Friday, May 10, 2019

मागेल त्याला पीक कर्ज- १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी पीककर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा- किशोर तिवारी

मागेल त्याला पीक कर्ज- १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी पीककर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा- किशोर तिवारी
Ø १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा
Ø मागेल त्याला पीक कर्ज, तालुकास्तरावर कर्ज मेळावे  द्या
Ø शेतक-यांना सातबारा व आठ अ घरपोच  द्या
Ø कर्जाचे पुनर्गठन करून सर्व शेतक-यांना पीककर्ज द्या

      
 दिनांक ११ मे २०१९ – अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, शेतक-यांना दिलेल्या लक्षाप्रमाणे १००टक्के पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व बँकांच्या अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे 
शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी केली आहे .  शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय्‍ घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी १५ जुन पूर्वी प्रत्येक शेतक-याला कर्ज पुरवठा होईल,यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, कुचराई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर बँकांवर कारवाई  करणार असल्याचे  त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यासाठी सुमारे २० हजार  कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे,परंतु ६० लाख  शेतक-यांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे असेल तर ३२ हजार  कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदारांकडून गावनिहाय शेतक-यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकांना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
     शेतक-यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतक-यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना प्राधान्य द्यावे असेही यावेळी किशोर तिवारी यांनी सांगितले.
             विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्यानंतर पूर्ण कर्ज मिळेल, याची हमी घेण्याची सूचना त्यांनी  केली. तसेच बँकांनी मागेल त्याला पीककर्ज यानुसार जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांपर्यंत पोहचवून कर्ज पुरवठा करावा. शेतक-यांना १ लाखापेक्षा जास्त कर्ज घेताना कर्जासाठी मॉडगेज करावे लागते, त्यासाठी येणारा खर्च शेतक-यांना भूर्दंड असल्यामुळे ही मर्यादा १०लाखांपर्यंत वाढवावी,यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटून शेतक-यांसाठी सुलभ धोरण ठेवण्याचा आग्रह करण्यात येणार असल्याचे किशोर तिवारी  यांनी सांगितले.   सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मेपासून कर्ज मेळावे घेण्यात यावे या महीन्यात  होणा-या ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली. बँकांनी  शेतक-यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्व बँकांनी पूर्वनियोजन केले असून १०० टक्के शेतक-यांना कर्जपुरवठा करण्याची तयारी करावी  आतापर्यंत विदर्भ व मराठवाड्यातील बँकांनी फक्त २०० कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
     पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कर्ज न घेतलेल्या शेतक-यांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत.विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्याला २०हजारावर कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असले तरी शेतक-यांना पीक कर्जासाठी पुनर्गठन झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून बँक कुचराई करतात हि बाब चिंतेची आहे तरी  सर्व जिल्ह्यातील खरीप हंगामासंदर्भातील पीककर्जाबाबत केलेल्या नियोजनाची माहिती किशोर तिवारी देण्याची सूचना केली आहे 

No comments: