Thursday, December 5, 2019

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कांदा महाग झाल्याची ओरड थांबवावी कारण हा महागाईचा नाहीतर निर्सगाचा प्रकोप -साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी यांचे साकडे

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कांदा महाग झाल्याची ओरड थांबवावी कारण हा महागाईचा नाहीतर निर्सगाचा प्रकोप -साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी यांचे साकडे 
दिनांक -५ डिसेंबर २०१९
सध्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज मिळत नसल्यामुळे कांद्याचा नापिकीमुळे झालेल्या तुटीमुळे वाढलेल्या किमतींचा जबरीने बाजार करणाऱ्या   राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांना ही ही राष्ट्रीय विपदा मद्यम वर्गीय ग्राहकांवर आली असुन अनेक गरीबांचे बळी पडतील देश आर्थिक संकटात येणार असा समज पसरू नका फक्त महीना दीड महिन्यात नाशीक कांदा भारताचा बाजारात येणार हे निश्चित असुन जर या राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांची अनाहुत ओरड ऐकून भारत सरकारने स्वस्त भावाचा कांदा पाकीस्थान मधुन मोठ्या प्रमाणात आणला तर जानेवारी नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा व्यापाऱ्यांना मोतीमोल भावात विकून आत्महत्या कराव्या लागतील तरी आपल्या  प्रसारणाला देण्यात येत असलेला राष्ट्रोय संकटाचे स्वरूप संयमित करावे असे आव्हान शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांना केले आहे 
आपल्या निवेदनात कांद्याचे संकट हे दिवाळी दरम्यान झालेल्या अकाली पाऊसामुळे असुन यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार कोटींचे उभे पीक नष्ट झाले आहे व याचा भारत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा संबंध नसुन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या फक्त १० टक्के उरलेल्या कांद्याला थोडा भाव मिळत असल्यामुळे ग्राहकही सहकार्य करीत आहेत तसेच कोणताही प्रसिद्धिप्रधान राजकीय पक्ष सुद्धा आपला मोमबत्ती मार्च करीत नसुन फक्त  राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी साऱ्या मध्यम वर्गीयांचा ठेका घेत सतत कांदा हा विषय लावून धरला आहे ही ओरड करणाऱ्यांनी  जैन बांधवांचा सल्ला घ्यावा कारण युगाण युगे ते कांदा लसूण शिवाय जगतायेत अनेक समाजात चार चार महीने कांदा न खाता सहज जगतात व त्यांचे विकारही कमी होतात आता सर्वच धर्मीय शेतकऱ्यासाठी आम्हीही कांद्याशिवाय वा कमी कांद्याने    जगू शकतो न दाखून दिले आहे कारण आजकाल एका  कुटुंबाला महिन्यात  जास्तीत जास्त ५  किलो कांदा लागतो  आणि बजेट ६०  रुपये कांदा या भावाने केले असेल तर कांदा फक्त ३ किलो खरेदी करा वाढलेलं बजेट सौदर्य प्रसाधन सिनेमा हॉटेल  आणि इतर  खर्च करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फक्त हे दोन महिन्यासाठी आहे पुढे रब्बी चा कांदा आला की कांद्याचे भाव जेमतेम २० रुपये  होतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
जेव्हा कांदा २० रुपये किलोच्या खाली होतो तेव्हा शेतकरी सतत तोट्यात असतो  कांही तोटा आज  कमी होतोय तर होई ओरड का कारण शेती ही चॅरिटी नाही व्यवसाय आहे हे मान्य करावयाला पाहीजे  सद्याची भाववाढ ही निर्सगाचा प्रकोपामुळे  केवळ मागणी आणि पुरवठा यामुळेच झाली आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे  लोकांना खुश ठेवण्याआठी कांदा बटाटा  हा जीवनाव्यशक  हा का यावर राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी खुली चर्चा करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी  गरिबांचे  काय होईल याची चिंता करू नका.ते आपलं बजेट सांभाळून चटणी भाकरी खाऊन आनंदी  असतात त्यामुळे ग्राहकांनी तेव्हा कांदा महाग झाला हा  राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी सुरु केलेल्या कांगावा पाहण्यात टाळावे अशी विनंती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
================================================

Tuesday, December 3, 2019

महा पोर्टलचा घोटाळा व्यापम घोटाळ्याच्या बाप - मागील ५ वर्षातील ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक गोरखधंद्याची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी

महा पोर्टलचा घोटाळा  व्यापम घोटाळ्याच्या बाप - मागील ५ वर्षातील ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक गोरखधंद्याची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी 
दिनांक -३ डिसेंबर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सरकारने महा पोर्टल रद्द करण्याची मागणी केल्याच्या नंतर  मागील ५ वर्षातील ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक उपक्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली आहे कारण ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाची कार्यपद्धतीवर शेकडो तक्रारी सतत येत होत्या व या  ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे ऍडमिन वा 
ऑन लाईनवर येणारी संपुर्ण माहीती व फेरपार करण्याची चावी वा सुविधा असणाऱ्या व्यक्ती या प्रशासनाच्या बाहेरच्या असुन पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांचा  असल्याचे आरोप होत असल्यामुळें या उपक्रमाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या व त्यांचे मालक यांची सारी माहीती जगासमोर येणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्राला आज पर्यंत मिळालेल्या पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असा वाद पुढे येणे अनुचीत असल्यामुळें याची सखोल चौकशीची आवश्यकता आहे वर्तमान  मुख्यमंत्र्यांचे सल्लागार असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.  
 मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सरकारमध्ये ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने महा पोर्टल उभारले होते मात्र नेटवर्क ग्रामीण भागात नसल्याने सर्वांचा अतोनात झळ करण्यात आला आता त्या पारदर्शक प्रणालीमध्ये पोटभरू दलालांनी कोट्यवधींची कमाई केली असा वासही येणे चुकीचे आहे म्हणून भाजपचे विरोधी पक्ष नेत्यांनी सि बी आई चौकशीची मागणी लावून धरणे अत्यंत गरजेचे झाले आहे कारण  महा पोर्टलबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. काही नावे / आडनावांना प्राधान्य देण्यात आले होते आणि इतरांना जाणीवपूर्वक हटविण्यात आले आहे, अशी शंका सर्वत्र पसरली आहे. काही विशिष्ट जाती / समुदायांना अनुकूलता देण्यात आल्याची तक्रार तर बिनबुडाची वाटते मात्र पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालाच नसेल असा विश्वास किशोर तिवारी प्रगट केला असुन मात्र रामभक्तांनी भगवान रामाचा आदर्श   ठेवत दुधाचे दूध पाण्याचे पाणी करावे असा आग्रह करीत  मागील सरकारने सुरू केलेल्या 'ई-टेंडरिंग' प्रक्रियेत व्यापक अनियमिततेच्या तक्रारी आल्या आहेत काही विशिष्ट घटकांना   'पूर्ण पारदर्शकता' न घेता अयोग्य फायदा दिल्याचा आरोप गंभीर फौजदारी गुन्हांना आमंत्रित करणारा आहे .  
 "महा पोर्टल व्यवस्थापनासह संबंधित व्यक्ती आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अद्यापही आपल्या पदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करतात. बर्‍याच वेळा त्यांच्यापैकी काहीजण विचित्र तास किंवा ठिकाणी विचित्र काम करीत असल्याचे दिसून आले आहे तसेच महापोर्टल महा टेंडर अधिकृत होण्यापूर्वी त्यांच्या माहितीची उघड वारंवार केली जात होती असा गंभीर आरोपच किशोर   तिवारी यांनी यावेळी  केला.

या पूर्वी मागील आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री  उद्धवजी  ठाकरे यांना  निवेदन देताना खादर सुप्रिया  सुळे म्हणाले की, महा पोर्टलवरील बेरोजगारांना भेडसावणाऱ्या नवयुवकांना केलेल्या तक्रारी व  अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी ते काढून टाकावे आणि त्याऐवजी त्यापूर्वीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींनुसार भरती करण्याची मागणी केली होती तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत अशीच मागणी केली आणि सुळे यांच्यासमवेत त्यांनी  भेट घेतली होती हे विषेय आहे . 
 बाह्य माहिती तंत्रज्ञ तज्ञांकडून महा पोर्टलची संपूर्ण तपासणी केल्यास महाराष्ट्रातील घोटाळ्याचे संभाव्य व्यापाम प्रकार उघडकीस येऊ शकतात आणि म्हणूनच त्याला त्वरित सील करण्यात यावे  व पुढील कामकाज सर्व   आई टी कंपन्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 
========================================================================

Sunday, December 1, 2019

BJP ouster in Maharashtra Echoed in World


BJP ouster in Maharashtra  Echoed in World  
Dated -2 December 2019

The drama which continued  in  Maharashtra fro 40 almost a month in which national ruling BJP failed to comeback even its miserable attempt  to grab the in the post midnight drama has been matter of world discussion  has very senior  executive of US base IT giant  based in australia  has sent has own analysis which has been very  viral in social media  which is putting question mark on the  national BJP leadership ,The Five Reasons why BJP lost the Maharashtra throne done by NRI Apporve Mishra who is working in IT firm in Australia are too serious to raise credibility of Indian political leadership as the  Game of Throne Maharashtra 2019 season is finally over. After being stabbed by BJP & Ajit Pawar and revived by  Sharad Pawar and  Udhav Thackrey has emerged as John Snow of Maharashtra. So, it’s a happy ending for the Thakreys and Shiv Sena, but it does raise some serious questions for BJP: What went wrong with BJP? How did they lose even after winning most seats? Is there a chance for comeback?
The answer to these questions is complicated but one can find it if they look at the below five reasons given by NRI are 
First: The Smug: The problem really started when the lok sabha election results were out and BJP won the majority. Suddenly BJP as a party started believing that they don’t really need the support of other local parties, which form the NDA alliance, for staying in power. As a result, even the BJP’s state leadership started practicing this self-reliant model in the state elections. Little that they knew that the voter’s mentality for the CM election is very different to the PM one. Maharashtra BJP leadership simply relied on the Modi brand to do it’s magic rather than them focusing on building their own image.
Second: The Disconnect: When a party contests election it is important for them to know the pain points of the voters. They need to know the daily struggles and miseries people are facing in the region. The election campaign should be around remediating those issues and making the life of a common man less painful. With BJP, all of this was missing. Not only did they failed to address the things that mattered for the state residents, but also turned deaf to the cries of local leader and other activists on the ground. Topics like surgical strike, article 370 and triple tallaq were used to justify Fadnavis second term. Needless to mention that there was no direct involvement of the ex CM on any of these matters.
Third: The Farmers: Often neglected and undermined these are the backbone of any nation. BJP Govt. in Maharashtra promised a lot to the poor farmers. There were policies made, on paper, to support them, but the implementation was poorly done. Lack of political will and genuine concerns towards improving the conditions of farmers in the state resulted in numerus suicides by the struggling farmers. Even when one of the BJP’s very own farmer leader and farmer activist tried to point out the flaw very little attention was paid by the Fadnavis Govt. All of this caused anger and distrust for the Govt among the local farmers.
FourthThe Ego: One can argue that even after all this BJP and Shiv Sena alliance was able to achieve enough seats to secure next term in Maharashtra. So, let me reiterate this, it was BJP and Shiv Sena alliance and not just BJP that had the numbers. The BJP leadership failed to understand this, they needed the support of Shiv Sena as much as the latter needed theirs. There were no efforts taken by them to understand the views of Shiv Sena. No efforts to diffuse the situation. There was a lack of respect for their oldest ally and the only thing present was ego. Due to this fake sense of superiority and do not care attitude, BJP leaders took a firm stance against something that should have been dealt with a humble tone.
FifthThe Greed: Finally, there was one thing that not only costed BJP it’s next term in Maharashtra, but also destroyed its reputation. Whole nation saw the act of desperation by BJP leaders, blinded by the urge to have five more years of power. The unprecedented actions taken to regain control in the region seriously backfired. Maharashtra was lost and so was the integrity of this great institution, which was built by the sweat and hard work of great leaders like Atal Bihari Bajpayee. All because of the Greed to conquer Maharashtra throne.
---------------------------------------------------------------------

Saturday, November 16, 2019

विनोद तिवारी, वॉटरटेक २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलच्या दौऱ्यावर

विनोद तिवारी, वॉटरटेक २०१९  मध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलच्या दौऱ्यावर 
दिनांक- 16 नोव्हेंबर २०१९
अर्थव्यवस्था व उद्योग व व्यापार व इस्त्राईल राज्य आर्थिक मंत्रालयाच्या निमंत्रणावरून, सदस्य कायदा व भूजल श्री विनोद तिवारी १८ रोजी होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शन व परिषद वॉटरटेक २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी इस्राईलच्या दौर्‍यावर जात आहेत. इस्राईलमधील तेल अवीव येथे १८ ते २१ नोव्हेंबर हि परिषद होत आहे . विनोद तिवारी  महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या प्रतिनिधीमंडळाचा एक भाग आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री (जलसंपदा), भारत सरकार श्री. गजेंद्र शेखावत हे इस्रायलमधील  वॉटरटेक २०१९ मध्ये साठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
वॉटरटेक २०१९ मध्ये जलसंपतेचे किमान वापर व संरक्षण यासाठी जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रयन्तांचे  भाग आहे  वॉटरटेक २०१९ मध्ये जगभरातील धोरणकर्ते, उद्योग नेते, व्यवसाय अधिकारी, संशोधक आणि राजकीय निर्णय घेणारे एकत्रयेणार आहेत 
वॉटरटेक २०१९ मध्ये कार्यशाळा, गोलमेज आणि सर्व सहभागींच्या बर्‍याच संवादासह पॅनेल चर्चा समाविष्ट करणारे सत्र. २०१७ मध्ये झालेल्या अंतिम डब्ल्यूएटीईसी इस्त्राईल कार्यक्रमात ९०  देशांतील १०,००० हून अधिक अभ्यागतांनी हजेरी लावली होती  . यंदाचे अर्थव्यवस्था व उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून इस्रायलचे राज्य नवीनतम घडामोडी व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी पहिल्यांदाच एक परस्परसंवादी प्रदर्शन क्षेत्र सादर करीत आहे. पाण्याचे डिजिटल व्यवस्थापन ; सोल्युशन्स ३६० डीग्री आणि सर्वमान्य पर्याय यावर प्रस्ताव चर्चेला येणार आहेत . 
श्री तिवारी इस्त्राईलमधील जलसंपता  क्षेत्रातील कल्पकतेची स्थिती समजून घेण्यासाठी क्षेत्रीय भेटी घेणार आहेत.
महाराष्ट्र जल जलसंपत्ती नियामक प्राधिकरण (एमडब्ल्यूआरआरए), महाराष्ट्रातील जल क्षेत्रामधील एक वैधानिक प्राधिकरण जलशक्ती मंत्रालय (जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान) भारत सरकारतर्फे स्थापित करण्यात आली आहे त्यांना राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नियोजनाच्या कामात केलेल्या कामगीरी बद्दल देण्यात आला आहे यामध्ये एमडब्ल्यूआरआर ए राज्य भूजल प्राधिकरण महाराष्ट्र राज्यातील जलसंपत्तीचा शाश्वत, न्याय्य व न्याय्य वापर करण्याच्या उत्तम पद्धतींचा उपयोग करण्यासाठी नियोजन करणारी एकेमव संस्था आहे 
महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) तरतूदी अंतर्गत एमडब्ल्यूआरआर ए राज्य भूजल प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे आणि श्री. तिवारी हे भारतातील पर्यावरण विषयाचे विधी कायदेशीर  अभ्यासक असून राज्याचे भूजल रिसोर्सेस प्राधिकरणाचे प्रभारी सदयस  देखील आहेत.

================
Vinod Tiwari, to  visit  Israel to participate in WATEC 2019
Dated- 16 Nov.2019 
On the invitation of  Ministry of Economy & Industry and Trade and Economic Mission of State of Israel , Mr. Vinod Tiwari, Member Law & Ground Water is visiting Israel to participate in WATEC 2019, an international professional exhibition and conference which will take place on 18-21 November in Tel Aviv, Israel. He is part of delegation of Maharashtra Water Resourses Regulatory Authority. Union Minister for Jalshakti ( Water Resourses), Govt of India Shri. Gajendra Shekhawat is heading Indian delegation for WATEC, 2019 in Israel.

The focus of WATEC 2019 is “Water Stewardship and Innovation - driving global leadership in the responsible planning management, and protection of water”.  WATEC Israel 2019 brings together policy makers, industry leaders, business executives, researchers, and political decision makers from around the world. 

Sessions that incorporate workshops, roundtables and panel discussions with much interaction from all participants. More than 10,000 visitors from 90 countries attended the last WATEC Israel event held in 2017. This year State of Israel thru it's Ministry of Economy & Industry is introducing a first-of-a-kind interactive display area, to showcase the latest developments and technologies: Digital Water; Solutions 3600 and Mainstream. This year we leverage Israel's global position as 'the water start-up nation' to jolt forward water technology for generations to come.

Mr. Tiwari will also be carrying out field visits to understand state of art innovation in Water Resourses Sector in Israel.

Maharashtra Water Resourses Regulatory Authority ( MWRRA), a Statutory authority in Water Sector in Maharashtra is the Winner of First position in National Water Awards, 2018 instituted by Govt of India thru Ministry of Jalshakti ( Water Resourses, River Development & Ganga Rejuvenation ) and planned to introduce best practices in sustainable, juditious & equitable use of Water Resourses in State of Maharashtra.  

MWRRA is also functioning as State Groundwater Authority under the Provisions of Maharashtra Groundwater ( Development & Management ) Act and Mr. Tiwari is also in charge of Ground Water Resourses Authority for the State.
==========================================================

Monday, November 4, 2019

भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीची करु नये माती..-किशोर तिवारी


भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी  महायुतीची करु नये माती..-किशोर तिवारी
किशोर तिवारी, 
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )
+919422108846
kishortiwari@gmail.com

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांची महायुती एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेली. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात युती ने निवडणूक रिंगणात उतरून प्रचंड यश मिळविले. त्या पूर्वी मातोश्री वर झालेल्या सविस्तर बोलणीत ५०:५० चा फॉर्म्युला ठरला होता. 
विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासप प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांतीचे संघटनाप्रमुख सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटना प्रमुख विनायक मेटे हे सर्व महायुतीचे नेते एकत्र निवडणूक प्रचार करीत होते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बांद्रा बीकेसी येथील मैदानात झालेल्या महायुतीच्या विराट सभेत उद्धव जी ठाकरे, रामदास आठवलेंसहीत भाजप शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी एकजुट दाखविली होती. लोकांनी विश्वास दाखवीत युती ला बहुमत दिले. हे यश कांहीं एकट्या भाजपचे नव्हते. शिव सेना व महायुती च्या इतरही घटक पक्षांचे ते संयुक्त यश होते, हे सर्वांना मान्य करावेच लागेल.
तीन दशकांपासून शिवसेना भाजपची युती अभेद्य असल्याचे अभिवचन देत,आमच्या महायुतीला महाराष्ट्राच्या हितासाठी विजयी करा, असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. महायुतीची अभेद्य एकजुट विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडी असा राज्यात सामना रंगला. 
निवडणुकीत २२५ च्या वर जागा मिळतील असा विश्वास ठेवणाऱ्या भाजप ला १०५ आणि शिवसेना ५६ जागा मिळून अपेक्षित यश जरी मिळू शकेल नाही तरी १६१ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवित निवडणूकीचा सामना महायुतीने जिंकला. महायुतीच्या बाजूने जनतेने आपला कौल दिला. महायुतीला १६१ जागांचा स्पष्ट बहुमतांचा जनादेश मिळाला. 
पण हा जनादेश मान्य करुन विजय उत्सव महायुतीच्या नेत्यांना आणि आमदारांना मनापासून आनंद साजरा करता आला नाही. याचे काय कारण असेल याचा विचार केला तर भाजप मधील मुख्यमंत्री पदाची व पूर्ण सत्ता निरंकुश पणें काबीज करून प्रभुत्व गाजविणे ही वृत्ती हे एकमेव कारण समोर येते. गेली पाच वर्षे शिवसेना चे ६३ आमदार भाजपसोबत होते. भाजपचा जोडीदार भागीदार, भाऊ म्हणून राज्यकारभार करण्यात शिवसेना भाजप ला साथ देत होती . मागील विधानसभा निवडणुक २०१४ मध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि नंतर सत्तेत एकत्र आले. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती करुन एकत्र लढले आणि निवडून आल्यावर पुन्हा वेगळे होण्याचे चिन्ह दिसत आहे. सत्तेत ५०:५० चा वाटा लोकसभेच्या निवडणुकीतच ठरला असताना आता मात्र सरळ नाकारणे, सध्या चर्चेला ही तयार नसणे व मुख्यमंत्रीपदासाठी १००% कब्जा सांगणे, हे युती धर्माला अशोभनीय आहेच पण वरुण शिवसेनेला दोष देत मीडिया मध्ये नकारात्मक संदेश देणे, हे फार क्लेशदायक आहे. दि. २४ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. येत्या गुरुवारी दि. ८ नोव्हेंबरला निकाल लागून १५ दिवस पूर्ण होतील. तोपर्यंत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, असे कोणतेही लक्षण दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांचे जणू जहाल द्वंद्व पेटलेले आहे, असे मीडिया मध्ये अंकित करणे, युती धर्माला तिलांजली देणेच आहे ! दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लोभा पोटी भाजपा पार युती धर्म विसरुन गेलेत की आपण एकत्र युती करुन जनतेसमोर मतांचा जोगवा मागायला गेलो होतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महायुतीच्या हाती सत्ता द्या, ही जनतेसमोर केलेली याचना भाजप नेते विसरले आहेत. महाआघाडीपेक्षा महायुती बरी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला. पुन्हा महायुतीला सरकार स्थापन करण्याची संधी दिली.भाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेच्या हव्यासाची एवढी धुंदी आहे की त्यांना शिवसेने चे अथक परिश्रम व जनतेने युती म्हणून दिलेली सुवर्ण संधी दिसत नाही. ५०:५० चा जग जाहीर केलेला सर्व मान्य फॉर्म्युला पाळून सरकार स्थापन करायची मिळालेली संधी, हे नेते वाया घालवित आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी  भाजप च्या हव्यासाचे द्वंद्व एवढे पेटले आहे की तीन दशकांच्या युतीची माती होते की काय अशी शंका येते. सोन्यासारख्या महायुतीची होत असलेली माती पाहून भाजपाच्या या गंभीर विषय पुढे महाराष्ट्राच्या जनतेने कपाळाला हात लावला आहे. महायुतीला पुन्हा सरकार स्थापन करण्याची महाराष्ट्राच्या जनतेने संधी दिली मात्र हे मुठ भर नेते इतके करंटे निपजलेले पाहून त्यांना ज्यांनी मतदान केले त्यांना निश्चित पश्चाताप होत असेल. म्हणूनच राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी खर्‍या अर्थाने वरिष्ठांनी हस्तक्षेप करावा,असे मी आवाहन केले आहे.
युतीला मिळालेले यश एकट्या भाजपचे नाही म्हणुनच सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी अत्यंत सरळ मार्ग म्हणजे ५०:५० चा जग जाहीर सर्व मान्य फॉर्मुला ..! कारण दोन्ही पक्ष महायुतीतून एकत्र निवडणूक लढले, त्यात भाजपला १०५ जागा जिंकता आल्या. त्यामुळे तो मोठा पक्ष ठरत नाही. पूर्वी जो फॉर्म्युला मान्य केला आहे, तो  भाजपला युती धर्म म्हणून मानावाचं लागेल. त्यात कांहीं कमी पणा नाही. एक जुना भरवश्याचा सहकारी पक्ष म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मान त्याचबरोबर मंत्रीमंडळाचे खातेवाटप करताना शिवसेनेला महत्वाची खाती आणि सम समान मंत्रीपदे देण्यात काहीच गैर नाही. किंबहुना त्यात भाजपची प्रतिमा उंचावेल. मात्र ते पाळणे सोडून आता शिवसेनेला मीडिया व जगासमोर खलनायक सिध्द करण्यासाठी शक्ती खर्ची करण्यात धन्यता कसली ? 
निवडणुकीचे वेळेस भाजप जनतेसमोर "आमचं ठरलंय - आमचं ठरलंय" असे ओरडून सांगत होती. या नेत्यांना जनतेचा सवाल आहे तुमचं नक्की काय ठरलंय? निवडणुकी नंतर शब्द फिरवून भांडायचं ठरलंय की एकत्र सरकार चालवायंच ठरलंय? "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटली होती , तो धागा पकडून आता सर्व राज्यभर पुन्हा देवेंद्रचा नारा दिला. शिवसेनेच्या अथक परिश्रमातून महायुतीने निवडणूका लढल्या आणि जिंकल्या. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला कळले की आपण खोदलेल्या खड्ड्यात १०५ वर आऊट झालो आहोत. शिवसेना चे ५६ शिलेदार असल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. ही अडचण ओळखून तरी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे सोडून बंडखोरीची तलवार उपसली. पुन्हा देवेंद्र म्हणून मीडिया मधे द्वंद्व सुरु करून शिवसेनेला खलनायक ठरविले जात आहे. हे  अनाकलनिय व अशोभनीय आहे.  
संजय राऊत शिवसेनेचे योद्धे हाती लेखणीची तलवार आणि जिव्हेतून वाक्बाण भाजपवर चालवू लागले, तर आता यांना आग होत आहे.  दोन्ही कडून घनघोर युद्ध सुरु आहे, असे भासवून ५०:५० च्या सर्व मान्य जग जाहीर फॉर्म्युला वर चादर झाकणे सुरू आहे. मुख्यमंत्रीपद लक्ष्य आहे. मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून अक्षरशः करो या मरो या आवेशात ते लढत आहेत. भाजपाची मुख्यमंत्रीपदाची लालसा व महत्वाकांक्षा आम्हाला मान्य आहे, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेशी जे लढणे सुरु आहे ते लढणे नसून कपटी डाव आहे. 
मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून चालविलेला रडीचा डाव थांबवावा. 
५०:५० फॉर्म्युला मान्य नव्हता तर व पुन्हा द्वंद्व करायचे होते तर निवडणूक प्रचारापूर्वीच घोषित करायच होत. "आमचं ठरलंय!!" हे कोड्यात बोलण्यापेक्षा "काय ठरलं?" ते तेव्हाच निवडणूक प्रचारात भाजपने स्पष्ट करायला पाहिजे होते. मुख्यमंत्रीपदाची आपली महत्वकांक्षा देवेंद्रने "आमचं जमल!!" या घोषणेच्या पदराआड लपू द्यायची नव्हती. "काय ठरलं" ते लेखी घेऊन जनतेसमोर मांडायचे होते. अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजपने वाटून घेण्याचे ठरले होते. आता म्हणायचं "मुख्यमंत्रीपदाबाबत असे ठरलेच नव्हते " हे किती लज्जास्पद आहे. त्यानंतर बहुमतासाठी आपल्या परीने आकडे जमविण्याचा आकड्यांचा खेळ सुरु करणे, सत्तेचा वापर करून अपक्षाना खुट्याशी बांधणे, चक्क भाई ठाकूर शी हात मिळविणे, असुरुद्दिन ओवैसी ला ओवाळणी घालणे व  बहुमताच्या आकड्यांच्या खेळात शिवसेना कशी खलनायक आहे,हे मीडिया मधून जगासमोर नकारात्मक अंकित करणे, हे सर्व युती धर्म सोडून वागणे नव्हे काय ? निवडणूक झाली की शिवसेना भाजपमधला संवाद संपला. ही फार क्लेशदायक बाब आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला की भाजपला या प्रश्नाभोवती महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा वाढत चालला आहे. त्यावर सातारचे राजे उदयनराजे भोसले यांनी शिवसेना भाजपचे ठरत नसेल तर मुख्यमंत्रीपदी रामदास आठवलेंची वर्णी लावून सरकार स्थापनेचा तिढा सोडवावा,अशी मिश्किलपणे मागणी करणे व त्यावर व्यंग करून भाजपने हास्य पसरविणे फार दुःखदायक आहे. तीस वर्षांपूर्वी झालेली युती नाकरण्या सारखे आहे. भाजपला हे शोभणारे नाही. म्हणूनच  मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने जास्त ताणू नये. युतीची माती करु नये. सत्तेची सुवर्ण संधी वाया घालवू नये. ५०:५० चा  फॉर्म्युला मान्य नव्हताच तर लोकसभे पूर्वीच कां जाहीर केले नाही?  शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते तर त्यांनी स्वबळावर स्वतंत्र लढले पाहिजे होते. युतीत शिवसेनेच्या बळावर लढलेल्या निवडणुकीच्या सामन्याचा भाजपा शतकवीर आहे,असे म्हणून सामनावीर आहे, असे भासवून शिवसेनेने आता उपकर्णधारपदावर समाधान मानले पाहिजे, हे ढासून सांगणे म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, अशी वृत्ती कोणी ठेवू नये. पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगत तसा प्रचार केला, त्याला त्यावेळी शिवसेनेने हरकत घेतली नाही, मग आता शिवसेना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी का हरकत घेत आहे? हे म्हणणे साफ चुकीचे आहे. युती धर्म सोडून आहे. जनतेचा विश्वास घात आहे !
शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे युतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन चाललेला पोरखेळ थांबवावा. खरे तर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले असते तर या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे पानिपत झाले असते. महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे त्यांना बहुमत मिळाले आहे, याची जाणिव ठेवून सत्ता स्थापनेची मिळालेली सुवर्णसंधी भाजपने वाया घालवू नये. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले त्यांच्यासमोर सत्ता टाकण्यात कसला आला आहे सच्चेपणा? आता वेळ न दवडता भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठीचे द्वंद्व थांबवावे आणि शिवसेना प्रमुखांना संधी द्यावी हीच महाराष्ट्राची इच्छा आहे....!

- *किशोर तिवारी
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )*
+919422108846
kishortiwari@gmail.com

Sunday, November 3, 2019

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -मुख्यमंत्र्यांनी फोटो -पंचनाम्याची आपली बूथ व वॉर रूमची यंत्रणा कामी लावावी 
दिनांक - ३ नोव्हेंबर  २०१९
दररोज पडत असलेल्या परतीच्या वादळी पाऊसाचा कहर दररोज नवीन नवीन क्षेत्रात पसरत असुन आता खरीपासोबत रबीचे क्षेत्र नापिकीच्या व नुकसानीच्या पट्टयात आले असुन आता संपुर्ण महाराष्ट्राचे -८० लाख हेक्टरमधील ३० हजार कोटीचे पिकांचे नुकसान झाले असुन यापुर्वी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी ६०  लाख हेक्टरमधील  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते आता महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटीची तातडीची मदत देऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसह सर्व खासदार व आमदारांनी नासीडीच्या शेतात जाऊन  शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा  प्रयन्त केल्याबद्दल शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी आभार मानले आहेत . 
दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत  आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या  दमदार पाऊस सुरू झाला होता   ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ  आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ८० टक्के   महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती मात्र मागून आलेल्या  पावसानंतर मराठवाड  पाठोपाठ आता विदर्भातील अनेक  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरीपेक्षा दिंडी ओलांडली आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दररोज होत असलेल्या पाऊसाने तसेच १५ दिवसांपासून ओला झालेला  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे महसुल व कृषी विभाग हतबल असुन आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या ग्रामीण नुकसानग्रस्त क्षेत्रातील पन्ना प्रमुख ,बुथ प्रमुख ,शक्ती प्रमुख ,विधानसभा क्षेत्र विस्तारक ह्या कंत्राटी फौजेसह वॉर रुममधील पगारी नियंत्रक सर्वे टीमचे खोटे रीपोर्ट देणारे कर्मचारी ,निकामी पगारी प्रवक्ते यांना कमी लाऊन ज्या ग्रामीण महाराष्ट्राने भाजप तेल लावलेले उमेद्वाराना आमदार केले व सत्तेचा वाट दाखविली त्याना वाचविण्यासाठी २४ तासात फोटो-पंचनामे करण्याचे आदेश द्यावे  असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे . 
==================================================================

Saturday, November 2, 2019

महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघाने मध्यस्थी करावी -किशोर तिवारी

महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघाने मध्यस्थी करावी -किशोर तिवारी 
दिनांक -३ नोव्हेंबर २०१९
महाराष्ट्राचे शेतकरी व ग्रामीण समस्यांचे राज्यमंत्री दर्जा असलेले व  निवडणुकीपूर्वी शिवेसनेत प्रवेश घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार विदर्भातील शेतकरी आत्महत्या जगासमोर आणुन  १९९६  पासुन सतत सरकारशी भांडणारे चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत याना महाराष्ट्रातील भाजप सेनेतील सत्तासंघर्षात  मध्यस्थी करण्याची जाहीर विनंती केली आहे कारण महायुतीला स्पष्ट सत्ता जनतेनी दिल्यावरही फक्त युतीधर्म व संवाद त्याचबरोबर दिलेला शब्द्ध फिरवल्याच्या कारणाने मागील १० दिवसांनी सुरु असलेला नंगानाच घृणास्पद असुन संघाने आपली भूमिका गंभीरपणे घ्यावी व हा तिढा सोडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी दिले . 
किशोर तिवारी हे हाडाचे संघाचे असुन त्यांचे वडील संघाचे व जनसंघाचे पहिले पूर्णवेळ प्रचारक होते व त्यांनी आणीबाणीत १९ महीने नाशिक जेलात हवा खाली होती मात्र न विचारता सल्ला देण्याचा त्यांचा स्वभाव असुन मागील डिसेंबर २०१८ मध्ये भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी कडे द्या म्हणजे आपल्या नागपूरचा मित्र भारताचा पंतप्रधान होऊ शकते अशी गळ संघाला टाकुन नितीन गडकरींना अडचणीत आणले होते व त्यानंतर भाजपने निर्विवाद सत्ता प्राप्त केल्यांनतर संघाने सत्ता विकेंद्रित करावी व गुजरातच्या जोडीचा एकाधिकारवाद मोडीत काढावा असा अनाहुत सल्ला दिला होता मात्र संघाने मौन धारण केल्यामुळे सबकुछ अमित शहा असे चित्र आज समोर येत आहे यावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे .सध्या  "धृतराष्ट्र आंधळा होता व गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली " असे चित्र असुन फक्त सारेकाही  मीडियाच्या माध्यमावाले  "संजय उवाज "ने टी आर पी वाढवीत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
आज भाजपाचे केंद्रीय नेतृत्व देशातील एकमेव हिदुत्व जपणारी समाजसेवेत सक्रिय असलेली शिवसेने सारख्या पक्षाला दिलेला शब्द्ध पाळत नाही त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही नाक घासुन येतील हा आदेश देणे अत्यन्त अनैतिक आहे व असला राजधर्म आला कोठून असा सवालही किशोर तिवारी व्यक्त केला आहे . 
जर आजही देशात  भाजपचे सर्वात मोठा जनाधार असलेले महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते नितीन गडकरी यांना मध्यस्थीं दिली तर दोन तासात शपधविधी झाला नाही तर पहा असे बोलवचन देत मागील सहा महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात ,जनादेश यात्रेत ,प्रचारात तसेच नेता निवडीमध्ये नितीन गडकरींचा उपमान जनतेला वेदनादायी आहे संघाने आज संपुर्ण भारतात संघटनेची होत असलेली व संघाने भाजपला दिलेले पूर्णवेळ प्रचारक यांचा झळ व सत्यासाठी भांडणाऱ्यांची  वाताहत ,पगारी व काँग्रेस संस्कृतीच्या नेत्यांचा हैदोस ,भरष्ट्राचाराच्या प्रचंड तक्रारी त्यातच अनियंत्रित एकाधिकारदाव मोडीत काढण्यासाठी यावेळी आदेश देऊन सत्तासूत्रे व सन्मान  कोणत्याही अटी न घालता शिवसेनेला द्यावा अशी विनंती सुद्धा किशोर तिवारी यांनी केली आहे . 
==========================================================================






































Tuesday, October 29, 2019

महाराष्ट्रात २० लाख हेक्टर वरील सोयाबीन धान कापुस व तुरीचे प्रचंड नुकसान -विमा कंपन्या ,कृषी व महसुल विभाग दिवाळीच्या तर लोकप्रतिनिधी सोय लावण्यात गुंतले --विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन

महाराष्ट्रात २० लाख हेक्टर वरील सोयाबीन धान कापुस व तुरीचे प्रचंड नुकसान -विमा कंपन्या ,कृषी व महसुल विभाग दिवाळीच्या तर लोकप्रतिनिधी सोय लावण्यात गुंतले --विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन 
दिनांक - ३० ऑक्टोबर २०१९
यावर्षी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी २० लाख हेक्टरमधील  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले असुन मात्र आठवाड्याभरापासून शेतकऱ्यांचा एकही फोन विमा कंपन्या ,कृषी व महसूल विभाग उचलत नसुन याउलट ४८ तासात नुकसानीची सुचना न देणाऱ्यास विमा मिळणार नाही असा फतवा पाठविण्यात येत आहे . कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी आचार संहिते व दिवाळीच्या सुट्टीचे कारण देत असुन एकही विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी उपलब्धच नसुन एकही तालुका वा जिल्हास्तरीय कार्यालयात मागील आठ दिवसापासून काळा कुत्राही नसल्याचा अनुभव चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी मदतकेंद्र उघडुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करावी व विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे 
दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत  आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या  दमदार पाऊस सुरू होता  ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ  आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ११६  महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसानंतर मराठवाड  पाठोपाठ आता विदर्भातील अनेक  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र नवनिर्वाचित आमदार व त्यांचे चमचे आपली सोया लावण्यात गुंतले असल्याने परिस्थीती बिकट झाली आहे त्यातच विमा कंपन्यांची दलाली करणारे सनदी अधिकारी विदेशात दिवाळी साजरी करीत असल्याच्या बातम्या खबरी देत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 
मागील आठ दिवसांपासून ओला झालेला  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे मूळ जागेवरून घरी उन्ह दाखविण्यासाठी आणला आता  विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी कृषी विभागांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे चुकीचे पंचनामे करणार आहेत त्यामुळे अवकाळी पाऊसाने झाडपलेल्या सर्व जिल्यात विमा कंपन्यांनी सरसकट समसमान नुकसान भरपाई द्यावी यासाठी  शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे . 
==================================================================

Sunday, October 27, 2019

Massive Mandate to BJP-SS in Farm-Crisis region of Maharashtra

Massive Mandate to BJP-SS in Farm-Crisis region of Maharashtra
dated-28 October 20119 
Maharashtra agrarian crisis-prone farmers suicide affected rural region vidarbha and  maharathwada  has given  massive victory  to ruling BJP-SS alliance as detailed analysis of the election results of the Maharashtra Legislative Assembly shows that our of 80 seats of this region BJP-SS has got 52 seats from rural part of region where as all seats in urban areas of same region BJP-SS has lost most of seats including top ranking ministers like pankanja munde  ,jaydutta shirisagar,arjun khot and agri. minister dr.anil bonde.

The main reason Vidarbha and Marathwada massive victory BJP-SS coalition government in 14 farm suicide-affected districts is due ground work done Vasantrao Naik Sheti Swalambhan Mission VNSSM due to  the tireless follow-up of Mission President Kishore Tiwari for the last four and  half years, the Mission has made efforts to get benefit of many welfare schemes for the farmers and rural life of the Government. VNSSM introduced food security ,health security and fresh credit to distressed and dying farmers as other core issues where taken up state  that are related to agriculture and the rural economy-related consulting Kishor Tiwari.
During the last four  and a half years, the farmers' mission has been pursued independently  to overcome the obstacles that the coalition government has for the welfare of the farmers and the rural population. Therefore, loan waiver, overcoming the crush of nationalized banks in providing farm credit, benefits of health related schemes, efforts to get minimum support  prices, administration efforts to be public oriented, success in implementing people-oriented programs such as "government at your doorstep" in nearly 6000 villages . The mission was successful in giving  the benefit of many public utility schemes to dying farmers , and its success is now evident from the results of the Assembly elections. in the Yavatmal district of the mission field, bjp-ss has been able to maintain 6 out of 7seats. Similarly, Mahayuti has achieved success in 3 seats in Akola district, 2 seats in Buldana district, 3 seats in Washim district, 3 in Wardha district . with the exception of those in western Vidarbha. A positive victory is seen in the field with the earnest efforts of the Mission in marathavada too , Tiwari expressed gratitude to the farmers and the rural people, for the massive support in the 14 districts of the VNSSM of the Farmer Mission.

Friday, October 25, 2019

काँग्रेस -राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठींबा एक मृगजळ -भाजपने मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास सोडावा -किशोर तिवारी

काँग्रेस -राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठींबा एक मृगजळ -भाजपने मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास सोडावा -किशोर तिवारी 
दिनांक -२६ ऑक्टोबर २०१९

महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांची जगात ओळख करण्यात २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस -राष्ट्रवादीचे सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असुन त्याकाळचे सरकारचे कृषिमंत्री विदर्भ -मराठवाड्यातील ३४ हजारावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे शिल्पकार असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला दिलेला विनाशर्त पाठींबा एक मृगजळ असुन महायुती एकदाची तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . तसेच सध्या १० किलो कापुस फक्त ३७० रुपयात विकल्या जात असतांना कलम ३७० च्या गप्पा बंद कराव्या कारण आता भाजप बंडखोरांमुळे शिवसेनेच्या ३० जागा पाडण्यात यश आल्यामुळे जागांचा खेळ करून मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरण्यात अर्थ नसुन आता खऱ्याअर्थाने शिवसेनेने मोठ्या भावाची समाजदारीची भूमिका घेतल्यामुळे फक्त जागा जास्त याचा कांगावा न करता व ''सब जगह केवल  भारत '' ही आताताई भुमिका सोडत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राची किमान द्यावी व आदर्श निर्माण करावा असे  आवाहन किशोर तिवारी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना केली आहे . 
भाजपामधील गटबाजी व विकासाचा मॉडेल नागपूर सारख्या शहरात नामंजूर झाला आहे विदर्भात भाजपच्या पायाखालची जमीन अनेक जिल्ह्यात खरसली आहे सगळे नेते खुर्चीच्या मागे लागले आहेत व एकमेकांचे पाय ओढत आहेत अशा परीस्थिती भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठींबा दयावा व आपले घर दुरुस्त करावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे सर्वे व वॉर रूमचा तमाशा करणारे पगारी जनाधार शुन्य सल्लागारांना हाकलुन तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्या भाजप निर्माण करावा कारण ही निवडणुक ग्रामीण महाराष्ट्रातील जातीय समीकरणाच्या भरोशावर राजकारण करण्याच्या धोरणावर धोक्याची घंटा आहे ,असा सावधगिरीचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी दिला आहे . 

महाराष्ट्रात पुन्हा शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास प्रगट केले असतांना आतां शेतकरी आत्महत्यांनी जगाचे लक्ष वेधीत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा केंद्रीय सरकारवर लागल्या असुन याचे कारण  गेल्या हंगामात कापसाचे कमी उत्पादन होऊनही जागतिक मंदी आणि गेल्या हंगामातील शिल्लक साठा, सरकीच्या दरातील घसरण, वाढती आयात अशा विविध कारणांमुळे यंदाच्या हंगामात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी  असुन हा बाजारभाव फरक प्रति क्विंटल हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांनी कमी असल्यामुळे तसेच आवक वाढल्यावर सरकीची भाव पडल्याने सध्या दलालांनी कापसाची खरेदी जेमतेम ३५०० ते ४००० प्रति क्विं सुरु केली आहे तरी कापूस उत्पादक  शेतकऱ्यांना वाचविण्याकरिता सरकारने कोरडवाहू  शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्न्नाला लक्ष देण्याकरीता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे पाहीजे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचा दावा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा लढणारे देणारे शिवसेना नेते  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

सध्या १० किलो कापुस फक्त ३७० रुपयात विकल्या जात असतांना कलम ३७० चा मुद्दा गौण झाला आहे कारण  देशातील सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सरासरी ४४ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत आली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचे शेती अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. पण, कापूस लागवड बहुतांशी कोरडवाहू आहे. सुमारे १० टक्के क्षेत्रावरच पूर्वहंगामी कापूस लागवड असते. निसर्गावरच कापूस हंगाम अवलंबून आहे. गेली चार ते पाच वर्षे कापूस उत्पादकांसाठी खडतर गेली. अलीकडच्या काळात गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले त्यातच यावर्षी अतिपाऊसाने कापसाचे पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे मागीलवर्षीच राज्यात २०१८-१९ च्या हंगामात ४२.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली होती. उत्पादन केवळ ७१ लाख गाठी झाले. उत्पादकता २८३.७३ किलोग्रॅम प्रतिहेक्टर इतकी कमी आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालात या अल्प उत्पादकतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे मात्र भाजपचा एकही नेता या विषयावर बोलत नाही याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
====================================================================

शेतकरी स्वावलंबन मिशन च्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेले यश : शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !-- किशोर तिवारी

शेतकरी स्वावलंबन मिशन च्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेले यश :
शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच !--  किशोर तिवारी 

