Friday, October 26, 2018

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची विद्युत भारनियमनामुळे प्रचंड नापिकी: शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भारनियमन तात्काळ बंद करा : किशोर तिवारी

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची विद्युत भारनियमनामुळे प्रचंड  नापिकी: शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भारनियमन  तात्काळ बंद करा : किशोर तिवारी 

 दिनांक २६ ऑक्टोबर २०१८
सध्या  विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी अनेक जिल्ह्यात पाणी असूनही विद्युत कंपनीच्या सैतानी भारनियमन व प्राचीन खंडीत विद्युत पुरवड्यामुळे आपले उभे पीक नष्ट होतांना पाहत असुन अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या नाकर्त्या व मस्तवाल अधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यापासून खराब झालेले रोहित्र आजही बंदच आहेत अनेक खेड्यातर पीठ दळण्यासाठीही विद्युत पुरवडा ग्रामीण भागात मिळत नसुन आपण वाशीम वर्धा यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यावर विद्युत कंपनीच्या नाकर्त्या अधिकारी अपुऱ्या कर्मचारी तर शून्य नियोजनामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी १० हजार हेक्टरमध्ये विद्युत पुरवडा नाकारल्यामुळे रु दोन हजार कोटीचे नुकसान होणार हे निश्चित झाले असुन याला वीज वितरण कंपनीचे नाकर्ते मस्तवाल अधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला  आहे . 
ज्या वेळेस भारताचे परिवहनमंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ हजार कोटीचे  नवीन महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजन करीत होते त्याचवेळेस शेकडो शेतकरी वाशीम जिल्ह्यात कारंजा  येथे तर यवतमाळ जिल्हयात उमरखेड तालुक्यात बेलखेड येथे भाजप आमदार राजू नगरधने यांना शेकडो शेतकरी घेराव टाकून होते . यवतमाळ जिल्हा भाजप  अध्यक्ष राजू डांगे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवारची ,मागेल त्याला शेततळे योजनेत झालेले काम धरणामध्ये असलेले ९० टक्के जल  साठा पाहता यावर्षी जर फक्त १५ दिवस २४ तास वीज पुरवडा दिला तर कापुस वाचु शकतो अशी विनंती केली मात्र १५ डिसेंबर पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही असे मुजोरीने सांगितले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह सर्व  शहरातील व उद्योगांना तात्काळ भर नियमन लावावे व ग्रामीण विदर्भाला १ महिन्यासाठी भारनियमन मुक्त करावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली . 
सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमीत १२ तास अखंडीत विद्युत पुरवडा देण्याचे आश्वासन उच्चन्यायालयात दिले आहे  मात्र वीज वितरण कंपनीचे नाकर्ते मस्तवाल अधिकारी कोणतेही सरकारचे आदेश जुमानत नाहीत असे चित्र दिसत आहेत . किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात विलायता या गावाला भेट दिली असता त्या ठिकाणी एक महिन्यापासून कृषी पुरवडा बंद असल्याचे वीज वितरण कंपनीचे नाकर्ते मस्तवाल अधिकाऱ्यांनी कबुली दिल्यावर कार्यकारी अभियंता चितळे यांना कंपनीच्या फोनवर लावला असता त्यांनी फोन ठेवला होता तेंव्हा विद्युत  वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला साहेबाच्या खाजगी फोन लावण्यास सांगीतल्यावर त्यांनी तात्काळ फोन लावुन दिल्यावर चितळे यांनी मागील एक महीन्यापासून सदोबा सावलीचे काम चालू होते उद्यापासुन लाईन येणार अशी बतावणी केली मात्र लाईन काही येत नसल्याच्या तक्रारी वाढल्याआहेत ,आपण पार्डीनस्करी येथे भेट दिल्यावर हे इ वर्गात येत असल्यामुळे येथे मिक्स फिडर असुन खेड्यात व शेतासाठी फक्त ८ तासच वीज मिळणार तक्रार असल्यास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटा असे उत्तर विद्युत अभियंतेनी विचारणा केल्यावर दिले . आपण २५ ऑक्टोबरला गोपालनगर पारधी बेड्यावर सत्कार आपल्या दारी कार्यक्रम दूपारला घेत असतांना लाईन नसल्यमुळे अधीक्षक अभियंता मडावी यांना फोन लावला मात्र त्यांनी फोन उचलला नाही नाग आपण तहसीलदारांना फोन करण्यास सांगीतले तेंव्हा त्यांनी फोन उचलला असे सर्वच्या सर्व  वीज वितरण कंपनीचे नाकर्ते अधिकारी मुजोर झाले असल्याची गंभीर तक्रार तिवारी यांनी केली आहे . 
यापुर्वी सध्या अख्ख्या जगात गाजत असलेल्या १३ निष्पाप आदिवास्यांचा बळी  घेणाऱ्या नरभक्षक  टी १ वाघीणीच्या विद्युत वितरण कंपनीच्या पांढरकवडा विभागात व राळेगाव उपविभागात दिवसा रात्रीचे चक्राकार भारनियमन तसेच झरी तालुक्यातील पवनार जंगल परीसरातील ,वाशीम  ,अमरावती जिल्हात नव्याने नरभक्षक  वाघाच्या घटनेची वनविभागाने या भागातील ग्रामीण जनतेला दिलेल्या जाहीर सूचनेनुसार या भागात  जाण्यास रात्री टाळण्यास सांगितल्यामुळे महाराष्ट्र सरकारने वाघग्रस्तभागात विद्युत भारनियमन तात्काळ बंद करावे अशी कळकळीची विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ,मुख्य सचिव दिनेश जैन ,उर्जामंत्री बावनकुळे ,ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार ,अति मुख्य सचिव प्रवीण परदेशी ,वन सचिव विकास घारगे यांना केली आहे . प्रधान सचिव वन विकास घारगे यांनी वरील सूचनेला  समर्थन देत ऊर्जा सचिवांना विनंती सुद्धा केली आहे . 
सध्या यवतमाळ जिल्हात १३ निष्पाप आदिवास्यांचा बळी  घेणाऱ्या नरभक्षक  टी १ वाघीणीच्या बंदोबस्त करण्याची विशेष मोहीम सुरु आहे व या नरभक्षक  टी १ वाघीणीची प्रचंड दहशत असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे उभे पीक वाळत आहे वन विभाग अनेक भागात जाण्यासही सुरक्षेतेच्या दुर्ष्टीने मज्जाव करीत आहे त्यातच हजारो शेत मजुरांची सतत उपासमार होत आहे अशा अडचणीच्या गंभीर परीस्थीतीमध्ये मुंबई व नागपूरबसुन  नरभक्षक  टी १ वाघीणीच्या जीवाची चिंता करीत असलेल्यांची जरा या उपासमारीला तोंड देत असलेल्या हजारो आदिवास्यांना आधार द्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 

=======================================================

No comments: