Thursday, March 14, 2019

विदर्भ मराठवाड्याचे कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकरी -शेतमजुर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्णकरणाऱ्या पक्षांच्या सोबत राहतील -किशोर तिवारी

विदर्भ मराठवाड्याचे  शेतकरी -शेतमजुर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्णकरणाऱ्या पक्षांच्या सोबत राहतील -किशोर तिवारी 
दिनांक -१४ मार्च २०१९
आज विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्जिवीत करण्यासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचा लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी सरळ अनुदान ,शेतीमालाचा भाव ,सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज विनाशर्त पंचवार्षिक तत्वावर जमिनीच्या किमतीच्या ७० टक्के देण्यात यावे , ७० टक्के प्रदूषण रासायनिक शेतीमुळे होत असुन हरीत क्रांतीच्या नावावर मातीच्या कणाकणात व पाण्याच्या प्रत्येक थेंबात विष ओतणाऱ्या रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे झाले असुन जगात मूठभर भांडवलदार देशानी पर्यावरणाचे व जीवसृष्टीचे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी अन्नाची शेती करण्यासाठी पीकपद्धती बदलण्याची प्रमुख मागणी तसेच ग्रामीण शेतमजूर महिला बचत गटांची शेतकऱ्यांना देण्यात आल्यासारखी कर्जमाफी देण्याची प्रमुख मागण्या भाजपसह कोणत्याही राजकीय पक्षाने निवणुकीनंतरची आपली ग्रामीण अर्थनीती स्पष्ट न केल्याने कोणत्याही पक्षाने विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मतांची जातीच्या आधारावर आपली अधिकारशाही दाखविणें चुकीचे ठरणार असुन आता भाजपसह सर्व प्रमुख पक्षांनी आपले धोरण जाहीर करावे अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ करीत आहेत त्यांनी ग्रामीण विदर्भ मराठवाडयातील शेतकरी -शेतमजुरांचे प्रमुख आर्थिक प्रश्न सतत रेटले आहेत .सतत ग्रामीण जनतेच्या समस्या व शेतकरी आत्महत्या या प्रश्न्नावर सतत रान उठवीत  २००८च्या राष्ट्रीय कर्जमाफीनंतर त्यांनी २००९मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसने हमीभाव ,पतपुरवडा ,ग्रामीण रोजगार ,पीकपद्धतीमध्ये बदल यासारख्या प्रमुख मागण्या नाकारल्यामुळे २०१४मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी ,पिककर्जमाफी ,ग्रामीण रोजगार ,पतपुरवडाधोरण याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नसुन यावर प्रामाणिक प्रयन्त करण्याची  आवश्यकता असतांनाही राजकीय पक्ष जातीय समीकरण मांडत असल्याची खंत व्यक्त केली शिवसेनेने मागील ५ वर्ष सतत विरोधी पक्षाची भूमिका घेत मुद्देसूद संघर्ष केला मात्र आता शेतीमालाचा भाव ,सातबारा कोरा करून सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज यावर भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची माहीती मतदारांना देण्याची गरज असुन पर्याय नसल्याने लोक आपणास निवडणून देतील हा समज चुकीचा असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 

"आपणास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रिपद देऊन सल्ले देण्यास  नियुक्त केले मात्र शेतीचे सर्व सल्ले सरकारला रासायनिक कीटकनाशक ,जैविक बियाणे व कृषी व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं देतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली .  खुली  अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने यावर्षी  ऐतिहासिक सुरवात केली असुन आता याला सकारात्मक टोकाला घेऊन जाणे अत्यन्त गरजेचे असुन मात्र सर्व राजकीय पक्ष मूळ प्रश्नाला  हात लावावा यासाठी निवडणुकीच्या वेळेस सत्तेचा तुकडा न पाहता तळमळीने प्रयन्त करणे काळाची गरज असल्याचे मत   किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले आहे  . 
 विदर्भ व मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादा न ठेवता सिक्कम प्रमाणे धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेतीसाठी  सरसकट देण्याची मागणी  व सरकारने  तेलंगाणा सरकारप्रमाणे रयतबंधू योजनेसारखी सरसकट संपुर्ण जमीनधारणेच्या नुसार प्रेतिहेक्टरी प्रति हंगाम रु ६००० रोजगार हमी योजनेच्या मदतीने द्यावी या  मागणीवर आपण भाजप काँग्रेससह सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली  . 

========================================================

No comments: