Tuesday, September 5, 2017

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासुन वंचित राहणार नाही-किशोर तिवारी

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासुन वंचित राहणार नाही : निमणी  कोलाम पोड "सरकार आपल्या दारी"  कार्यक्रमात किशोर तिवारी यांची  घोषणा
दिनांक ९ सप्टेंबर   २०१७
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें’तर्गत आतापर्यंत ६०  लाखावर  शेतकर्‍यांनी आनलाईन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही अर्ज भरण्यासाठी गावातील सर्व शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांना मदतीचे  आदेश  असुन सध्या ही   मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असुन तांत्रिक अडचणी असल्यास ही वाढविण्यात   येणार  असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्यामध्ये   झरी   तालुक्यातील निमणी -दाभाडी  कोलाम पोड   येथे भाजपच्या जी.प. सौ मीनाक्षी सुरेश बोलेनवार यांनी आयोजीत केलेल्या    "सरकार आपल्या दारी" कार्यक्रमात दीली .


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंमध्ये सर्व अडचणीचे शेतकरी येतील व २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठीत केलेले २०१७च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहीती यावेळी तिवारी यांनी दिली . घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले  स्वतंत्रपणे कर्जमाफी पात्र असुन मयत शेतकऱ्यांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहीती दिली . 
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी संदीप अपार ,झरी तालुका तहसीलदार गणेश राऊत ,झरी गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम ,वणी परिक्षेत्र वन्य अधिकारी पटवारी पाटण येथील ठाणेदार वाघ ,आदिवासी सेवक डॉ महेंद्र लोढा ,धर्मा आत्राम ,भाजप नेते सुरेश बोलेनवार ,आदिवासी नेते अंकित नैताम ,विलास आत्राम ,भीमराव नैताम उपस्थित होते . 
 अनेक शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच काही खासगी केंद्रांद्वारे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे  अर्ज भरतांना प्रचंड हेलपाटे व आर्थिक भुरदंड पडत असल्याची तक्रार केल्यावर तिवारी यांनी चौकशीचे आदेश दिलें व  अर्ज भरल्यानंतर एका अर्जामागे दहा रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना पैसे देण्याची शेतकऱ्यांना गरज नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. तरी देखील कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास किंवा कामकाजाबाबत हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आल्यास या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द  तात्काळ करण्याचा सूचना यावेळी तिवारी यांनी दिल्या

मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  यवतमाळ जिल्यामध्ये   झरी तालुक्यातील निमणी -दाभाडी  कोलाम पोड   येथे  "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम  जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात आला  . यावेळी दाभाडी वरपोड खडकडोह पवनार घोन्सा पेंढरी सोनेगाव शिवपोड परीसरातील  येथील  कोलाम पोडावरील आदिवासींनी येथील गावकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्न ,घरकुल योजनेच्या अडचणी  शेतकऱ्यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी  आतापर्यंत  नवीन पिककर्ज ,मुद्रांकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी  ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न उपस्थित केले 


यावेळी आदिवासी बहुल भागात सातबारावर वारसाची नावे चढविणे तसेच पिवळ्या  शिधा वाटप नाहीत अशा प्रचंड तक्रारी येत आहेत अनेक कोलाम  व पारधी पाड्यात जनतेला घरकुल योजना मिळत नसुन कारण घराचे पट्टे मालकीचे नाहीत   अनेक तांत्रिक अडचणी  वर्षानुवर्षं हा प्रश्न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली  तसेच वंचितांना  आजही अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण  यांच्या समस्या परीसरातील लोकांनी मांडल्या  यासर्व समस्यांवर तात्काळ तोडगा काढा असे आदेश  शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी यांनी यावेळी दिलें. 
=======================================================

No comments: