Monday, January 12, 2026

महाराष्ट्र मे प्रजातंत्र की रक्षाके लिए और धार्मिक और भाषाई नफ़रत को रोकने के लिए,महानगर चुनावों में सिर्फ़ कांग्रेस को वोट देना समय की ज़रूरत है - किशोर तिवारी

महाराष्ट्र मे प्रजातंत्र की रक्षाके लिए और धार्मिक और भाषाई नफ़रत को रोकने के लिए,महानगर चुनावों में सिर्फ़ कांग्रेस को वोट देना समय की ज़रूरत है - किशोर तिवारी

तारीख - १२  जनवरी २०२६ 


हाल ही में हुए नगर परिषद्  और नगर पंचायत चुनावों में, महायुति की भाजपा और शिंदे सेना ,अजीत पवार राष्ट्रवादी  पार्टियों ने हर वोटर को खरीदकर और मुस्लिम वोटरों को वोट न देने के लिए पैसे बांटकर सारे चुनाव जीते। अब, वोटरों को खरीदे बिना सिर्फ़ विपक्षी उम्मीदवारों को खरीदने का "राहुल नार्वेकर पैटर्न" पूरे महाराष्ट्र में शुरू हो गया है। भारत रत्न बाबासाहेब अंबेडकर द्वारा संविधान के ज़रिए दी गई प्रजातंत्र सत्तारूढ़  पार्टी  तानाशाही  में बदला रही है। जबकि भजपा की बी टीम ओवैसी और राज ठाकरे चुनावों में हिंदू, मुस्लिम और मराठी अमराठी का मुद्दा उठाकर महायुति पार्टियों के लिए जीत का रास्ता बना रहे हैं, अब सुजान  मतदाताओंके  के पास प्रजातंत्र को ज़िंदा रखने का एकमात्र विकल्प  कांग्रेस ही बचा है और किसान नेता किशोर तिवारी  कांग्रेस को वोट देने की अपील की है।

२०२५ में जब विदर्भ में हर दिन ४  मराठी किसान आत्महत्या कर रहे होंगे, तब "ठाकरे भाइयों" को मराठी लोगों की याद क्यों नहीं आती?

जिन मराठी लोगों को पिछले साल २०२५ में २००९ किसानों नए   पश्चिमी विदर्भ में  की आत्महत्या की गई थी,पर ठाकरे बंधू एक भी मराठी किसान घर नहीं गए और जब  मराठी लोगों के मुंबई से विस्थापन कर रहे है उसपर शिवसेना मनसे ने विस्थापन हर वक्त मौन रखा , भाजपा और राज ठाकरे की धार्मिक और भाषाई नफ़रत फैलाकर  अशांति पैदा कर रहे है ,  नमाज़ और अज़ान का मुद्दा उठाकर मुस्लिम समुदाय को परेशान कर रहे हैं।मुंबई में शांति सर्व धर्म सदभाव और विकास के लिए कांग्रेस मजबुत करना समय की मांग है। 

अंबानी के बेटे की शादी में नाचने और अडानी से डोनेशन लेने वाले "ठाकरे ब्रदर्स" का गुजराती विरोध दिखावा है।

ठाकरे बंधु का गौतम अडानी, से  समय-समय पर डोनेशन लेना और मुकेश अंबानी के बेटे की शादी में नाचना  एक मराठी माणूस मुर्ख बनाना है  उनका अडानी-अंबानी विरोध यश एक  पाखंड है और पिछले ३  सालों में मुंबई की हज़ारों एकड़ ज़मीन अडानी को महाराष्ट्र सर्कार देने पर  "ठाकरे ब्रदर्स" की चुप्पी एक रहस्य है। पिछले २५  सालों में मुंबई के विकास पर वोट न मांगते हुए  धर्म, भाषा और जाति वोट मांगना अनुचित है।  बिहारी उत्तर भारतीय गुजराती तमिल बोलने वाले लोगों को धमकाने का यह काम राज ठाकरे का अमराठी वोटरों को भाजपा  की तरफ मोड़ने का काम है और भाजपा की तानाशाही  रोकने के लिए कांग्रेस ही एकमात्र विकल्प है, जो सभी धर्मों, भाषा और जाति के वोटरों के हितोंमे है जबकी भाजपा लोकतंत्र विरोधी तानाशाही अडानी अम्बानी का राज ला रही है। किशोर तिवारी ने आने वाले चुनावों में कांग्रेस को मज़बूत करने की गुज़ारिश की है।

-------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 31, 2025

India’s Dying Field (West Vidarbha) Record 2009 Farmer Suicides 2025

Date - January 3, 2026

Epicenter and capital farm suicide in India west Vidarbha which is most backward agrarian crisis hit region has reported into 2025, for the first time since 2001, a record 2009 drought-affected and indebted farmers suicide. This is the largest incident of farmer genocide on a global scale. The BJP government at the centre and state, the administrative machinery, and all political parties have remained silent, and the entire year 2025 was spent solely in the hustle and bustle of parliamentary ,assembly and local body elections. All political parties showered promises, but the serious issue of farmer suicides vanished into thin air, expressed Kishore Tiwari, an activist who has been continuously working on the serious issue of farmer suicides and the agricultural crisis for the past 30 years.

Reasons for the record number of farmer suicides in 2025:

The farmer suicide-affected areas in West Vidarbha include Yavatmal, Amravati, Akola, Washim, and Buldhana districts and administratively, the Wardha district of East Vidarbha ,they are mostly dryad farmers depends upon the nature global climate.In West Vidarbha, cotton is cultivated in 45 percent of the area, soybeans in 40 percent, and various pulses and sorghum in the remaining area. This year, from June 3rd to November 12th, continuous rains wreaked havoc. The government provided compensation twice, but this did not alleviate the agricultural crisis. The main reasons for this are only 50 percent disbursement of crop loans through banks, exploitation by moneylenders and microfinance self-help groups, the doubling of cultivation costs leading to an uncontrolled debt burden, complete soybean crop failure, only 40 percent of the cotton crop surviving where as the government's assistance was meager, further exacerbating the agricultural crisis.

In 2025, Yavatmal district recorded a record 446 suicides, followed by Amravati with 396, Akola with 388, Buldhana with 343, Wardha with 224, and Washim with 212 farmer suicides.  Many of these suicides involve young farmers and tenant farmers who do not have land ownership documents (7/12 extract), and therefore, these suicides are not officially recorded by the government. The number of tenant farmers, who cultivate land on lease, is as high as 50 percent in every village. They do not receive government crop loans or compensation for crop losses moreover, they are obligated to pay the land rent even if the crop fails.  This has led to a significant increase in suicides among farmers without land ownership documents this year, as they are heavily indebted to private moneylenders, microfinance companies, and cooperative credit societies run by political leaders in villages.  The government, the administrative machinery, and all political parties are unwilling to address this serious issue.  Kishore Tiwari has expressed concern that if the government does not implement measures such as improving credit availability, improving seed quality, changing cropping patterns, reducing cultivation costs by 50 percent, and declaring a state bonus on minimum support prices, the agricultural crisis and farmer suicides will increase dramatically in 2026.


Thursday, December 18, 2025

भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सार्वजनिक पदाचा दुरुपयोग करून ऊर्जा क्षेत्रात दलाली व भ्रष्टाचार केला – किशोर तिवारी यांची लोकायुक्तांकडे शपथपत्रीय तक्रार

भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सार्वजनिक पदाचा दुरुपयोग करून ऊर्जा क्षेत्रात दलाली व भ्रष्टाचार केला – किशोर तिवारी यांची लोकायुक्तांकडे शपथपत्रीय तक्रार


दिनांक १८ डिसेंबर २०२५

संघाचे स्वयंसेवक असल्याचे पांघरूण मागील बारा वर्षांपासून मंत्रालय, ऊर्जा विभाग तसेच महाराष्ट्रातील राज्य-नियंत्रित वीज कंपन्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नियुक्त्या, बदल्या, कंत्राटे व धोरणात्मक निर्णय बेकायदेशीररीत्या वळवण्याचे काम भाजपचे प्रवक्ते विश्वास वसंत पाठक यांनी केले आहे. सार्वजनिक पदाचा उघड गैरवापर करून त्यांनी ऊर्जा क्षेत्रात दलाली व भ्रष्टाचाराचा सुव्यवस्थित साखळीप्रणाली उभी केली असून, यासंदर्भात प्रसिद्ध शेतकरी नेते व राजकीय विश्लेषक किशोर तिवारी यांनी लोकायुक्तांकडे शपथपत्रावर आधारित सविस्तर तक्रार दाखल केली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणातील चौकशी दाबून ठेवण्याचा अथवा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्यास, सर्व कागदपत्रीय व दस्तऐवजी पुरावे घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही तिवारी यांनी दिला आहे.

विश्वास पाठक यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजेनको), महाराष्ट्र राज्य वीज वहन कंपनी (महाट्रान्सको) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महाडिसकॉम) या राज्य-नियंत्रित कंपन्यांच्या संचालक मंडळावर असताना मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांच्या नावाचा सर्रास वापर करून टेंडर मंजुरीसाठी खुले कमिशन घेतले. या पदाचा गैरवापर करून त्यांनी गेल्या बारा वर्षांत मुंबई, पुणे व नागपूर येथे डझनभर फ्लॅट्स, शेती व इतर मालमत्ता जमा केली असून, या संपत्तीबाबत कोणतेही कायदेशीर व समाधानकारक उत्पन्नाचे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ऊर्जा विभागातील तत्कालीन वरिष्ठ सचिवांनी पाठक यांच्या दबावगिरीबाबत वारंवार तत्कालीन मुख्य सचिवांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्या सर्व तक्रारींचा अधिकृत नोंदवहीचा संपूर्ण संच लोकायुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, गौतम अडाणी समूहाचा निकृष्ट दर्जाचा (ओला व निम्नस्तरीय) कोळसा जबरदस्तीने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या प्रकल्पांवर स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी पाठक यांनी हस्तक्षेप केला. याच्या बदल्यात मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट ‘बक्षीस’ म्हणून देण्यात आल्याची माहिती शपथपत्रात स्पष्टपणे नोंदवण्यात आली आहे.

विश्वास पाठक हे २०१२ ते २०१३ या कालावधीत ‘राईट वॉटर सोल्यूशन्स’ या कंपनीचे संचालक होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या कंपनीने महाराष्ट्रात जलशुद्धीकरण प्रकल्प, सौर पंप योजना, महाडिसकॉम व मेडा अंतर्गत कंत्राटांमध्ये झपाट्याने विस्तार केला. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी या कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले असून अधिकृत भांडवल २२ कोटी रुपये आणि अदा केलेले भांडवल १४.७६ कोटी रुपये आहे. सरकारी नोंदींनुसार विश्वास पाठक व ओंकार पाठक यांचे भागभांडवल स्पष्टपणे दिसून येते. एकाच वेळी निर्णय घेणाऱ्या पदावर उपस्थित राहून त्याच क्षेत्रातील खाजगी कंपनीला थेट किंवा अप्रत्यक्ष व्यावसायिक लाभ मिळवून देणे हा उघड हितसंबंधांचा संघर्ष असून तो संविधानातील अनुच्छेद १९१ तसेच ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’च्या व्याख्येत बसतो.

‘मागेल त्याला कृषी सौर पंप योजना’ अंतर्गत शक्ती पंप्स, जीके कंपनी, ओसवाल, राईट वॉटर सोल्यूशन्स आणि क्रॉम्पटन या काही निवडक कंपन्यांचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. कंत्राटी दर विभागीय अंदाजापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी जास्त असल्याने कार्टेलायझेशन व बोली प्रक्रियेतील फेरफाराचा गंभीर संशय निर्माण होतो. महाडिसकॉममधील अंतर्गत चर्चांमध्ये पात्रता निकष ठरावीक बोलीदारांना अनुकूल ठेवण्यासाठी बदलले गेले का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. संचालक पदावर असतानाही विश्वास पाठक यांनी स्वतःला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले नाही, हा कंपनी कायदा २०१३ मधील कलम १८४ व १८९ चा स्पष्ट भंग आहे.

राईट वॉटर सोल्यूशन्सला महाडिसकॉम, मेडा, जल जीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा व सौर पंप क्लस्टर अंतर्गत मिळालेली पाचशे कोटी रुपयांहून अधिक कंत्राटे सार्वजनिक निधीतून वित्तपुरवठा केलेली आहेत. तरीही कंपनीने किंवा विश्वास पाठक यांनी त्यांच्या चालू आर्थिक हितसंबंधांविषयी कोणतेही अधिकृत प्रकटीकरण केलेले नाही. हा प्रकार सार्वजनिक पदाचा दुरुपयोग व संस्थात्मक भ्रष्टाचार दर्शवितो.

महत्त्वाचे म्हणजे, विश्वास पाठक यांची महाडिसकॉममधील स्वतंत्र संचालक म्हणून मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपलेली असतानाही महाडिसकॉमच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचे नाव अद्याप ‘इंडिपेंडंट डायरेक्टर’ म्हणून दर्शविले जाते. ते अद्यापही मंत्रालय, ऊर्जा विभाग व मुंबईतील एचएसबीसी (हॉंगकॉंग) इमारतीत संचालकासारखा वावर करून निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. सौर ऊर्जा व कृषी पंपांशी संबंधित टेंडर हवे असलेल्या ठेकेदारांना याच ठिकाणी बोलावून करार व आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता विश्वास वसंत पाठक यांच्याविरोधात तातडीने लोकायुक्त चौकशी सुरू करावी, राईट वॉटर सोल्यूशन्सला दिलेली सर्व शासकीय कंत्राटे रद्द करावीत, तसेच या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
===============================================================

Monday, November 3, 2025

मनसेसोबतच्या युतीच्या निषेधार्थ शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी यांनी पक्षातून राजीनामा दिला

 मनसेसोबतच्या युतीच्या निषेधार्थ शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी यांनी पक्षातून राजीनामा दिला

दिनांक: ३ नोव्हेंबर २०२५

महाराष्ट्रातील शिवसेना (UBT) चे वरिष्ठ नेते आणि शेतकरी मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सोबतच्या कोणत्याही युतीला विरोध करत आपल्या पक्षातून राजीनामा दिला आहे. तिवारी यांनी आज यूट्यूब वर एका व्हिडिओद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली. तिवारी यांनी सांगितले की पक्षाचा लोकसभेचा विजय हिंदी भाषिक आणि मुस्लिम समुदायांच्या पाठिंब्यामुळे झाला आहे आणि मनसेशी हातमिळवणी केल्याने ही व्होटबँक नाराज होऊ शकते.

https://youtu.be/jWtOjgBGtKc?si=pNPYbP5m9FHzeFSO

(किशोर तिवारी यांच्या विधानासाठी या लिंकवर क्लिक करा)

मनसेसोबतच्या युतीला विरोध करणारे शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी म्हणाले की यामुळे हिंदी भाषिक आणि मुस्लिमांचा विश्वास तुटेल आणि हे भाजपचे षड्यंत्र आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढतील. त्यांनी या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी केराची टोपली दाखविली .

“मनसेशी युती करणे हानिकारक आहे”

तिवारी यांनी स्पष्टपणे सांगितले की मनसेशी युती केल्याने शिवसेना (यूबीटी) ला नुकसान होईल. अलिकडच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिक व अमराठी  मतदार आणि मुस्लिम समुदायाकडून पक्षाला मोठा पाठिंबा मिळाला आणि जर मनसेसोबत सामील झाले तर हाच घटक त्यांच्यापासून दूर जाईल असा युक्तिवाद त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या मनसेने यापूर्वी बिगर-मराठी आणि मुस्लिम समुदायांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या आहेत असा आरोप तिवारी यांनी केला. कधीकधी हिंदी भाषिक लोकांवर हल्ले केले गेले तर कधीकधी मशिदींमधून होणाऱ्या अजानवरून वाद निर्माण केले गेले.

राज ठाकरे यांच्या मनसेकडे आता कोणतीही व्होटबँक नाही - किशोर तिवारी

किशोर तिवारी यांनी असेही म्हटले की मनसेकडे आता एक मजबूत व्होटबँक नाही.राज ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत भाडेपट्टीवर काम करतात व त्यांच्यावर कोहिनूर गिरणी प्रकरण इडी सिबिआई कडे प्रलंबित आहे . किशोर तिवारी  म्हणाले की या युतीची चर्चा प्रत्यक्षात भाजपची चाल आहे. भाजपला शिवसेना (यूबीटी) कमकुवत करायची आहे आणि मुंबईसह ११ शहरांच्या महानगरपालिकांमध्ये त्यांचा पराभव करायचा आहे. तिवारी यांनी उद्धव ठाकरेंना भाजपच्या हातातील बाहुली न बनण्याचे आवाहन केले. त्यांचे असे मत आहे की शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांशी आपले संबंध मजबूत करावेत जेणेकरून विरोधी पक्षांची एकत्रित ताकद भाजपला आव्हान देऊ शकेल. तथापि, उद्धव ठाकरे यांनी तिवारींचा सल्ला ऐकला नाही आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. किशोर तिवारी म्हणतात की भविष्यात ते मोदी सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरू करतील आणि शेतकरीविरोधी भाजप सरकारांना विरोध करतील.

===================================================

Sunday, November 2, 2025

पंतप्रधान अमृत योजनेत पांढरकवडा येथे ६५ कोटींचा भ्र्ष्टाचाराचे विष महायुतीने कालवले -किशोर तिवारी

 पंतप्रधान  अमृत योजनेत पांढरकवडा येथे  ६५ कोटींचा भ्र्ष्टाचाराचे विष महायुतीने कालवले -किशोर तिवारी 

दिनांक -१ नोव्हेंबर २०२५

ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात मंत्री कंत्राटदार निरीक्षक सरकारी प्रतिनिधी संस्था यांनी संघटित पणे राजकीय संरक्षणात संघटीत कट रचुन १५०० कोटींची लूट केली त्यामध्ये यवतमाळ ,वणी शहरानंतर पंतप्रधान  अमृत योजनेत पांढरकवडा येथे  ६५ कोटींचा भ्र्ष्टाचाराचे विष महायुतीने कालवले केल्याची तक्रार करीत सामाजीक कार्यकर्ते यांनी यामध्ये दिल्ली पासून गल्ली पर्यंत सत्ताधारी शामिल असुन पंतप्रधान कार्यलयाने याची नोंद पूर्वीच घेतली असुन फक्त शपथपत्रावर लेखी तक्रारीची अधिकृत तक्रार देण्याच्या सूचनेची पालन करीत आपण १२६ पानांची तक्रार दाखल केल्याची माहीती यावेळी किशोर तिवारी यांनी दिली . अमृत योजना प्रत्येक शहरात ,गावात ,खेड्यात भ्रष्टाचाराचे कुराण झाले असुन १०० टक्के मजूर निधी दिल्यानंतर फक्त १६ टक्के योजना पूर्ण झाली असुन हा अहवाल केंद्रीय चमू दिला असुन तांत्रीक बाबी व पाण्याचा दाब तसेच घराघरात नळाने शुद्ध पाणी हे पंतप्रधान यांचे स्वप्न देवाभाऊच्या टीम करून दाखविलें असुन प्रत्येक तांत्रिक बाबी तपासून निधी व नियम झालेल्या कामाचे निरीक्षण करणारी संस्था ही भाजपा जवळील भामट्याच्या लोकांची असुन हा सर्व प्रकार अनियंत्रितपणे जसा कामगार कल्याण निधी साहीत्य वाटपाचा होत आहे तो २०१४ पासुन २०२५ अविरत पणे होत आहे मधल्या काळात अडीच वर्षात महाराष्ट्रात सत्ता बदल झाला मात्र हा भ्रष्टाचार तसाच सुरु होता फक्त राजकीय लाभार्थी पोटभरू नेते बदलले होते असा आरोप किशोर तिवारी यावेळी केला . 

सार्वजनिक जीवनातुन भ्र्ष्टाचार निर्मूलन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतीक स्तरावर गाजत असलेल्या प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाणी देण्याच्या पवित्र कार्यात यवतमाळ जिल्ह्यात मंत्री ,प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी पोसलेले कंत्राटदार यांनी एक हजार पाचशे कोटीची (१५०० कोटी ) ची उधळपट्टी व भ्रष्टाचार केला आहे त्याची पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी सरळ सि बी आई मध्ये दाखल केली असुन भ्र्ष्टाचाराचे सर्व पुरावे जोडले  आहेत अशीच तक्रार लोकायुक्त महाराष्ट्र ,केंद्रीय जांच आयोग व भारताचे पंतप्रधान यांचे कडे दिली आहे यामध्ये जिल्ह्याचे मंत्री ,जिल्हाधिकारी ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी ,तातडीने देयके काढण्यासाठी दबाव व मुख्याधिकारी याना मारहाण करणारे गुंड कंत्राटदार यांचा समावेश आहे व हि देयकांमधील कोट्यवधींची हिस्सा घेणारे दानशुर व्यक्तींची नावे  सुद्धा आहेत या भ्रष्ट व्यवहार करणारे अधिकारी व कंत्राटदार यांनी जे तक्रार व याजिका कर्ते यांनी शपथ पत्रावर मंत्रालयापासुन पांढरकवड्या दानवीरांच्या नावे असेल साक्ष सुद्धा जोडली आहे . आपण यवतमाळ जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या १५०० कोटींच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा संपुर्ण हिशोब सादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असुन त्यांच्या भाजप शासित राज्यात नळाने शुद्ध पाणी घरापर्यंत २४ तास देण्याचा योजनेचा कसा भ्र्ष्टाचार होत आहे याचा पीपीटी सादरीकरण करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगीतले . 

असा होत आहे पांढरकवडा नगरीच्या पाणी पुरवडा योजनेत ६५ कोटींचा भ्रष्टाचार

यापूर्वी २००९ व २०१० मध्ये ४ कोटींची सुधारीत पाणी पुरवडा योजनेसाठी नवीन पाईप लाईन सायखेडा उमरी मार्गे पांढरकवडा येथील पाणी साठवण टाकी अशी टाकण्यात आली व त्यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांनी यांनी राजकीय कंत्राटदारांच्या दबावात सरसकट तात्रिक चुकीच्या दृष्टीने टाकल्याने तशीच पडली असतांना ती तशीच सोडुन नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक घरात नळाचे शुद्ध पाणी या  संकल्पाची पूर्तता करण्यासाठी व ५० टक्के रक्कम मंत्री ,नगरपालिकेचे बाप लोक ,अधिकारी खाण्यासाठी मार्च २०२४ मध्ये नवीन निविदा आदीवासी भाग असल्यामुळे निर्धारीत नियमांचा १० टक्के रक्कम जास्त करून ६४ कोटी २० लाखावर रक्कमेची निविदा लपून न प्रकाशीत होणाऱ्या व निवडलेले ५० टक्के कमीजण देणारे अती भ्रष्ट कंत्राटदार यांनी सगळीकडे २० टक्के कमी दार देतात मात्र या ठिकाणी खाणारे महायुती मध्ये तीन पक्ष असल्याने १५ ते १२ टक्के जास्त दराने टेंडर भरले व याना कमीशनचा दर ठरविण्यासाठी चर्चेला बोलाविण्यात या चर्चेत टक्केवारीचा ऑडीओ सुद्धा उपल्बध आहे .त्यानंतर ८ टक्के सरकारी किमतीच्या वर हे टेंडर अधिकार नसतांना देण्यात आले मात्र मुंबईचे अधिकारी यांनी पैसे कमी खा आम्ही वाढीव रक्कम ४  कोटी देणार नाही असा फतवा काढला व वाढीव रक्कमेसाठी कोणत्या बँकेतून वा सरकारी यंत्रेणेमधून कर्ज घ्यावे हे सुद्धा कळविले यावेळी सरकारने आदिवासी विकास निधीचा वापर यासाठी केल्यास तो केंद्राच्या आदेशाचे उलंघन होईल अशी ताकीद दिली मात्र केंद्र व राज्य सरकार यांना न मोजणारे जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्या दिग्रस येथील नगर पालिकेचे कुख्यात मुख्याधिकारी याना पांढरकवडा येथे मुख्याधिकारी व प्रशासक तसेच जिल्हाधिकारी यांचे अधिकार देऊन खास नियुक्ती केली व त्यांनी आदीवासी विकास निधी २ कोटी ११ लाख आदिवासी प्रभागात ७ वर्षापासुन प्रलंबित कामे बाजूला सारून अभूतपुर्व शून्य टक्के काम झालेल्या कंत्राटदारांची बिले देण्यासाठी वापरली मात्र काही नगरपालिकेच्या बापांना कमीशन कंत्राटदाराने न दिल्याने त्यांनी चक्क दिग्रस वाल्या चोर मुख्याधिकाऱ्याला त्याच्या कॅबिनमध्ये मारहाण केली त्याचा वीडियो किशोर तिवारी यांनी जोडला आहे . 

विरोधकांशी मांडवनी केल्याने  असा झाला भ्रष्टाचार 

पांढरकवड्याच्या जनतेनी २००९ मध्ये नळ योजनेत भ्र्ष्टाचार झाल्यामुळे भ्र्रष्टाचाराचा कर्दनकाळ बच्चू कडु यांच्या आवाहनाला दाद देऊन नवीन रक्ताला निवडून दिले व भाजपला प्रमुख विरोधी पक्ष याची जबाबदारी दिली मात्र त्यांचा हा अनुभव निराशेचा ठरला कारण ४ कोटीची योजना ७० कोटींच्या घरात नेल्यावर जल जीवन निगम यांनी कंत्राटदाराने पहिले ज्या सायखेडा धरणातून पाणी घ्यावयाचे आहे त्या ठिकाणी उंची असलेली साठवण विहीर निरीक्षक भिंत ,उमरी येथे हेड कायम ठेवण्यासाठी ४५ हजार क्षमता असलेला तान्त्रीक उंची हेड पांढरकवडा येथे पाणी शुद्ध केल्यानंतर सर्व टाकीमध्ये जाणार याची व्यवस्था पूर्ण करा असा नियम असतांना नगरपरिषदेने सायखेडा येथे २० टक्के उमरीयेथे ५ टक्के कामे झाल्यानंतर २८ कोटींची इतर कामांची देयके द्रुत गतीने जिल्ह्याधिकारी ,पालक मंत्री तसेच त्यांचे उजवा हात असलेले दुबई सट्टाकिंग यांच्या दबावाने काढण्यात आली व ही देयके काढतांना अधिकाऱ्यांनी ही बाब लिहून ठेवली आहे . १० कोटी रुपयाची देयके मागील महिन्यांत नगरपरिषद निवडणुकीत वाटण्यासाठी विशेष घाटंजी वरून मुख्याधिकारी आणून काढली गेली आहेत .मागील पाणी पुरवडा योजनेत मागील १० वर्षापासून पडून असलेली पाईपलाईनची  जूने पाईप नवीन करून बिल काढण्यासाठी पांढरकवड्याच्या विकास पुरुषांचा  सल्ला भाडेपट्टीने घेण्यात असल्याचे सुद्धा किशोर तिवारी यांनी आपल्या शपथपत्रावर केली आहे.ज्यांनी मागच्या ७ वर्षात सर्व सत्ताधारी पक्षाला खिशात ठेऊन चक्क पैसे वाटुन निवडणूक जिंकली ते दानशूर दुबई सट्टा किंग यांनी नगरपरिषद निवडणूक ३ महिने पुढे ढकला आम्ही ७० कोटी रुपयाची देयके कागदावर सुधारीत नळ योजना पूर्ण झाली हे दाखवुन मुंबई दिल्ली गाठल्याने ही तक्रार शपथपत्रावर देत असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे . 

============================================

Saturday, September 20, 2025

विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार

विदर्भाच्या  शेतकरी  विधवा  दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड  दर्शनाला जाणार 

दिनांक -२१ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या आदेशाने सरकारने मुंबईतील मलबार हिल येथील वर्षा बंगल्याचे डबल बेड गादी, सोफा  पुरवठा करण्यासाठी निविदा मूल्य २०.४७ लाख संदर्भ आयडी २५०९१७४१७१२०० ने काढली असुन त्याचवेळी संदर्भ आयडी २५०९१७४१२४३०० ने वर्षा बंगल्याचे शेड, स्वयंपाकघर प्लॅटफॉर्म, सी. काँक्रीट आणि विविध कामांचे  नूतनीकरण करण्यासाठी निविदा मूल्य १९.५३ लाख त्याचबरोबर संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने वर्षा बंगल्याचे प्लास्टर आणि रंगकाम करण्यासाठी  संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने निविदा मूल्य १९.८७ लाख एकूण ६० लाखाचे टेंडर देवाभाऊंच्या सेवेत काढले आहेत ,हे सर्व काम ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावयाचे आहे यापुर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामध्ये तसेच नंदनवन आणि देवगिरी बंगला, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे केटरिंग सेवांचा पुरवठा करण्यासाठी संदर्भ आयडी २५०४०९४८३४३० ने १०.२२ कोटी ची २९ एप्रिल २०२५ पूर्वी करण्यात आली आहेत त्यापुर्वी मागील ५ वर्षात मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर २० कोटी रुपये खर्च झाले आहेत आता आपल्या देवाभाऊ २० लाखाचा पलंग व गादी पाहण्यासाठी मागील डिसेंबर महिन्यांपासून शेतकरी आत्महत्या केलेल्या देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणी विशेष बसने "दर्शन यात्रा " काढुन मुंबईला भेट देणार असल्याची माहीती "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . 

सध्या महाराष्ट्रावर १० लाख कोटीचे विक्रमी कर्ज झाले आहे तसेच राज्यात ६३ लाख हेक्टर मध्ये खरीपाची पिके पूर्णपणे बुडाली आहे व शेतकऱ्यांचे कमीत कमी ४० हजार कोटींचा लागवड खर्च बुडाला आहे त्यातच सरकारी व सहकारी बँकांनी यावर्षी निर्धारीत लक्ष्याच्या फक्त ४० टक्के पीककर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांनी बहुतेक पीककर्ज मायक्रोफायनान्स ,बजाज फायनान्स ,महिंद्रा फायनान्स ,नागरी पत  संस्था यांच्या कडुन २४ टक्के वार्षीक व्याजाने घेतले आहे या अभुतपुर्व संकटामुळे दररोज महाराष्ट्रात ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत तर आमचे देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती करण्यात व्यस्त आहेत अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 

 "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " मध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कुंकू पुसलेल्या शेतकरी विधवा वर्षा बंगल्यासोबत  सोबत नंदनवन आणि देवगिरी बंगला ,सिल्वर ओक बंगला ,मातोश्री नवीन व जुने ,कष्टाने मोलमजुरीकरून मराठी जनतेसाठी निवारा देण्यासाठी तयार केलेल्या राज ठाकरे यांच्या "शिवतीर्थावर " सुद्धा देव दर्शन करतील पार्वतीला ऑटो रिक्शा चालक वाहक एकेकाळी असलेले मराठा नेते एकनाथराव शिंदे व प्रतापराव नाईक यांच्या पुण्यभुमीचे दर्शन घेतील .या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा "आलेल्या शेतकरी विधवा बहुतेक बंजारा ,मराठा ,ओबीसी ,आदीवासी, दलीत असल्यामुळें यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची व्यवस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट मध्ये करणार आहेत तसेच या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " करण्यासाठी कृषी विभागाला विशेष अनुदान सर्व शेतकरी विधवांना विश्व बँकेच्या १० हजार कोटीच्या कर्जातुन करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे हे देणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

=======================================================================

Monday, September 8, 2025

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन


प्रतिनिधी यवतमाळ 

राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित आहे. पैसे न मिळाल्याने अडचणीत आलेले कंत्राटदार आता आत्महत्या करीत आहे. या आतमहत्या थांबवा तसेच कामाआधीच कंत्राटदारांकडून घेतलेले ३० टक्के कमिशन तत्कालीन आमदार, खासदार तसेच नेत्यांनी परत करावे असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात नोकरशाहीने खर्चाचे ताळमेळ जपण्याचे व आपले सनदी कामे नीट करण्याची घटनात्मक  शपथ घेतली आहे, तरीही कोणतीही अर्थ संकल्पीय तरतूद नसतांना सुमारे २ लाख कोटींची कामे २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी निविदा काढून देण्यात आली. तत्कालीन सर्व पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी या कंत्राटदाराकडून कमीतकमी ३० टक्के कमिशन घेतले असुन देयके न मिळाल्याने प्रत्येक आठवड्यात कमीत कमी दोन कर्जबाजारी कंत्राटदार आत्महत्या करीत आहे. या कंत्राटदारांना वाचविण्यासाठी ५० हजार कोटी कमीशनपोटी हात उसने घेतलेले परत करावे अशी कळकळीची विनंती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी देवाभाऊला  केली आहे. यामुळे निरपराथ लहान कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबतील असेही त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ५० हजार कोटी कमीशन घेणाऱ्यांमध्ये प्रमुख वाटा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथांच्या व देवाभाऊचे संकटमोचक गिरीश महाजन व सनातनी भ्रष्ट दादांचा आहे. त्याच बरोबर सर्व तत्कालीन आमदार, खासदार यांनी सुद्धा घटनात्मक अधिकाराने पैसे घेतले आहे. आता मात्र हे सर्व मंत्री, आमदार व खासदार असहाय्य झाले आहेत कारण महाराष्ट्र सरकार प्रचंड आर्थीक संकटात आले आहे. मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे कर्ज १० लाख कोटी रुपयांचे वर  होणार आहे,  त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाजे १३ कोटी नागरिकांपैकी प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कमीत कमी ८० हजार रुपयांचे कर्ज राहणार आहे, ही महाराष्ट्र निर्मिती पासून आजवरची सर्वात जास्त आर्थिक विपन्नावस्था आहे ,असे किशोर तिवारी यांनी सरकारी आकड्यांचा आधार घेत म्हटले आहे 

देवाभाऊंचा दावा खोटा 

या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ठेवल्या त्या पुर्णपणे नियमांची पायमल्ली असुन यावर मुख्य सचिवांसह अर्थसचिवांनी हरकत घेतली आहे. सध्या नौकरदारांचे पगार देण्यासाठी कर्ज घेण्याची अवस्था सरकारवर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल हा देवाभाऊंचा दावा धांदात खोटा आहे. फक्त भाजपच्या सर्व कंत्राटदार मंत्री, आमदार यांची देयके देण्यात येतील व यासाठी आपले राज्यकर्ते आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या टाळूवरील लोणी खातील, त्यामुळे देवाभाऊंनी जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिध्दीचा हव्यास टाळून कंत्राटदारांच्या आत्महत्या रोखण्याचे आवाहन  किशोर तिवारी यांनी केले आहे. 
=======================
प्रति, संपादक, जिल्हा प्रतिनिधी
वरील बातमी आपल्या प्रसिध्द वृत्तपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.