दि. २५ ऑक्टोबर २०१९  --            

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाचे सविस्तर विश्लेषण केले असता विदर्भ व मराठवाडयातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्वातील युती सरकारने स्थापन केलेल्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ब-यापैकी यश मिळाले असल्याचे स्पष्ट होत आहे.  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या विगत साडेचार वर्षाच्या अथक पाठपुराव्याने शासनाच्या शेतकरी व ग्रामीण जनजीवनासाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनने जे प्रयत्न केलेत़ , त्यामुळे मिशनच्या कार्यक्षेत्रातील  पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाण्यासह वर्धा जिल्हयातील एकूण ३४ विधानसभेच्या जागांपैकी महायुतीला २२ जागी यश प्राप्त झाले असून मिशनच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडयातील सर्व आठही जिहयांत एकूण ४६ जागांपैकी २९ जागी महायुतीला विजय प्राप्त झाल्याने मिशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विधानसभेच्या एकूण ८० जागांपैकी ५१ जागांवर विजय प्राप्त झाला असून  शेतकरी व ग्रामीण जनतेचा बहुमताचा कौल महायुतीचे बाजूनेच असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था संबंधी सल्लागार किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. 
शेतकरी मिशनने स्वतंत्रपणे पाठपुरावा करुन शेतकरी व ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी युती सरकारने केलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ  मिळवून देण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षात अथक प्रयत्न केलेत.  त्यामुळे कर्जमाफी, शेती पत पुरवठा करण्यात राष्ट्रीयकृत बँकाची कुचराईवर मात, आरोग्यासंबंधी असलेल्या योजनांचा लाभ, किमानभूत शेतमालाच्या किंमती मिळवून देण्यात केलेले प्रयत्न, प्रशासन लोकाभिमुख व्हावेत यासाठी केलेले प्रयत्न, ग्रामीण जनजीवनात प्रत्यक्ष मिसळून घेण्यात आलेले “सरकार आपल्या दारी” यासारखे लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात मिळालेले यश इत्यादीमुळे युती सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा लाभ मिळवून देण्यात मिशनला यश प्राप्त झाले आणि त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता स्पष्ट दिसत आहे.  मिशनच्या कार्यक्षेत्रातील यवतमाळ जिल्हयात महायुतीला ७ पैकी ६ जागा राखण्यात यश मिळाले आहे.  त्याचप्रमाणे अकोला जिल्हयातील ५ पैकी ५ जागा, बुलडाणा जिल्हयातील ७ पैकी ५ जागा, वाशिम जिल्हयातील ३ पैकी २ जागा, वर्धा जिल्हयातील ४ पैकी ३ जागांवर महायुतीला यश प्राप्त झाले असून फक्त अमरावती जिल्हयात ८ पैकी १ जागा मिळाल्याने तो अपवाद वगळता पश्चिम विदर्भातील शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त क्षेत्रात मिशनच्या अथक प्रयत्नाने एक सकारात्मक विजय दिसून येत असून ३४ पैकी २२ जागा जनतेने निवडून दिल्या आहेत.  त्याचप्रमाणे मराठवाडयातील ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य जनतेने दिलेल्या भरघोस पाठींब्याने औरंगाबाद जिल्हयातील सर्व ९ पैकी ९ जागा, उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ४ पैकी ४ जागा, नांदेड जिल्हयातील ९ पैकी ४ जागा, हिंगोली जिल्हयातील ३ पैकी २ जागा, जालना जिहयातील ५ पैकी ३ जागा, बीड जिल्हयातील ६ पैकी २ जागा, परभणी जिल्हयातील ४ पैकी ३ जागा, लातूर जिल्हयातील ६ पैकी २ जागा महायुतीला मिळून  एकूण ४६ जागांपैकी २९ जागी विजय प्राप्त होऊन यश मिळाले आहे.  अशाप्रकारे शेतकरी मिशनच्या १४ जिल्हयातील विस्तृत कार्यक्षेत्रात ८० पैकी ५१ विधानसभा क्षेत्रात महायुतीला यश प्राप्त झाल्याने नव्या सरकारच्या स्थापनेचा महायुतीचा मार्ग मोकळा झाला  असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट करुन शेतकरी व ग्रामीण जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.



शेतकरी मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला मिळालेल्या यशाचे विवरण खालीलप्रमाणे       
*पश्चिम  विदर्भ* 
(६ जिल्हे : अमरावती विभाग व वर्धा जिल्हा )
एकूण ३४ जागा पैकी २२ जागी विजय ...! 
*यवतमाळ * 
७ पैकी ६ जागी विजय )
दिग्रस - संजय राठोड - शिवसेना
यवतमाळ - मदन येरावार - भाजप
आर्णी - डॉ संदिप धूरवे - भाजप
राळेगाव - डॉ. प्रा. अशोक उईके - भाजप
वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार - भाजप 
उमरखेड - नामदेवराव ससाणे – भाजप

*अकोला*
(५ पैकी सर्व ५ जागी विजय)
अकोट - प्रकाश भारसाकळेभाजप
अकोला पश्चिम - गोवर्धन शर्माभाजप
अकोला पूर्व - रणधीर सावरकरभाजप
बाळापूर - नितीन टाले - देशमुख-शिवसेना
मूर्तिजापूर - हरीश पिंपळेभाजप

*बुलडाणा*
७ पैकी ५ जागी विजय )
खामगाव - आकाश फुंडकरभाजप
चिखली - श्वेता महालेभाजप
जळगाव जामोद - संजय कुटेभाजप
बुलडाणा - संजय गायकवाडशिवसेना
मेहकर - संजय रायमुलकरशिवसेना

*वाशिम*
३ पैकी २ जागी विजय )
कारंजा - राजेंद्र पाटनीभाजप
वाशिम - लखन मलिकभाजप

*अमरावती*
८ पैकी १ जागी विजय )
धामणगाव रेल्वे - प्रताप अडसडभाजप
*वर्धा*
४ पैकी ३ जागी विजय )
आर्वी - दादाराव केचेभाजप
हिंगणघाट -समीर कुनावारभाजप
वर्धा - डॉ. पंकज भोयरभाजप

*मराठवाडा* ( सर्व - ८ जिल्हे  )
एकूण ४६ जागा पैकी २९ जागी विजय 
*औरंगाबाद*
(९ पैकी सर्व ९ जागी विजय)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाटशिवसेना
औरंगाबाद पूर्व - अतुल सावेभाजप
औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वालशिवसेना
कन्नड - उदयसिंह राजपूतशिवसेना
गंगापूर - प्रशांत बंबभाजप
पैठण - संदीपान भुमरेशिवसेना
फुलंब्री - हरीभाऊ बागडेभाजप
वैजापूर - रमेश बोरनारेशिवसेना
सिल्लोड - अब्दुल सत्तारशिवसेना

*हिंगोली*
३ पैकी २ जागी विजय )
कळमनुरी - संतोष बांगरशिवसेना
हिंगोली - तानाजी मुटकुळेभाजप

*परभणी*
४ पैकी २ जागी विजय )
जिंतूर - मेघना बोर्डिकरभाजप
परभणी - डॉ. राहुल पाटीलशिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे- रासप

*जालना*
५ पैकी ३ जागी विजय )
परतूर - बबनराव लोणीकरभाजप
बदनापूर - नारायण कुचेभाजप
भोकरदन - संतोष दानवेभाजप
*उस्मानाबाद*
(४ पैकी सर्व ४ जागी विजय)
उमरगा - ज्ञानराज चौगुलेशिवसेना
तुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटीलभाजप
उस्मानाबाद - कैलास पाटीलशिवसेना
परांडा - तानाजी सावंतशिवसेना

*नांदेड*
९ पैकी ४ जागी विजय )
किनवट - भिमराव केरामभाजप
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकरशिवसेना
नायगाव - राजेश पवारभाजप
मुखेड - डॉ. तुषार राठोडभाजप

*लातूर*
६ पैकी २ जागी विजय )
औसा - अभिमन्यू पवारभाजप
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकरभाजप

*बीड*
६ पैकी २ जागी विजय )
गेवराई - लक्ष्मण पवारभाजप
केज - नमिता मुंदडाभाजप
                                अशाप्रकारे शेतकरी स्वावलंबन मिशनच्या कार्यक्षेत्रात महायुतीला ८० पैकी  ५१ विधानसभा क्षेत्रात यश प्राप्त झाल्याने शेतकरी व ग्रामीण वैफल्यग्रस्त भागात महायुती  आपली आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.   ग्रामीण जनतेने सरकारच्या  प्रामाणिक प्रयत्नांची ही पावती दिली असल्याचे मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.   
-----------------
                                                          (  किशोर  तिवारी  )
                                                          अध्यक्ष, व.ना. शेतकरी स्वावलंबन मिशन
                                           मो. ९४२२१०८८४६ – kishortiwari@gmail.com