Thursday, December 6, 2018

नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) प्रकरण :राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा चौकशी अहवाल पूर्वग्रह दूषित -किशोर तिवारी

नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) प्रकरण :राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा चौकशी अहवाल पूर्वग्रह दूषित -किशोर तिवारी 
दिनांक -७ डिसेंबर २०१८
पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवलेला  ठपका पूर्वग्रह दूषित असुन पीपल्स फॉर आयनिमल च्या मनेका गांधी व वाघांचे चित्रीकरण व वन्यप्राणी प्रेमापोटी  गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्याचे ढोंग करणाऱ्या अतिरेकी निसर्गप्रेमीं वातानुकूल घरात यापुर्वी केलेल्या आरोपांच्या आधारावर मनेका गांधी यांच्या दबावाखाली देण्यात आल्याचा गंभीर आरोप या पांढरकवडा भागात आदीवासी व शेतकरी जळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .हा अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर होण्यापूर्वी मनेका गांधी  सारख्या दिल्ली मुंबई पुण्याला  बसुन मिडिया ट्रायल करणारे पत्रकार  व विदेशी पैशाने उच्चं वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल वन्यप्राणी प्रेमी   तसेच वाघाचे फोटो काढण्यासाठी  छंद ठेवणारे  निष्पाप आदिवासी व शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा नरभक्षक वाघिणीसाठी ओरड करणारे पाखंडी नेत्यांना मिळाला कसा असा सवालही किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे . राज्य सरकारचा अहवाल फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल येण्याचा आगोदरच हा चौकशी अहवालाचा रीतसर बाजार करण्यात असुन या  बिनबुडाच्या प्रचाराने सध्या प्रचंड प्रमाणात मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असल्याने  वन्यप्राण्यांविरुद्ध टोकाच्या भुमिकेत आदीवासी व शेतकरी जात असुन वन्यप्राणी प्रेमीजनांनी हा वाद संपवावा अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
२ नोव्हेंबरला असगर अली खान याने गोळी झाडून अवनीची शिकार केली. पण, मुळात असगर अलीची नियुक्ती या कामासाठी करण्यात आलीच नव्हती असा अफलातुन बिनबुडाच्या आरोपाचा शोध राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने लावला  आहे . या समितीने राज्य सरकारकडे सोपविलेल्या अहवालात वनकायदा, शस्त्रकायदा आदींचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवतांना वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अस्तिव राज्य सरकारच्या अस्तिवालाच आवाहन देणारे ठरत आहे . 
वनकायदा, शस्त्रकायदा  मोठा की महामानव भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेत दिलेला जगण्याचा मुलभूत अधिकार मोठा असा गंभीर सवाल किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या पाखंडी चौकशी समितीला केला आहे सध्या अवनीच्या हत्येनंतरही वाघांनी शेतात व गावाच्या शिवारात ८च्या वर निष्पाप आदीवासी शेतकरी शेतमजुरांना मारले आहे सध्या वाघाचे संरक्षण करण्यासाठी विदर्भात कोणते उपाय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असल्याचा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे . 
यापूर्वी मनेका गांधी  सारख्या दिल्ली मुंबई पुण्याला  व विदेशात बसुन मिडिया ट्रायल करणाऱ्या तथाकथित वन्यप्राणीप्रेमींनी आपल्या आरोप जे मुद्दे उपस्थित तेच सर्व मुद्दे अहवालात असल्यामुळे ही संपूर्ण चौकशी पूर्वग्रह दूषित असल्याने याला केराची टोपली दाखविण्याची विनंती किशोर तिवारी यांनी मुख्यसचिव डी के जैन यांना केली आहे .  
एकीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप मरणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी नव्या पिढीत आस्था वाढविण्यासाठी वन विभागाने मागील चारवर्षात  वन्य जीव संरक्षण  जनजागृतीपर उपक्रम मोठा प्रमाणात हाती घेतला त्यातच मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष संघर्षांवर समाधान न शोधता अतिरेकी भुमिका घेणे सर्वांना चुकीचे राहणार असा इशारा यावेळी किशोर तिवारी यांनी दिला . 
=================================================================

No comments: