Tuesday, December 25, 2018

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी मिशनने दिला भाजप सरकारला दहा सुत्री " महामंत्र "

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी मिशनने दिला भाजप सरकारला दहा सुत्री " महामंत्र "
दिनांक- २६ डिसेंबर २०१८
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत  मध्यप्रदेश ,छत्तीसगड,व राजस्थान मध्ये भाजपाचा पराभव व तेलंगणामध्ये  भाजपचा आलेले   दयनीय  अपशय त्यातच तेलंगणामध्ये तेलंगणा राज्य समितीला ग्रामीण भागात आलेले अभुतपुर्व यश यामुळे सध्या महाराष्ट्र सरकारसमोर शेतकरी , आदीवासी व गरीबांची नाराजी दूर करण्यासाठी चिंतन सुरु झाले आहे कारण मागील चार वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयासाने    महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश व मराठवाड्यामध्ये जलयुक्त शिवार ,प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करणे , ऐतिहासिक कृषी वीज जोडणी ,महाराष्ट्रात ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार कोटीची कृषीकर्ज माफी,विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख कोरडवाहू शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सुरक्षा व अन्न पुरवडा विभागामार्फत वार्षिक १० हजार कोटीची अन्न सुरक्षा योजना तसेच कापूस सोयाबीनच्या नापिकीवर  व दुष्काळग्रस्तांना सरकारने दिलेली सुमारे १० हजार कोटीची मदत , खुल्या बाजारातुन विक्रमी तूर खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नसुन शेतकरी आत्महत्या होत असल्यामुळे  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी "शेतकरी वाचविण्यासाठी " महामंत्र दिला असुन सरकारला यावर तात्काळ निर्णय घेण्याचा आग्रह केला आहे . 
१-पूर्णवेळ शेतीची जाण असणारे कृषीमंत्री व कृषी  सचिव ,कृषी व कृषी पत पुरवडा ,ग्रामीण अर्थ व्यवस्थेचे अ ब क ड समजणारे सनदी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी . 
२. सरळ नगदी अनुदान -भाजपच्या झारखंड सरकारने व तेलंगणामध्ये तेलंगणा राज्य समितीला ग्रामीण भागात आलेले अभुतपुर्व यश याचा प्रमुख श्रेय प्रति एकरी रु ५ हजार सरळ नगदी प्रत्येक हंगामासाठी देण्यात येणारे अनुदान  विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश व मराठवाड्यामथील कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे . 
- शेतकऱ्यांना पेन्शन योजना -सध्या वृद्ध व युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय चिंतेचा आहे . वृद्ध शेतमजूर वा इतर पेशनप्राप्त लोकांना घरात दोनवेळचे जेवण व सन्मानाची वागणुक मिळत आहे तसेच वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा महामहिन पंतप्रधान मोदींनी केली होती आता अत्यंत अडचणीच्या वेळी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने तात्काळ लागु करावी . थकीत खावटी कर्ज माफ केल्यामुळे तात्काळ आदीवासी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना नव्याने खावटी वाटप योजना 
४-सध्या बँकांनी व नाकामी सनदी अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक कृषी कर्जमाफीचे निर्विवाद तीनतेरा वाजविले आहे तरी एप्रिल पूर्वी केंद्र - राज्याचा कायदा करून  सरसकट १०० टक्के शेतकऱ्यांना  विनाशर्त सातबारा कोरा करण्याची केंद्र शासनाचा सहभाग असणारी पीककर्ज वाटप तसेच पंचवार्षिक तत्वावर आधारीत जमिनीच्या किमतीच्या ५० टक्के रकमेइतकी कृषीकर्ज देणारी  योजना त्यामध्ये पिककर्ज व शेतकऱ्यांचे लंग्न ,शिक्षण ,आरोग्य सारखे सर्व खर्चासाठी कर्ज देण्याची तरतूद असावी
५- सध्या मायक्रो फायनान्स व खाजगी सावकाराच्या कर्जामुळे शेतकरी व महीला बजेट गट हैराण झाले आहेत यांचे  मायक्रो फायनान्स व खाजगी सावकारांचे सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ माफ करावे ही काळाची गरज आहे 
६- तामिलनाडू सारखी अम्मा अन्न सुरक्षा योजना - सर्व अंत्योदय धारकांना ३५ किलो अन्न देणारी अन्नपुर्णा योजना ,सर्व  बीपीएल राशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाना ३५ किलो अन्न देणारी अंत्योदय योजना इतर सर्वांना ए पी एल ची पांढरी शिधावाटप पत्रिका असणाऱ्यांना  बीपीएल राशन कार्ड देण्यात येणारे अन्न देण्यात यावे 
७- शेतकऱ्यांच्या पाल्याना केजी ते पीजी पर्यंतचे  सर्व प्रकारचे शिक्षण संपुर्ण १०० टक्के मोफत शिक्षण सरसकट देण्याची योजना जाहीर करण्यात यावी  
८- पंतप्रधान पीकविमा योजनेतर अत्यंत महत्वाचे बदल - पंतप्रधान पीकविमा गावस्तरावर करण्यात यावा ,खाजगी बिमा कंपनीला बंदी घालण्यात यावी ,पीक कापणी व नुकसानीचे अहवाल ग्रामसभा देण्याचे बदल करण्यात यावे . सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पीक  विम्याच्या सरसकट १०० टक्के अनुदानावर सरळ भरावा . 
९- शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी एकलक्ष नगदी अनुदान योजना तात्काळ लागू करण्यात यावी . 
१०- गाव तेथे आरोग्य सेवा केंद्र योजना सुरु करण्याची योजना विदर्भ मराठवाड्यात तात्काळ सुरु करण्यात यावी सोबतच संपुर्ण ग्रामीण विदर्भ व मराठवाड्यात दारूबंदी करण्याचा निर्णय तात्काळ करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत व्यस्त असल्यामुळे आपण हा प्रस्ताव अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देणार असल्याचे किशोर तिवारी स्पष्ट केले आहे . आपण  शेतकरी मिशनचा अध्यक्ष या नेत्याने मागील ४ वर्षात ३६८० खेड्यात घरा घरात भिरल्यावर लाखो लोकांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे हा महामंत्र देत असल्याचे म्हटले आहे कारण सारी अधिकारी ,पश्चिम महाराष्ट्राचे नेते व मुंबईकर वाघासोबत भाजप-सेनेचे  मंत्री शेतकऱ्यांवर पुतण्या मावशीचे प्रेम करतात  सरकारचा फोकस समृद्धी मार्ग .मेट्रो सिमेंट रस्ते ,पोटभरू नेत्यांना सरळ टक्केवारी देणारा विकास अत्यन्त प्रिय आहे मात्र ग्रामीण उपाशी जनतेचा राग शहरी मतदारांवरही होते हे आपण पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत  मध्यप्रदेश ,छत्तीसगड,व राजस्थान मध्ये भाजपाचा पराभव व तेलंगणामध्ये  भाजपचा आलेले   दयनीय  अपशयामधून पाहीले आहे म्हणुन १४४ शहरी जागांवर लक्ष केंद्रित न करता अन्नदाता वाचवा व सत्ता मिळवा अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
==================================================================

No comments: