Thursday, December 9, 2021

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद साधणार

महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी  बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी  ११ डिसेंबरला संवाद साधणार 

दिनांक ९ डिसेंबर २०२१
सध्या मागील १४ महीने वसुली करू नये असा आदेश काढणाऱ्या व सरकारी बँका प्रमाणे कमीत कमी २ लाख कोटीचे पॅकेज नागरी बँकांना न देता केंद्रामध्ये सहकार खाते उघडल्या बरोबर दररोज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या आदेशाने आर बी आई आपल्या अधिकाराच्या बेफाम दुरुपयोग निर्बंध लावत असुन पहिले मकलापूर अर्बन बँक  त्यानंतर कै बाबाजी दाते महीला अर्बन बँक व आता नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने सुमारे ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील ठेवी झपाट्याने काढण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या व चाकरमान्या पेन्शन धारकांनी आपल्या ठेवी ठेऊन समाजाच्या अंत्योदयाचे आंदोलन लवकरच पडणार असुन हा सगळा ४ लाख कोटीच्या सहकारी बँका व पत संस्था यामधील गुजरातच्या खाजगी बँकांना देण्याचा कट मोदी -शहा रचला असुन पीएमसी बँक सुद्धा या अधिवेशनात कायदा करून खाजगी बँकेला देण्याचा अफलातुन प्रयोग करण्यात येत असल्याने महाराष्ट्र शिवसेना या सहकारी बँका लुटण्याच्या अमित शहा पॅटर्नचाविरोध करणार असुन यवतमाळ कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी  ११ डिसेंबरला संवाद  टिम्बर  भवन येथे दुपारी १२ वाजता साधणार असल्याची माहीती शिवसेना व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीणभाऊ निमोडीया यांनी यावेळी दिली . 
दिनांक. ८ डिसेंबरला अमरावती येथे कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी बैठकीत  यवतमाळ येथील हजारो शेतकरी विधवा ,दलित ,मुस्लिम ,आदीवासी ,मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी व जमा पैशाची बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३७० कोटीची केलेली  लुटकेल्याचा आरोप शिवसेना नेते किशोर तिवारी केला असुन महाराष्ट्र पोलीस कडुन एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार व एकाही ठेवीदार वा ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही व यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बँक ग्रस्तांच्या बैठकीत दिली . 
एकवर्षांपूर्वी ज्या बँकेचा  एनपीए फक्त ४ टक्के होता तो एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.१३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. बँकेला ‘ड’दर्जा देण्यात आला हा सर्व प्रकार  बँकेचे अधिकारी ,संचालक ,ऑडिटर,रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीने साध्य झाले आहे याला बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न जबाबदार असुन व हा सर्व प्रकार मागील ५ वर्षापासून जगासमोर आल्यानंतरही सारे गप्प का होते हा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
८ नोव्हेंबर रोजी रिझर्व बँकेने परिपत्रक काढून बँकेवर निर्बंध लादले आहेत  खातेदारांनी ५ हजार रूपये काढण्याचे निर्देश आरबीआयने दिले मात्र कालावधी स्पष्ट नमुद केलेला नाही ही सर्व परिस्थिती संचालक मंडळ तसेच बॅक व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थीक हितसंबंधातून व हितसंबंधांना कमी किमतीच्या मालमत्तांवर जास्त कर्ज दिल्याने थकित कर्ज व वसुलीचा समतोल एनपीए ७० टक्के नेण्यासाठी कारणीभुत झाली आहे. 
कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांचा यांच्या अनेक तक्रारी आरबीआई  व जिल्हा उपनिबंधकांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही,आमच्या कडे भरपुर प्रकरणे प्रलंबीत असून सवड मिळत नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक जिल्हा उपनिबंधकांचा कारभार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे,त्यांची भुमीका बँकेच्या बाजूला असून पिडीतांना अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील इतर शाखांमधूनही तक्रारींचा ओघ वाढला आहे.हा सर्व प्रकार आंधळा दळत आहे व कुत्रे खात आहेत असा असुन यावर एकही भाजपा आमदार मात्र बोलत नसुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे जीवनभर कमाई करून जमविलेले घामाचे पैसे चोरांनी लुटल्यानंतर त्यांचा नाकर्तेपणा पाहण्यासारखा आहे . 
सध्या महाराष्ट्रात अनेक नागरी सहकारी बँका व पत संस्था  बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा कंचलवार पॅटर्न चालवीत असल्यामुळे त्यांचा एनपीए सुद्धा दाते महिला सहकारी बँके जास्त असुन फक्त ऑडीटर आरबीआय व सहकार खात्यातील चोर अधिकारी यांच्यामुळे दाबून ठेवण्यात येत आहे याचा  पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला . 
====================================================


Friday, November 26, 2021

वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा किशोर तिवारींचे ऊर्जामंत्र्याना निवेदन

वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका  नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा  किशोर तिवारींचे  ऊर्जामंत्र्याना निवेदन 

दिनांक -१८ डिसेंबर  २०२१

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीज फुकट मिळणार नाही ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा विदर्भ व मराठवाड्यातील वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका  नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असुन विदर्भातील सबसिडी जी मागील तीस वर्षे उत्तर महाराष्ट्राने लाटली त्याचा हिशोब व चुकीच्या अधिभार ,वीज गळतीचा दंड व अंधाधुंद पाठविलेली वीज बिले यावर ही वीजमंत्र्यांनी बोलावे जरा काँग्रेसचा जाहीरनामा व इतर काँग्रेस शासित राज्यात कृषी वीज बिल फुकटात देण्याचे धोरण यावरही दाबून बोलावे सध्या विदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे व ऊर्जामंत्री विदर्भ विभागातील दलीत मागासवर्गीयांचे आधार आहेत त्यांना विदर्भाच्या होत असलेल्या शेतकरी आत्महत्या व विदर्भाचा विजेचा बिलाचा अनुदानाचा अनुषेय यावर दांडगा अभ्यास आहे त्यांच्याकरून अशा घोषणा अपेक्षित नाहीत तेंव्हा येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन 
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकारने खरीप हंगाम अतिवृष्टीने कापूस सोयाबीन तूर धान या पिकांची प्रचंड प्रमाणात नापिकी झाल्यामुळे  ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई दिली आहे मात्र केंद्र सरकारच्या बँका ही नुकसान  भरपाई पीककर्जात जॅम करण्यास सुरु केली असतांना वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आणि या जुलमी अत्याचारामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत यातच प्रशासकीय उदासीनता पीकविमा कंपन्यांचा नाकर्तेपणा यामुळे हैराण झालेल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातविदर्भ व मराठवाड्यातील नापिकीग्रस्त भागात कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा अशी विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .
चालु खरीप हंगामामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगामा पूर्णतः बुडाला असून आता शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार रब्बी वर आहे.अतिवृष्टीमुळे शेतात पाणी पातळी चांगली असतांना आता वीज वितरण कपंनीने वीज तोडणीमुळे  शेतकऱ्यांच्या कामात बाधा येत असुन  शेतकऱ्यांशी सहकार्याने वागावे व  कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबावी अशी विनंती अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली असुन सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे अशी आग्रही मागणी किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे 

खरीप हंगामात झालेला प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी थोडीबहुत  रब्बीची तयारी करीत आहेत  मात्र वीज वितरणने कृषी पंपाची वीज तोडणीचा सपाटा लावला आहे आता परिस्थिती अधिकच बिकट होत आहे सनदी अधिकारी मंत्रालयात आपल्या वातानुकूल चेंबरमध्ये बसुन सक्तीच्या वसुलीसाठी दररोज नवीन नवीन आदेश काढत असुन वीज कंपनीचे अधिकारी एकीकडे वीज तोडणी वा रोहित्रे-ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी १०० टक्के थकबाकीचा भरणा करा अशी सक्ती करीत मात्र अशी सक्ती नापिकीग्रस्त वा दुष्काळग्रस्त भागात करता येत नाही मात्र वीज वितरण कम्पनीचे अभियंता सरळ ऊर्जामंत्रीशी बोला असा सल्ला देत आहेत तर विरोधी पक्ष या वीज तोडणीचे घाणेरडे राजकारण करीत आहेत या करीता मुख्यमंत्र्यानी वीज तोडणीस तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे  .

एकीकडे वीज तोडणी तर वाघांचा दररोज शेतकरी व शेतमजुरांचा फडशा पडत असताना   कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असून ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे कारण रात्री मिळणारी वीज रात्री ११वा. ऐवजी ही सकाळी ८ ते सायं.५  पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात वनभागातील  देण्यात यावी तसेच सर्व रोहित्रे व इतर दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्र्यांना केली आहे 

==========================================

Sunday, June 20, 2021

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी

प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या  फारकत  घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी 

दिनांक २१ जुन २०२१ 


शिवेसना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे भाजप -सेना युती पुन्हा होणार वा का तुटली यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे मात्र केंद्रात भाजपची सत्ता तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकसुत्री काम करण्यासाठी एकवटलेली सत्ताकेंद्रे व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस  देशात जवळपास ५५ वर्षे सत्तेत राहुन आज आपल्या जनाधारासाठी व अस्तित्वाची लढाईत गुंतला असतांना भाजपचा सर्वात जवळ असलेला सखा  शिवसेना अशा पोषक परिस्थिती मध्ये  आपल्याला का सोडून गेला यावर आत्मचिंतन न करता महाराष्ट्र भाजपाचे एकसुत्री काम लहरी सत्ता गाजविणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,प्रदेश अध्यक्ष चंदा कांत पाटील व राज्यात शिवसेने वर एकही संधी न  गमावता आसुड ओढणारे राणे पितापुत्र किरीट सोमय्या आशिष शेलार कदम भातखळकर  दरेकर यांच्या कडुन आलेली प्रतिक्रिया फारच विकृत प्रकारच्या असुन यामध्ये आकस व सत्ता गमावल्यामुळे सुड काढण्याचा मनभेद दिसतो हे राज्याच्या राजकारणासाठी दुर्भाग्यपुर्ण असल्याचे मत शिवसेना कार्यकर्ते मात्र राष्ट्रीय स्तरावर मागील एका वर्षापासून माध्यमांवर बाजु मांडणारे किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

मागील १८ महिन्यात  ही इतकी जुनी मैत्री का तुटली यावर सत्य परिस्थितीचे व वास्तविकतेचे आत्मचिंतन न करता ही युती मुख्यमंत्री पदावरूनच  तुटली यावर जोर देण्यात आला मात्र खरी परिस्थितीचे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहेत ते असे कीं  २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने आपल्या एनडीए मधील घटक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात संपविण्याचा प्रयन्त सुरु केला त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तोडुन स्वबळावर निवडणूक लढविली मात्र पूर्ण बहुमत न आल्यामुळे व पोडापोडी न जमल्यामुळे शिवसेनेच्या घुबडया घेतल्या व सत्तेत आले मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपच्या वागणुक फारच बदलेली होती त्याचा अनुभव वारंवार उद्धवजींना आला मात्र २०१९ निवडणुकीमध्ये मोदी -अमित शाह यांनी लहान भाऊ मोठा भाऊ करीत पुन्हा युती केली मात्र २०१९ मध्ये जशी एकखांबी सत्ता भाजपाला आली त्याचवेळी शिवसेनेला कट टू साईज करण्यासाठी सर्व कारस्थान रचण्यात पुन्हा सुरवात समसमान जागेच्या नांवावर १२० जागा त्यातही त्याठिकाणी बहूतेक आपले बंडखोर उभे करून कोट्यवधी रुपये फडणवीस साहेबांनी फेकले मात्र तरीही बहुमत मिळाले नाही त्यानंतरही दिलेले सारे वचन धाब्यावर ठेवत अभद्रपणे सरकार स्थापन करण्याचा लाजिरवाणा प्रयन्त देवेन्द्रजीनी केला व आपली फजीती करून  घेतली माञ मागील १८ महिन्यात आपला सखा शिवसेना ज्याच्या कुबडया घेत आपण महाराष्ट्रात अस्तिव निर्माण केले तो एकेकाळचा मोठा भाऊ दूर का गेला यावर एक दिवसही आत्मचिंतन न करता ,आपली सत्ता कशी येणार याचा प्रयन्त करणाऱ्या चिल्लर अल्पबुद्धीधारक भाजपच्या नेत्यांना कसा  कळेल कारण आज सर्वांना घेऊन चालणारे  महाजन मुंडे नाहीत तर जे समेट आणण्यात सक्षम आहेत अशा नितीन गडकरी यांना भाजपने कट टू  नागपुर केले आहे असा टोमणा किशोर   तिवारी यांनी मांडला आहे . 

आज रोज भाजप शिवसेना संबंधामह्ये  हळू हळू विष कालविणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला शिवसेनेच्या युतीमध्ये रस नाही अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपामध्ये देवेन्द्र टीम चे सर्वात सक्रीय किरीट सोमय्या यांनी विष कालविणारी प्रतिक्रिया दिली आता देवेंद्र टीमचे राणे पिता पुत्र प्रवीण दरेकर राम कदम आशिष शेलार अतुल भातखळकर कोणतीही आवश्यकता नसतांना मागील १८ महिन्यांपासून जशा प्रकारे एकही  संधी न गमावता ज्या प्रकारे विकृत प्रतिक्रिया देत आहेत त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देतील असा विश्वास किशोर तिवारी प्रगट  केला . 

मागील दीड वर्षापासुन देवेंद्र टीमने केंद्राच्या NIA CBI  ED NCB चा वापर करून शिवसेनेला वा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा  सपाटा लावला आहे वा ज्याप्रकारे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचा "शवसेना सोनीयासेना" असा उल्लेख करतात त्यामुळे शिवसेने-भाजपा सम्बंधामध्ये दुरावा निर्माण होत  आहे मात्र या मुर्खांना महाराष्ट्रात भाजपा सोबत शिवसेना नसली तर लोकसभेत व विधानसभेत  खासदार आमदारांची मोठी घसरण होणार हे कळत नाही . शिवसेनेनी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे व उध्दवजी प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतांना मुख्यमंत्री म्हणुन ज्याप्रकारे या विषम विचारांच्या पक्षासोबत व भाजपच्या केन्द्र सरकार सोबत अतिशय प्रेमाने  कोरोना संकटात काम करीत आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे व याचा इतिहास साक्षीदार राहणार . शिवसेनेच्या या महाविकास आघाडी मध्ये  जाण्याच्या निर्णयावर मतदार कौल देतील मात्र ज्या प्रकारचे सुडाचे व व्यक्तिगत चारीत्र्य हनन बदनामी करण्याचे अत्यंत घाणेरडे प्रकार भाजपच्या  देवेंद्र टीमने केले त्याचा साक्षी सुद्धा इतिहास राहणारच असा इशारा भाजपला किशोर तिवारी यावेळी दिला . 

आपला भाजपावारी अनुभव सांगताना किशोर तिवारी म्हणाले की "मी २०१२ च्या डिसेंबर मध्ये त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष वं माझे १९७७ पासुन मित्र नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन फक्त त्यांना पंतप्रधान पाहण्याच्या  दृष्टीने भाजपसोबत काम करणे सुरु केले मात्र माझा २०१२ ते २०१९ चा अनुभव विश्वासघातांचा राहीला व मी  लोकसभेत भाजपाची एकखांबी सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत कोणतीही अट वा मागणी न करता माझे १९९९ पासून चे मित्र उद्धवजी ठाकरे यांच्या  सोबत सामाजिक चळवळ करण्यासाठी सोबत काम करण्याचे ठरविले मी त्यांच्या पेक्षा थोरला असल्यामुळें त्यांच्याशी फारच अधिकाराने जवळुन चर्चा करण्याची संधी मिळाली . मला त्यांच्या बोलण्यात २०१४ ते २०१९ भाजपच्या वेळोवेळी दिलेल्या वागणुकीचा वा प्रादेशिक पक्ष कट टू साईज करण्यासाठी होत असलेल्या प्रयन्ताचा त्यांचा साक्षात्कार जाणवत होता त्यातच ऐन दिवाळीत आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करारच झाला नाही अशी अकालनीय देवेंद्र घोषणेमुळे त्यात प्रचंड भर पडली मात्र  आज शिवसेनेचा प्रवास जसा  भारतात जसा बंगाल ओरीसा तेलंगाणा आंध्रप्रदेश तामिळनाडू सारख्या एकखांबी सत्ता गाजविणाऱ्या प्रादेशिक पक्षासारखा झाला त्यातच उद्धवजींना राष्ट्रवादीचे शरद पवार सारख्या भारताच्या  राजकारणातील पितामह व्यक्तीचा  आशीर्वाद मिळाला आहे मला तर असे वाटत २०२४ मध्ये सगळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस व डावे यांना  सोबत घेऊन  उद्धवजींच्या नेतृत्वात भारताच्या सत्तेवर येतील व २०२४ ते २०२९ या काळात भारताला "भाजपा मुक्त " करून खऱ्या अर्थाने चांगले दिवस आणतील . 

किशोर तिवारी 

संपर्क -९४२२१०८८४६ 

===================================================

Thursday, June 17, 2021

सेवा किचन व आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम पोडावर कोरोना लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम

सेवा किचन व  आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम  पोडावर कोरोना  लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम 

दिनांक -१७ जुन २०२१

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिवसेने वतीने शेकडो कोलाम  पोडावर व पारधी बेड्यावर  तसेच आदिवासी व गरिबांच्या वस्तीत कोरोना  लसीकरण कोरोना  चाचणी व जाणीव जागरूकता अभियान "आधार उद्भवाचा " प्रकल्पात सुरू करण्यात आला आहे. दिनांक १८ जूनला घोंसी कोलाम  पोडावर कोरोना  लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम  सकाळी ११ वाजता  आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व सेवा किचन व  आभा प्रकल्पा मार्फ़त आयोजित करण्यात आला आहे अशी माहीती शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी दिली .यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच लसीकरणासाठी लोकांची गर्दी कमी झाली आहे मात्र लसीकरणासाठी मोहीम राबविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केल्यामुळे आदीवासी प्रकल्प अधिकारी व अति . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा आरोग्य अधिकारी पी एस चव्हाण  तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मडावी  तलसीलदार सुरेश केवले ,गट विकास अधिकारी सुरेश चव्हाण ,आदिवासी नेते अंकित नैताम बाबुलाल मेश्राम ,माधवराव टेकाम ,संतोष नैताम ,विक्रमसिंग धुर्वे यांच्या सहकार्याने होत आहे . 

नागपूरच्या खुशरु पोचा या रेल्वे मध्ये कर्मचारी असलेल्या व मागील २० वर्षापासुन रुग्णांना व त्यांच्या नातलगांना नागपूर प्रत्येक दवाखान्यात जेवण देण्याचा सेवा किचन या नावाने कोणतीही देणगी न घेता सुरु केलेल्या प्रकल्पाद्वारे  मागीलवर्षी १० हजारावर कुटुंबाना तीन महिने अन्नाच्या किट वाटप केले होते व त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सरळ फोन करून केली होती व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी मागीलवर्षी पदमश्री पुरस्कारासाठी शिफारस सुद्धा केली होती .यावर्षी सुद्धा   पहिल्या टप्प्यात  २० मे रोजी सकाळी पांढरकवडा  १५०० कुटुंबांना  "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले व  दुसऱ्या टप्प्यात १०००  कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले आहे  हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी  ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार  एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच  क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे. 

 गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत  असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

===========================================================

Monday, May 31, 2021

घुईखेड ग्रामस्थांना स्व कमलाबाई टावरी बहुउद्धेशीय शिक्षण संस्थेतर्फे अन्न व किराणा किट सानुग्रह मदतीचे वाटप
दिनांक ३१ मे २०२१

Saturday, May 22, 2021

विदर्भातील अति दुर्गम भागात कोरोनाग्रस्तांसाठी शिवसेना भाजपा अफलातुन युती - पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला नितीन गडकरीं कडुन ५ ऑक्सिजन काँसंट्रेटरचे लोकार्पण

विदर्भातील अति दुर्गम भागात कोरोनाग्रस्तांसाठी शिवसेना भाजपा अफलातुन युती - पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला   नितीन गडकरीं कडुन ५ ऑक्सिजन काँसंट्रेटरचे  लोकार्पण 

दिनांक २२ मे २०२१


एकीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे चार सहकारी किरीट सोमैया प्रवीण दरेकर राम  कदम अतुल भातखळकर  महाविकास आघाडी सरकारला त्यातल्या त्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना काळात कसे अडचणीत येतील याचा २४ तास प्रयन्त करीत असतात व भाजप सेनेचे संबंध विकोपास नेण्यात प्रयन्तशील असतात त्याचवेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कोणताही पक्ष जातीभेद न ठेवता कोरोना काळात मदत करीत आहेत व सर्वांना यावेळी घाणेरडे राजकारण करू नका असा निरोप त्यांच्या राज्यातील भाजपा नेत्यांना देत आहेत याच त्यांच्या अविरत प्रयन्तांचा भाग म्हणुन त्यांनी शिवसेना नेते किशोर तिवारी यांच्या मार्फत पांढरकवड्याच्या उपजिल्हा रुग्न्यालयात पाच ऑक्सिजन कॉन्सोन्ट्रेटर देण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली सातुरवार   डॉ संजय तोडासे डॉ. माधुरी  कांबळे डॉ. अश्वनी  काळे  सौ राजेश्री बोबडे प्रभारी सिस्टर अर्चना तोडेकर संजीवनी वंजारी सिस्टर  माया खाडे सिस्टर संतोष भाऊ दत्ता येनगंट्टीवार विशाल सिडाम लोहार  प्रकाश तायपेल्लीवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकित नैताम नंदकिशोर जैस्वाल बाबू जैनकर संतोष नेताम गणेश कोल्हे विक्रम धुर्वे सुजल गेडाम गणेश तलमले उपस्थित होते . 

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिवसेने वतीने शेकडो कोलाम  पोडावर व पारधी बेड्यावर  तसेच आदिवासी व गरिबांच्या वस्तीत कोरोना  लसीकरण कोरोना  चाचणी व जाणीव जागरूकता अभियान "आधार उद्भवाचा " प्रकल्पात सुरू करण्यात आला आहे. दिनांक 20 मे रोजी सकाळी पांढरकवडा  1500 denyकुटुंबांना  "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले. पुढील टप्प्यात दररोज 1000 कुटुंबांना आधार म्हणजे  कीट जाणीव जागरूकता  शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी  ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार  एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच  क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे. 

 गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत  असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली 

नितीन गडकरी यांनी मागील वर्षांपासुन कोरोनग्रस्तांसाठी केलेल्या कामाचा आढावा 

धान्याचे कीट : गेल्या मार्चमध्ये संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली, अनेकांचे रोजगार गेले, उपासमारीची वेळ आली. ही स्थिती लक्षात घेता सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि संवेदना म्हणून 1 लाख 78 हजार धान्याचे कीट गरीब कुटुंबाना वितरित केले. या कीटमध्ये 5 लोकांच्या कुटुंबाला लागणार्‍या सर्व वस्तूंचा समावेश होता. डाळ-तांदुळापासून तर मसाले चहापर्यंत सर्वच वस्तू देण्यात आल्या.
मास्क : मागील वर्षभराच्या काळात कोरोना संक्रमणावर नियंत्रण येण्याच्या उद्देशाने 80 हजार ते 1 लाख मास्कचे वितरण करण्यात आले.

पीपीई कीट : कोरोनाच्या काळात कोरोना योध्दे, आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मचारी, सफाई कामगार यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीपीईचे कीटचे वितरण करण्यात आले. ऑरेंज सिटी क्लस्टर्सच्या माध्यमातून 1500 पीपीई कीट नागपूर आणि विदर्भातील रुग्णालयांना, आरोग्यसेवकांना, सफाई कर्मचारी, पोलिस विभाग यांना उपलब्ध करून दिल्या. यामुळे या सर्वांच्या सेवा जलद गतीने उपलब्ध होऊ शकल्या.
सॅनिटायझर : सॅनिटायझरचा वापर वाढला असताना आणि कोरोना योध्ये व रुग्णालयांना लागणार्‍या सॅनिटायझर होणारा काळा बाजार लक्षात घेता आम्ही स्वत:च सॅनिटायझर बनविण्याचा निर्णय घेऊन ते बनविलेही. काही साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीची विनंती केली व बाजारात सॅनिटायझर उपलब्ध झाले. सॅनिटायझरच्या 2 लाख बॉटलचे वितरण विदर्भातील सर्व जिल्ह्यात करण्यात आले. शासकीय रुग्णालये, आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले.
रुग्णशय्यांची उपलब्धता : माझ्या कार्यालयातील हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णांना 1500 रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांची माहिती घेऊन संबंधित रुग्णांना त्या रुग्णालयातील रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
एम्समध्ये 500 रुग्णशय्या : एम्स या रुग्णालयात सुरुवातीला फक्त 65 बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता या रुग्णालयात 500 अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली. यासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन येणार्‍या अडचणी दूर करण्यात आल्या. लवकरच या बेड्सवर व्हेंटिलेटरची व्यवस्था होत आहे. याशिवाय महापालिका, मेयो व मेडिकल रुग्णालयात प्रत्येकी 100 रुग्णशय्या वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले.
अ‍ॅम्ब्युलन्स सेवा : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात विविध संस्था व लोकांकडून अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी येत असताना त्या काळात शेकडो लोकांना अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
सर्व सुविधायुक्त 7 अ‍ॅम्ब्युलन्स वितरण : जनमानसात आणि आदिवासी व दुर्गम भागात काम करणार्‍या संस्थांना रुग्णसेवेसाठी राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे 7 अ‍ॅम्ब्युलन्स वितरित करण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात या अ‍ॅम्ब्युलन्स वितरित करण्यात आल्या. मैत्री परिवार, चरणसिंग ठाकूर पारडसिंगा, डॉ. सातव धारणी (अमरावती), डॉ. हेडगेवार समिती अहेरी (गडचिरोली), प्रभाकरराव दटके समिती, लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट या संस्थांना अ‍ॅम्ब्युलन्स वितरित करण्यात आल्या.
पंतप्रधान कार्यालयाला माहिती : नागपूरसह विदर्भात कोरोनाची स्थिती लक्षात घेता काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची विदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाला दररोज देण्यात येत होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेण्यात येत होता. याशिवाय विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून माहिती घेण्यात येत होती. या बैठकीतून उपलब्ध झालेली माहिती पंतप्रधान कार्यालयाला नियमित देण्यात येत होती.
पंतप्रधान कार्यालयामार्फत माझ्याकडे राज्यातील 22 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

प्लाझमा, रक्ततपासणी, आरटीपीसीआर : कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक रूग्णांच्या नातेवाईकांकडून, सामाजिक संघटनांकडून प्लाझमा, रक्ततपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी करून देण्याची मागणी होत असताना या सर्व सुविधा रुग्णांसाठी रुग्णांच्या नातवाईकांना उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आली.

रेमडेसीवीर इंजेक्शन : कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर संक्रमणाचा वेगही अति वाढला असताना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनची मागणी शासकीय, खाजगी रुग्णालयातून होत होती. पण इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे हाहाकार माजला होता. अशा स्थितीत हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी इंजेक्शन तयार करणार्‍या विविध कंपन्यांच्या मालकांना फोन करून 15 हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी सन फार्मा व मायलॉन या कंपन्यांमार्फत हे इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले.
रेमडेसीवीरचे संकट भविष्यात पुन्हा निर्माण होऊ नये या दृष्टीने व विदर्भाची निकड भागविण्यासाठी या इंजेक्शनचे उत्पादन वर्धा येथून सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. लवकरच 30 हजार इंजेक्शन दररोज उत्पादन सुरु होत आहे. रुग्णांची निकड लक्षात घेता हा धाडसी निर्णय घेण्यात आला. भविष्यातील निकडीचा विचार आजपर्यंत कुणी केला नसावा, असा हा निर्णय ठरला आहे. भविष्यात या इंजेक्शनची मागणी वाढली तरीही उत्पादन वाढविण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे.

ऑक्सीजनची व्यवस्था : ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दररोज 220 मे. टनची ऑक्सीजनची मागणी असताना कधी 110 तर कधी 130 मे. टन ऑक्सीजन उपलब्ध होत होता. स्थानिक पुरवठादार आवश्यक असलेल्या ऑक्सीजनचा पुरवठा करू शकत नव्हते. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांसमोरही एक मोठे आव्हान या ऑक्सीजनने उभे केले होते. अशा स्थितीत आपण स्वत: पुढाकार घेऊन विशाखापट्टणम, भिलाई स्टील प्लाण्ट, जिंदल स्टीलचे मालक यांच्याशी चर्चा करून ऑक्सीजन देण्याची विनंती यांना केली व त्यांनी ती मान्य केली. शहराला ऑक्सीजन उपलब्ध झाला. भिलाई, विशाखापट्टणम येथून ऑक्सीजन आणण्यासाठी लागणारे कंटेनर देऊन प्यारेखान यांच्या वाहतूक कंपनीने बहुमोल सहकार्य केले.
शहराला आता ऑक्सीजनचा तुटवडा नाही. 19 टँकर उपलब्ध झाले. 160 मे. टन ऑक्सीजन आणणे शक्य झाले. 3 टँकर विशाखापट्टणम येथून रेल्वेद्वारे मिळाले आणि रुग्णांना ऑक्सीजन मिळाला. 200 मे. टन ऑक्सीजन बाहेरून आणण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण झाले. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीची जबाबदारीही माझ्यावर असल्याने तेथेही ऑक्सीजन उपलब्ध करून दिला.
ऑक्सीजन उपलब्ध झाल्यानंतर विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे नियोजनही करण्यात आले. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्यासोबत बसून कोणत्या जिल्ह्याला किती ऑक्सीजन मिळत आहे, त्यांची गरज किती आणि तो कसा लवकरच पुरवायचा याचेही नियोजन करण्यात आले.

व्हेंटिलेटर इन्वेसिव्ह : आतापर्यंत 150 व्हेंटिलेटर इन्वेसिव्ह 150 नागपूर विभागाला उपलब्ध करून देण्यात आले. अधिक 100 व्हेंटिलेटर इन्वेसिव्ह येणार असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी ते देण्यात येणार आहेत.


ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर : ज्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, तेथे एनआयव्हीचा पुरवठा करण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागात आतापर्यंत 500 एनआयव्ही वितरित करण्यात आले.
ऑक्सीजन सिलेंडर, पाईप लाईन उपलब्ध नाही अशा रुग्णालयांना ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरच पुरवठा करण्यात आला. संपूर्ण विदर्भात आतापर्यंत 3000 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर वितरित करण्यात येणार आहेत. आजतागायत 500 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.

15 कोटींची मदत : गेल्या वर्षभराच्या काळापासून आतापर्यंत 15 कोटी रुपयांचे साहित्य आणि उपकरण रुग्णांसाठी मिळवून दिले आहेत.

ऑक्सीजन प्लाण्ट : ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर युध्द पातळीवर ऑक्सीजन मिळविण्याचा अनुभव लक्षात घेता या क्षेत्रातही आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याची निकड भासू लागली. लगेच यावर तज्ञांशी चर्चा करून महापालिकेने, मेयो, मेडिकल रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन प्लाण्ट उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच 50 रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयांनी हवेपासून निर्माण होणार्‍या ऑक्सीजनचे प्लाण्ट सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी शासकीय रुग्णालयांना स्वत:च्या ऑक्सीजन प्लाण्टसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनी 5 कोटींची मर्यादा दिली. याशिवाय वेस्टर्न कोल फिल्डच्या सामाजिक दायित्व निधीतू 5 कोटींची मदत करण्यात येणार आहे. अशाप्रकारे ऑक्सीजन निर्मितीत आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

स्पाईस हेल्थ लॅब : कोरोनाची तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट त्वरित मिळावा व जास्तीत जास्त नागरिकांना तपासणी करता यावी म्हणून स्पाईस हेल्थमार्फत मोबाईल तपासणी प्रयोगशाळा नागपुरात उपलब्ध होणार आहेत. यापैकी एक नागपुरात दाखल झाली असून ती कार्यरतही झाली आहे. करून देण्यात आल्या. अशा दोन मोबाईल प्रयोगशाळा नागपुरात उपलब्ध झाल्या आणि तपासण्याही सुरु झाल्या आहेत. या केंद्रांतून आरटीपीसीआर तपासणी केली जाते. एका प्रयोगशाळेमार्फत दररोज 3000 नागरिकांच्या तपासणी करण्यात येत आहेत. महिनाभरात 1 लाख नागरिकांच्या तपासणी केल्या जातील.
‘जिनोम सिक्वेसिंग’ सुविधाही या तपासणीत उपलब्ध आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन असेल तर तोही या तपासणीतून सुटणार नाही, अशी व्यवस्थाही या तपासणीत आहे.

Saturday, May 8, 2021

लॉक डाऊन काळात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीसाठी हैदौस - उपाशी मरत असलेल्या गरीबांवर होत असलेले अत्त्याचारा रोखा -किशोर तिवारी

 लॉक डाऊन काळात   मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीसाठी हैदौस  - उपाशी मरत असलेल्या गरीबांवर होत असलेले अत्त्याचारा रोखा  -किशोर तिवारी 

दिनांक -८ मे  २०२१
एकीकडे मागील एक महिन्यापासुन महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु आहे . सर्व जिल्हाधिकारी कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधा सोडुन फक्त लॉक डाऊन किती कडक करता येईल ठेवढा कडक करून शेतकरी शेतमजुर मोलकरीण गावातील दुकानातील नौकर हातठेले वाले टपरी वाले कशाप्रकारे लाचार होतील व त्यांची उपासमार कशी होणार यासाठी अविरतपणे शिस्तबद्ध रीतीने काम करीत  आहेत मात्र त्यांना त्याचवेळी प्रत्येक गावात खेड्यात दामदुपट्टीने वसुली करणारे मायक्रो फायनान्स कंपन्यांचे गुंड दिसत नाहीत . सध्या सुरु असलेली जुलमी सरकारी नियंत्रणात व रिझर्व्ह बँक वा नाबार्डच्या मुक मान्यतेने मायक्रो फायनान्स कंपन्यांची लुट व अत्त्याचारावर नियंत्रण करण्याची मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना केली आहे . 
भारत सरकारने मोठ्या उधोगाला २० लाख कोटीचे पॅकेज दिले मात्र गरीबांना व शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही . महाराष्ट्र सरकारने यावर्षी लॉक डाऊन घोषीत करतांना गरीबांना व मजूरांना तसेच आदिवासीना व संघटीत कामगारांना ५ हजार कोटीचे पॅकेज दिले मात्र बहुतेक विदर्भ मराठवाड्यात मदतीचे वाटप प्रशासनाने केले नसल्याचे चित्र आहे .कोरोना मुळे एकीकडे गावच्या गाव आजारी पडत आहेत त्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांचे गुंड वसुलीसाठी जुलूम करीत आहेत .लॉक डाऊन मध्ये पोटाची खडगी भरण्यासाठी जराही रस्त्यावर आल्यास मारणारे पोलीस मायक्रो फायनान्स कंपन्यांचे गुंडाना राजरोसपणे अत्त्याचार कसे करू देतात असा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे . 
सध्या विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी व शेतमजूर कोरोनाच्या लॉक डाऊन व  कृषी संकटामुळे बँकांची दारे ग्रामीण जनतेला बंद झाल्याने विश्व बँकेच्या दबावाखाली  मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या रूपाने सुरु केलेला पतपुरवठा  एका नवीन खाजगी सावकाराच्या युगाचा प्रारंभ करणारा ठरला आहे त्यातच आता महाराष्ट्राचा समावेश सर्वाधिक मायक्रो फायनान्स कंपन्या असणाऱ्या पहिल्या पाच राज्यांत होतो व सध्या सुमारे ९८०० कोटी रुपये वाटुन ४५ कंपन्या राज्यामध्ये मायक्रो फायनान्स क्षेत्रात प्रचंड हैदौस घालत आहे असे विदारक चित्र आहे याचे प्रमुख  कारण  महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्याप्रमाणे  कडक कायदे न केल्याने आज ग्रामीण  जनता या कंपन्यांच्या कचाटय़ात फसली आहे. शेतकरी मिशनने कडे शेतकऱ्यांनी व ग्रामीण जनतेनी केलेल्या तक्रारीमध्ये   रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार मायक्रो फायनान्स कंपन्यांना कोणत्याही अटी व शर्तीचे पालन करीत नाही ,त्याना  २६ टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारता येत नाही; परंतु या कंपन्यांनी २३ टक्क्यांपासून ते ३६ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केल्याचे सत्य पुढे येत आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अधिकारी  वसुलीसाठी रात्री-अपरात्री लोकांना त्रास देत असतात व या कंपन्यांच्या कारभाराला पोलीस का आळा घालत नाहीत? ज्या पद्धतीने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी विधिमंडळात स्वतंत्र कायदे करून या बेताल मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावला. व्याजाची कमालमर्यादा व वसुलीची नियमावली केली, तसे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्याची वेळ आलेली आहे.राज्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या आणि कर्जवसुलीसाठी कोणत्याही थराला जाणारे मुजोर वसुली अधिकारी यांनी कर्ज वसुलीसाठी केलेल्या अरेरावीच्या विरोधात आता  जनता आंदोलनाच्या मार्गावर जात आहे याची चिंता किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
शेतकरी मिशनकडे आलेल्या तक्रारी मध्ये अख्ख्या विदर्भ मराठवाड्यात मायक्रो फायनान्स कंपन्यां वसुलीसाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांना व  गोरगरीब महिलांना शिव्या घालणे, गुंडागर्दी करणे, घरातील वस्तूची जप्ती वा भल्या पहाटे, रात्री-अपरात्री वसुलीसाठी जातात व घरात येऊन वसुलीसाठी ठाण मांडून बसतात  म्हणून अनेकींनी आत्महत्येचे प्रयत्न केले असल्याचे प्रकरणाची माहीती देण्यात आली आहे . एकीकडे कोरोनाचे संकट व सततची नापिकी, दुष्काळ, शेतीमालाला भाव नसणे यामुळे छोटे शेतकरी व शेतमजूर यांची आíथक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. कितीही आíथक कोंडी झाली तरी गरजा असणारच. आजारपण व शेतीच्या कामाला पसा हा लागतोच.घरदुरुस्ती, मुलांचे शिक्षण याला तरी कुठला पसा आणायचा? घरात लग्नकार्य आले की जास्तच आíथक कोंडी होते अशावेळी   मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाळ्यात फसतात .
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये आता फायनान्स कंपन्यांचा जुलमी  तगादा व गुंडागर्दी  हे कारण समोर येत आहे. शासनाच्या पातळीवर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जाची सुविधा केलेली असली तरी झटपट कर्ज मिळणे सोयीचे आणि कमी कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीच्या वेळी या फायनान्स कंपन्यांना बळी पडत आहे. अत्यंत चढ्या दराने हे व्याजदर उपलब्ध असतानाही शेतकरी कर्ज घेत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीही वाढत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कार्यरत सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांची माहिती घेण्यात  यावी त्यांची एकदा माहिती तयार झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती आणि त्यावरील नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 


========================================================================

Sunday, January 31, 2021

Maharashtra farmers’ Mission seeks special package in Budget

Maharashtra farmers’ Mission seeks special package in Budget

 Dated-31 Jan 2021

late Vasantrao Naik sheti Sawalaban Mission {VNSSM} Farmers Body in the Mahrashtra  region has demanded a Rs 50,000 crore development package from the upcoming Union Budget.

In view of the plight of the farmers, it was high time that the central government looks at agrarian crisis seriously in Mahashtra   and announces a hefty development package, VNSSM  President Kishore Tiwari said in a statement on Monday.

VNSSM, an official state govt. advocacy group for farmers, said they have demanded a Rs.50,000 crore package which would take care of the huge backlog for the region, help sustainable crop promotion, support mega micro irrigation schemes and other infrastructure development in the region.

VNSSM has also urged the government to constitute a national-level Commission, which looks into measures to prevent farmer suicides.

Recent reforms introduced by centre failed to address agrarin crisi of mahrashtra ,hence demand specail relief is must in the budget ,tiwari ueged .

Since 2006, the state government has announced two separate packages worth Rs 5,825 crore. This was followed by a loan waiver of Rs 4,600 crore from the central government and Rs 1,100 crore in 2009 by the state government, added Tiwari.

“Yet, suicides have not stopped and the region continues to be backward and the sentiments are strongly in favour of a special package is must  ,” Tiwari pointed out.

The major demands of the farmers include- minimum support price (MSP) for cotton and soybean to match the cost of production with a 50 per cent profit margin, new crop loan to farmers after waiving their existing debt dues, bringing new technology in agriculture and irrigation.

Financial assistance for farm widows and higher education facilities to their wards.

Finance Minister Ms.Nirmala Sitaraman  is likely to present the union budget of 1st feb,2021.

==============================================