Sunday, June 16, 2013

महांडोळी येथील शेतकय्राची पांढरकवड्यात आत्महत्या


पांढरकवडा - महांडोळी येथील शेतकरी लक्ष्मण बाजीराव टेकाम वय ५५ वर्षे या शेतकय्राने पांढरकवडा येथील नव्या काँटन मार्केट जवळील शेतात गळफास लावुन आत्महत्या केली. त्याचे मागे पत्नी, २ मुले व १ मुलगी आहे. तो वडीलांची शेती करीत होता. फाशी चे नेमके कारण कळु शकले नाही पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शेतात काम करून तो आजारी पडला होता व आजाराला कंटाळुन त्याने आत्महत्या केली. परंतु बघ्यांमध्ये मात्र वेगळीच चर्चा दिसुन आली पेरणीसाठी बियाण्यांची सोय न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे ही घटना पांढरकवडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे असलेल्या शेतात घडली सदर शेतकय्राने शर्ट टाँवेल व रूमालाचा गळफासाकरिता उपयोग केला. विशेष म्हणजे त्याचे पाय जमिनीला टेकलेले होते या प्रकरणी पोलीसांनी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास जमादार ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन आगले करीत आहे

No comments: