Tuesday, September 10, 2019

नव्या वाहतूक नियमानुसार प्रचंड दंडाच्या रकमेत नितीन गडकरी यांनी कमी करावा-किशोर तिवारी

नव्या वाहतूक नियमानुसार प्रचंड दंडाच्या रकमेत नितीन गडकरी यांनी कमी करावा-किशोर तिवारी 
दिनांक -१० सप्टेंबर २०१९
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसुल करण्यात येणाऱ्या प्रचलित दंडाच्या रकमेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ही आर्थिक दंडवसुली सामान्य जनतेला   अमान्य आहे व मध्यमवर्गीयांना फारच कष्टदायक आहे तस  वाहतूक नियम मोडल्यास अधिकचा दंड ठोठावण्याचा निर्णय जनहितासाठीच घेतलाय शिवाय, सध्याच्या दंड हे जवळपास दशकभर जुने होते, त्यामुळं त्यात बदल करणंही आवश्यक होतंच शिवाय सध्याच्या दंड हे जवळपास दशकभर जुने होते, त्यामुळं त्यात बदल करणंही आवश्यक होतंच यामुळे  दंडाच्या रकमेत वाढ झाल्यानं अपघात कमी होतील. कारण लोक वाहन चालवताना अधिक सतर्क राहतील. मात्र दहापटीने दंड वाढविल्याने पोलीस व परीवहन खात्याचा वसुलीचा दर दहापटीने वाढला असुन हा सारा प्रकार तापदायक असल्याने यावर फेरविचार करावा अशी विनंती त्यांचे खंदे समर्थक व जवळचे मित्र किशोर तिवारी यांनी केली आहे 
अनेक राज्यांनी नवीन मोटार वाहन कायद्याची अंबलबजावणी सुरु केली नाही तरी  मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास प्रचंड आर्थिक दंड आकारला जात असल्याने पोलीसांनी व परीवहन खात्याने वसुली नव्या दराने सुरु केली आहे यामुळे प्रचन्ड भाडेवाढ ट्रक वाल्यानी केली आहे कारण केंद्राच्या आदेशानुसार देशभरात १ सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवे नियम लागू झाले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडवसुली केली जात आहे. या नव्या नियमांची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे  आपण व्यथित झाले असुन आपणास अनेक लोक फोन करून नितीन गडकरींना सांगा असा आग्रह धरत असल्यामुळे आपण ही विनंती करीत असल्याचे किशोर तिवारी स्पष्ट केले आहे . आपण नितीन गडकरी याना पंतप्रधान करा असा आग्रह जाहीरपणे केला होता आता मात्र मला माझे विरोधक अपमानीत करून जर पंतप्रधान गडकरी साहेब झाले असते तर अश्याच प्रकारे शिस्त लावण्याचा प्रकार सर्वच क्षेत्रात लागला असता वाचलो रे बापा असा टोमणा मारतात त्यावेळी नसता मानसिक त्रास विकत घेतल्याचा वेदना होतात याकडे किशोर तिवारी यांनी लक्ष वेधले आहे 
या दंडवसुलीला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच विरोध केला आहे. नव्या मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला आहे; पण नव्या मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या आर्थिक दंडाला माझा व्यक्तिशः विरोध आहे कारण लायसन्स नसताना गाडी चालवली तर ५ हजार रुपयांचा दंड त्याबरोबर ,अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही तर २ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.,अपात्र होऊन वाहन चालवल्यास १० हजार रु. दंड,भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.,धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं तर ५ हजार रुपयांचा दंड ,दारू पिऊन गाडी चालवली तर १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.,स्पीडिंग किंवा रेसिंग केलं तर ५ हजार रुपयांचा दंड आहे.,परवाना नसताना वाहन चालवलं तर १० हजार रुपयांचा दंडलायसन्सचे नियम तोडले तर २५ हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे.,वाहनात जास्त सामान भरलं तर २ हजार रुपयांहून जास्त दंडाची तरतूद आहे.,वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर एका पॅसेंडरला एक हजार रुपये असा दंड पडेल.,सीटबेल्ट लावला नाही तर १ हजार रुपयांचा दंड आहे.,स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या तर २ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.,हेल्मेट घातलं नाही तर १ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा.,अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर १० हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवलं तर २ हजार रुपयांचा दंड पडेल.,अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात झाला तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवलं जाईल. वाहनाची नोंदणीही रद्द होईल.,नातिकीट प्रवास केला तर ५०० रु. दंड अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. हे जरा जास्त वाटते यावर फेरविचार करावा व जुलमी दंड आकारणी बंद करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी आपले १९७७ पासूनचे मित्र नितीन गडकरींना केली आहे 
===========================================================
================
=============










No comments: