  सौर उर्जेवर चालविण्यासाठी सौरउर्जेचे वीज निर्मिती प्रकल्प सुरु केले असुन यामुळे आम्ह्चे सुद्धा तेलंगाणाच्या शेतकऱ्यानंसारखे चांगले दिवस येणार अशी आशा  विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे मात्र सध्या वीज विभागाकडुन जुलमी मोगलाई पद्धतीने वसुली सुरू असुन प्रत्येक खेड्यात घरात एक व दोन दिवे असतांना हजाराच्या घरात बिल येत आहे तर कृषी विजेचे बिल अनेकांचे लाखाच्या घरात जात आहे ,ग्रामीण जनता वीज वितरण कंपनीच्या त्रासाने वैतागली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज विभागाचा इलाज करण्याची मागणीच किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जशी अखंड आंध्रप्रदेश असतांना तेलंगणा विभागाची  सतत विकास बाबत उपेक्षा होत होती आता स्वतंत्र तेलंगाणा राज्याने सुरु केलेला विकास आणि विजेच्या क्षेत्रात केलेली घोषणा यावरून महाराष्ट्रात विदर्भ विभागाचा विकास व सिंचन ,वीज , उद्योग व रोजगाराच्या क्षेत्रात चांगले दिवस आणण्याकरीता वेगळ्या विदर्भ  राज्यशिवाय पर्याय नसल्याचा विस्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
========================================





Friday, December 29, 2017

राज्यात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची संख्या दहा लाखावर:बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल -किशोर तिवारी


राज्यात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची संख्या दहा लाखावर:बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल  -किशोर तिवारी 
दिनांक ३० डिसेंबर २०१७
महाराष्ट्र  राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना कृषी मंत्री भाऊसाहेब  फुंडकर यांनी काल  विधानसभेत  जाहीर केलेल्या ऐतिहासिक मदतीनंतर सध्या सुमारे दहा लाखावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी  अमेरीकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांविरुद्ध रीतसर नुकसान भरपाईची तक्रार केली असुन बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्यांच्या एकाधिकार व जागतिक शोषणाविरुद्ध हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा लढा असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकरी आपली स्वातंत्र्याची व अधिकाराची लढाई जिंकणार असा विस्वास  कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या घोषणेप्रमाणे कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल मात्र बियाणे कंपन्या नुकसान भरपाई न देता न्यायालयात जातील असा युक्तिवाद करून ही मदतच मिळणार नाही असा आर्थिक अडचणीत असलेल्या नैऱ्याशग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये  भ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांवर कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आक्षेप घेत मागील तेरा वर्षामध्ये अमेरीकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांनी  बी टी कापसाचे बियाणामध्ये विषारी जिन टाकुन २५० रुपयाचा संकरीत कापसाच्या बियाणांचा भाव सुरवातीला रु ११५० व नंतर रु ८५० प्रती पाकीट विकुन हजारो कोटींची कमाई केली असुन आता बी टी बियाणे बोंडअळी रक्षक राहीले नसुन कापुस बियाणे कंपन्यांनी केलेले सर्व दावे फोल ठरल्यामुळे महाराष्ट्राच्या कापूस बियाणे गुणवत्ता  नियंत्रण कायद्यांतर्गत नुकसान भरपाई देणे कायद्याने देणे गरजेचे असल्याने यावर शंका घेणे चुकीचे असुन महाराष्ट्र सरकारने अमेरीकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांविरुद्ध त्यांच्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धच्या लढ्यात शामिल होण्याचे आवाहनच किशोर तिवारी यांनी सर्व टीकाकारांना केले आहे . 
मागील वर्षीच  गुलाबी बोंडअळीचे संकट लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आले होते यावर्षी    संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरणार याची संपुर्ण जाणीव   अमेरीकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांना होती त्यातच  महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान होणार अशी भीती  कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी व्यक्त केली होती मात्र तरी सुद्धा जबरीने खोटे दावे करीत या बीटी बियाणांची विक्री राजरोस कां करण्यात आली असा सवाल  किशोर तिवारी  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी वतीने केला आहे . जे तथाकथीत शेतकरी नेते मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांची दलालीकरीत बी टी बियाणामधील २०१२ मध्येच  विषारी जिन निकामी झाले  होते व आता बी टी बियाणे बोंडअळी रक्षक राहीले नाही तर या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांनी प्रति पाकिटावर बी टी ची रु ५०० ते ६०० रॉयल्टी का घेत होते असा सवाल तिवारी यांनी करीत जे कापुस बियाणे कंपन्यांनी कापसाच्या पिकाचे दावे केले व बोंडअळी रक्षक असल्याचा दावा केला आता संपुर्ण अपयश आल्यांनतर ज्या शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये लुबाडले त्यांना परत करण्यासाठी आपली नैतिकता दाखवावी ही काळाची गरज असुन जे राजकीय नेते व शेतकरी नेते मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांची बाजी घेत बचाव करीत आहेत त्यांनी आपल्या मातीला बेईमान होऊ नये अशी विनंती तिवारी यांनी केली आहे . 
सरकारच्या घोषणेप्रमाणे कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हक्काची मदत असल्याने यावर शंका करू नये तसेच ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी आर्थिक अडचणीमुळे पीकविमा घेतला नाही त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र व राज्य दरबारी आपला पाठपुरावा सुरु असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . सध्या सरकारच्या घोषणेप्रमाणे कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल तरी वरील मदतीवर २ हेक्टरची मर्यादा ठेऊ नये अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे .
===================================
=====================

Thursday, December 28, 2017

प्रशासनाच्या उदासीनतेसमोर ग्रामीण जनता हतबल : सुकंडी-रूढा-कारेगाव-अर्ली येथील जनता दरबारात समोर आलेले सत्य

प्रशासनाच्या उदासीनतेसमोर ग्रामीण जनता हतबल : सुकंडी-रूढा-कारेगाव-अर्ली येथील जनता दरबारात समोर आलेले सत्य  
दिनांक -२८ डिसेंबर २०१७
केळापुर  तालुक्यातील अर्ली ,घुबडी ,कारेगाव बंडल , सुकंडी ,चनाका व रूढा  परीसरातील शेतकरी ,शेतमजुर ,आदीवासी ,कोलाम, पारधी यांच्या रस्ता ,वीज ,पाणी ,घरकूल ,अन्न सुरक्षा ,जमिनीचे पट्टे व आदीवासी ग्राम विकास  विकास योजनेपासुन वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनताच   कारणीभुत असुन सतत पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल तर याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा कै वसंतराव नाईक शेती स्वा . मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या रूढा ,कारेगाव व अर्ली येथील जनता दरबारात तक्रारीचा डोंगरच मांडल्यानंतर केली . 
एकाही घरात वीज नाही अशा सुकंडी कोलमपोडावर सर्व प्रथम तालुक्याचे तहसीलदार महादेव जोरवार , गट विकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,उपअभियंता वीज विभाग शेख साहेब , उपविभागीय अन्न पुरवडा अधिकारी झाडे , विभागीय वन्य अधिकारी पवारसाहेब , सहायक निबंधक मेश्राम यांचे सह भेट दिल्यानंतर निवारा ,पिण्याचे पाणी ,वीज ,घरकुल यांचा प्रश्न मांडण्यात आला त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन  यावेळी देण्यात आले . 
रूढा  येथे या परीसरातील भाजप नेते शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित जनतादरबारमध्ये ७७ वर्षीय निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी गावातील ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसुन ,प्रत्येक वेळी ग्रामविकासाच्या प्रश्न्नावर उपमानास्पद वागणुक देत असल्याची तक्रार केली . कोलामाना घरकुल योजनेपासुन व जमिनीच्या पट्टापासुन सतत वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रार नागारेड्डी तोटावार यांनी यावेळी  केल्यावर   ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव देण्याचा आदेश यावेळी दिला . 
शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी कापुस उत्पादक शेतकऱ्यांना  गुलाबी बोंडअळीचा फटका बसला असुन सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर यावर्षी प्रचंड नुकसान झाले असुन कृषी व महसुल खात्याने पंचनामे पुर्ण न केल्याची तक्रार यावेळी केली . 
कारेगाव येथे सरपंच कृष्णराव कनाके व भाजप नेते धनंजय झिल्पीलवार  यांनी येथील  आश्रम शाळा मागील दहावर्षापासुन ५० की मी नेण्यात आली असुन नवीन वास्तु तयार झाल्यानंतरही सुरु करण्यात आली नाही वारंवार आंदोलन करूनही कोणतीही कारवाई होत नाही अशी तक्रार केली तसेच टिपेश्वर अभयारण्यामुळे वन्यप्राण्यांचा तसेच वाघाचा प्रचंड त्रास होत असुन या परीसरात शेती करणे कठीण झाले असुन सामुहिक फेन्सिंग शेताला करण्याची मागणी तालुका भाजपचे उपाध्यक्ष नरेंद्र येनगुरवार पाटील यांनी यावेळी केली तसेच शेतीवरील लेव्हीची अट आता रद्द करण्यात यावी अशी मागणी नरेंद्र येनगुरवार पाटील यांनी केली आपण सरकारदारी याचा पाठपुरावा करण्याचे  आश्वासन  तिवारी यांनी यावेळी दिले . 
दिलीप मेश्राम व वेंकटरेड्डी सोमावार यांनी   अर्ली येथील शाळा राजकीय नेत्यांनी चालबर्डीला पळवली असुन जिल्हापरिषदेच्या शाळेवर शिक्षकांचा कट रचुन दुष्काळ ठेवण्यात येत असुन शेकडो मुलींना शिक्षणापासुन वंचित ठेवले जात आहे अशी तक्रार केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अर्ली संपूर्णपणे आजारी असुन आरोग्यखाते व प्रशासन वांरवार भेटी देऊनही कारवाई करण्यास तयार नाहीत या गंभीर तक्रारींची  दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत यांनी यावेळी दिले .
 सुकंडी -रूढा -कारेगाव -अर्ली येथे आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकर्तेपणावर किशोर तिवारी नाराजी प्रगट करीत आपण याचा अहवालच मुख्यमंत्र्याना देणार असे यावेळी जाहीर केले . 
=====================================
==================================
====




Friday, December 22, 2017

बोंडअळीग्रस्त कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे शेतकरी मिशनकडून स्वागत :कापसाचे बियाणे व पर्यायी पीकव्यवस्थेवर तोडगा काढा -किशोर तिवारी

बोंडअळीग्रस्त कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे शेतकरी मिशनकडून स्वागत :कापसाचे बियाणे व पर्यायी पीकव्यवस्थेवर तोडगा काढा -किशोर तिवारी 
दिनांक २३ डिसेंबर २०१७
महाराष्ट्र  राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना कृषी मंत्री भाऊसाहेब  फुंडकर यांनी काल  विधानसभेत  जाहीर केलेल्या मदतीचे कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले आहे . भाजप सरकारने बोंडअळीग्रस्त  कापूस उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी  प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत कृषीमंत्री श्री. फुंडकर यांनी घोषीत  केल्यावर आज किशोर तिवारी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात सरकारचे स्वागत करून कापसाच्या पिकावर बियाणांच्या उपयशानंतर विदर्भ -मराठवाड्याचे कापुस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असुन या संकटावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याच्या प्रयन्तात गंभीरपणे चिंतन करण्याची गरज तिवारी व्यक्त केली आहे . 

यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे

कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला होता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या  सादर   केला आहे 

सध्या सरकारच्या घोषणेप्रमाणे कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल तरी वरील मदतीवर २ हेक्टरची मर्यादा ठेऊ नये अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे . 

Monday, December 18, 2017

गुजरात निवडणुक :पंतप्रधान मोदींनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अनास्था दुर करावी

गुजरात निवडणुक :पंतप्रधान मोदींनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अनास्था दुर करावी 
दिनांक -१९ डिसेंबर २०१७
नुकत्याच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण गुजरात राज्याच्या त्यातच कापूस उत्पादक क्षेत्राच्या मतदारांची भाजपवरील नाराजी मोठ्याप्रमाणात समोर आली असुन ही भाजपसाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिंतनाची बाब असुन भारत सरकारने आपल्या कृषी व ग्रामीण विकासाच्या कार्यक्रम व धोरणांच्या अंबलबजावणी होत असलेली प्रशासकीय कुचराई व कृषीमालाच्या भाव ,लागवडी खर्च नियंत्रण ,बँकांचा पत पुरवडा ,ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी सरकारच्या कार्यक्रमांना बँका व सनदी अधिकाऱ्यांकडुन मिळत असलेला असहकार हे भाजपावरील नाराजीच्या मुळात असुन  पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भारताच्या विषेय म्हणजे ग्रामीण भारताच्या आर्थिक कणा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन तात्काळ तोडगा काढावा अशी विनंती  महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी केली आहे . 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या पाचवर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी दिलेल्या कृषी व ग्रामीण विकासाच्या कार्यक्रम व धोरणांच्या अंबलबजावणीसाठी  राज्य सरकारची कामगीरी तसेच केंद्रीय कृषी व अर्थ मंत्रालयाचा पुढाकार अपुरा पडत असल्याचा अनुभव ग्रामीण जनतेला व कापसासारखे नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे . गुजरात राज्याच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजी पेक्षा महाराष्ट्राच्या ४० लाखावर लागवड केलेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट जाणवत आहे मात्र वातानुकुल कशात बसलेल्या अधिकाऱ्यांनी तसेच सरकार दरबारी चापलुसी करणाऱ्या नेत्यांनी लपविण्याचा लाजीरवाणा प्रयन्त सुरु केल्याचा आरोप सुद्धा किशोर तिवारी यांनी केला आहे . 
भारताच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना  गुलाबी बोंडअळीचा फटका बसला असुन सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर यावर्षी प्रचंड नुकसान झाले आहे . भारत सरकारच्या पंतप्रधान कृषी भूमी आरोग्य कार्ड योजना ,पंतप्रधान कृषी विमा योजना ,पंतप्रधान कृषी सिंचन योजना ,कृषीमालासाठी बाजार ,वखार योजना ,कृषी पीककर्ज वाटप योजना ,कृषिपंप वीज वाटप योजना सर्वात महत्वाचे कृषिमालाला लागवड खर्चावर आधारीत  हमीभावाचा प्रश्न ,कापूस ,तूर ,सोयाबीनची हमीभावामध्ये होत असलेल्या खरेदीच्या अडचणीची दूर करण्यासाठी होत असलेले अपूरे प्रयन्त यामुळे विदर्भ मराठवाड्यातील कापूस-तूर -सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा गुजरात सारखे अडचणीत आहेत व सरकारने गंभीरपणे या नाराजीवर तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
यावर्षी अचानकपणे  आलेले गुलाबी बोंडअळीचे अभूतपूर्व संकट ,कापुस -सोयाबीन व तुरीला आलेली मंदी यामुळे विदर्भ मराठवाड्याचे संपूर्णपणे हवालदील  झाले आहेत या शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रात केंद्र सरकारने विषेय आर्थिक पॅकेज देणे गरजेचे असुन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर  कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचा आधार द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
====================================================================

Friday, December 15, 2017

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे संकट गंभीर :प्रशासन सरकारची दिशाभुल आहे -किशोर तिवारी


बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे संकट गंभीर :प्रशासन सरकारची दिशाभुल आहे -किशोर तिवारी 
दिनांक -१६ डिसेंबर २०१७
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून ऑक्टोबर नंतर सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे सत्य आहे त्यामुळे आता डिसेंबरनंतर कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर करीत कापसाला पाणी दिले त्यासर्वच शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला असुन जुलै ऑगस्ट मध्ये आलेली बोंड तेही बहुतेक कोरडवाहू क्षेत्रात ऑक्टोबर नोव्हेंबर फुटली व सर्वच शेतकऱ्यांचे पहिला व दुसरा वेचा चांगला आला ,त्या कापसाची आवक पाहुन बोंडअळीचे संकट कृषिविभाग कमी आखत असुन सरकारची दिशाभुल करीत असल्याचा गंभीर आरोप कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे . 
यावर्षी महाराष्टात व लगतच्या तेलंगणामध्ये सप्टेंबर -ऑक्टोबर  महिन्यात बोंडअळी संकट आले व आज राज्यात जेमतेम ९८ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे मात्र आपण संपुर्ण विदर्भ मराठवाड्याचा दौरा केल्यांनतर शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असा प्राथमिक अंदाज दिला होता त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक डिसेंबरमध्ये घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट करून गहु हरभऱ्याची पेरणी केली आहे मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
या खरीप हंगामात  सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र गुलाबी बोंडअळीने हे कापसाचे उत्पादन १८० ते २२० लाख क्विंटलच्या घरात आणले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु दहा हजार कोटीचे नुकसान झाले आहे मात्र कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर  कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली कारण सध्या ५ लाखावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी दिल्या आहेत तर सुमारे ५ लाखावर आदीवासी दलीत मागासवर्गीय भूमिहीन शेतकरी बियाणाची पावती व  बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट असल्यामुळे तसेच हजारो शेतकऱ्यांनी बोगस तण नाशक निरोधक बी जि ३ कापसाचे बियाणे व राज्यात बंदी घातलेले राशी ६९५ लगतच्या राज्यातुन विकत आणुन पेरल्यामुळे तक्रारी करण्यापासुन वंचित असल्याचे सत्य विदर्भ मराठवाड्यात आपल्याला दौऱ्यात दिसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .एकीकडे  सरकार  कुठलीही बियाणे कंपनी असो, गुन्हे दाखल होतील असा दावा करीत आहे  दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकारी बियाणे कंपन्यांचे हित जोपासत असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे

कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला असुन या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे . 
आपल्या पंचसूत्री बोंडअळी समस्या निवारण कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाला सुरवातीला सरकारने भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने पूर्णपणे खल्लास झाले आहे . 
आपल्या पंचसुत्रीमध्ये सादर   केलेल्या प्रस्तावात किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकामध्ये उभे पीक  गाई म्हशी बैलांना वा बकऱ्याना चारणे त्यामुळे अळीचा सरसकट नाश  होईल ,उरलेले कापसाचे पीक नष्ट करणे ,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक डिसेंबर नंतर फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,बियाणे कंपन्या विरुद्धचा सामुहिक नुकसान भरपाईचा दावा सादर करावयाचा असल्यामुळे तक्रारी  दाखल करणे गरजेचे असुन त्यासाठी शेतकऱ्यांना संपुर्ण माहिती देणे ,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला आहे .
= ======================================

Tuesday, December 5, 2017

गुलाबी बोंडअळीचे संकट -७ डिसेंबरला यवतमाळ येथे कापुस उत्पादक शेतकऱ्यांची परिषद


गुलाबी बोंडअळीचे संकट -७ डिसेंबरला यवतमाळ येथे कापुस उत्पादक शेतकऱ्यांची परिषद 
दिनांक -५ डिसेंबर   २०१७
यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन या अभुतपुर्व संकटातुन शेतकऱ्यांना पर्याय शोधण्यासाठी व प्रचंड आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या मागण्या सरकार दरबारी रेटण्यासाठी कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशन,कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी जुळलेले महाविद्यालये ,कृषी विज्ञान केंद्र ,कृषी विभाग जिल्हा परीषद यवतमाळ , जिल्हा पत्रकार  संघ ,शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या संघटना ,शास्वत शेतीवर काम करणारे कार्यकर्ते यांच्या संयुक्त  प्रयासाने येत्या गुरुवारला यवतमाळ कै वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कै जवाहरलाल दर्डा सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा व शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या  अभुतपुर्व संकटावर तोडगा व पर्याय याकडे सरकारचे व शेतकऱ्यांचे  लक्ष व यावर मात करण्यासाठी  गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात रेटून  शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु करण्यासाठी ठराव व प्रस्ताव सरकार दरबारी रेटण्यात येतील अशी माहीती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व यवतमाळ जिल्हा  परिषदेचे उपाध्यक्ष श्यामबाबू जैस्वाल यांनी दिली . 
 बोंडअळी समस्या निवारण करण्यासाठी कापूस उत्पादक कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था ,शेतकरी ,शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते ,बियाणे उत्पादक यांचे प्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणुन  कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाचे  मूळ कारण व त्यावर समाधान यावर  चिंतन तसेच   बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें  संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने संकटात आल्यामुळे यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व तोडगा देण्यासाठी सक्रिय प्रयन्त या  कार्यशाळेमार्फत करण्यात येतील, तरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या तक्रारी घेऊन यामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती किशोर तिवारी व श्यामबाबू जैस्वाल यांनी केली आहे .  
या महाराष्ट्राच्या पहील्या  बोंडअळी समस्या निवारण करण्यासाठी आयोजित कापूस उत्पादक परिषदेमध्ये शास्वत शेतीचे अभ्यासक व शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे ,जैविक शेतीचे प्रणेते मनोहरराव परचुरे ,केंद्रीय कापूस अनुसंधान परिषदेचे संशोधक ,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सल्लागार ,कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहीती जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोलपकर यांनी यावेळी दिली 
==========================================================. 

.

Saturday, December 2, 2017

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या शेतकरी मिशनकडुन विरोध

आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या  शेतकरी मिशनकडुन विरोध  -निर्णयाचा फेरविचार करा शेतकरी मिशनची मागणी 
दिनांक -२ डिसेंबर २०१७
अन्न-पुरवठा विभागाच्या अंत्योदय योजनेच्या ज्या कुटुंबात एक वा दोन लोक आहेत अशा सर्व कुटुंबाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत एकास ५ किलो व दोन लोक असल्यास १० किलो अन्न देण्याच्या  निर्णयाच्या पाठोपाठ आता  अन्न-पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी   शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील ६५ लाखावर नैरायग्रस्त शेतकरी कुटुंबाना सुरु असलेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेली ऐतिहासिक अन्न सुरक्षा योजना गुंडाळण्याचा केलेला सुतोवाचा स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रखर विरोध केला असुन सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी नापिकी व सोयाबीन -कापसाच्या हमीभावापेक्षा कमी भावात होत असलेल्या खरेदीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असुन त्यातच त्यांना देण्यात येत असलेली अन्न सुरक्षा बंद करणाच्या तुकलंकी शेतकरी विरोधी निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या   नैराया भर पडणाऱ्या असल्यामुळे या हा भुकलेल्याना अन्नापासून वंचित ठेवणाऱ्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे . 
 विदर्भ व मराठवाड्यातील ६५ लाखावर नैरायग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देण्याकरीता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्षिक १२०० कोटी रुपयाचा सरकारच्या तिजोरीवर बोजा लादणारी अन्न सुरक्षा योजना शेतकरी मिशनच्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी सुरु केली होती मात्र मागील दोन वर्षापासूनच शेतकरी विरोधक सनदी अधिकारी ही योजना बंद करण्याची संधी शोधात होते आता सरकारच्या खर्चामध्ये कपात करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना उपासमारीला तोंड देण्यासाठी सोडण्याच्या निर्णय घेण्यास अन्न-पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना पटविण्यात सनदी अधिकाऱ्यांना यश आले असुन अशा प्रकारे अडचणीतल्या हवालदिल शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या  हा अन्न-पुरवठा विभागाचा निर्णय सरकारची लोककल्याणकारी प्रतिमा खराब करणारा असुन सर्वोच्च व उच्चन्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारा असुन ,हा भुकलेल्याना अन्नापासून वंचित ठेवणाऱ्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी  किशोर तिवारी यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे . 
यापुर्वी सरकारने  अंत्योदय योजनेच्या ज्या कुटुंबात एक वा दोन लोक आहेत अशा सर्व कुटुंबाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत एकास ५ किलो व दोन लोक असल्यास १० किलो अन्न देण्याच्या निर्णयामुळे   लाखो आदिवासी, गरीब, कोलाम पारधी  दलित अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना बसला आहे कारण उपरोक्त योजनेतून कमी करून त्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट केले गेल्यामुळे याचा फटका वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा आदींना बसला आहे  कुपोषणग्रस्त भागात याची  झळ मोठयाप्रमाणात बसली आहे ,ही योजना केंद्राची असल्यामुळे यामध्ये सरकारने मोदी सरकारची कोणतीही सूचना नसतांना तसेच अन्न-पुरवठा विभागाने आपल्या  विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा सल्ला केराच्या टोपलीत टाकत हा अफलातून गरीब व आदिवासी विरोधी निर्णय घेतला असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 

अन्न-पुरवठा विभागाचे हे पत्रक तातडीने रद्द करावे, अशी मागणी शेतकरी मिशनने सरकारला  केली आहे .ग्रामीण भागात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्याची गरज आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण रोजगाराला चालना मिळेल. प्रलंबित वन हक्क दाव्यांवर तत्परतेने निर्णय घ्यावा आदी मागण्या आदिवासी रस्त्यावर येत असतांना अंत्योदय योजनेंबाबत प्रधान सचिवांनी काढलेले पत्र कायद्याचा भंग करीत असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान सनदी अधिकारी करीत असल्याची खंत तिवारी यावेळी व्यक्त केली 

नागरी पुरवठा विभागांतर्गत अन्न अधिकारासाठी ज्या योजना सुरू आहेत, त्यामध्ये ३५ किलो धान्य वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा, परित्यक्ता, गर्भवती, स्तनदा माता, एकटय़ा राहणाऱ्या महिला, मानसिक रुग्ण, सर्व आदिम जमातीच्या कुटुंबाचा समावेश करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. आदिवासी, गरिबांवर उपासमारीची वेळ आणणारे अन्न-नागरी पुरवठा विभागाचे पत्र तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्वच स्तरावरून येत आहे याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले आहे , अंत्योदय योजनेचा लाभ निराधार, विधवा-परित्यक्ता महिला, वयोवृद्ध अपंग, वेश्या, वेश्यांची मुले, रस्त्यावरील अनाथ मुले यांना देण्यात  अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्य अन्न अधिकार आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे. . . 

Monday, November 27, 2017

बोंडअळीचे संकट अख्ख्या भारताच्या कापुस उत्पादक क्षेत्रात-शेतकरी मिशनने दिला भारत सरकारला तोडगा


बोंडअळीचे संकट अख्ख्या भारताच्या कापुस उत्पादक क्षेत्रात-शेतकरी मिशनने दिला भारत सरकारला तोडगा  
दिनांक -२७  नोव्हेंबर   २०१७
यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे
कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला असुन या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे . 
आपल्या पंचसूत्री बोंडअळी समस्या निवारण कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाला सुरवातीला सरकारने भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने पूर्णपणे खल्लास झाले आहे . मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी, गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रोच्या परवानाधारक   कंपन्याच्या  बियाणांवर सरसकट हल्ला झाला आहे त्यामुळे   बोंडअळीच्या संकटाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे त्यातच महाराष्ट्रातील कापुस हे ४० लाख हेक्टर वरील सर्वात मोठे नगदी पीक असल्याने विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत म्हणूनच शेतकरी मीशनने हा प्रश्न लावून धरला आहे 
आपल्या पंचसुत्रीमध्ये सादर   केलेल्या प्रस्तावात किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकामध्ये उभे पीक  गाई म्हशी बैलांना वा बकऱ्याना चारणे त्यामुळे अळीचा सरसकट नाश  होईल ,उरलेले कापसाचे पीक नष्ट करणे ,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक डिसेंबर नंतर फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,बियाणे कंपन्या विरुद्धचा सामुहिक नुकसान भरपाईचा दावा सादर करावयाचा असल्यामुळे तक्रारी  दाखल करणे गरजेचे असुन त्यासाठी शेतकऱ्यांना संपुर्ण माहिती देणे ,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला आहे .
= ======================================

Sunday, November 19, 2017

अंत्योदय योजनेच्या लाभार्थींचे अन्न कमी केल्यामुळे गरीब ,वंचित व आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ -निर्णयाचा फेरविचार करा शेतकरी मिशनची मागणी


अंत्योदय योजनेच्या लाभार्थींचे अन्न कमी केल्यामुळे  गरीब ,वंचित व  आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ -निर्णयाचा फेरविचार करा शेतकरी मिशनची मागणी 


दिनांक -२० नोव्हेंबर २०१७
अन्न-पुरवठा विभागाच्या अंत्योदय योजनेच्या ज्या कुटुंबात एक वा दोन लोक आहेत अशा सर्व कुटुंबाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत एकास ५ किलो व दोन लोक असल्यास १० किलो अन्न देण्याच्या  परिपत्रकामुळे अनेक सर्व गरीबातले अत्यंत गरीब ,वचिंत वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा ,आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे हा अन्न-पुरवठा विभागाचा निर्णय सरकारची लोककल्याणकारी प्रतिमा खराब करणारा असुन सर्वोच्च व उच्चन्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारा असुन ,हा भुकलेल्याना अन्नापासून वंचित ठेवणाऱ्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे . 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर एक वा दोन लोकांच्या कुटुंबामध्ये देण्यात येणारे अंत्योदय योजनेचा गहू व तांदूळ खुल्या बाजारात विकल्या जाऊ नये हा प्रयन्त अन्न-पुरवठा विभागाचा असल्यास सरकारने या सर्व गरीबातले अत्यंत गरीब ,वचिंत वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा ,आदिवासी कुटुंबांना अन्नपूर्णा योजना ज्यामध्ये २० किलो अन्न मोफत देण्यात येते त्यामध्ये यांचा समावेश करावा असा प्रस्ताव किशोर तिवारी सरकारला दिला आहे . 


  राज्यात  लाखो आदिवासी, गरीब, कोलाम पारधी  दलित अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना उपरोक्त योजनेतून कमी करून त्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट केले गेल्यामुळे याचा फटका वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा आदींना बसला आहे  कुपोषणग्रस्त भागात याची  झळ मोठयाप्रमाणात बसली आहे ,ही योजना केंद्राची असल्यामुळे यामध्ये सरकारने मोदी सरकारची कोणतीही सूचना नसतांना तसेच अन्न-पुरवठा विभागाने आपल्या  विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा सल्ला केराच्या टोपलीत टाकत हा अफलातून गरीब व आदिवासी विरोधी निर्णय घेतला असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 



अन्न-पुरवठा विभागाचे हे पत्रक तातडीने रद्द करावे, अशी मागणी शेतकरी मिशनने सरकारला  केली आहे . अन्न-नागरी पुरवठा विभागाच्या परिपत्रकानुसार अंत्योदय योजनेचे लाभार्थी योजनेतून कमी करण्यात आले असुन  त्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट केले गेले  आहे. या बदलामुळे संबंधित कुटुंबांना आधी प्रति महिना मिळणारे ३५ किलो धान्य कमी झाले  आहे. आता अन्न सुरक्षेच्या प्राधान्य यादीत यांना महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाणार आहे. वास्तविक विदर्भात आदिवासी, आदिम जमाती मोठय़ा प्रमाणावर आहे. याच भागात भुकेमुळे आणि रोजगार नसल्याने कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. या पाश्र्वभूमीवर तिवारी  होणाऱ्या विपरीत परिणामांकडे सरकारचे  लक्ष वेधले आहे . 
नागरी पुरवठा विभागांतर्गत अन्न अधिकारासाठी ज्या योजना सुरू आहेत, त्यामध्ये ३५ किलो धान्य वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा, परित्यक्ता, गर्भवती, स्तनदा माता, एकटय़ा राहणाऱ्या महिला, मानसिक रुग्ण, सर्व आदिम जमातीच्या कुटुंबाचा समावेश करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. आदिवासी, गरिबांवर उपासमारीची वेळ आणणारे अन्न-नागरी पुरवठा विभागाचे पत्र तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्वच स्तरावरून येत आहे याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले आहे , अंत्योदय योजनेचा लाभ निराधार, विधवा-परित्यक्ता महिला, वयोवृद्ध अपंग, वेश्या, वेश्यांची मुले, रस्त्यावरील अनाथ मुले यांना देण्यात  अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्य अन्न अधिकार आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे. . ग्रामीण भागात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्याची गरज आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण रोजगाराला चालना मिळेल. प्रलंबित वन हक्क दाव्यांवर तत्परतेने निर्णय घ्यावा आदी मागण्या आदिवासी रस्त्यावर येत असतांना अंत्योदय योजनेंबाबत प्रधान सचिवांनी काढलेले पत्र कायद्याचा भंग करीत असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान सनदी अधिकारी करीत असल्याची खंत तिवारी यावेळी व्यक्त केली . 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणार : किशोर तिवारी


बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणार : किशोर  तिवारी
दिनांक -१९ नोव्हेंबर २०१७
सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रार्दुभावर आला असून या बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात  नुकसान होण्याबरोबरच पिक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल व ज्या ज्या बियाणे कंपन्यांचे कापसाचे बियाणे खराब निघाले आहे त्या सर्व कंपन्यांन्यावर सरकार नुकसान भरपाईचे दावे टाकणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली रीतसर तक्रार द्यावी    त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सुचना स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मौदा येथील  शेतकरी समस्या आढावा बैठकीत केली . या बैठकीला शेतकरी नेते विजयभाऊ तेलंगे ,प्रमोदभाऊ देशटीवार .उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,तहसीलदार महादेवराव जोरवार उपस्थित होते . 

शेतकऱ्यांशी चर्चा करतांना किशोर तिवारी यांनी कापसाच्या पिकाच्या व बियाणाच्या  विषयी महाराष्ट्रात सक्त कायदा असल्यामुळे एकही बियाणे कंपनी नुकसान भरपाई पासुन सुटणार नाही मात्र गुलाबीअळीग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करणे गरजेचे आहे जर कृषी विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तक्रार घेत नसतील माझ्याशी  मोबाईल -०९४२२१०८८४६ वर संपर्क करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली . जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे होत असलेल्या नुकसानीचा आढावा घेतला.  तसेच शेतकरी फवारणी करताना विष बाधित झाले होते. अशा किटकनाशक औषधी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना पीककर्ज माफी देऊन नवीन पीककर्ज देणे आवश्यक आहे. पीककर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत जमा करण्यात येईल. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित विज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, अशा सुचना विद्युत विभागाला केल्या. यावेळी राजीव गांधी जिवनदायी योजनेचा, शेतकरी अन्नसुरक्षा योजना, शेतकरी अत्महत्या याचाही आढावा घेतला..

Sunday, November 12, 2017

विदर्भ व मराठवाड्याचे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात - शेतकरी मिशनचे मदतीसाठी सरकारला साकडे

विदर्भ व मराठवाड्याचे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात - शेतकरी मिशनचे मदतीसाठी सरकारला साकडे  
दिनांक -१३  नोव्हेंबर   २०१७
यावर्षी पाऊसाने दिलेला फटका ,त्यांनतर कीटकनाशक फवारणीचे विषबाधेचे संकट ,आता गुलाबी अळीसह अनेक प्रकारच्या रोगाची पिकांना झालेली लागण त्यातच सर्रास हमीभावापेक्षा कमी भावात होत  असलेली कापुस ,सोयाबीन ,धान ,मुंग ,उडीतची पडेल भावात विक्री ,नाफेड व सि सि आय ,पणन महामंडळ यांनी  जाचक अटी लाऊन सुरु असलेला प्रचंड त्रास यामुळे विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर शेतकरी कुटुंब दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे महाराष्र्टाच्या मायबाप सरकारने सर्व कापूस ,सोयाबीन ,धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी विनंती  कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा  करून   केली   आहे. माननीय कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर यांना सुद्धा आपण संकटाची जाणीव दिली असुन त्यांनीसुद्धा  संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याची  गंभीर दखल घेत कृषीखात्याला अहवाल सादर करण्याचे ,सर्व वादग्रस्त बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर सरकार नुकसान भरपाईची कारवाई  करीत असल्याची माहिती देण्याचे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे . 
एकीकडे कापूस ,सोयाबीन ,धान उत्पादक शेतकरी कीटकांच्या अनियंत्रित हल्ल्याने आपले उभे पीक नष्ट करीत आहे त्यातच थोडाबहुत माल घरी आला त्याला नाफेड व सि सि आय ,पणन महामंडळ जाचक अटी लावत असल्यामुळे आतापर्यंत खुल्या  बाजाराची लुट रोखण्यासाठी सरकार पुर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र विदर्भ व  मराठवाड्यात दिसत असुन शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचा सूर ऐकू येत असुन ,शेतकऱ्यांच्या या कठीण समयी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्यांना खंबीरपणे आधार देऊ शकतात असा विश्वास त्यांनी माझ्याजवळ व्यक्त करीत असल्यामुळे आपण तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
 मागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या  विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर  यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाची पेरणी केली होती मात्र पाऊसाने त्यावर  थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी, गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे संपुर्ण पीक गारद झाले आहे आता ही रोगराई सर्वच पिकांवर गेल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती तिवारी यांनी केली आहे
मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी  कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे  उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
केंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन  महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाख हेक्टरसाठी  कापसाचे बियाणे तर  सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत  लागू करण्याचा कृषी विभागाचा केंद्र सरकारला सादर   केलेला प्रस्ताव तात्काळ लागु  करावा अशी  किशोर तिवारी केली आहे .
==============================================================

Friday, November 10, 2017

कीटकनाशके निर्मात्यांची संघटनेचा जावईशोध कीटकनाशकाचे बळी नाहीच तर शेतकरी दारूमुळे मेले -शेतकरी मिशन केले यूपीएलच्या बहिष्काराचे आवाहन

कीटकनाशके निर्मात्यांची संघटनेचा जावईशोध कीटकनाशकाचे बळी नाहीच तर शेतकरी दारूमुळे मेले -शेतकरी मिशन केले यूपीएलच्या बहिष्काराचे  आवाहन  
दिनांक १० नोव्हेंबर, २०१७
भारतातील कीटकनाशके निर्मात्यांची संघटना  क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीएफआय)चे अध्यक्ष व भारताच्या सर्वात मोठ्या कीटकनाशक कंपनी यूपीएलचे  मालक राजु श्रॉफ यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला नागपुर येथे आपला जावईशोध सादर केला असून यामध्ये कीटकनाशकांच्या विषबाधा होऊन   कोणीही मेलेला नाही व यवतमाळ जिल्हातील कीटकनाशक विषबाधेचे  बळी चक्क शेतकरी व शेत मजुरांच्या स्वतःच्या चुकीने व दारूच्या कारणाने  असल्याचा  दावा त्यांनी केला आहे .नागपुर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ते मुख्य पाहुणे म्हणून आले होते व विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या जाहीर उपमान करून परत गेले सोबतच त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कीटकनाशक विषबाधेचे समज चुकीचे असुन केंद्रीय कृषी सचिवांना आपण ही माहीती दिली असुन त्यांनी मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन (व्हीएनएसएसएम)चे  अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राजु श्रॉफ यांचा  निषेध केला असुन शेतकऱ्यांनी राजु श्रॉफ यांच्या यूपीएल या कंपनीच्या सर्व कीटकनाशक ,तणनाशकांचा वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे . 
(ही आहे मूळ बातमी -https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/inhaling-pesticides-cant-cause-death-crop-care-fedn-chief/articleshow/61584480.cms)

महाराष्ट्रात कृषी संकट टाळण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष विशेष कार्यदल  वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन (व्हीएनएसएसएम)चे  अध्यक्ष किशोर तिवारी यांनी   भारतातील कीटकनाशके निर्मात्यांची संघटना  क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीएफआय)च्या यांच्या विशेष तपास पथक (एसआयटी) समोर लेखी रूपात दिलेल्या निवेदनात कीटकनाशकांच्या फवारणीच्यावेळी स्वास घेतांना विषबाधा झाल्यास आजपर्यंत कोणीही मेलेला नाही व यवतमाळ जिल्हातील कीटकनाशक विषबाधेचे  बळी चक्क शेतकरी व शेत मजुरांच्या स्वतःच्या चुकीने मेल्याचा अफलातून सादर केलेला दावा धांदात खोटा असुन मृत्यु पावलेल्या नीरपराध    शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे . 
किशोर तिवारी यांनी विश्व आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे ऑर्गनोफोस्फोरस कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे भारतात हजारो शेतकरी व शेतमजूर मरत असुन जगात ज्या भागात अत्यंत विषारी ऑर्गनोफोस्फोरस   कीटकनाशके उपलब्ध आहेत त्या भागात सुमारे २ लाखावर शेतकरी व शेतमजूर विषबाधेने मेलेले आहेत कारण या विषबाधेचे  वैद्यकीय व्यवस्थापन कठीण आहे वं  विश्व आरोग्य संघटने वर्ग १ ची विषाक्तता असल्यामुळे यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी सुद्धा तिवारी यांनी केली आहे. 
कीटकनाशक कंपन्या आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी हा  तर्क देत असल्यामुळे विदर्भाच्या  शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या झालेल्या  ४३ मृत्यूवर  व  ८०० पेक्षा जास्त विषबाधेच्या तक्रारींच्या सत्यावर परदा पडणार नाही  तसेच ४३ शेतकऱ्यांचे  व शेतमजुरांचे   रक्त व विसरा नमुन्यांची अमरावतीच्या सरकारी फारेंसिक प्रयोगशाळेत   विश्लेषण अहवालात कीटकनाशकाच्या विषाच्या कण मिळाले नसल्यामुळे विषबाधेचे बळीच नाहीत हा  कीटकनाशक कंपन्याचा दावा  संपूर्णपणे मूर्खपणाचा असुन वैद्यकीय तज्ञांप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारणीच्यावेळी स्वास घेतांना विषबाधा झाल्यास मेंदूवर परीणाम होते व हृद्य -फ़ुपूस -किडनी बंद पडल्याने मृत्यू होतात जर कीटकनाशकांच्या सेवनानंतर मृत्यू झाल्यास त्याचे कण  रक्त व विसरा नमुन्यांमध्ये मिळतात यावर विवाद उपस्थित करून कीटकनाशक कंपन्या निर्दोष असल्याचा आव आणत असतील तर याचा इलाज सरकारने करावा अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे 
किशोर तिवारी यांनी विश्वास व्यक्त केला की यवतमाळच्या भेटीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे या ऑर्गनोफोस्फोरस कीटकनाशके निर्माण करणाऱ्या मस्तवाल कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाची फौजदारी कारवाई होईल जेणेकरून निर्दोष शेतकरी आणि शेतमजुरांना ऑर्गनोफोस्फोरस कीटकनाशकामुळे भविष्यात विषबाधा होऊन मृत्यू पडणार नाहीत . 
ऑर्गनोफोस्फोरस कीटकनाशके निर्माण करणाऱ्या मस्तवाल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे संरक्षण किट व विषबाधेची ऍंटीडोड  औषधी विक्रेत्याकडे ठेवली नाहीत तसेच एक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात नाही हा प्रकार दिलेल्या कीटकनाशक परवान्याच्या शर्तीचा भंग असुन यावेळी हे सर्व प्रकरण शेतकरी चळवळीचे नेते ,माध्यमे , सरकारचे  मंत्री व शेतकरी मिशननेच जगासमोर आणल्याने कीटकनाशक कंपन्यांनी  गैर-सरकारी संस्थांना जबाबदार धरणे चुकीचे असुन आता पर्यावरण अनुकूल ,विषमुक्त ,परंपरागत शेती व समाजाला विषमुक्त अन्न देण्याच्या एकमेव मार्ग शिलक्क राहीला असल्याने सरकारने स्वीकारावा अशी आग्रही मागणी तिवारी यांनी केली आहे . 

========================================================

Thursday, November 9, 2017

Agro-Chem. Industries claims on Pesticide Poisoning is Misleading -Kishore Tiwari


Agro-Chem. Industries claims on Pesticide Poisoning is Misleading -Kishore Tiwari 


 
Dated -10th November 2017 
Kishor Tiwari, chairman of the special task force constituted to tackle agrarian crisis in Maharashtra,The Vasantrao Naik Sheti Swawlamban Mission (VSSNM) has strongly objected the claim of the Crop Care Federation of India (CCFI) official forum of pesticides manufacturers in india that no pesticides can ever kill anyone due to inhalation. "This is completely untrue as per reports of WHO all Organophosphorus pesticides self-poisoning is an important clinical problem in rural regions of the India  and kills an estimated 200 000 people every year in region of southeast asia and africa as this is a  problem in places where highly toxic organophosphorus pesticides are available. Medical management is difficult, with case fatality is very high hence we demand to ban all  highly toxic organophosphorus pesticides (WHO Class-I toxicity)in cotton growing region of Maharashtra" Tiwari urged GOI.
'I can understand the logic behind argument of CCFI being a body of the Indian Agro Chemicals Industry to safeguard their commercial interests but truth behind   the 43 deaths of farmers and farm labourers and illness of more than 800 reported from Yavatmal  and vidarbha is known to the world" tiwari said objecting the arguments of Crop Care Federation of India (CCFI) in a submission to the Special Investigation Team (SIT) ,terming the it as attempt to divert its focus from the fact and to influence the investigations. 
we are confidant that no such submission will have  any way influence on  the investigations of SIT as CM of Maharashtra Mr.Devendra Fadnavis has clarified that he will take this issue to its logical conclusion so that no innocent farmers and farm labourers are killed by organophosphorus pesticides poisoning in future ,Tiwari said . 
Tiwari has drawn attention of Crop Care Federation of India (CCFI) to the fact that not single Indian Agro Chemicals Industry has provided any protection kit and antidote medicine moreover not single training camp was conducted  till Yavatmal strategy is reported. All protocols laid down by indian authorities are being shown the dustbin thanks to corrupt implementing agencies ,It was Govt. Task force who brought this issue before the nation not the NGOs being blamed by CCFI as we want  environment friendly sustainable ,non toxic  & poison free farming and food to the society .
VSSNM chief  has asked for all  stakeholders discussion on  CCFI  claim that the toxicity arising from off-target air drift of the highly toxic pesticides spray mixture through dermal deposit will not be fatal to humans and differences of opinion over the reports that  43 blood samples analysed by Amravati lab showed no residues of pesticides and validity of clinical experts claim that  that administering the antidote atropine is the reason for absence of such pesticides residues in blood samples as core issue of innocent deaths are being diluted .
====================================================
===================== 

Sunday, November 5, 2017

बी.टी.कापुस नाही राहीले "अळीरक्षक "-अख्या महाराष्ट्रात ४८ लाखातील   बी. टी. कापसाचे पीक धोक्यात :शेतकरी मिशनची चिंता   
दिनांक २९ ऑगस्ट २०१७
मागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या  विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर  यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाच्या कृषी विभागाच्या यावर्षी बी. टी . कापसाच्या प्रजातीवर मोठयाप्रमाणात गुलाबी अळीचा मारा होणार या सावधानतेचा इशाऱ्याला न जुमानता केलेली पेरणी आता थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात  येत असल्याची गंभीर चिंता  कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सादर केलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा  करून   सादर केलेल्या अहवालात वर्तविली आहे . 
जगात बोन्डअळीमुळे  अख्खी कापसाची उभे पीक नष्ट होत असल्यामुळे व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु झाल्याने  अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीने "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" म्हणजे बी टी कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले भारत सरकारने या बी टी बियाण्याला २००४ मध्ये सरसकट वापराची परवानगी मोनसँट्रो या कंपनीला प्रती ४५० ग्रॅमच्या संकरीत बियाणांच्या  मुळकिंमतीच्या चौपट किंमत  आकारून दिली सुरवातीला कीटक नाशकाच्या  वापरात घट आली व भारतामध्ये कापसाचे उत्पादन विक्रमी झाले मात्र २००८ पासुन उत्पादन घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बी टी कापसावर थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली मात्र मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी  कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवार निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 

केंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन  महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाखसाठी कापसाचे बियाणे तर  सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत  लागू करण्याचा कृषी विभागाचा प्रस्ताव तात्काळ करावा  व बी टी बियाणांच्या कंपन्याची दलाली करण्यावर कारवाईची मागणी किशोर तिवारी केली आहे .

