Monday, April 21, 2025

शेतकरी विधवा गीता चिंचोलकर हिच्या लक्ष्मीच्या लग्नात समाजाकडून मदतीच्या वर्षाव

शेतकरी विधवा गीता चिंचोलकर हिच्या लक्ष्मीच्या लग्नात समाजाकडून मदतीच्या वर्षाव
दिनांक २१ एप्रिल २०२५
१९९६ पासून विदर्भात दररोज ८ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत, एकीकडे राजकीय पक्ष कृषी संकटाचे राजकारण करून सत्तेत येत आहेत मात्र कृषी संकटावर तोडगा निघत नसून आजही कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आत्महत्या अशाच चालू आहेत मात्र या कृषी संकटाचे जे हजारो शेतकरी  बळी पडले आहेत त्यांच्या विधवा व कुटुंबातील सदस्यांच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत मात्र ही कुटुंबे आज उपासमारी व देशोधडीला लागले आहेत. 

अशीच या कृषी संकटामुळे कोपामांडवी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथील श्रावण चिंचोलकर यांनी ऑक्टोबर २००६ मध्ये आत्महत्या केली होती, त्यावेळी श्रावण चिंचोलकर याची १७ वर्षाची विधवा गीता चिंचोलकर आपल्या ६ महिन्याची कोवळी लेकरू लक्ष्मी सोबत विधवा व अनाथ झाली व काल २० एप्रिल रोजी  हिच्या मुलीच्या म्हणजे आमच्या लक्ष्मी च्या लग्नाला कोपमांडवी परिसरातील सर्वच खेड्यातून प्रत्येक कुटुंबातील मंडळी उपस्थीत होती व समाजातील प्रत्येक स्तरातून लक्ष्मीला प्रेमाचा व मदतीचा वर्षाव झाला व लक्ष्मी चे लग्न एक अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम म्हणून सध्या या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात चर्चेचा विषय ठरत आहे, मात्र संवेदन शून्य प्रशासन मात्र नियोजन व निधी उपलब्ध नसल्याने मदत देता येत नाही म्हणून बघ्याची भूमिकेत होते.

मराठवाकडी येथील तरुण शेतकरी कुणाल वाघाडे यांनी एकही पैसा व वस्तू न घेता लक्ष्मी सोबत लग्नाचा प्रस्ताव दिला व लक्ष्मी पुढे शिकविण्याची तयारी दाखवली व हे लग्न अशा प्रकारे आदर्श रित्या ठरले व  संपूर्ण सहयोग व सहभागाने संपन्न झाले.

शेतकरी विधवा गीता चिंचोलकर यांनी संघर्ष करून आपला संसार रोज मजूरी करून रेटला... आम्ही प्रत्येक अडचणीत सतत गीता सोबत होते... लग्नाच्या वेळी कोपा मांडवी येथील सर्व गावकरी  सहभागी झाले होते व महिलांनी आपल्या मुली सारखा प्रेम दाखवित असल्याचे चित्र दिसले.... नागपूर येथील खुशरू पोचा सह व विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे ,आमदार मदन येरावार अजय संचेती ग्रँड मराठा फाउंडेशन ,खेतानी फाउंडेशन, जगदंबा मंदिर संस्थान, लायका गुझदार, चंद्रा नायक, सतीश झाझरिया, सुविधी सुराणा, रोहित पाटील, आमदार संजय देरकर, आमदार हेमंत पाटील , नितीन सरदार यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींनी तसेच 

समाजातील विविध स्तरावरून गीता चिंचोलकर हिला मदतीचा हात पुढे आला असल्यामुळे हा एक अविस्मरणीय लग्न सोहळा झाला आहे... यावेळी स्मिता तिवारी, अंकित नैताम व शेतकरी विधवा साठी नेहमी मदतीचा हात देणारे किशोर तिवारी उपस्थित होते.. लक्ष्मी च्या लग्नाला परिसरातील सर्वच खेड्यातून मदत करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर समोर आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
यावर्षी नापिकीमुळे व मुलीचे शिक्षण व सावकारी तसेच बचत गटाचे मायक्रो फायनान्स कर्ज यामुळे गीता चिंचोलकर अडचणीत आहे तिला समाजातील सुजाण दानशूरानी तिच्या खात्यात फुल नाही तर फुलाची पाकळी अशी मदत करावी 
तिचा बँक खाते 
गीता श्रावण चिंचोलकर 
Geeta Shrawan Chincholkar
Bank of Maharashtra Padharkawad
A/C 60167144718
IFSC code
MAHBOOOO262
------
आपला नम्र 
किशोर तिवारी 
संपर्क - 9422108846

Saturday, February 1, 2025

विदर्भाचे कृषीसंकट कमी करणारा अर्थ संकल्प - शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी

 विदर्भाचे कृषीसंकट कमी करणारा अर्थ संकल्प - शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी 

दिनांक - १ फेब्रुवारी २०२५

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे केंद्र असलेल्या विदर्भातील कापूस उत्पादक प्रदेशातील कृषी संकटांचा मागोवा घेणारे आणि २००१ पासून दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद करणारे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या भारतीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे ज्यामध्ये लागवडी खर्चाचे नियमन,उत्पादकता वाढविण्यासाठी कापूस अभियानाची सुरुवात व  तेलबियांना प्रोत्साहन देणे या मुख्य मुद्द्यांवर मिशन मोड मध्ये कार्यक्रम सादर करण्यात आला आहे .  

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 'धन ध्यान कृषी' योजनेची घोषणा केली  यामुळे देशातील १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत होईल आणि 'प्रधानमंत्री धन ध्यान कृषी योजना' कमी उत्पादन, आधुनिक पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेल्या १०० जिल्ह्यांना समाविष्ट करेल.तरुण, महिला आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण समृद्धी, लवचिकता कार्यक्रम सुरू करण्याच्या आणि तूर, उडीद आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी ६ वर्षांचा कार्यक्रम सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी स्वागत केले: अर्थमंत्री सीतारमण. भाजीपाला, फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि किफायतशीर भाव देण्यासाठी व्यापक कार्यक्रम हा चांगला पाऊल आहे आणि कापूस उत्पादनाला चालना देण्यासाठी ५ वर्षांच्या अभियानासोबत उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचे प्रस्तावित राष्ट्रीय अभियान सुरू केले जाईल,असे तिवारी म्हणाले.

किसान क्रेडिट कार्डसाठी व्याज सवलत योजनेची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी स्वागत केले, यामुळे कर्ज चक्र पुनर्संचयित होईल. पीक विविधीकरण आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करणे आणि पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवणूक वाढवणे आणि सिंचन सुविधा सुधारणे ही काळाची गरज आहे,असे तिवारी म्हणाले.

किशोर तिवारी यांनी कर आकारणी, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, वीज आणि नियामक सुधारणा या ६ क्षेत्रांमध्ये सुधारणा सुरू करण्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही अशी घोषणा केल्याने करदात्यांना विशेषतः मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल  असे तिवारी म्हणाले.

========================

Friday, December 27, 2024

विदर्भातील कृषी संकटाची दखल घेउन दिलासा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग -किशोर तिवारी

विदर्भातील कृषी संकटाची दखल घेउन दिलासा देणारे  पहिले भारतीय पंतप्रधान  डॉ.मनमोहन सिंग -किशोर तिवारी 

दिनांक - २७ डिसेंबर २०२४

२००४ मध्ये तत्कालीन भारत सरकारने स्वस्त कापसाच्या आयाती परवानगी दिल्यामुळे कापसाचे दार भारतात प्रचंड प्रमाणात पडले व त्याच वर्षी बोण्डअळी ने अख्खे कापसाचे पीक नष्ट केल्यामुळे ऑगस्ट २००४ पासुन    पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी अचानक उद्विग्न झाले व पश्चिम विदर्भात  कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रचंड प्रमाणात  सुरुवात झाली ,दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या राष्ट्रीय स्तरावर येऊ लागल्या तेंव्हा  जुलै  २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पश्चिम विदर्भ कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना पश्चिम विदर्भात भेट देण्यास सांगितले व त्यांनी भेट दिल्यावर आपला अहवाल दिला त्यांनी गंभीर दखल घेत योजना आगोगाची संपूर्ण टीम २००६च्या सुरवातीला पाठविली व उपाय योजनेसाठी संपूर्ण कार्यक्रम आखला त्यानंतर ३० जून २००६ ला  यवतमाळ आणि वर्धा या सर्वात जास्त कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त भेट देणारे  भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांनी शेती संकटाच्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा केली आणि नंतर १ जुले २००६ ला नागपूर येथील राजभवनात ४४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ऐतिहासिक 'विदर्भ मदत पॅकेज' जाहीर केले होते . परंतु त्यावेळच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या  भ्रष्टाचारामुळे ते पूर्णपणे अयशस्वी झाले होते.मात्र   आता इतिहासात  विदर्भातील कृषी संकटाची दखल घेणारे आणि त्यावर उपाययोजना करणारे पहिले भारतीय पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग सतत आठवणीत राहतील अशी श्रद्धांजली देत  विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर आणणारे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी  यांनी आज स्व. डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणीला उजाळा दिला 

पहिल्या राष्ट्रीय कृषी कर्जमाफीचे जनक  डॉ. मनमोहन सिंग 

२००६मध्ये जेव्हा राज्य सरकार विदर्भातील मदत पॅकेज लागू करण्यात अपयशी ठरले ज्यामुळे मोठा सिंचन घोटाळा झाला, तेव्हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे मोठे आव्हान होते. स्व. डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय मार्च २००८ मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर  कृषी  कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला व २००९ मध्ये केंद्रात शेतकऱ्यांनी डॉ मनमोहन सिंग यांचे सरकार निवडून दिले  विदर्भातील कापूस उत्पादक  शेतकरी नेहमीच त्यांचे ऋणी राहतील ,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रभूस विनंती   किशोर तिवारी यांनी केली 

====================================================

Wednesday, October 9, 2024

केळापुर-आर्णी विधान सभा मतदार संघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उबाठा लढणार -आदिवासी नेते अंकीत नैताम यांची उमेदवारी साठी राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे

केळापुर-आर्णी विधान सभा मतदार संघ महाविकास आघाडी कडुन शिवसेना उबाठा लढणार -आदिवासी नेते अंकीत नैताम यांची उमेदवारी साठी  राष्ट्रीय  प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे 

दिनांक -९ ऑक्टोबर २०२४

महाराष्ट्राची विधान सभेची निवडणुकीची तारखा घोषीत होण्याची व आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली असता महाविकास आघाडीमध्ये मेरीटवर पक्ष भेदाभेद न करता नवीन परीवाद बाजूला ठेऊन युवा नवीन भूमीपुत्र चेहरा देण्याच्या भूमिकेचे शिवसेना उबाठा चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन  पांढरकवडा ह्या आदिवासी बहुल  केळापुर -आर्णी विधान सभा मतदार संघावर शिवसेना उबाठा चा दावा ठोकला असुन हि जागा शिवसेनेला महाविकास आघाडीने सोडावी व पांढरकवडा येथील स्थानीय व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांना साकडे टाकले आहे व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरदचंद्र पवार व काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी सुद्धा आपला दावा कसा मजबूत आहे हे समजावून सांगणार असल्याचे किशोर तिवारी यांनी आज सांगीतले . मागील २५ वर्षापासून सतत आदिवासी व शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे अत्यंत गरीब मात्र सतत समाजसेवा करणारे युवा आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांना भूमिपुत्र उमेदवार शिवसेना उबाठा उभे करणार आहे . 

"हा मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असुन सतत आयात केलेले  भाजपचे नाकर्ते लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे वणी राळेगाव सह केळापूर भागातील आदिवासी व कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत व आपल्या हक्काच्या जमिनीशी नाळ जुडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देण्याचा व मस्तवाल पोटभरू तसेच परीवारवादाला सोडुन आमदार निवडण्याच्या आग्रहाचा आदर महाविकास आघाडीने करावा यासाठी किशोर तिवारी पाठपुरावा करीत असुन अंकित नैताम यांनी सुद्धा आपला जनसंपर्क सुरु केला आहे 

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघ आर्णी केळापूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर २००४ काँग्रेस पराभूत झाली आहे त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेस पराभूत झाली व 20१९ मध्ये काँग्रेस पराभूत झाली या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय प्राप्त होत आहे २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार यांनी ३१०००मतदान घेतले  आहे अंकित नैताम एक आदिवासी कुटुंबातील वयाच्या दहा वर्षापासून किशोर तिवारी राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना यांच्या सोबत  आहेत व आहे मी पांढरकवडा नगर परिषदेत सन २००७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयप्राप्त करुन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती या पदावर कार्यरतहोते 

सन २०१२ मध्ये नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून अंकीत नैताम यांनी  नियुक्ती  करण्यात आली होती. यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी या पदावर कार्यरत होते  तसेच यवतमाळ जिल्हा ट्रायबल  फोरम या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत असुन तसेच ते युवा टायगर फोर्स सयोजक या पदावर कार्यरत आहे आदिवासी भागातील सामाजिक संस्था म्हणून क्रांतिवीर बिरसा मुंडा शैक्षणिक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केळापूर तालुक्यातील शेतकरी आदिवासी विधवांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण कोरोना काळामध्ये अन्नाची किट वाटप सात हजार कुटुंबांना घरपोच वाटप केला आहे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्त साडी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता रक्षाबंधन ना बहिणींना टिफिन डबे चा कार्यक्रम आयोजित करून वाटप केला आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे विवाह संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे कार्यक्रम सुरू असतात

अंकित नैताम एक  सामाजिक कार्यकर्ता .

मी विविध विषयावर आंदोलन करीत असून शेतकऱ्यांना, आदिवासींना न्याय मिळवून देण्याकरिता माझं सामाजिक काम सतत सुरू असतात. आणि मी एक गरीब कुटुंबातील आदिवासी कार्यकर्ता आहे यांना यावेळी शिवसेना उबाठा कडुन  संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे टाकले आहे . 

=================================================

Friday, June 21, 2024

कापूस सोयाबीन हमीभाव घोषणा-पंडी सरकारने महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली -किशोर तिवारी

कापूस सोयाबीन हमीभाव घोषणा-पंडी सरकारने महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली -किशोर तिवारी 

दिनांक - २२ जुन २०२४

मागील लोकसभा निवडणुकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात सरसकट नाकारल्यानंतर भाजपा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आर्थीक अडचणीत असलेले शेतकरी विक्रमी आत्महत्या करीत असतांना येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील मोदी सरकार विरुद्धचा रोष कमी होण्यासाठी स्वामिनाथन  आयोगाच्या लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा या फार्म्युल्याने यावर्षी केंद्र सरकार १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करतांना CACP अर्थात कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्ष लागवड खर्च अधिक कमीत कमी पन्नास टक्के नफा हिशोबात धरून करतील अशी अपेक्षा होती मात्र हमीभावाच्या घोषणेत हाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली असुन या हमीभावाच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढतील अशी भीती विदर्भाच्या  कापुस उत्पादक कोरड वाहू शेतकऱ्यांसाठी १९९० पासून अधिकारांचा लढा लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 

कृषी खर्च आणि किमती आयोगाने वातानुकुल कार्यालयात भांडवलदारांशी चर्चा करुन घोषणा केली  

यावर्षी कापसाचा नवीन हमीभाव ७१२१ व ७५२१ म्हणचे ५०१ रुपयाची नगण्य वाढ  करण्यात आला  आहे  तर सोयाबीनच्या हमीभावात फक्त २९२ रुपये करून दुष्काळ नापीकी व कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची निराशा केली आहे यातच तूर डाळीच्या एमएसपीमध्ये ५५० रुपये प्रति क्विंटल आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये ४५०  रुपये प्रति क्विंटलने वाढ केल्याने विदर्भ मराठवाड्यात पेरा करतांना कसला पेरा करायच्या हा प्रश्न मोदी सरकारने उभा केला आहे. 

हमीभाव म्हणचे भांडवलदारांच्या लुटीचा बाजार 

यावर्षी कापसाला ५०१ रुपयाची नगण्य वाढ  तर सोयाबीनच्या हमीभावात फक्त २९२ रुपये वाढ देणे यावर मागील २ वर्षात लागवडीचा खर्च ,उत्पादकेमध्ये झालेली घट ,निसर्गाचा प्रकोप ,जागतिक बाजारात सुरु असलेली लूट याचा  अभ्यास कृषी खर्च आणि किमती आयोगाने शेतकऱ्यांशी चर्चा करून केला असता तर फक्त लागवडीचा खर्च कापसाला ७००० रुपये ,सोयाबीनला ५००० हजार तर तुरीला ७००० रुपये येत आहे याचा अर्थ या हमीभावात शेतकऱ्यांना नफा तर सोडा प्रचंड तोटा होणार आहे सध्या भारताचे कृषीमंत्री शिवराज चव्हाण आहेत व महाराष्ट्रात शेतकरी समस्यांची जाण असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी महाराष्ट्राचे ९० लाख हेक्टर मध्ये पेरा असणारे १७२ विधान सभेच्या जागांवर आपला जय-पराजय निश्चित करण्याची क्षमता असणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी व सध्या होत असलेल्या विक्रमी आत्महत्या रोखण्यासाठी या तोट्याच्या हमीभावात रद्द करून वाढीव हमीभाव जाहीर करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली आहे . 

CACP अर्थात कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी

पिके

MSP

2024-25

MSP

2023-24

MSP त किती वाढ?
धान23002183117
धान A ग्रेड23202203117
ज्वारी हायब्रीड33713180191
ज्वारी मालदंडी34213225196
बाजरी26252500125
रागी42903846444
मक्का22252090135
तूर75507000550
मूग86828558124
उडीद74006950450
शेंगदाणे67836377406
सूर्यफूल72806760520
सोयाबीन48924600292
तीळ92678635632
रामतीळ87177734983
कपाशी (मिडल स्टेपल)71216620501
कपाशी (लाँग स्टेपल)75217020501


Sunday, June 9, 2024

१० जूनला किशोर तिवारी यांचा आभार प्रदर्शन व ऋणानुबंध दौरा - डेंगू ग्रस्त गावांना सुद्धा भेट देणार

१० जूनला किशोर तिवारी यांचा आभार प्रदर्शन व ऋणानुबंध दौरा - डेंगू ग्रस्त गावांना सुद्धा भेट देणार 

दिनांक ९ जुन २०२४

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघातील केळापुर तालुक्यातील गावांमधुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार यांना भरघोस मतदान केल्या बद्दल त्यांचे ऋण व आभार प्रगट  करण्याकरीता सोमवार १० जूनला शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी ,आदिवासी नेते अंकित नैताम ,शेतकरी नेते अजय राजुरकर ,प्रेम चव्हाण ,अभय कट्टेवार , संजय सुरंगे ,प्रशांत बावणे ,कोलाम चळवळीचे नेते  अतुल आत्राम , नानासाहेब वाघमारे ,विजय खापर्डे , रमेश चव्हाण हे सर्व कार्यकर्ते  करणवाडी ,खैरगाव (देशमुख ) ,वागदा  लिंगटी ,सायखेडा बेघर वस्ती ,किन्ही नंदपूर ,उमरी ,घोडदरा ,वाढोणा ,मंगी पोड  ,करंजी, खातारा ,अडणी ,सोनुर्ली ,मुंजाळा ,सिंगलदिप या ठिकाणी मतदारांचे आभार मानतील .सर्व ११ जूनला उरलेल्या गावांना भेटी देतील ,अशी माहीती दौरा  संयोजक संतोम नैताम यांनी दिली . 

शेतकऱ्यांच्या पीककर्ज ,बियाणे टंचाई ,टेंगूची साथ याच्या तक्रारी शासनदारी मांडणार 

सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी पतपुरवडा मिळत नसुन ,बियाणे व रासायनिक खते सुद्धा दर्जेदार मिळत नसुन ,अनेक भागात पावसाच्या पुर्वीच टेंगू  इतर आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत मात्र मस्तवाल सरकारचे आमदार व अधिकारी फक्त पैसे खाण्यात गुंतले असुन ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडले आहे .पाणी पुरवड्याच्या सर्व योजना आमदाराने आपल्या दलाल यान दिल्यामुळे तसेच सर्व कामात आमदाराने ५० टक्के कमीशन खाऊन वाढल्याने त्याचे तीन तेरा वाजले आहे या साठी जनआंदोलन सुरु करण्यासाठी आभार व ऋणानुबंध दौऱ्यात नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी केली .

 =============================================

Friday, June 7, 2024

शिवसेना"इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी"साठी महाराष्ट्रात जनआंदोलन करणार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी

शिवसेना"इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी"साठी महाराष्ट्रात जनआंदोलन करणार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी 

दिनांक -७ जुन २०२४

यावेळेस राहुल गांधी-उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी निवडणुक प्रचारात शेतकऱ्यांना ,महिलांना ,बेरोजगार युवकांना ,वंचितांना दिलेल्या ' पंच गॅरंटी ' ची पूर्तता ,ही काळाची गरज असुन सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या कुबडया घेवून सत्तेत आलेल्या भाजपावर सशक्त विरोधक या नात्याने केंद्रात व राज्यात असलेल्या निकामी सरकारच्या विरोधात आता जनतेच्या आक्रोश रस्त्यावर दाखविणें गरजेचे असुन त्यासाठी आता महाविकास आघाडीचे सर्व पक्ष जनआंदोलन सुरु  करतील व भाजपला संपूर्णपणे नाकारलेल्या विदर्भ व मराठवाड्यात शिवसेना लवकरच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगी सुरु करेल ,अशी माहीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी दिली . 

शेतकऱ्यांसाठी गॅरंटी 

सध्या शेतकऱ्यांना बियाणे व कीटक - तण नायक करमुक्त करणे ,सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करणे ,हमीभाव कापसाला १० हजार रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ६ हजार रुपये प्रती क्विंटल देणे गरजेचे आहे त्या बरोबर रोजगार हमी योजनेतून शेतीच्या मजुरीचे अनुदान देणे ,शेतकऱ्यांना पूर्णवेळ मोफत वीज देणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे व त्यासाठी या भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या सरकारच्या विरोधात जनतेचा एल्गार अत्यंत आवश्यक आहे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना संपुर्ण राज्यात मशाल पेटविणार व या घटनाबाह्य सरकारची पापाची लक्तरे टांगणार असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला 

 महीला व बेरोजगार युवकांना गॅरंटी 

देशाच्या संपत्तीं व संसाधनावर फक्त अडाणी सारख्या २२ लुटारूंचा अधिकार आहे व ९० टक्के सरकारच्या ५ किलो अन्नावर जगत आहे तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील कोट्यवधी बेरोजगार युवक सरकारी नौकरीसाठी   फक्त मागच्या दहा वर्षापासुन  आहेत आता प्रत्येक गरीब कुटुंबाला कमीत कमी १० हजार रुपये शोषणमुक्ती भत्ता व प्रत्येक शिक्षित युवकाला बेरोजगारी भत्ता देणे गरजेचे आहे ,

महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्याची गॅरंटी 

सध्या सर्व गरीब शेतकरी शेतमजूर महागड्या खाजगी शिक्षणामुळे व अती महाग आरोग्यसेवे मुळे  जगणे कठीण झाले आहे ,श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या भाजपा सरकारला महागडे शिक्षण व आरोग्य सेवा मोफत करण्यासाठी जनआंदोलन करणे काळाची गरज आहे व यासाठी जनआंदोलन हाच एक मार्ग आहे . 

आदिवास्यांना जल जंगल जमिनीचा अधिकार 

आज पर्यंत मूळ निवासी आदीवासी जनतेला त्यांचा 'जल-जंगल -जमिनीचा ' अधिकार देण्यात आला नसुन सध्या त्यांना या संसाधनावरून भाजपा हुसकावुन देत आहे यासाठी जनआंदोलन सुरु करण्याची घोषणा किशोर तिवारी केली . 

जातीनिहाय जनगणना व त्यानुसार आरक्षणाचा मुद्दा 

बिहार सारखं जाती जमाती निहाय सर्वे अत्यंत आवश्यक असुन अती वंचितांना 'जगण्याचा अधिकार ' अबाधित राहावा व त्यांना देशाच्या मुख्य धारेत आणावे हि काळाची गरज आहे व हे काम महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच करू शकतात असा विश्वास किशोर तिवारी यावेळी प्रगट केला 

=========================================================================