Saturday, September 29, 2018

Task force urged Finance minister to save 8 million credit starved farmers

Task force urged Finance minister to save 8 million credit starved farmers

Dated 30 September  2018

Task Force ( Vasantrao Naik  Sheti Swavalamban Mission (VNSSM) chairman Kishore Tiwari urged Indian finance minister Arun Jaitely to save  debt trapped dying drought hit 8 millions distressed farmers to stop ongoing farmers suicides in 14 districts of Marathwada and Vidarbha after the PSU banks failed to fulfilled target given by RBI-Nabard miserably in Maharashtra as per figure made available by SLBC (State Lead  Bankers Committee) in review meeting held held at Pune  on 28th of September 2018 .As the SLBC data in Maharashtra all PSU banks achieved only 41% taget in state as whole where they disbursed only Rs.11 thousand crore against target Rs. 28 thousand crore  in farm suicide prone 14 districts of Marathwada and Vidarbha achievement crop loan in only  30 % where PSU banks  due to apathy of apex bank and complete hostile functioning of PSU banks controlled by RBI even after stae govt, has given mega loan waiver to these farmers to tune of Rs.14 thousand crore  hence special task force headed farm activist has now approached finance minister Arun Jaitely for in his urgent intervention and special bailout package so that every debt trapped is brought under institutional credit cover .

Task Force ( VNSSM) chairman Kishore Tiwari has brought the attention of planning commission report of 2006 which was tabled in the parliament and drawn the attention  of   page 52 para 1.29.2 which has urged Indian Govt. for the same ,
I quote 

1. 29.2 Fresh crop loan to all farmers is only solution to stop suicide.

Government of Maharashtra has announced that interest rate on crop loan will be reduced to 6% from existing 9%, but when only 5% farmers are taking loan for farming from bank, what is the use of this reduction, Kishore Tiwari asked. “In Vidarbha out of 3.2.million cotton growers, 2.8 million farmers are old defaulters of bank loans and not eligible for institutional credit.

Hence taking loan from private money lenders and falling in to the debt trap is inevitable for them. In order to stop this exploitation of Vidarbha farmers, it is must to provide them bank credit”.
unquote 

Kishore Tiwari  informed Indian finance minister Arun Jaitely that Maharashtra is facing severe drought in 14 districts of Marathwada and Vidarbha region since 2014 and crop failure is being reported since 2012 and prevailing acute distress and despair has resulted in to very serious issues of farmers suicides and to address this agrarian crisis state govt. has started numbers of direct and indirect intervention in area of food security and health security ,rural employments ,creating protective irrigation facilities in each drought prone villages of region and  major relief  intervention to save these 8 million debt trapped farmers Maharashtra CM Devendra Fadanvis announced mega loan waiver in order to provide crop loans to at least 80% of these farmers but PSU banks hostile attitude and noncooperation failed its basic purpose of this loan waiver .  
As debt is main issue in all cases of the farmers suicides in 14 districts of Maharashtra’s drought affected region hence the state has decided to cover all 8 million farmers of this to cover under institutional credit and has made very strong case before RBI  but till there is no response resulting in daily credit starved farmer’s suicides in Maharashtra, Tiwari added.
Task force  asked Indian finance minister Arun Jaitely  “Its not a time that the finance minister sitting as mute spectator, when our farmers are constrained to commit unfortunate suicides…………..!!!!”..We know that you are very busy & occupied,  but have a couple of minutes to read & act on this in the interest to protect dyeing farmers….!!.
==================================================================


Sunday, September 23, 2018

पाटणबोरी स्टेट बँक २० सप्टेंबरपासून बंद : शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकाचा स्मरणार्थ बँक अधिकारी संघटनेने शेतकरी व ग्राहकांच्या सेवा रोखल्या

पाटणबोरी  स्टेट बँक २० सप्टेंबरपासून बंद : शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकाचा स्मरणार्थ बँक अधिकारी संघटनेने शेतकरी  व ग्राहकांच्या सेवा रोखल्या 
दिनांक २४सप्टेंबर २०१८
यवतमाळ जिल्हातील पाटणबोरी येथील स्टेट बँकेमध्ये पीककर्ज मिळावे यासाठी २ महिन्यापासून १० ते १५ वेळा चक्र मारूनही पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज खरीप हंगाम संपत असतांना मिळत नसल्याच्या तसेच बँकेत आदिवासी वृद्ध विधवा महीला यांना सरकारी अनुदानही ५ ते १० वेळा चकरा मारूनही मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी घेऊन बँकेसमोर मागणी करणाऱ्या जमावाला शांत करण्यासाठी १९ सप्टेंबरला पाटणबोरी स्टेट बँकेसमोर शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी बँक मॅनेजरला देत असलेल्या त्रासाबद्दल सुनावल्यामुळे तिवारी यांनी मूर्ख नालायक कामचुकार  म्हटले याच्या विरोधात बँक संघटनेने बँकेच्या व्यवस्थापनाच्या अनुमतीने पाटणबोरी स्टेट बँकच बंद करून आपल्या सेवा अचानक सर्व ग्राहकांना बंद केल्या असुन या घटनेचा तिव्र निषेध करीत हे आपण शेतकऱ्यांसाठी अविरतपणे बँकांच्या उदासीन धोरणाविरुद्ध सूर असलेल्या लढा रोखावा यासाठी दबावतंत्र असुन जर आपल्या विरुद्ध तक्रार असल्यास आपणावर कायद्याच्या चौकटीत कारवाई तात्काळ करावी मात्र सरकारी बँक कोणतीही सूचना न देता बेमुदत बंद करणे बँक अधिकारी संघटनेकडुन आपली समांतर सत्ता गाजविण्याचा प्रकार असुन अख्ख्या विदर्भ व मराठवाड्यात स्टेट बँकेने सर्वात कमी पिक कर्ज वाटप केले आहे ,यवतमाळ जिल्हात जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कोटी रुपयाची खाती बंद केल्यांनतर जेमतेम ५० टक्के वाटप करण्यात आले आहे ,वाशीम ,अमरावती ,अकोला ,बुलढाणा .हिंगोली ,परभणी ,बीड सह अनेक जिल्हात स्टेट बँकेनी पीककर्ज वाटपात २५ ते ३५ टक्केच वाटप केले आहे ,आपला सर्व स्टेट बँक अधिकाऱ्यांशी वारंवार वाद होत असुन आपण यांची भारत सरकारला अनेक तक्रारी केल्या आहेत आता पाटणबोरी स्टेट बँकेच्या घटनेचा बाजार मांडून आपण पीककर्ज वाटपाचा पाठपुरावा करू नये व महाराष्ट्र सरकारने किशोर तिवारीच्या बंदोबस्त करावा या मागणीसाठी सुरु असलेल्या स्टेट बँक अधिकारी संघटनेच्या आंदोलनास शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी समजून घ्यावी यासाठी हा खुलासा
पाटण बोरी साठे बँकेच्या सेवा क्षेत्रात येणाऱ्या रूढा ,अर्ली ,घुबडी ,सुन्ना .,कोदोरी येथील शेतकऱ्यांनी आपण मागील २ महिन्यापासून सतत चक्रामारूनही पीककर्ज मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे  तसेच  १२ सप्टेम्बर नंतर खरीप वाटप बंद झाले असे बँक अधिकाऱ्यांनी घोषीत केल्यामुळे जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार पिक कर्ज वाटप मेळावा १९ सप्टेंबरला पाटणबोरी स्टेट बँकेसमोर लावला व याला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांना आंमत्रित केले होते . १९ सप्टेंबरच्या सकाळपासूनच ५०० च्या वर शेतकरी ,महीला बजेट गटाच्या महीला ,आदीवासी ,निराधार वृद्ध व विधवा जमले होते  . स्टेट बँकेच्या कामकाजाविषयी प्रचंड असंतोष त्यावेळी प्रगट होता त्यावेळी परिस्थिती स्फोटक होती .
कार्यक्रमाची बातमी 
https://youtu.be/GMriMenjodE

स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंतराव घोडखांदे यांनी मला फोन करून तात्काळ बोलावुन घेतले ,आपण जनतेला शांत  केल्यांनतर आपल्या तक्रारी देण्यास सांगीतले त्यावेळी तक्रारीचा पाऊस पडला त्यामध्ये खालील तक्रारीमुळे आम्ही सर्वानी आपली मान लज्जेने खाली झाली .... 
१. अर्ली येथील मागासवर्गीय ९ महिन्याच्या  गर्भवती महिलेने २ महिन्यांपासून सतत चक्रामारूनही आम्हला पिक कर्ज देण्यास आज या उद्या या आज पर्यंत कर्ज मिळाले नसल्याची तक्रार केली . 
२. घुबडी येथील कुमरे या ७२ वर्षाच्या आदीवासी वृद्धांनी मागील ३ महिन्यापासून आपण ५ वेळा आलो मात्र केस तयार असूनही पीककर्ज नाकारले . 
३.पीवरडोल येथील शेतकरी महीला महिलेने माझे ५० हजाराचे पीककर्ज मंजूर झाले असतांना दिवसभर बसवूनही हातपाय झोडूनही बँक अधिकाऱ्यांनी सणासाठी ५०० रु. ही दिले नाही . 
४. सरकारी अनुदान व निराधार निराधार वृद्ध व विधवायांचे बँकेत जमा झालेले पैसे महिन्या भऱ्यापासून मिळत नसल्याची तक्रारी शेकडो  वृद्धांनी महिलांनी केली . 
५.रूढा व गवारा सह शेतकडो शेतकऱ्यांनी सरकारने पीककर्ज वाटप बंद केल्याचे सांगुन बँक मॅनेजरने परत पाठविल्याची तक्रार केली . 
६. बँकेत ज्या लोकांना पीककर्ज मंजूर झाले त्यांना सरकारी प्रमाणे न देता बँक मॅनेजर मर्जीने देत असल्याची तक्रार यावेळी केली . 
७. अनेक ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी दिवस दिवसभर उन्हात उभे रहावे लागत असल्याची तक्रार केली . 
८. बँक कॅशियर पैसे मोजता येत नसल्यामुळे व बँक मॅनेजर दिवस मोबाईलवर चिट चॅटींग करीत बसत असल्याची तक्रार यावेळी केली. बँक अधिकारी महिलांना व ग्राहकांचा सतत अपमान करतात ही तक्रार यावेळी करण्यात आली . 
९.बँकेत मुद्रा योजनेसाठी एकालाही कर्ज मिळत नसल्याची तक्रार शेकडो नागरीकांनी यावेळी केली . 
१०. बँकेत पीककर्जाच्या अनेक फाईल गहाळ झाल्याची तसेच सर्च रिपोर्ट सह सर्व बँकांचे नाहरकत बँक अधिकारी मागत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली . 
११. बँक मॅनेजरला बँकेच्या कर्ज समाधान योजनेविषयी विचारले असता या बँकेला लागु  नाही असे उत्तर दिले . 
१२.-ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज सरकारने माफ केले व कर्जमाफीची रक्कमही बँकेत दिली तरी बँकेने नवीन   पीककर्ज नाकारले अशी तक्रार यावेळी करण्यात आली . 

आपण पाटणबोरी बँक मॅनेजर वरील तक्रारी खऱ्या की खोट्या यावर विचारणा केली असता त्यांनी तक्रारी खऱ्या आहेत माझे होते ते करा असे उत्तर दिले व आपण दोन महिन्यांपासून आले असुन २५० च्या वर शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगीतले व मला पीककर्ज वाटप बंद करण्याचे वरून सांगण्यात आल्याचे सांगीतले . आपण सरकारी नियमांचे पालन करून पिक कर्ज मर्यादा कमी का केली तर मला पीककर्ज वाटपाचे नियम माहीत नसल्याचे उत्तर दिले . बँकेत फक्त ६ कर्मचारी व २ अधिकारी असल्याने कामे होत नसल्याचे सांगुन मुजोऱ्या करण्यास सुरवात केल्यावर जनतेचा आक्रोश कमी करण्यासाठी स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंतराव घोडखांदे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना  येत्या ७ दिवसात कर्ज देण्यात येणार असल्याची हमी दिली व पीककर्ज मेळावा आटोपला मात्र त्यांनतर बँक अधिकाऱ्यांनी आपली झाडा झडती घेताना किशोर तिवारी यांनी आपण नालायक ,गाढव व इतर ठिकाणी जागा मिळाली नाही बिहारवरून पाठविले ,मंत्री दर्जा असल्यामुळे शांत आहे जर शेतकऱ्यांना व आदीवासी वृद्ध व विधवांना सन्मान दिला नाही तर पुढच्या वेळेस बदडल्याशिवाय जाणार नाही अशी धमकी दिल्याने स्टेट बँक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने शुक्रवारपासुन बंद केल्याचे जाहीर केले असल्याचे बँक अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आपणास सांगितले ,आपण ह्या हुकूमशाही शेवट पर्यंत विरोध करणार व बँकांची मुजोरी विरुद्ध आंदोलन सुरु करणार असल्याची माहीती यावेळी दिली . 
स्टेट बँक पाटणबोरी बंद करणाऱ्या ३ घटना 
१ घटना पहीली - वर्ष २०१६-२०१७ खरीप हंगामात स्टेट बँक मॅनेजर बारई यांनी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याला संगणकाच्या मॉनिटरने मारले पोलिसात गुन्हा दाखल 
बँकेची कारवाई - नागपूर विभागीय कार्यालयात पदोन्नती देऊन बदली 
२. घटना दुसरी -वर्ष २०१८-२०१९ खरीप हंगामात स्टेट बँक मॅनेजर प्रश्नात फटिंग यांनी झरी तहसीलदार यांनी दिलेला मदतीचा धनादेश नाकारला व तलसीलदारांना खुलेआम धमकी दिली . 
बँकेची कारवाई - नागपूर विभागीय कार्यालयात पदोन्नती देऊन बदली 
३. घटना तीसरी -१९ सप्टेंबर २०१८ रोजी खरीप हंगाम संपत आलं तरी २५० शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारल्यामुळे पीककर्ज मेळावा 
बँकेची कारवाई - बँक व्यवस्थापनाकडून कोणतीही चौकशी न करता पाटणबोरी स्टेट बँक बंद करण्याच्या निर्णय 
वरील तीनही घटनांमध्ये शेतकरी वा बँकांच्या ग्राहकांनी कोणतीही अनुचित घटना केलेली नाही ,आज पर्यंत एकही तक्रार शेतकऱ्याविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी केलेली नाही


शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारणाऱ्या सरकारी बँकामध्ये स्टेट बँक आघाडीवर 
अख्ख्या विदर्भ व मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त भागात महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफीच्या सर्व तीनतेरा करून पीककर्ज नाकारणाऱ्या सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक आघाडीवर असून आपण  विदर्भ व मराठवाड्यात  स्टेट बँकेच्या शाखानिहाय भेटी देऊन झाडाझडती घेत असल्यामुळे दररोज किशोर तिवारींचा बंदोबस्त करा असे निरोप सोशल मीडियावर टाकत आहे ,पाटणबोरीच्या घटनेचा आवाज मुंबई मध्ये घेऊन जाणारे महाभाग नागपूर पावर  कंपनीच्या घबाडाचे धनी आहेत ज्यांची पत नाही अशांना २० हजार कोटीचे कर्ज देणारे ३० लाख शेतकऱ्यांना ३० लाख कोटीची जमीन  असतांना ३ हजार कोटी कर्ज नाकारतात व त्यांचा झळ करतात त्या मस्तवाल अधिकाऱ्यांना सरकार रोखत नसल्यास हे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे . 
पाटणबोरी स्टेट बँक बंद घटनेची चौकशी करा 
तडकाफडकी बंद करण्याच्या तसेच बँक व्यवस्थापक यांनी केलेल्या तक्रारीची उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ज्या इतर दोन घटनांचा उलेख्ख बँक करण्यात आला आहे त्याची सुद्धा  उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ही आपली मागणी असुन यासाठी आपण २ ऑक्टोबर पासुन बँकेसमोर उपोषण सत्याग्रह सुरु करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली 
==================================================











Thursday, September 13, 2018

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण :अडेगाव येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात जनतेनी वाचला समस्यांचा पाढा

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण :अडेगाव येथील सरकार आपल्या दारी कार्यक्रमात जनतेनी वाचला समस्यांचा पाढा 
दिनांक -१३ सप्टेंबर २०१८
झरी तालुक्यात शेतकरी महावितरण कंपनीच्या भोगलं कारभारामुळे त्रस्त झाले असुन रोहित्र डी पी चार  चार महिन्यांपासून बंद असणे घरगुती मीटरचे बिल हजारोच्या घरात येणे तसेच  सरकारी अनुदान ,पीककर्ज ,आरोग्य सुविधा यासाठी प्रचंड ओरड झाल्यामुळे शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आमदार संजय बोदकुलवार यांनी तहसीलदार अश्विनी जाधव ,नायब तहसीलदार रामचंद्र खीरेकर ,गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण ,सह गटविकास अधिकारी शिवाजीराव गवई ,महावितरण कंपनीचे अभियंता लटारे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम ,ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या उपस्थितीत सरकार आपल्यादारी कार्यक्रम अडेगाव  तालुका झरी   ६ सप्टेंबरला  घेतला असताना परिसरातील नागरीकांनी वीज वितरण ,अन्य सर्व विभागाचा समस्यांचा पाढाच वाचल्याने किशोर तिवारी व आमदार संजय बोदकुलवार जनतेच्या आक्रोशाची सामना करावा लागला . 
मागील पंधरवाड्यात उपविभागाचे  सर्व अधिकारी आदिवासींच्या समस्या वाऱ्यावर सोडून उपविभागीय अधिकाऱ्याच्या लग्नाला तिरुपतीला गेल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या प्रकारांनंतर या सर्व कामचुकार व नाकर्त्या अधिकाऱ्यांची मस्तवालपणाची परीक्षा घेण्यासाठी तसेच झरी  तालुक्यातील  आदीवासी ,कोलाम ,पारधी ,शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास,पाणी ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी   सरकार आपल्यादारी कार्यक्रम अडेगाव  तालुका झरी     येथे  आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाला आदीवासी कार्यकर्ते जिल्हापरिषद सदस्यसंगीताताई सुरेश मानकर जिल्हापरिषद सदस्य मिनाक्षीताई सुरेश बोलेनवार जिल्हा परिषद सदस्य, लताताई आत्राम पंचयात समिती सभापती,राजु  गोंडरावार पंचायत समिती सदस्य, अशोकरेड्डी बोदकुरवार, अनिल भाऊ पोटे तालुका भाजपा अध्यक्ष , अनिल पावडे, विठल बंडेवार ,सुरेश बोलेनवार, सुरेश मानकर, सतिश नाकले, शाम बोदकुरवार, उपस्थित होते  . 
यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी गावात येत नसल्याच्या तक्रारी केल्या ,मुकुटबन येथील ग्रामीण बँक व स्टेट बँक पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याची  तक्रार केली . शेतकरी महावितरण कंपनीच्या कडुन  रोहित्र डी पी चार  चार महिन्यांपासून पुरवढा होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली किशोर तिवारी यांनी ह्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या आश्वासन यावेळी दिले . 
या सरकार आपल्यादारी कार्यक्रमाचे संयोजन  अडेगाव सरपंच अरुण हिवरकर उपसरपंच सिंधुताई टेकाम ,तंटामुक्ती अध्यक्ष निर्मलाताई दातारकार नंदू वऱ्हाडे भास्कर सूर गोविंदराव उरकुडे संजयभाऊ दातारकार सखाराम ठेंगणे यांनी केले होते . 
=========================================

Monday, September 10, 2018

टिप्पेश्वर अभयारण्याच्या वन्यप्राण्यामुळे हजारो हेक्टर वरील पिके नष्ट :सुन्ना येथील वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची घोषणा

टिप्पेश्वर अभयारण्याच्या वन्यप्राण्यामुळे हजारो हेक्टर वरील पिके नष्ट :सुन्ना येथील  वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची घोषणा 
दिनांक -११  सप्टेंबर २०१८
टिप्पेश्वर अभयारण्याला लागुन असलेल्या मराठवाकडी ढोकी सुन्ना टेम्बी सुसरी पेंढरी वऱ्हाकवडा कोपामांडवी कोबाई कोदोरी कारेगाव घुबडी वळवाट रूढा खैरी कारेगाव बंडल अर्ली गणेरी भीमकुंड मंगी सगदा सावंगी सावरगाव रामपूर जाम कालेश्वर  मातनी झुली बोथ बहात्तर येथील सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांचे उभे पीक रानडुक्कर व रोह्यानी नष्ट केले असुन  वनखाते कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तर सोडा त्यांचे साधे पंचनामेही होत नसुन आता या अन्यायांविरुद्ध या ३४ गावाच्या शेतकऱ्यांनी जी. प . प्रतिनिधी गजानन बेजंकीवार पंचायत समिती सभापती इंदुताई मिस्सेवार ,उपसभापती संतोष बोडेवार ,घाटंजी  पंचायत समिती प्रतिनिधी जीवनभाऊ मुद्दलावर  पारवा जी. प . प्रतिनिधी रूपेश  क्यातमवार  पंचायत समिती प्रतिनिधी सुहासभाऊ पारवेकर मोहन मामीडवार  यांच्या पुढाकाराने एकवटले असुन मागील  शुक्रवार ७ सप्टेंबरला टिप्पेश्वर अभयारण्याच्या सुन्ना येथील  टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पाढाच यावेळी वाचण्यात आला . 
माजी आमदार  लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांनी मागील दोन वर्षात  रानडुक्करांची  व रोह्याच्या संख्या वाघासारखीच वाढली असुन आमचे जगणे कठीण झाले असुन सरकारने या हजारो शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी रेटली . 
वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी  पंचनामा करण्याचे पैसे मागतात व नुकसान हजारोच्या घरात व मोबदला शे पाचशे देतात अशी तक्रार सुन्नाचे सरपंच पवन चिंतकुंटलावार यांनी केल्यावर साऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रकार आम असल्याचे सांगीतले तसेच मोबदला घेण्यासाठीही पैसे खात असल्याची तक्रार करण्यात आली . वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना वाऱ्यावर वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी  सोडतात व नियमानुसार मिळणारी मदत देण्यास देत नसल्याच्या तक्रारी येत असल्याची  खंत मदन जिड्डेवार व मोहन मामीडवार यांनी व्यक्त केली . 
यावेळी टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी समितीचे पवन चिंतकुंटलावर ,रामण्णा बोलकुंटवार ,श्रीहरी जिड्डेवार ,दामोदर  चिंतकुंटलावर,धर्माजी बावणे ,माधवराव मरसकोल्हे  हनुमंतू कायपेल्लीवार  गजानन  जिड्डेवार,गणेरीचे निरंजनभाऊ कोचहाडे ,मंगीचे मनोज जडगिलवार ,अविनाश आनंदीवार ,प्रवीण खेरलावार ,राकेश आपतवार यांनी शेतकरी समितीच्या प्रमुख्य मागण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी ,श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेमध्ये सरकारी अनुदानेमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे कुंपन लावून देण्यात यावे असा ठराव मांडला व तो आपण सरकार दरबारी रेटणार अशी घोषणा शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली . 
या टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर ,शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,शेतकरी नेते मदन जिड्डेवार ,आदीवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,धर्माभाऊ आत्राम ,दलीत नेते नितीनभाऊ कांबळे ,बाळासाहेब राऊत ,बाबुलाल मेश्राम उपस्थित होते  . 
टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त  मेळाव्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी शामिल झाले होते  .  

Saturday, September 8, 2018

नाकर्त्या अधिकारी व बँकाच्या उदासीनतेमुळे हजारो शेतकरी बोंडअळी अनुदानापासून ऐन पोळ्यात वंचित


नाकर्त्या अधिकारी व बँकाच्या उदासीनतेमुळे हजारो शेतकरी  बोंडअळी अनुदानापासून ऐन पोळ्यात  वंचित 
दिनांक -८ सप्टेंबर २०१८

                                   महाराष्ट्र  सरकारने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिलेली हेक्टरी रु . ६८००  दोन हेक्टर पर्यंतची मदत सरकारने उपलब्ध करून दिल्यानंतरही अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या खात्यात जमा केल्याने शेतकऱ्यांच्या एकमेव सर्वात महत्वाचा पोळा सण कोरडा झाला असुन अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने मदतीची रक्कम जमा करूनही आमच्या जवळ वेळ नाही म्हणुन बँकांनी न दिल्याच्या प्रचंड तक्रारी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे  अध्यक्ष किशोर तिवारी यांना मिळाल्याअसून या सर्व नाकर्त्या व मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला शेतकरी मिशनने रीतसर तक्रार दिली आहे . 

                                                      यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोलाम आदीम जमातीचे आंबेझरी इजारा येथील   शेतकरी पोतू भीमा आत्राम सुनील आत्राम तुळशीराम लोनसावाले ,मणिराम आत्राम ,शशिकांत ढवळे या शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी  तक्रारीमध्ये म्हटले आहे की सेंट्रल बँक शाखा मारेगाव येथे त्यांची बोंडअळीची मदत जमा झाली आहे मात्र व्यवस्थापक सोनकुसरे यांनी थकीत पीककर्जामध्ये जमा केली आहे . महाराष्ट्र सरकारने मदतीचे अनुदान कर्जात जमा करण्यात येऊ नये असे स्पष्ट केल्यानंतरही आपण का कपात केली अशी विचारणा केली असता आमच्या बँकांवर  महाराष्ट्र सरकारचे नियंत्रण नसल्याचे उत्तर दिले अशीच परिस्थीती स्टेट बँकेच्या व महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आहे , दाभाडी झरी तालुक्यातील शेतकरी  नामदेव आत्राम यांची बोंडअळीची मदत पिक कर्ज खात्यात जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र बँकेच्या झरी शाखेने दिल्यांनतर विभागीय व्यवस्थापक प्रशांत गजभिये यांच्याकडे किशोर तिवारी यांनी तक्रार केली त्यांनी असा प्रकार होणार नाही असे आश्वासन दिले मात्र मस्तवाल बँक अधिकाऱ्याने ऐन पोळ्यात मदत शेतकऱ्यांच्या हातात दिलीच नाही 

                    महाराष्ट्र सरकारने बोंडअळीची मदतीचा दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध करून दिला व जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी हे मदतीची रक्कम तात्काळ तहसीलदारांना वळती केली मात्र घाटंजी झरी केळापूर या आदिवासी भागातील महसूलचे अधिकारी व कर्मचारी तिरुपतीला भुवनेश्वरीदेवीच्या दर्शनाला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गेल्यानें बोंडअळीची मदतीचे रखडले त्यातच बँकांनी दररोज फक्त १० ते १५ शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम वळती केल्याने १ महिन्यापासून आलेली रक्कम लालफीतशाही शेतकऱ्यांच्या पासुन वंचित राहीली आहे आपण या सर्व प्रकार राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांना कळविला असुन त्यांनी चौकशीची आश्वासन दिल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले आहे . 

                         बोंडअळीची मदतीच्या वाटपामध्ये सरकारी बँकाच शेतकऱ्यांवर अन्याय करीत नसुन मध्यवर्ती सहकारी बँकांचे अधिकारी आखाडीवर असल्याच्या आरोप किशोर तिवारी यांनी केला असुन हा प्रकार त्यांनी यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमनराव गावंडे यांच्याकडे केल्यावर त्यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी सर्व मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा फक्त बोंडअळीची मदतीच्या वाटपासाठी सुरु ठेवल्या आहेत मात्र शेतकऱ्यांनी आमची सुट्टी खराब केली याचा रोष प्रगट करीत त्यांनी मुठभर लोकांना बोंडअळीची मदतीचे वाटप केल्याने उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांच्या व त्यांच्या कडे काम करणाऱ्या शेतमजुरांचा पोळा कोरडा गेल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली . 


===============================================================

Wednesday, September 5, 2018

७ सप्टेंबरला सुन्ना टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळावा :श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेच्या तात्काळ लागु करण्यासाठी शेतकरी संघर्षाच्या मार्गावर 
दिनांक -६ सप्टेंबर २०१८
टिप्पेश्वर अभयारण्याला लागुन असलेल्या मराठवाकडी ढोकी सुन्ना टेम्बी सुसरी पेंढरी वऱ्हाकवडा कोपामांडवी कोबाई कोदोरी कारेगाव घुबडी वळवाट रूढा खैरी कारेगाव बंडल अर्ली गणेरी भीमकुंड मंगी सगदा सावंगी सावरगाव रामपूर जाम कालेश्वर  मातनी झुली बोथ बहात्तर येथील सुमारे ३० हजारावर शेतकऱ्यांचे उभे पीक रानडुक्कर व रोह्यानी नष्ट केले असुन  वनखाते कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तर सोडा त्यांचे साधे पंचनामेही होत नसुन आता या अन्यायांविरुद्ध या ३४ गावाच्या शेतकऱ्यांनी जी. प . प्रतिनिधी गजानन बेजंकीवार पंचायत समिती सभापती इंदुताई मिस्सेवार ,उपसभापती संतोष बोडेवार ,घाटंजी  पंचायत समिती प्रतिनिधी जीवनभाऊ मुद्दलावर  पारवा जी. प . प्रतिनिधी रूपेश  क्यातमवार  पंचायत समिती प्रतिनिधी सुहासभाऊ पारवेकर यांच्या पुढाकाराने एकवटले असुन येत्या शुक्रवार ७ सप्टेंबरला टिप्पेश्वर अभयारण्याच्या सुन्ना गेटवर टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळावा आयोजीत केला आहे . 
या टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी मेळाव्याला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर ,शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार ,धर्माभाऊ आत्राम ,बाळासाहेब राऊत ,बाबुलाल मेश्राम उपस्थित राहणार आहे . 
टिप्पेश्वर वन्यप्राणीग्रस्त शेतकरी समितीच्या प्रमुख्य मागण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी ,श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेमध्ये सरकारी अनुदानेमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे कुंपन लावून देण्यात यावे यांचा समावेश असुन या मेळाव्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी शामिल होणार आहेत अशी माहीती संयोजक पवन चिंतकुंटलावर ,रामण्णा बोलकुंटवार , श्रीहरी जिड्डेवार ,दामोदर  चिंतकुंटलावर,धर्माजी बावणे ,माधवराव मरसकोल्हे  हनुमंतू कायपेल्लीवार  गजानन  जिड्डेवार,गणेरीचे निरंजनभाऊ कोचहाडे ,मंगीचे मनोज जडगिलवार ,अविनाश आनंदीवार ,प्रवीण खेरलावार ,राकेश आपतवार यांनी केले आहे . 


Sunday, September 2, 2018

आदिवासींना वाऱ्यावर सोडून सारे अधिकारी कर्मचारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या लग्नाला :वासरी कोलाम पोडावर पुन्हा एकदा सरकारची उदासीनता आली समोर

आदिवासींना वाऱ्यावर सोडून सारे अधिकारी कर्मचारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या लग्नाला :वासरी कोलाम पोडावर पुन्हा एकदा सरकारची उदासीनता आली समोर 
दिनांक - २ सप्टेंबर २०१८
घाटंजी  तालुक्यातील  आदीवासी ,कोलाम ,पारधी ,शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास,पाणी ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  वासरी कोलाम पोडावर   सरकार आपल्यादारी कार्यक्रम  आयोजित केला  होता.   या कोलाम पोडावर पार्डी  साखरा तरोडा वडनेर लिंगापुर मोवाडा पहापळ टिटवी राजूरवाडी मारेगाव येथील शेकडो आदीवासी महीला आपल्या आदिवासी विकास ,अन्न  पुरवडा ,ग्राम विकास ,पाणी पुरवडा कृषी  व आरोग्य विभागाच्या प्रचंड तक्रारी समोर  समोर आल्या मात्र घाटंजी तहसीलदारासह आदीवासी प्रकल्प कार्यालयाचे सर्वच अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांचा लग्नात खुर्च्या उचलण्यासाठी गेल्यामुळे एकही अधिकारी उपस्थित नव्हता यावर सर्व आदिवासींनी आपला असंतोष प्रगट करीत या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली यावेळी कोलाम नेते ,माधवराव टेकाम ,भीमराव नैताम ,बाबुलालजी मेश्राम ,लेतुजी जुनघरे ,अंकितराव नैताम व  जी.प .प्रतिनिधी  सविता मोहनराव जाधव यांनी आपल्या भावना प्रगट केल्या . 
यावेळी वासरी कोलाम पोडाचे रामकृष्ण आत्राम ,भीमराव टेकाम ,कवडू आत्राम ,विठ्ठल सुरपाम ,बापुंण्या आत्राम ,सुखदेव सुरपाम ,संजय आत्राम ,प्रशांत आत्राम ,बाजीरावजी आत्राम व मोतीराम मेश्राम यांनी आमच्या पोडावर पाणी वीज रस्ता घरकुल जातीचे प्रमाणपत्र तसेच आरोग्याच्या प्रचन्ड तक्रारीं या कार्यक्रमात विविध विभागाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विभागीय अधिकारी उपस्थित राहणार होते मात्र जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आपण पुन्हा आपल्या दारी येण्याचे आश्वासन किशोर तिवारी . 
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी राळेगाव घाटंजी केळापूर मारेगाव तालुक्यातील आदिवासींच्या सरकारच्या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे समस्यांच्या डोंगर साचला आहे त्यामध्ये  कोलाम घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या ,घरकुल ,ग्राम विकास योजनांचा या भागातील जनतेला  मिळालेला लाभ ,कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण , वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,  घाटंजी  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, वीज जोडणी ,वीज पुरवढा या विषयी  समस्या      जनतेच्या  शिक्षणाच्या सवलती व लाभ ,या तालुक्यातील    परीसरातीलवरळी मटका व कोंबडा बाजाराचा ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना,उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल,कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील
शेतकऱ्यांची  यादी ,या   प्राथमिक  आरोग्यकेंद्राच्या समस्या सतत पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने हा सरकार आपल्यादारी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला आहे मात्र भ्र्ष्ट अधिकाऱ्यांनी त्याचे तीनतेरा केल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला '
======================================================