बी.टी.कापसावर गुलाबीअळीचा हल्ला - महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर मधील उभ्या कापसाच्या पिकात नापिकी

बी.टी.कापसावर गुलाबीअळीचा हल्ला - महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर मधील उभ्या  कापसाच्या पिकात नापिकी 
दिनांक -५ नोव्हेंबर   २०१७
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपुर्ण कापुस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या  बातम्यासमोर समोर आल्यावर आता संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने संपुर्ण नष्ट झाल्याने हे या दशकातील  सर्वात मोठे आर्थिक संकट असुन महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या

कापसाच्या पिकांचे कमीतकमी रुपये १० हजार कोटीचे कमीतकमी नुकसान होत असुन यामुळे अळीच्या हल्ल्याने तूर व सोयाबीनचे पीक गारद झाल्याचा माहीती     कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सादर केलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा  करून   सादर केलेल्या अहवालात दिली  आहे .
 मागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या  विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर  यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाच्या कृषी विभागाच्या यावर्षी बी. टी . कापसाच्या प्रजातीवर मोठयाप्रमाणात गुलाबी अळीचा मारा होणार या सावधानतेचा इशाऱ्याला न जुमानता केलेली पेरणी आता थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात  येत असल्याची गंभीर चिंता तिवारी यांनी ऑगस्ट महिन्यातच सरकारला दिली होती.
जगात बोन्डअळीमुळे  अख्खी कापसाची उभे पीक नष्ट होत असल्यामुळे व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु झाल्याने  अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीने "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" म्हणजे बी टी कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले भारत सरकारने या बी टी बियाण्याला २००४ मध्ये सरसकट वापराची परवानगी मोनसँट्रो या कंपनीला प्रती ४५० ग्रॅमच्या संकरीत बियाणांच्या  मुळकिंमतीच्या चौपट किंमत  आकारून दिली सुरवातीला कीटक नाशकाच्या  वापरात घट आली व भारतामध्ये कापसाचे उत्पादन विक्रमी झाले मात्र २००८ पासुन उत्पादन घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बी टी कापसावर थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली मात्र मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी  कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे  उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
केंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन  महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाख हेक्टरसाठी  कापसाचे बियाणे तर  सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत  लागू करण्याचा कृषी विभागाचा केंद्र सरकारला सादर   केलेला प्रस्ताव तात्काळ लागु  करावा  व बी टी बियाणांच्या कंपन्याची दलाली करण्यावर कारवाईची मागणी किशोर तिवारी केली आहे .
=======================================================================

Thursday, November 2, 2017

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सदस्य (विधी) पदी अॅड. विनोद तिवारी यांची निवड

महाराष्ट्र  जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सदस्य (विधी) पदी अॅड. विनोद तिवारी यांची निवड

नागपूर: महाराष्ट्र   शासनाच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरण या उच्च स्तरीय आयोगाच्या सदस्य (विधी) पदावर पाणी समस्या व त्याचे नियमन या क्षेत्रात राज्य स्तरावर काम करीत असलेल्या ”जल संघर्ष “ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष व नागपूर येथील जेष्ठ  विधीज्ञ अॅड. विनोद तिवारी यांची निवड राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांचेद्वारे करण्यात आली आहे. 
राज्यातील सर्व जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण व व्यवस्थापन यासाठी महाराष्ट्र  जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कायदा, २००५ “ खाली महाराष्ट्र राज्यात    जलसंपत्ती नियामक प्राधिकरण स्थापन झालेले असून जागतिक बँकेच्या मदतीने उभारण्यात येणारे विविध धरण प्रकल्प व सिंचनाच्या पायाभूत सुविधेतुन निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग-कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, महानगरपालिका, नगरपरिशदा व ग्रामीण क्षेत्रातील पेयजल वितरण व्यवस्थेसह भूजलसंपदा, नद्या  व पाणी स्त्रोत्रांचे संपुर्ण व्यवस्थापन व न्यायोचित पाणी वितरण यासाठी हा उच्चाधिकार आयोग कार्यरत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुरू असलेल्या जनहित याचीकेद्वारे या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाला सर्व उच्चाधिकार देवून कार्यान्वित करण्याचा आदेष पारीत झाल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी उच्चाधिकार निवड समितीच्या शीफारसी वरून या आयोगावर तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात सदस्य (विधी) म्हणुन अॅड. विनोद तिवारी (नागपूर-यवतमाळ) यांचेसह सदस्य (भूजल संपत्ती) डाॅ. रतनचंद जैन (दिल्ली) आणि सदस्य (अर्थव्यवस्था) प्रा. डाॅ. शिवाजीराव सांगळे (औरंगाबाद) यांची नेमणूक राज्यपाल श्री राव यांनी केली आहे. 
अॅड. विनोद तिवारी यांनी इंजिनियरींग, व्यवस्थापन, कायदा, लोक प्रषासन, पर्यावरण, माहितीतंत्रज्ञान, मानवी हक्क कायदा, कर प्रणाली कायदे, अर्थ व्यवस्थापन इ. क्षेत्रात पदवीत्तर शिक्षण  प्राप्त केले असून त्यांना विविध क्षेत्रातील कार्याचा ३३ वर्षाचा  दांडगा अनुभव आहे. जलव्यवस्थापन व पाण्याचे न्यायोचित वितरण या विषयावर अॅड. तिवारी यांनी राष्ट्रीय  व अंतराष्ट्रीय स्तरावर विविध संम्मेलनात भाग घेतला असून ”जल संघर्ष “  या लोक चळवळीच्या माध्यमातून ते राज्यातील सिंचन व्यवस्थेच्या रेंगाळलेल्या विविध प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी सातत्याने लढत असून मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या लोकउपयोगी ”जलयुक्त शीवार“ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अमलबजावणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व ग्रामीण जनजीवनाच्या समस्यांची अॅड. तिवारी यांना जाण असून जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या नविन जबाबदारीने ते ग्रामीण जनतेला त्यांचा पाण्यावरील समसमान व न्यायोचित हक्क मिळवून देतील असा विश्वास  व्यक्त करण्यात येत आहे. 
केंद्रीय जलसंपत्ती मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, महाराश्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शेतकरी स्वावलम्बन मिशनचे  अध्यक्ष श्री. किशोर तिवारी व यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी अॅड. तिवारी यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

संपर्क: अॅड. विनोद तिवारी 
मो. 9371137653/9370373777