Friday, March 11, 2011

दारूबंदीसाठी झटणाऱ्या दलित महिलेचा हत्तेची जबाबदारी गृहमंत्री आबा पाटिल यानि घ्यावी - न्यायालयीन चौकशीची विदर्भ जनांदोलन समितीची

दारूबंदीसाठी झटणाऱ्या दलित महिलेचा हत्तेची जबाबदारी गृहमंत्री आबा पाटिल यानि घ्यावी - न्यायालयीन चौकशीची विदर्भ जनांदोलन समितीची

नागपुर -१२ मार्च २०११
भंडारा येथून 22 किलोमीटर अंतरावरील गोलेवाडी येथील गावठी दारूचा अड्डा बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मागासवर्गीय रमाबाई आंबेडकर महिला बचतगटाच्या सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले (35) या महिलेचा अवैध दारूअड्डा चालविणाऱ्याच्या मफियानी गळा दाबून खून करण्यात केल्याची भीषण घटना गुरुवारी (ता. 10) रात्री साडेनऊला घडली आसून या घटनेने अख्या विदर्भात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे पोलीसच जबाबदार असून गृह्मन्त्रानी आपल्या पदचा राजीनामा द्यावा अशी मागणी विदर्भा जनांदोलन समितीने केली आहे
विदर्भात 'दारुमुक्ति ' आंदोलनाचे प्रनेत्या परोमिता गोस्वामी आज गोलेवाडी येथे भेट देणार असून सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले (35) यांच्या परिवाराला भेट देणार आहेत .या खुनाचे पडसाद सपूर्ण महाराष्ट्रात पडणार असून आघाडी सरकारला सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले (35) यांच्या बलिदानाची कीमत मोजावी लागेल अशी चेतावनी विदर्भा जनांदोलन समिति दिली आहे .समिचे नेते किशोर तिवारी यानि सपूर्ण घटनेची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कड़े केली असून .या घटनेची माहिती पन्तप्रथान, मुख्यमंत्री यांचेकडे पाठविली आहे .आज विदर्भात दारुबंदी व्हावी या मागणी करीता चंद्रपुर व यवतमाल येथे प्रचंड आन्दोलन होत असून भंडारा येथेहीअनेक खेड्यात हे आन्दोलन पेटले आहे आणि दारू मफियानी दारुबंदी अन्दोलाकंचे मुद्दे पाडने सुरु केले याला सरकार व पोलीसच जबाबदार असून सरकारने सपूर्ण विदर्भात दौ बंद करावी अशी मागणी किशोर तिवारी यानि केली आहे .
सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले हत्तेचे प्रकाशित बातमी प्रमाने
http://www.esakal.com/esakal/20110312/4821679814639573502.htm
" गोलेवाडी येथील सरपंच, तंटामुक्ती समिती आणि महिला बचतगटांनी गावात दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गाव व परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना दारूविक्री अड्डे बंद करण्याची समज देण्यात आली होती . त्यानंतर काही विक्रेत्यांनी आपले अड्डे बंद केले, तर काही अड्डे सुरूच होते. त्यामुळे महिला बचतगटांनी 23 फेब्रुवारीपासून गावातील अवैध दारूअड्डे बंद करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेला यशही आले. मात्र, गावाच्या शेवटच्या भागात राहाणाऱ्या संजय ताराचंद वैद्य याचा अवैध दारूविक्रीचा अड्डा सुरूच होता. त्या परिसरातील लोकांनी ही बाब रमाबाई आंबेडकर महिला बचतगटाच्या अध्यक्ष श्रीमती मंजिरा छन्नाभाई दहिवले यांना सांगितली. श्रीमती दहिवले यांनी बचतगटाच्या 15 महिलांसोबत संजयच्या घरी जाऊन त्यांना दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. गावात दारूबंदीचा निर्णय झाला असून, तुम्ही ताबडतोब दारूविक्री बंद करा, अशी समजूत या महिला घालत असतानाच संजय वैद्य यांची कथित पत्नी सुमित्रा नामदेव मडावी (35) हिने त्या महिलांना शिवीगाळ सुरू केली. हा वाद सुरू असतानाच सुमित्राने त्या महिलांवर मिरचीची पावडर फेकली. महिलांच्या डोळ्यांत मिरचीची पूड गेल्याने त्यांना दिसेनासे झाले. याचा फायदा घेत सुमित्रा मडावीने बचतगटाच्या सदस्य सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले (35) यांना मारहाण सुरू करीत त्यांचा गळा दाबला. गळा दाबून ठेवल्याने मीनाक्षी खाली कोसळल्या. त्यांना इतर महिलांनी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले यांच्या परिवारल कामित कमी १० लाख रूपये मदत व कुटुम्बा मधील एकाला नौकरी देण्याची मागणी विदर्भा जन आन्दोलन समिति केली आहे .
सौ. मीनाक्षी आनंदराव दहिवले यांच्या खुनाचे पडसाद सुपूर्ण विदर्भात आदोलन स्वरूपात पडणार असून भंडारा यथे आखाड़ी सरकार विरुद्ध रंगशिग फुन्कनार असल्याची माहिती किशोर तिवारी यानीदिली

No comments: