Sunday, September 10, 2017

"यवतमाळचे शिवदत्ताचे तांडव"-"लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला गोरखधंदा बंद कोण करणार -किशोर तिवारी


"यवतमाळचे शिवदत्ताचे तांडव"-"लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला  गोरखधंदा बंद कोण करणार -किशोर तिवारी 

दिनांक- ११ सप्टेंबर  २०१७
सध्या अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या चर्चेत असलेल्या यवतमाळ येथील कंत्राटदार शिवदत्त शर्मा  यांची माझा मुलगा अपघाताने मागील सहा महीन्यापासून कोमात आहे मी सरकारी दरापेक्षा २५ टक्के दरात काम घेतले असल्यामुळें माझे घर विकुन आपणास कामाच्या रकमेच्या ५ टक्के विधानसभा क्षेत्र आमदाराची अलीखीत  जबरीची खंडणी जी अधिकृतपणे अधिकारी गोळा करतात ती देण्यास असमर्थ आहे ही ध्वनीफीतने  "लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला  गोरखधंदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला  आहे सगळ्या राष्ट्रीय व  राज्य स्तरावरच्या माध्यमांनी मागील चार दिवसापासुन सतत कंत्राटदार शिवदत्ता शर्मांचे आमदारांशी झालेले स्वछता अभियानावर झालेले पवित्र संभाषण जगासमोर आनल्यानंतर या गंभीर आरोपांची साधी चौकशीची मागणीही विरोधीपक्ष वा  सत्ताधारी विरोधी पक्ष(ही जमात मागील ३ वर्षात जन्माला आली आहे ) करीत नाही यावरूनच सारेच्या सारे या देशलुटीच्या राष्ट्रीय पर्वात सहभागी असल्याची चर्चा वचिंत दलीत जनता करीत असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढावा अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी केली आहे . 
दवाखान्यात डॉक्टर नाहीत ,प्रशासनात अधिकारी नाहीत ,शेतकरी मरत असतांना कृषी व ग्रामीण   विभागात अधिकारी नाही अशावेळी नेमका ठाणेदारच पाहीजे यासाठी  आपली सारी पत खर्ची लावणाऱ्या नेत्यांनी शिवदत्त शर्मा यांचे सत्यासाठी सुरू असलेले तांडव एक गंभीर इशारा असुन सत्ता -संपत्ती -सन्मान अनित्य आहेत एक दीवस जाणारच मात्र त्याचा खुला दुरुपयोग समाज माफ करीत नाही असा निर्वाणीचा सल्ला किशोर तिवारी यांनी पोटभरू नेत्यांना दीला आहे . 
 लोक चांगले दिवस येण्यासाठी व शेतकरी शेत मजुर आदीवासी दलीत यांच्या घरात सुखींचे दिवस येणार या आशेने सरकारे बदलतात मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे समाजसेवक व राजकीय नेते चांगले दिवस येऊ देत नाहीत . भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देशच विकण्याचा धंदा सुरु केला असुन आता जनतेनी  हातात मशाली घेण्याची वेळ आली असल्याची भावना तिवारी यांनी या संघटीत  गोऱ्रखंधंद्यावर टीका करतांना म्हटले  आहे .


मागील महिन्यातच असाच गोऱ्रखंधंद्यावर प्रकाश टाकतांना समोर आलेल्या सत्याप्रमाणे  राज्यात कार्यरत असलेल्या मजुरांच्या  सहकारी संस्था ह्या मजुरांच्या नसुन राजकीय नेत्यांच्या पोट भरण्याचा धंदा असल्याचे सबळ पुरावे व सत्य  अनेक जिल्ह्यातील तथाकथीत मजूर संस्थाचे  सहकार खात्याने ऑडीट केल्यावर ह्या मध्ये असलेले मजुर सध्या आयकराचा भरणा करणारे राजकीय नेते असुन त्यांनी संस्थांनी केलेल्या कामावर एक दिवसही काम केल्याचे समोर आले आहे तसेच जे काम खुल्या  निविदामार्फत फक्त ७० टक्के  निर्धारीत निधीमध्ये सहज होत असतांना संस्थामार्फत हेंच काम १०० टक्के निर्धारीत निधीमध्ये करण्यात आले असुन यामध्ये कोणतीच खुली  स्पर्धा नसल्याचे स्पष्ट झाले असुन ही एक संघटीत कट रचुन अधिकारी यांच्या सहमतीने केलेला  गुन्हा असल्यामुळे   या गोरखधंद्यामध्ये शामील असलेल्या सर्व संस्थामालकांवर  फौजदारी करण्याच्या व सरकारी निधी वसुल करण्याचा आग्रह  किशोर तिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकेला  सर्व पुराव्यानिशी  तक्रार सादर केल्यानंतर केला होता . 

                              महाराष्ट्रात जिल्याजिल्ह्यात नेत्यांनी व कंत्राटदारांनी तथाकथित मजूरसंस्था निर्माणकरुन त्यांचा एक थोतांड महासंघ निर्माण केला व आपले समांतर सरकार स्थापन करून राजरोसपणे गोरखधंदा करून सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा जुना लावत असुन खासदार ,मंत्री, आमदार हे सुद्धा ह्या समांतर सरकारला दंडवत लाऊन आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम मागत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात येत होत्या . मजूरसंस्थाचे नेते मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी -काँग्रेस पदाधिकारी होते आता भाजप -शिवसेनेचे पदाधिकारी झाले असुन सरकारी अधिकाऱ्यांवर दबाब टाकुन सरकारी तिजोरीची कोट्यवधी खुली लुट करीत असुन यामध्ये हळुहळु न्याय व्यवस्था सोडुन लोकशाहीचे सारे स्तंभ शामील होत असल्याची वेदना  किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे जवळ व्यक्त केली होती . 

.

No comments: