विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार
दिनांक -२१ सप्टेंबर २०२५
सध्या महाराष्ट्रावर १० लाख कोटीचे विक्रमी कर्ज झाले आहे तसेच राज्यात ६३ लाख हेक्टर मध्ये खरीपाची पिके पूर्णपणे बुडाली आहे व शेतकऱ्यांचे कमीत कमी ४० हजार कोटींचा लागवड खर्च बुडाला आहे त्यातच सरकारी व सहकारी बँकांनी यावर्षी निर्धारीत लक्ष्याच्या फक्त ४० टक्के पीककर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांनी बहुतेक पीककर्ज मायक्रोफायनान्स ,बजाज फायनान्स ,महिंद्रा फायनान्स ,नागरी पत संस्था यांच्या कडुन २४ टक्के वार्षीक व्याजाने घेतले आहे या अभुतपुर्व संकटामुळे दररोज महाराष्ट्रात ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत तर आमचे देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती करण्यात व्यस्त आहेत अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
"मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " मध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कुंकू पुसलेल्या शेतकरी विधवा वर्षा बंगल्यासोबत सोबत नंदनवन आणि देवगिरी बंगला ,सिल्वर ओक बंगला ,मातोश्री नवीन व जुने ,कष्टाने मोलमजुरीकरून मराठी जनतेसाठी निवारा देण्यासाठी तयार केलेल्या राज ठाकरे यांच्या "शिवतीर्थावर " सुद्धा देव दर्शन करतील पार्वतीला ऑटो रिक्शा चालक वाहक एकेकाळी असलेले मराठा नेते एकनाथराव शिंदे व प्रतापराव नाईक यांच्या पुण्यभुमीचे दर्शन घेतील .या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा "आलेल्या शेतकरी विधवा बहुतेक बंजारा ,मराठा ,ओबीसी ,आदीवासी, दलीत असल्यामुळें यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची व्यवस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट मध्ये करणार आहेत तसेच या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " करण्यासाठी कृषी विभागाला विशेष अनुदान सर्व शेतकरी विधवांना विश्व बँकेच्या १० हजार कोटीच्या कर्जातुन करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे हे देणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
=======================================================================
No comments:
Post a Comment