Thursday, April 24, 2014

हवामान खात्याचे एल-निनोचा प्रभाव मुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी भाकीत -महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना वाचवा -विदर्भ जनांदोलन समिती


हवामान खात्याचे  एल-निनोचा  प्रभाव मुळे  यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी  भाकीत -महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना वाचवा -विदर्भ जनांदोलन समिती 
विदर्भ -२५ एप्रिल २०१४
मागील वर्षी एल-निनो या पर्यावरण  बदलाचा घटकाचा प्रभाव जोरदार फटका खरीप व रबी पिके पूर्णपणे गमावलेल्या महाराष्ट्राच्या ५० लाख कोरडवाहू शेतकर्यांना या वर्षीसुद्धा एल-निनो या पर्यावरण  बदलाचा घटकाचा प्रभाव जोरदार फटका बसणार असे भाकीत हवामान खात्याने गुरुवारी वर्तविलेल्या नंतर भारत व महाराष्ट्र सरकारच्या आपदा निवारण विभागाने या विषयी शेतकर्यांना हजारो कोटीच्या आर्थिक हानी पासून वाचविण्यासाठी पर्यंत सुरु करावी अशी मागणी विदर्भाच्या शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे 
महाराष्ट्राच्या शेतकर्यांनी यंदाच्या मान्सूनच्या स्थितीचा मोठा मुकाबला करण्यास सज्ज राहावे लागणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी वर्तविलेल्या आपल्या पहिल्या अंदाजात यंदाचा मान्सून सरासरीच्या ९५ टक्क्यांच्या खालील राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यात अर्थातच उणे वा अधिक ५ टक्क्यांची चूकभूल राहू शकते. हा विभाग आपला दुसरा अंदाज जूनमध्ये वर्तविणार असला तरी पावसाअभावी देशाच्या काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. हा अंदाच कर्जबाजारी  शेतकर्यांना चिंतेचा विषय असून मागील वर्षी २० जुलै ते २५ ऑगस्ट ला झालेल्या अतिवष्टीमुळे  विदर्भात खरीफ पिकांचे  १० हजर कोटीचे नुकसान झाले होते व सरकारने ३ हजार कोटीची मदतसुद्धा केली होती नंतर या वर्षी २५ फेबुवारी ते २२ मार्चपर्यंत अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना आपले सर्व रबीचे पीके सुद्धा गमवावी लागली हा सर्व एल-निनो या पर्यावरण  बदलाचा घटकाचा प्रभावमुळे होत असल्याचे सप्ष्ट झाले आहे अशा गंभीर संकटावर भारत व महाराष्ट्र सरकारच्या आपदा निवारण विभागाने शेतकर्यांना  विशासात घेत उपाय योजना करावी अशी मागणी सुद्धा  किशोर तिवारी यांनी केली आहे
या विभागाच्या मते यावर्षी मान्सून सरासरी खाली पडण्याची शक्यता ३५ टक्के आहे. सरासरीइतपत पडण्याची शक्यता ३३ टक्के तर देशाच्या काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता २३ टक्के आहे. हवामानशास्त्र विभागाने विकसित केलेल्या मापदंडानुसार ९७ ते १0४ टक्के पाऊस सरासरीइतपत मानण्यात येतो. १0५ ते ११0 टक्के पाऊस सरासरीच्या अधिक तर ११0 टक्क्यांपेक्षा पडणारा पाऊस हा अतवृष्टीमध्ये गणल्या जातो. ९0 ते ९५ टक्के पडणारा पाऊस सरासरीपेक्षा कमी आणि त्यापेक्षाही कमी पडणारा पाऊस देशात दुष्काळी स्थिती निर्माण करणारा असतो आणी याचा फटका विदर्भ व मराठवाडा विभागाला जोरदार पडणार आहे तरी सरकारने तत्काळ पाऊले उचलावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
यंदाच्या मान्सूनवर एल-निनो या घटकाचा प्रभाव राहण्याची अधिक शक्यता आहे. प्रशांत महासागरातून वाहणार्‍या गरम पाण्याच्या प्रवाहाचा भारतीय मान्सूनवर नेहमीच प्रभाव पडत आला आहे. २00९ मध्ये त्यामुळे देशात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदा एन-निनोचा हा प्रभाव अधिक उग्र राहणार असून, दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यास नवीन सरकारसमोर महागाईचे सर्वात मोठे संकट राहणार आहे. सत्तेत आल्यास सर्वच राजकीय पक्षांनी आपण महागाई कमी करू , असे आश्‍वासन दिले असले तरी सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत संभाव्य दुष्काळी स्थितीकडे देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही मात्र आता  निवडणुकीच्या रणधुमाळी संपली व निकालाला २० दिवसाच्या अवधी तरी सरकारने ,नोकरशाहीने व शेतकरी मित्र म्हणून मत  मागणार्यांनी  या विषयावर एक  होऊन तोडगा काढावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
 

1 comment:

सतेज said...

Satej Khadse · Nagpur University
PEOPLE OF VIDARBHA , PLEASE VOTE THE PERSON WHO WANT VIDARBHA - A SEPARATE STATE""
विदर्भा च्या नालायक नेट्यांनो, अaतaपर्यंन्त झोपले होता का? 1960 साली विदर्भ महाराष्ट्र मधे विलीन झाला आणि 10-15 वर्षे सत्ता विदर्भ नेत्यांच्या हाती होती,, काननामवर, वसंत नाईक, तिर्पूड़े, वानखेड़े, टिड़के, जांबुवंत, वसंत साठे, साल्वे, पुरोहित, गडकरी , मुत्तेमवार आणि बरेच नेते ,, या नेते मंडली नी काय केले, मला अठवाते जामबुवंत नी इतवारी शाहिद चौकत विदर्भा चण्डिका स्थापन केली होती आणि फुसकी विदर्भाची घोषणा केली होती , त्याचे काय झाले >>> विदर्भाच्या नेट्यांना फक्त पच्मिम महाराष्ट्र नेट्यांना खुश करायचे आहे ,, विदर्भ कारिता यांनी काहीच केले नाही, कारखाने नाहीत , सिंचन नही, रोजगार नाही,, मिहान चे उदाहरण घ्या, विदर्भाच्या बाहेर जर हा मिहान असता तर आता पर्यन्त पूर्ण झाला असता, परंतु येथील नालायक नेते मंडली ने काहीच केले नही ,, आता तेलंगाना मुळे जाग आली,,सर्व नेते मतलबी आहेत, पैसा कमवीने फक्त उधदीस्ट आहे ,,,
the leadership of vidarbha is useless,, starting from vasant naik, kannamwar, wankhede, tidke, tirpude, vasant sathe, nkp salve, purohit, mighe , jambuwant dhote, and many useless leaders of vidarbha>> what they have done for vidarbha>>nil... when I was in c p & berar school in 1967,68,69 that time , jambuwant has installed "vidarbha chandika in shahid chouk itawari" and promised to form vidarbha> then he has join congress for money and post and now again >>> NO USE , THE LEADERSHIP AND PEOPLE OF VIDARBHA ARE LIKE CHAKKE (6), & THEY WILL NOT DO LIKE TALANGANA PEOPLE/LEADERS. ,, THE LEADERS OF VIDARBHA ARE CLEANING THE A... OF WESTERN MAHARASHTRA LEADERS.... I DOn't THINK , VIDARBHA WILL BE A SUCCESS WITH THESE TYPE OF LEADERS.